२२ जुलै, २०१६

गेम थेअरी : सवाल नैतिकतेचा (भाग १)

 सवाल नास्तिकाच्या नैतिकतेचा (भाग १)

देवा धर्मा मुळे नैतिकता टिकून राहते असे मानले जाते.  नरक, स्वर्ग, कर्मफळ इत्यादी गोष्टींना घाबरून सामान्य माणसे खरे बोलतात, चोऱ्या, खून, लबाड्या, बलात्कार करत नाहीत असेही म्हणतात. ईश्वराच्या संकल्पाने प्रमाणे कायदा काही सर्व व्यापी - सर्व साक्षी  नाही . कायद्याच्या कचाट्यातून सुटणेही फार सोपे असते. त्यामुळे खरे खोटे कसेही असो - देव धर्म उपयुक्त आहेत - कारण त्यामुळे नीतिमत्ता आणि सचोटी टिकते असे  म्हटले जाते.  प्रस्तुत लेखात आपण विज्ञान, गणित आणि जीवशास्त्र नैतिकतेकडे कसे पाहते ? याची चर्चा करायची आहे.

दोन माणसांनी एकमेकांशी कसे वागावे ? याचे नियम म्हणजे नैतिकता . आपण येथे गेम थेअरीतले दोन कैद्यांचे प्रसिद्ध उदाहरण पाहायचे आहे. समजा....

गेम थेअरी

बबन  आणि मगन  असे दोन चोर आहेत. त्यांनी एक मोठा दरोडा घातला . हे दोन्ही चोर अतिशय बुद्धिवादी आणि नास्तिक आहेत असे आपण गृहीत धरायचे आहे. पोलिसांनी त्या चोरांना पकडले आहे. दोन वेगवेगळ्या कोठड्यात ठेवलेले आहे . बबन आणि मगन ची स्वतंत्र पोलीस चौकशी सुरू आहे. या दरोड्याला कोणीही साक्षीदार नाही . कोणताही पुरावा नाही . पण बबन आणि मगन पैकी एक जण माफीचा साक्षीदार बनू शकतो .

१) जो गुन्हा कबूल करेल तो माफीचा साक्षीदार ठरेल. त्याला कोणतीही शिक्षा नाही (शून्य  वर्षे ) - दुसर्याला २० वर्ष खडी फोडावी लागेल .

२) दोघांनी गुन्हा कबूल केला तर पोलीस हलकी कलमे लावून पाच वर्षात दोघांनाही  सोडून देतील.

३) मगन  आणि बबन या दोघांनीही गुन्हा मान्य केला नाही   - गप्प राहिले तर - केस चाले स्तवर एखादे वर्ष तुरुंगात काढावे लागेल . साक्षीदार नसल्याने दोघेही वर्षभरात सुटतील .









तिसरा पर्याय सरळच दोघांच्याही फायद्याचा आहे.  दोघे गप्प राहिले तर - वर्षभरात सुटतील . पण हे गणित इतके सोपे नाही . दुसरी बाजू काय निर्णय घेते ? हे दोघांनाही माहीत नाही .  संगनमत करायला पोलीस संधी देत नाहीत.

 एक वर्षाची माफक कैद सुद्धा टाळण्याचा मोह आपल्या सहकार्याला होऊ शकतो . त्यामुळे   मी गप्प राहिलो आणि समोरच्याने गुन्हा कबूल  केला तर ? वीस वर्ष मला तुरुंगाची हवा खावी लागेल - या भीतीने तो धोका कोणीही पत्करणार नाही.  मग  मगन  आणि बबन ने कोणता निर्णय घ्यावा  ? स्वतःचा तोटा कमीत कमी  कसा करावा ? तर्कशास्त्रा नुसार गुन्हा कबूल करणे हाच सेफ गेम आहे . यात फार तर पाच वर्ष शिक्सला होईल किंवा कदाचित लगेच सुटका !

बबन आणि मगन या दोघांनीही गुन्हा कबूल केला !

हा एक अतिशय नैतिक निर्णय दोन अनैतिक दरवडे खोरानी घेतला आहे . त्यांनी बुद्धिवाद वापरला ! तर्कशास्त्र वापरले ! हे अनैतिक स्वार्थीच होता - पण त्यापायी दोघांनीही नैतिक निर्णय घेतला !

पण हे थोडे तोट्याचे आहे - शिवाय मैत्री भावनेशी अनैतिक देखील आहे ... आता थोडे पुढे जाऊ ....


खेळ मांडीयेला 


मगन आणि बबन ला पोलिसांपुढे साक्ष देण्याची एकच संधी होती . नेहमीच्या जीवनात आपल्याला सतत नैतिक निर्णय घ्यायचे असतात. समोरची व्यक्ती कशी वागेल याचा आपण सतत अंदाज घेत असतो. त्यानुसार आपले धोरण ठरवत असतो . त्यातून आपला स्वभाव बनतो . व्यक्तिमत्व बनते . म्हणजे मानवी गेम थेअरीत सातत्य आहे. वारंवारता आहे . आता एक पत्त्याचा डाव मांडूया .....

समजा तुमच्या कडे दोन रंगाचे पत्ते आहेत - सहकार्य आणि विश्वासघात

हे दोन पत्ते म्हणजे तुमचे दोन निर्णय.  हे निर्णय तुम्हाला आयुष्यात वारंवार घ्यायचे आहेत. सहकार्य आणि विश्वासघात . तुम्ही कोणता पत्ता निवडणार ? इथेही समोरचा माणूस काय खेळी खेळणार आहे ते तुम्हाला माहीत नाही .



निर्णय घेणारे दोन पक्ष 



हे निर्णय सतत घेताना तुम्ही काही धोरणे आखू शकता

१) सतत सहकार्य
२) सतत विश्वासघात
३) जशास तसे 
४) अनियमित (रॅन्डम ) चाली खेळायच्या 
५) अचानक केलेली फसवणूक
६) पश्चात्ताप धोरण - आपण फसलेल्या माणसाने सहकार्य केल्यास त्यास पुन्हा नाही फसवायचे
७) सूडाचे धोरण - जो एकदा फसवेल त्यास सतत फसवायचे

इत्यादी ....

पण या खेळात केवळ दोन पक्षी नाहीत . अनेक आहेत . खर्या आयुष्यातील निर्णय घेताना देखील अनेक पक्ष आहेत. कोण जिंकेल ?



संगणकीय प्रयोग 

रॉबर्ट अक्सेलरॉड  या अमेरिकन शास्त्रज्ञाने कॉम्पुटर प्रोग्राम वापरून हा प्रयोग केला . त्याने एकूण पंधरा शास्त्रज्ञाना यात सहभागी केले . हे सर्व गेम थेअरी मधील तज्ञ होते .  सहकार्य की  विश्वासघात ? आणि त्यांचा क्रम काय असला तर अंतिम विजय प्राप्त होईल ? पंधरा वेगवेगळी धोरणे कॉम्प्युटर ला फीड केली. सर्व धोरणांना एकमेकांशी दोनशे वेळा खेळवले. 


-----------------------------------------------------------
प्रोग्रामचे नियम : - 

दोघांनी सहकार्य केले तर दोघांना १०० मार्क
एकाने दगा केला आणि समोरच्याने सहकार्य केले - तर पराभूतला शून्य  मार्क , विजेत्याला १०० मार्क
दोघांनी दगा केला तर दोघांनाही  ५० - ५० मार्क


या १५ धोरणांनी एकदा स्वतः:शी देखील खेळायचे होते - म्हणजे १५ X   १५ = २२५ लढती 
प्रत्येकी दोनशे वेळा ४५००० लढती  झाल्या 

या इतक्या शक्यतांत ज्या धोरणाला जास्त मार्क मिळतील ते विजेते धोरण 
----------------------------------------------------------




सतत विश्वासघात करणारे या खेळात टिकू शकत नाहीत . जशास तसे वाले जिंकू लागतात . त्यांचे परस्परांशी सहकार्य निर्माण होते - आणि मग सतत विश्वास घात  करणारे अल्पसंख्य बनून हरू लागतात . कारण ते कोणाशीच सहकार्य करत नाहीत . (इतर विश्वास घात  वाल्यांशी सुद्धा नाही )

रॉबर्ट च्या संगणकीय प्रयोगात प्रयोगात जशास तसे हे धोरण जिंकले . आणि गंमत म्हणजे या पंधरा पैकी जी लबाड धोरणे होती ती शेवटच्या नंबरात आली . सज्जन धोरणे पहिल्या सात मध्ये आली .



दुसरा संगणकीय प्रयोग 

एक प्रयोग करून रॉबर्ट थाबला नाही. पहिल्या प्रयोगात एक त्रुटी राहून गेली होती . इतरांची धोरणे सहभागी शास्त्रज्ञाना माहीत नव्हती . साधारणतः कोणती धोरणे जिंकतात याचाही अंदाज नव्हता. हा अंदाज आल्यावर मग पुन्हा नवी धोरणे मागवली .

 त्यातले एक प्रसिद्ध धोरण , दोनदा फसवल्यास एकदा शिक्षा - असे उदारमत वादी - दुसर्याला सुधारायची एक संधी देणारे - पण सतत बदमाशी करणार्यांना धडा शिकवणारे असे होते

सज्जन धोरणे जिंकतात या पहिल्या निकालाच्या अंदाजाने इतर लोक सज्जन धोरणेच पाठवतील असा अंदाज बहुतेक गेम थेअरी वाल्या सहभागी शास्त्रज्ञानी केला . आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून  यावेळी आलेली बरीच धोरणे ही लबाड आणि बदमाश होती . पुन्हा दोनशे वेळा खेळ मांडीयेला .... या प्रयोगाचा निर्णय अजूनच विचित्र लागला !

फसवणार्या लबाडाची संख्या फार जास्त होती . त्यामुळे .... 

१) जशास तसे वाले बर्याच वेळेस लबाडी करू लागले - सूड वाले सूड चक्रात अडकले -  लबाडाची संख्या अजूनच वाढली

२) सज्जन धोरणे हरली .

३) दोनदा फसवल्यास एकदा शिक्षा वाल्याचे देखील काही चालेना . त्याला सतत बहुसंख्येकडून  फसवणूक झाल्याने हरावे लागले.

आजूबाजूच्या परिस्थिती वरून आणि समाजातील इतर धोरणावरून जय / पराजय ठरत होता . 




आता जीवशास्त्रीय प्रयोग 

मानवी व्यवहार म्हणजे कॉम्प्युटर चा प्रोग्राम नाही. मानवी व्यवहार अधिक जटील आहेत. याहून अधिक धक्कादायक निष्कर्ष  हाती लागणार आहेत .... त्यानंतर आपण ट्रेनचा प्रयोग पाहणार आहोत ...

(क्रमश:)




गेम थेअरी : सवाल नैतिकतेचा (भाग १)

 सवाल नास्तिकाच्या नैतिकतेचा (भाग १)

देवा धर्मा मुळे नैतिकता टिकून राहते असे मानले जाते.  नरक, स्वर्ग, कर्मफळ इत्यादी गोष्टींना घाबरून सामान्य माणसे खरे बोलतात, चोऱ्या, खून, लबाड्या, बलात्कार करत नाहीत असेही म्हणतात. ईश्वराच्या संकल्पाने प्रमाणे कायदा काही सर्व व्यापी - सर्व साक्षी  नाही . कायद्याच्या कचाट्यातून सुटणेही फार सोपे असते. त्यामुळे खरे खोटे कसेही असो - देव धर्म उपयुक्त आहेत - कारण त्यामुळे नीतिमत्ता आणि सचोटी टिकते असे  म्हटले जाते.  प्रस्तुत लेखात आपण विज्ञान, गणित आणि जीवशास्त्र नैतिकतेकडे कसे पाहते ? याची चर्चा करायची आहे.

दोन माणसांनी एकमेकांशी कसे वागावे ? याचे नियम म्हणजे नैतिकता . आपण येथे गेम थेअरीतले दोन कैद्यांचे प्रसिद्ध उदाहरण पाहायचे आहे. समजा....

गेम थेअरी

बबन  आणि मगन  असे दोन चोर आहेत. त्यांनी एक मोठा दरोडा घातला . हे दोन्ही चोर अतिशय बुद्धिवादी आणि नास्तिक आहेत असे आपण गृहीत धरायचे आहे. पोलिसांनी त्या चोरांना पकडले आहे. दोन वेगवेगळ्या कोठड्यात ठेवलेले आहे . बबन आणि मगन ची स्वतंत्र पोलीस चौकशी सुरू आहे. या दरोड्याला कोणीही साक्षीदार नाही . कोणताही पुरावा नाही . पण बबन आणि मगन पैकी एक जण माफीचा साक्षीदार बनू शकतो .

१) जो गुन्हा कबूल करेल तो माफीचा साक्षीदार ठरेल. त्याला कोणतीही शिक्षा नाही (शून्य  वर्षे ) - दुसर्याला २० वर्ष खडी फोडावी लागेल .

२) दोघांनी गुन्हा कबूल केला तर पोलीस हलकी कलमे लावून पाच वर्षात दोघांनाही  सोडून देतील.

३) मगन  आणि बबन या दोघांनीही गुन्हा मान्य केला नाही   - गप्प राहिले तर - केस चाले स्तवर एखादे वर्ष तुरुंगात काढावे लागेल . साक्षीदार नसल्याने दोघेही वर्षभरात सुटतील .









तिसरा पर्याय सरळच दोघांच्याही फायद्याचा आहे.  दोघे गप्प राहिले तर - वर्षभरात सुटतील . पण हे गणित इतके सोपे नाही . दुसरी बाजू काय निर्णय घेते ? हे दोघांनाही माहीत नाही .  संगनमत करायला पोलीस संधी देत नाहीत.

 एक वर्षाची माफक कैद सुद्धा टाळण्याचा मोह आपल्या सहकार्याला होऊ शकतो . त्यामुळे   मी गप्प राहिलो आणि समोरच्याने गुन्हा कबूल  केला तर ? वीस वर्ष मला तुरुंगाची हवा खावी लागेल - या भीतीने तो धोका कोणीही पत्करणार नाही.  मग  मगन  आणि बबन ने कोणता निर्णय घ्यावा  ? स्वतःचा तोटा कमीत कमी  कसा करावा ? तर्कशास्त्रा नुसार गुन्हा कबूल करणे हाच सेफ गेम आहे . यात फार तर पाच वर्ष शिक्सला होईल किंवा कदाचित लगेच सुटका !

बबन आणि मगन या दोघांनीही गुन्हा कबूल केला !

हा एक अतिशय नैतिक निर्णय दोन अनैतिक दरवडे खोरानी घेतला आहे . त्यांनी बुद्धिवाद वापरला ! तर्कशास्त्र वापरले ! हे अनैतिक स्वार्थीच होता - पण त्यापायी दोघांनीही नैतिक निर्णय घेतला !

पण हे थोडे तोट्याचे आहे - शिवाय मैत्री भावनेशी अनैतिक देखील आहे ... आता थोडे पुढे जाऊ ....


खेळ मांडीयेला 


मगन आणि बबन ला पोलिसांपुढे साक्ष देण्याची एकच संधी होती . नेहमीच्या जीवनात आपल्याला सतत नैतिक निर्णय घ्यायचे असतात. समोरची व्यक्ती कशी वागेल याचा आपण सतत अंदाज घेत असतो. त्यानुसार आपले धोरण ठरवत असतो . त्यातून आपला स्वभाव बनतो . व्यक्तिमत्व बनते . म्हणजे मानवी गेम थेअरीत सातत्य आहे. वारंवारता आहे . आता एक पत्त्याचा डाव मांडूया .....

समजा तुमच्या कडे दोन रंगाचे पत्ते आहेत - सहकार्य आणि विश्वासघात

हे दोन पत्ते म्हणजे तुमचे दोन निर्णय.  हे निर्णय तुम्हाला आयुष्यात वारंवार घ्यायचे आहेत. सहकार्य आणि विश्वासघात . तुम्ही कोणता पत्ता निवडणार ? इथेही समोरचा माणूस काय खेळी खेळणार आहे ते तुम्हाला माहीत नाही .



निर्णय घेणारे दोन पक्ष 



हे निर्णय सतत घेताना तुम्ही काही धोरणे आखू शकता

१) सतत सहकार्य
२) सतत विश्वासघात
३) जशास तसे 
४) अनियमित (रॅन्डम ) चाली खेळायच्या 
५) अचानक केलेली फसवणूक
६) पश्चात्ताप धोरण - आपण फसलेल्या माणसाने सहकार्य केल्यास त्यास पुन्हा नाही फसवायचे
७) सूडाचे धोरण - जो एकदा फसवेल त्यास सतत फसवायचे

इत्यादी ....

पण या खेळात केवळ दोन पक्षी नाहीत . अनेक आहेत . खर्या आयुष्यातील निर्णय घेताना देखील अनेक पक्ष आहेत. कोण जिंकेल ?



संगणकीय प्रयोग 

रॉबर्ट अक्सेलरॉड  या अमेरिकन शास्त्रज्ञाने कॉम्पुटर प्रोग्राम वापरून हा प्रयोग केला . त्याने एकूण पंधरा शास्त्रज्ञाना यात सहभागी केले . हे सर्व गेम थेअरी मधील तज्ञ होते .  सहकार्य की  विश्वासघात ? आणि त्यांचा क्रम काय असला तर अंतिम विजय प्राप्त होईल ? पंधरा वेगवेगळी धोरणे कॉम्प्युटर ला फीड केली. सर्व धोरणांना एकमेकांशी दोनशे वेळा खेळवले. 


-----------------------------------------------------------
प्रोग्रामचे नियम : - 

दोघांनी सहकार्य केले तर दोघांना १०० मार्क
एकाने दगा केला आणि समोरच्याने सहकार्य केले - तर पराभूतला शून्य  मार्क , विजेत्याला १०० मार्क
दोघांनी दगा केला तर दोघांनाही  ५० - ५० मार्क


या १५ धोरणांनी एकदा स्वतः:शी देखील खेळायचे होते - म्हणजे १५ X   १५ = २२५ लढती 
प्रत्येकी दोनशे वेळा ४५००० लढती  झाल्या 

या इतक्या शक्यतांत ज्या धोरणाला जास्त मार्क मिळतील ते विजेते धोरण 
----------------------------------------------------------




सतत विश्वासघात करणारे या खेळात टिकू शकत नाहीत . जशास तसे वाले जिंकू लागतात . त्यांचे परस्परांशी सहकार्य निर्माण होते - आणि मग सतत विश्वास घात  करणारे अल्पसंख्य बनून हरू लागतात . कारण ते कोणाशीच सहकार्य करत नाहीत . (इतर विश्वास घात  वाल्यांशी सुद्धा नाही )

रॉबर्ट च्या संगणकीय प्रयोगात प्रयोगात जशास तसे हे धोरण जिंकले . आणि गंमत म्हणजे या पंधरा पैकी जी लबाड धोरणे होती ती शेवटच्या नंबरात आली . सज्जन धोरणे पहिल्या सात मध्ये आली .



दुसरा संगणकीय प्रयोग 

एक प्रयोग करून रॉबर्ट थाबला नाही. पहिल्या प्रयोगात एक त्रुटी राहून गेली होती . इतरांची धोरणे सहभागी शास्त्रज्ञाना माहीत नव्हती . साधारणतः कोणती धोरणे जिंकतात याचाही अंदाज नव्हता. हा अंदाज आल्यावर मग पुन्हा नवी धोरणे मागवली .

 त्यातले एक प्रसिद्ध धोरण , दोनदा फसवल्यास एकदा शिक्षा - असे उदारमत वादी - दुसर्याला सुधारायची एक संधी देणारे - पण सतत बदमाशी करणार्यांना धडा शिकवणारे असे होते

सज्जन धोरणे जिंकतात या पहिल्या निकालाच्या अंदाजाने इतर लोक सज्जन धोरणेच पाठवतील असा अंदाज बहुतेक गेम थेअरी वाल्या सहभागी शास्त्रज्ञानी केला . आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून  यावेळी आलेली बरीच धोरणे ही लबाड आणि बदमाश होती . पुन्हा दोनशे वेळा खेळ मांडीयेला .... या प्रयोगाचा निर्णय अजूनच विचित्र लागला !

फसवणार्या लबाडाची संख्या फार जास्त होती . त्यामुळे .... 

१) जशास तसे वाले बर्याच वेळेस लबाडी करू लागले - सूड वाले सूड चक्रात अडकले -  लबाडाची संख्या अजूनच वाढली

२) सज्जन धोरणे हरली .

३) दोनदा फसवल्यास एकदा शिक्षा वाल्याचे देखील काही चालेना . त्याला सतत बहुसंख्येकडून  फसवणूक झाल्याने हरावे लागले.

आजूबाजूच्या परिस्थिती वरून आणि समाजातील इतर धोरणावरून जय / पराजय ठरत होता . 




आता जीवशास्त्रीय प्रयोग 

मानवी व्यवहार म्हणजे कॉम्प्युटर चा प्रोग्राम नाही. मानवी व्यवहार अधिक जटील आहेत. याहून अधिक धक्कादायक निष्कर्ष  हाती लागणार आहेत .... त्यानंतर आपण ट्रेनचा प्रयोग पाहणार आहोत ...

(क्रमश:)




१९ जुलै, २०१६

विज्ञान विरुद्ध छद्म विज्ञान : Causation Vs Correlation

विज्ञान विरुद्ध छद्म विज्ञान :
छद्म म्हणजे खोटारडे . विज्ञान आहे असे सोंग आणते पण खरे पाहता जी एक अंधश्रद्धा असते त्याला छद्म विज्ञान म्हणतात. उदाहरणार्थ अमेरिकेतील बहुसंख्य लोकांचा एलियन वर विश्वास आहे . अनेकांची श्रद्धा देखील आहे . परग्रहावरील जीव उडत्या तबकड्यातुन पृथिवीवर येतात असे त्यांना मनापासून पटले आहे. ते सर्व खोटे बोलतात काय ?.... नाही .

ललित साहित्य सिनेमे याचा मानवी मनावर परिणाम होत असतोच. त्याला काही विचित्र अनुभवाची जोड देऊन आपण आपली मते बनवतो. विज्ञानात ज्याप्रमाणे तर्क असतात त्याप्रमाणे तर्क छद्म विज्ञानात असतात . श्रद्धेत असतात आणि अंध श्रद्धेत सुद्धा तर्क असतातच . तर्क करण्याची पद्धत मात्र चुकलेली असते.




अमेरिकेत उडत्या तबकड्या दिसण्याचा एक काळ होता. १९८० सालच्या दहशकात अमेरिकेत एलियन येण्याचे प्रमाण वाढले होते. अनेक वर्तमानपत्रातून त्यावर लेख येत . उडत्या तबकड्यांचे फोटोही छापून येत. एलियन पाहिल्याचे दावे करणारे महापुरुष भाषणे करत . पुस्तके लिहीत पैसेही कमावत . त्यातले काही लोक्स लबाड धरले तरी सगळेच खोटारडे होते असे म्हणता येणार नाही. एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घावी लागेल , ती म्हणजे १९८० च्या दशकात एलियन ने गर्दी केली पुढे गायब झाले ! हे एलियन मुख्यतः अमेरिकेत येत .. इतर देशाचा व्हिजा त्यांकडे नसावा अथवा एलियन लोकांना अमेरिकन बर्गर आवडत असावेत ! कारण इतर देशात उडत्या तबकड्या अभावानेच दिसल्या !





१९८० च्या दशकात अमेरिकन संरक्षण संस्था - पेन्टयागोंन - एका नवीन प्रकारच्या विमानावर गुप्तपणे काम करत होती - स्टेल्थ विमान . हे विमान लांबून उडत्या तबकडी सारखे दिसते . हा कार्यक्रम पूर्ण झाला . विमाने लष्करात दाखल झाली . आणि एलियन नि अमेरिकेतून गाशा गुंडाळला ! त्यानंतर एकही उडत्या तबकडीच्या नोंद नाही ! ( संबंधित बातमी Click Here )

इथे अमेरिकन लोकांनी केलेला तर्क बरोबर आहे . एखादी विचित्र उडती वस्तू आकाशात दिसली की तिचा संबंध परग्रहावरील प्राण्यांशी लावणे यात तर्क आहेच ! तर्क करण्याची पद्धत चुकलेली आहे .




----------------------------------
Causation Vs Correlation : 

कार्यकारण भाव विरुद्ध सहसंबंध
----------------------------------

इथे कार्य कारण भाव आणि सहसंबंध यातील फरक समजावून घ्यावा लागेल. दोन घटना एका मागोमाग एक घडल्या की मानवी मन त्यात संबंध जोडते. मांजर आडवी गेल्यावर अपशकुन होतो हा असाच जोडलेला संबंध आहे . दिवसभरात काही बर्या वाईट घटना घडतातच . त्यातील वाईट घटना सकाळच्या रस्ता क्रॉस करणाऱ्या मांजरावर टाकता येतातच ! यात तर्क आहेच पण अमेरिकन एलियन प्रमाणेच तर्क करण्याची पद्धत चुकली आहे . चांगली तारीख , मुहूर्त , लकी कलर , लकी डे या सर्वात सहसंबंध (correlation) असते पण त्यामागे (causation) कार्य कारण भाव नसतो.

कार्य कारण भाव म्हणजे काय ?

अपशकुन नेमका मांजरा मुळेच झाला हे सिद्ध करावे लागते. त्यासाठीचे एक साधन गणित आणि संख्याशास्त्र आहे . शंभर मांजरे शंभर माणसापुढून गेली , शंभर माणसापुढून डुकरे , शंभरा पुढून गायी गेल्या ... कोणाचा दिवस कसा गेला ? किती वाईट घटना घडल्या ? किती चांगल्या घटना घडल्या ?
त्या सर्वांची निरीक्षणे घेतली पाहिजेत .
त्यातून मग मांजराचे अपशकुनी असणे किंवा नसणे सिद्ध होते . व्यक्तिगत अनुभवा वरून तर्क करणे चूक आहे . त्यासाठी गणिती किंवा सांख्यिकी पाद्धत वापरली पाहिजे .
अजून एक पद्धत म्हणजे एखाद्या सिस्टीम मध्ये मुद्दाम मांजर सोडायची किंवा काढून घ्यायची ! म्हणजे रोज सकाळी उठल्यावर मांजर आडवी गेलीच पाहिजे याची व्यवस्था करायची - मग पाहायचे ! काय घडते दिवसभरात ? किंवा ज्या दिवशी काही वाईट घडणार आहे याची खात्री आहे - त्यादिवशी सोसायटीतल्या सर्व मांजरी जेल मध्ये टाकायच्या ! नेमके ठरवले पाहिजे अपशकुन नेमका मांजरा मुळे की अजून कशामुळे ?
अशाप्रकारे वेगवेगळ्या वैज्ञानिक पद्धती वापरून कार्य कारण भाव सिद्ध करावा लागतो .

--------------------------

श्रद्दा , अंधश्रद्धा , वेदातली विमाने आणि डाव्या लोकांच्या सोशल थेअर्या - या सार्या सहसंबंध - (correlation) वर आधारालेल्या आहेत . त्यामुळे ते छद्म विज्ञान आहे. विज्ञान नाही . कारण त्यात कार्य कारण भाव नाही .
विज्ञान ही विचार करायची पद्धती आहे . त्यातला प्रमुख भाग म्हणजे कार्य कारण भाव शोधणे आणि सतत तपासत राहणे.

१८ जुलै, २०१६

संस्कार की अनुवंश ? : नेचर विरुद्ध नर्चर

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *