१२ डिसें, २०१४

संघाचे धर्मांतर …. विरोधी पक्षांचा गदारोळ आणि काही मूलभूत प्रश्न


७ प्रश्न कोकुमम्मा च्या विचारासाठी  आणि   प्रश्न हिंदुत्व वाद्यांच्या विचारासाठी 
 .
पार्श्वभूमी : लोकसत्ताच्या ११ डिसेंबर २०१४ च्या बातमिनुसार २०० मुस्लिमाना संघाने हिंदु करून घेतले. दोन्ही (को)न्ग्रेस ,(क)म्युनिस्ट, बंगालची (म)मता आणि (मा)यावती कोकुममा यांच्या पक्षांनि लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ घातला . या पक्षाना एकत्रित रित्या कोकुममा म्हणुया . विरोध करताना कोकुममा कारणे देत होते कि या हिंदु धर्मांतरामुळे ताणाव वाढेल , संघाने आधार कार्डाची लालूच दाखवली इत्यादी.

भारताची घटना त्यातला सेक्युलारीझम आणि धर्म् - स्वातंत्र्य हे सर्व भारताच्या  हिताचे आहे । हे तुम्हाला कधी कळणार ? हा बौद्धिक दुबळेपणा कधी सोडणार ?
.
यातून काही मुलभूत धार्मिक -राजकीय - सामजिक प्रश्न उभे राहतात . त्यांचा अतिशय तटस्थ पणे विचार करुया .
७ प्रश्न कोकुमम्मा च्या विचारासाठी : 

१) धर्मांतर हा घटनेने दिलेला हक्क आहे . मुस्लिमांना हा घटनादत्त मूलभूत अधिकार नाकारणारे कोकुममा कोण ?
.
२) यावेळी संघाने केवळ २०० लोकाना हिंदु केले आहे । या आधी लाखोंच्या संख्येने ख्रिश्चन आणि मुस्लिमांनी हिंदुचे धर्मांतर केलेले आहे . त्यावेळी कोकुममा चे प्रश्न आणि गोंधळ कोठे गुप्त झाला होता ?
.
३) आधार कार्ड देतो अशी लालूच दाखवून संघाने धर्मांतर घडवले असा या पक्षांचा आक्रोश आहे . या आधी जी हिंदुंचि धर्मांतरे ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मात झाली ती सर्वच्या सर्व तौलनिक धर्म शास्त्रांचा विद्यापीठीय अभ्यास करून झाली होती काय ? रेव्हरंड टिळ्कांसार्खे अपवाद वगळता ९९.९९९% धर्मातारे हि भीती किंवा लालुच यामुळेच होतात. पाद्र्यांचि पाव भिस्कुटे आणि मौलविंचा (लग्नाळू लव्ह ) दबाव राहिला एका बाजूला . मुळात सारे धर्मच लालूच दाखवतात . जन्नतची लालूच . जहन्नुमची भीती . स्वर्ग - नर्क - मोक्ष - पुनर्जन्म - दु:खमुक्ती यांची भीती किवा लालूच दाखवल्याशिवाय कोण्यातरी धर्माचे दुकान चालेल काय ?
.
४) जमाते इसलामीचे दावत आणि इस्लाम सर्वांसाठी असे धर्मांतर अभियान सध्या चालू आहे. मागे जॉनी लिव्हर आणि नगमाने मुंबईभर मोठमोठाली पोस्टर लावून ख्रिस्ती धर्मप्रचार चालवला होता . तेव्हा कोकुममा आणि त्यांचे भाडोत्री विचारवंत काय करत होते ?
.
५) यात खरे विवस्त्र झाले ते कम्युनिस्ट . धर्म हि जर अफूची गोळी आहे तर अफूचा ब्रेंड बदलल्याने तुम्हाला काय फरक पडतो ? अल्प्संख्यकांच्या सहान्भूतीचे हे फ्लोप नाटक कोकुममा किती वेळ करणार ?
.
६)हिंदुनि भारतीय धर्मात केलेले धर्मांतर आणि उपरोक्त धर्मांतर यातला फरक   आहे   ?   हिंदु - मुस्लिम - ख्रिस्ती धर्मांतराचा संबध बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म स्वीकाराशी करण्याचा मुर्खपणा कोकुममा करणार आहेत काय ? सामाजिक न्यायासाठी बाबासाहेबांनी केलेले योग्य कृत्य आणि उपरोक्त राजकीय वशिलेबाजीतला फरक कोकुममा ला कळणार काय ?
.
७ )अशा प्रकारे सतत हिंदु जन विरोधी आणि इस्लाम धर्म धार्जिणी भूमिका घेतली तर कोकुममा पैकी एखाद्याला… निदान विरोधी पक्षनेता होण्याएव्हढ्या सीटा तरी भारतीय लोकसभेत मिळतील काय ?


--------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी इथे धर्म सुधारणाबद्दल बोलत नसून …. कोकुमम्मा च्या दुटप्पी धर्मांधतेबद्दल बोलत आहे . मुस्लिमाना धर्मांतराचा मुलभुत हक्क नाकारणार्या कोकुमम्मा फेसिझम बद्दल बोलत आहे … बाकी तणाव दबाव हे अपवाद आहेत …इथेहि आणि तिथेही … धर्म हि एक अतिशय सामान्य आणि फालतू गोष्ट आहे आणि ती दिवसातून पाच वेळा बदलली तरी चालते . सोडली तरी चालते . किंबहुना हिंदु समाजाच्या हितासाठी त्यांनी मनुस्मृती जाळली पाहिजे असेच आमचे मत आहे. हिंदू समाजाचे हित …… आणि ……. सनातनी हिंदु धर्मवाद यातला फरक स्पष्ट करण्यात पुरोगामी अपयशी ठरले आहेत . कारण हिंदु या शब्दाचाच वांझोटा " कुत्सित " द्वेष करणारी   विचारसरणी त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

मी अतिशय काळजीपूर्वक वरील प्रश्न विचारले आहे . सहसा असे प्रश्न सनातनी विचारतात पण त्यांचा मुद्दा असतो कि … हिंदु धर्मातच सुधारणा का ? हिंदुचेच अंधश्रद्धा निर्मुलन का ? सानातन्यांचे विक्षिप्त म्हणने आहे कि " … जो तो उठतो तो हिंदूंनाच शहाणपण काय म्हणुन शिकवतो ? हिंदूच्याच सुधारणा काय म्हणुन ? अंधश्रद्धा निर्मुलन फक्त हिंदुचेच का ? विकास फक्त हिंदुचाच का ? प्रगती फक्त हिंदुचीच का ? प्रगतिपथावर फक्त हिंदूच का ? हिन्दुनाहि बहुपत्नित्वाचा , धर्माधतेचा , अस्पृश्यतेचा , मागासलेपणाचा, दारिद्र्याचा , भोळसट्पणाचा आणि गरिबिचा पुर्ण हक्क आहे ! आणि तो आम्ही हिन्दु मिळवणारच"
.--------------------------------------------------------------------------------------------------------------------


७ प्रश्न हिंदुत्व वाद्यांच्या विचारासाठी :


हिदुत्व वादि लोक्स धर्मांतर बंदी कायद्याचा पुनरुच्चार करत आहेत । तसे झाले तर हा घटनेने दिलेल्या मुलभुत धर्म स्वातंत्र्यावर घाला असेल।  ७ प्रश्न हिंदुत्व वाद्यांच्या विचारासाठी :

हिंदु सबलिकरणाचि भाषा करणार्यांना संख्या हे एक बळ हे समजत नाही ? जर समजत असेल तर मग हिंदु पर्सेंटेज आहे तेव्हढेच ठेवण्याचा धर्मांतर बंदी कायदा का ?
.
१)श्रद्धा हि डोक्यात असते कागदी सर्टिफ़िकेटात नाही । आणि विचारावर बंदि घालता येत नाहि. बौद्धिक चर्चा करून स्वधर्माची महती पटवून द्यायला काय अडचण आहे ? कि काही विशिष्ट मुद्द्यावर चर्चा आणि आत्म्परिक्षण कठीण जाते आहे ?
.
२) आज हिंदुत्व वादि पुर्ण बहुमताने सत्तेत आहेत . हा देश शत प्रतिशत हिंदु बनवायची सुवर्णसंधी चालून आलेली आहे . हिंदु लोक सत्ता संपत्ति साधने आणि माध्यमे या बाबतीत इसाई आणि मुस्लिमांपेक्षा कितीतरी अधिक सरस आहेत . मग हि भित्रट वृत्ती का ? धर्मप्रसार करणे हा हिंदुचाहि मुलभूत घटनादत्त हक्क आहे … तो तुम्हाला का गमवायचा आहे ? सारी सत्ता हातात असताना मिश्नर्यांसमोर का गुढगे टेकताय ? हे क्लैब्य आहे … आणि हि मानसिक कमजोरी हिंदुचा सर्वनाश घडवण्यास पुरेशी आहे . बाहेरच्या शत्रुंची गरज नाही .
.
३) धर्मांतर केले कि नव्या धर्मांतरीत व्यक्तिस कोणती जात द्यावी ? कर्मविपाक सिद्धांताने गेल्या जन्मीचे फळ म्हणुन मिळणारी जात कशी शोधावी ? सर्व धर्म सारखीच शिकवण देतात ? अशा भाकड प्रश्नातून हिंदुनि यापूर्वी कधीही धर्मप्रसार केला नाही । त्यात सहिष्णुतेचा भाग कमी आणि मानसिक क्लैब्याचा भाग अधिक आहे . या मानसिक कमजोरीतून बाहेर पडल्याशिवाय हिंदू समाज , त्याचे समाजकारण आणि राजकारण कधीही बलवान होऊ शकत नाही .
.
४) हम पाच हमारे पच्चीस वरून मुस्लिमांविरुद्ध बोंब ठोकायची आणि हिंदुनि दहा मुले जन्माला घालावीत असे आदेश काढायचे … यापेक्षा बरे उपाय संख्या वाढवायला मिळत नाहीत का ? कुटुंबाची लोकसंख्या लग्नाच्या संख्येवर अवलंबुन असते-- समाजाची नाही . एव्हढे साधे सत्य समजत नाही ? निसर्गात: स्त्रीपुरुष प्रमाण समान असते … एकाने पाच लग्ने केली तर उरलेले चार पुरुष विधुर राहतात हे तरी समजते का ? समाजाची लोकसंख्या त्या समाजातील स्त्रियांच्या लोकसंख्येवर अवलंबुन असते … लग्नावर नाही …। हिंदुतलि स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे हा लोकसंख्या वाढवायचा शास्त्रीय मार्ग आहे. पर हजारी स्त्रियांची संख्या मुस्लिमात जास्त आहे…कारण त्यांत स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण नगण्य आहे …। या बाबतीत त्यांची बरोबरी करायला कधी आदेश का नाही आला ?
.
५) स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे यासारखे हिंदु सबलीकरणाचे साधे सोपे शास्त्रीय मार्ग सोडुन द्यायचे आणि … कुटुंबनियोजन नको म्हणुन रडायचे … धर्मांतर बंदी कायद्याची वकिली करायची आणि मग हिंदुराश्ट्र म्हणुन रडायचे … हा बौद्धिक भित्रेपणा कधी सोडणार ?
6) आपला धर्म इतरांना सामावून घेण्याची शक्ती गमावून चुकला आहे … मठ मंदिराच्या आवारात आणि बाबा बुवांच्या परसात धर्माची वाढ खुंटली आहे … वाढ करायची नाही … या भ्याडपणातुन सर्वच धर्म सारखी शिकवण देतात … हि बुळचट विचारसरणी हिंदुत जन्माला आली . धर्मांतर केले तरी ते किती वेळ टिकेल याची ग्यारेंटि नाही … म्हणुन कायद्याची नाटके चालू आहेत… सध्याच्या हिंदु सरकारला एक कायदा करून मंदिरातले हजारो कोटींचे धन त्यांच्या घर वाप्सिला वापरता येईल … हिंदुचा पैसा हिदुधर्माच्या वाढीसाठीच वापरल्याचे पुण्य पण मिळेल . असे होईल का ?
.
7) बहुसंख्य ख्रिस्ती धर्मांतर हे रोग बरे करणारे येशूचे पाणि वाटुन होते . अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याचा योग्य वापर केला तर ख्रिस्ती धर्मांतर पूर्णपणे थांबवता येईल हे सनातनी बाल्बुद्धीना सुचेल काय ? त्याच कायद्याचा वापर करून शौर्य दाखवणार कि भित्र्या भागुबाई प्रमाणे अंधश्रद्धा विरोधी कायद्याच्या नावाने रडत बसणार ?

.जर एखाद्याने मनातून हिंदु धर्म सोडला तर कागदी सर्टिफ़िकेटला कोण विचारतो ? कागदोपत्री हिंदु असलेले लोक्स हिदुत्व वादि असतात काय ? नव्या युगात आत्मपरिक्षण धर्मसुधारणा हि टिकण्याची साधने आहेत …. भ्याड कायदे नाही … इव्होल्युशन आणि नास्तिकता अंशत: तरी मान्य करणार्या ख्रिस्ती पोप ला हे कळले …भारताची घटना त्यातला सेक्युलारीझम आणि धर्म् - स्वातंत्र्य हे सर्व हिंदु हिताचे आहे । हे तुम्हाला कधी कळणार ? हा बौद्धिक दुबळेपणा कधी सोडणार ?


. Dr Abhiram Dixit
.

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *