२० एप्रि, २०१५

हिटलरचा भारत द्वेष !

हिटलरचा भारत द्वेष !

हिटलरचे माइन काम्फ हे आत्मचरित्र भारतात तुफान विकले जाते. जर्मनीत त्यावर बंदि आहे. महाराष्ट्राचे हिटलर प्रेम जरा ओसांडुनच वाहते. त्याचे मराठी चरित्र हे बेस्ट सेलर पुस्तक आहे.   आर्यधर्मोध्दारक सदा सन्माननिय महापुरुष हिटलर यांच्या 126 व्या जयंती निमित्त सादर नमन !!!!! अशा अर्थाच्या पोस्ट हिटलरच्या जयंती निमित्त सोशल मिडियावर फिरत होत्या .

१९३० साली हिटलर म्हणतो ' भारताच्यास्वातंत्र्य  लढ्याचे कौतुक मला नाहि. भारतीय वंश हीन दर्जाचा आहे. इंग्रज शुद्ध नॉर्डिक  वंशीय आहेत . आणि नीच जातीच्या स्वातंत्र्य वादि भारतीयांना इंग्लंडने हवे तसे हाताळावे.  पहिल्यांदा  त्या गांधीला गोळी घाला , नाही भागल इतर महत्वाच्या डझनभर स्वातंत्र्य  सैनिकाना मारा, डझनाने काम झाल नाही, तर दोनशे लोकांना मारा, आणि आवश्यक वाटल्यास अजूनही …. (संदर्भ १)

सुभाषबाबना त्याने कैक दिवस भेटच दिली नाही . महत्प्रयासाने जेंव्हा तो भेटला तेंव्हा " भारताला रशिया जिंकेल म्हणून रशियाशी युद्ध केले पाहिजे इंग्लंडशि नाही वगैरे असंबद्ध बडबड त्याने सुरु केली …सुभाषबाबू लिहितात - या माणसाशी गंभिर राजकीय चर्चा करणेच अवघड आहे !



हिटलर हा एक मूर्ख आणि आक्रस्ताळी मनुष्य होता . तत्कालीन अध:पतित युरोपीय संस्क्रुतित  तो जर्मनीत लोक प्रिय ठरला यात काही नवल नाही . हिटलर चा सर्व विचार हा वंश श्रेष्ठत्व - वंशवाद  याभोवती फिरत राहतो. आज विज्ञानाने ते सर्व फोल ठरवले आहे . पण हिटलर हा देशभक्त हुकुमशहा होता - आणि अशाच एका नेत्याची भारताला गरज आहे - अशी एक भारतीय अंधश्रद्धा अजूनही आहे. आजच्या प्रगत जर्मनीत मात्र हिटलर देशद्रोही - देशबबुडव्या समजला जातो. हिटलरच्या  आणि नाझीवादाच्या विरुद्ध जर्मन शालेय अभ्यासक्रमात धडे असतात.
 
भारतीय लोक युरोपियनांच्या तुलनेत बरेच काळे असतात . त्यामुळे ते हीन दर्जाचे रक्त भेसळ झालेले टाकाऊ वंश आहेत असे हिटलर मानत असे. हिटलर लिहितो - " हे काळे लोक म्हणजे जन्मजात अर्धवानर - त्यांच्यावर विशेष मेहनत - खर्च  करून त्याला  वकील बनवणे हा विनोदी प्रकार आहे.  (Mein Kampf p. 391).

केवळ वंश नाही तर हिंदु संस्कृती हि देखील एक खालच्या दर्जाची गोष्ट आहे असे हिटलर मानत असे . २२ ओगस्ट १९४२ रोजी हिटलर लिहितो " काशीला हिंदु प्रेते जाळून पाण्यात टाकतात - तेच पाणी पितात. असल्या घाणेरड्या लोकांविरुद्ध स्वच्छतेचे  क्रुसेड (ख्रिस्ती धर्मयुद्ध )  लढले पाहिजे. ब्रिटिश लोक सतिबंदिभोवति खेळत बसले आहेत . हिंदुना अतिशय जबरी शिक्षा (rigorous  penalties) दिल्या पाहिजेत. आपण त्यांच्यावर राज्य करत नाही हे त्यांचे नशीब  आहे. मी भारताचा सम्राट असतो असतो तर हींदुचे आयुष्य वेदनामय करून टाकले असते .    (We should make  their lives a misery!) - ( संदर्भ २)





हिटलर ने त्याच्या माइन काम्फ या आत्मचरित्रात भारतीय लोकांचा उल्लेख - हलक्या नसलेचे कुत्रे असा केला आहे . हीन वंशाच्या लोकांना गेस चेंबर मध्ये ठार मारले पाहिजे असे नाझिंचे स्पष्ट मत होते -आहे - राहील  . बाकी भारतीयांच्या  अडाणी आर्य बंधु प्रेमाबद्दल काय लिहावे ?



 संदर्भ १) Appeasement and World War II. David Faber (2009). Munich, 1938:Simon and Schuster. p. 40.
संदर्भ २) Hitler's Table Talk - १९४१ ४४ : २२ ओगस्ट १९४२

आंबेडकर भक्त ओवेसिंना पाच प्रश्न


डॉ. आंबेडकर भक्त (म्हणवणार्या) ओवेसिंना पाच  प्रश्न 


महात्मा गांधिंपेक्षा मी  डॉ  आंबेडकरांना अधिक मानतो असे विधान   खासदार ओवेसिंनि एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नुकतेच केले आहे .  या बद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजेत . आजच्या आधुनिक काळात बाबासाहेबांच्या पुरोगामी विचारांची देशाला गरज आहे.  सामाजिक न्याय , धर्म निरपेक्षता आणि समाज सुधारणा याबाबतीतले बाबासाहेबांचे विचार सार्या देशानेच अंगिकारले पाहिजेत . ओवेसी सारख्या वेगाने लोकप्रिय होणार्या नेत्याने बाबासाहेबांच्या नावाची  कास धरावी हे एक चांगले लक्षण आहे. बाबासाहेबांचे नाव कोन्ग्रेस, भाजपा, कम्युनिस्ट इत्यादि सारेच घेत असतात . पण त्यांचे सगळे विचार  मात्र  मान्य करत नाहित. हिंदुत्व  परिवार एकिकडे बाबासाहेबांचे फ़ोटो लावतो दुसरीकडे त्यांनी त्यागलेल्या  सनातन हिंदु धर्माचे हि समर्थन करतो  . हा बाबासाहेबांच्या फ़ोटोचा दुटप्पी  उपयोग आहे. त्याच धर्तीवर ओवेसी साहेबांचे नवे आंबेडकर प्रेम विचारासाठी आहे कि मतासाठी ?  या संबंधाने काही प्रश्न उपस्थित होतात . स्वातंत्र्य ,समता , विज्ञान निष्ठा , धर्म चिकित्सा आणि सेक्युलारीझम यावरील बाबासाहेबांचे विचार ओवेसिंना मान्य आहेत का ? हा खरा प्रश्न आहे.   







१)  स्त्री स्वातंत्र्य : मुस्लिम समाजाचे भले व्हायचे असेल तर आधी मुस्लिम स्त्रियांचे हित पाहिले पाहिजे असे बाबासाहेबांना वाटत असे. शोषित मुस्लिम स्त्रियांचा विकास आणि  व्यक्ती स्वातंत्र्य  हा त्याना अतिशय महत्वाचा मुद्दा  वाटे .   बाबासाहेब लिहितात   " रस्त्या वर चालणार्या  बुरखाधारी स्त्रिया हे भारतातील एक भीषण आणि गलिच्छ दृश्य आहे . (most hideous site ) बुरख्याचे आरोग्यावर गंभिर दुष्परिणाम होतात  . मुस्लिम स्त्रियात अनिमिया , टीबी आणि पायोरीया सारखे रोग जास्त प्रमाणात आहेत. अनेकांची  शरीरे क्षतिग्रस्त , हात पाय व्याधीग्रस्त , हाडे बाहेर आलेली आणि कणे वाकलेले आहेत . पेल्व्हिक आजार आणि हृदयरोग यांचे प्रमाणही अधिक आहे. बुरखा - मुस्लिम स्त्रीचे  शारीरिक आणि मानसिक पोषण होऊ देत नाही "  ( ८ - २३० , २३१)  बुरखा नावाची अमानुष अन्यायी आणी व्यक्तिस्वातंत्र्य दडपणारी धार्मिक रूढी मोडायला ओवेसी पुढाकार घेणार का ? बाबासाहेबांचे विचार मानणार का ?  स्त्री स्वातंत्र्या साठी धर्मसुधारणा करणार का ? 

२) सेक्युलारीझम:  भारतीय राज्यघट्नेवर बाबासाहेबांच्या विचारांची चिरंतन छाप आहे . या घटनेतली धर्म निरपेक्षता ओवेसिंना मान्य आहे का ? घटनेतले २५ वे कलम फक्त पारलौकिक बाबतीतल्या धार्मिक स्वातंत्र्याला मान्यता देते . इहलोकात धर्मात हस्तक्षेप  करण्याचे सर्व हक्क शासनाकडे संरक्षित राहतात . अस्पृश्यता , मंदिर प्रवेश आणि बुरखा , तालाख इत्यादी  सर्व धार्मिक बाबतीत कायदे करण्याचे  स्वातंत्र्य सरकारला आहे. ओवेसिंना सरकारचा धर्मात हस्तक्षेप करण्याचा-  हा सेक्युलर अधिकार मान्य आहे का ?  

३) बुद्धिवाद आणि विज्ञान निष्ठा : यावर बाबासाहेबांचा भर होता . हिंदु समाजात   आधुनिक विचार येउन त्यांची धार्मिक रुढितून सुटका व्हावी असे बाबासाहेबांना वाटत असे .  धर्म धिक्कार आणि हिंदु समाजाचे प्रबोधन यासाठी बाबासाहेबांनी नेटाने लेखणीचे शस्त्र चालवले आहे.   पण बाबासाहेब कधीही हिंदुंचे पक्षपाति नव्हते . हिंदुप्रमाणे मुस्लिमांचेहि प्रबोधन व्हावे - प्रगती व्हावी असे त्यांना वाटे. यासाठी मुस्लीमानीही आधुनिक व्हावे धर्म ग्रंथ  बाजूला ठेवून विज्ञान ग्रंथाचे  पान उलटावे असे बाबासाहेबांना वाटे . त्यासाठी त्यांनी रेनन ला उधृत केले आहे. बाबासाहेब उधृत लिहितात  : 
  • " इस्लाम विज्ञानाला सततच  शत्रू समजत आला आहे. हे त्या धर्माचे एकनिष्ठ एकमेव सातत्य आहे . पण हे सातत्य धोकादायक आहे. इस्लामच्या दुर्दैवाने इस्लामला यश मिळत आले. विज्ञानाचा  - बुद्धीवादाचा वध  करून खरे तर इस्लामने स्वत:चाच वध  केला आहे. जगाचे शाप घेतले आहेत आणि हीनत्व पत्करले आहे " ( ८ - २३५)      
मुस्लिमांनी विज्ञान निष्ठेचा, बुद्धिवादाचा , आणि धर्म चिकित्सेचा स्वीकार केल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही इतरांचेही भले होणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे . डॉ. आंबेड्करांच्या विचारांचे पालन करून बुद्धिवादी आणि विज्ञान निष्ठ होण्याची ओवेसिंचि तयारी आहे का ? 


४) समता:  इस्लाम हा मुक्तिदाता , समतेचा , शांततेचा धर्म आहे या   अंधश्रद्धेतुन हि  मुक्त झाले पाहिजे. बाबासाहेब लिहितात " " इस्लाम बंधुत्वाचि भाषा करतो. सर्वाना वाटते कि जणु  इस्लाम  मध्ये गुलामी नाही …. आज गुलामी जगभरातून गेली असली तरी जेंव्हा गुलामी होती तेंव्हा तिच्या समर्थनाचा प्रारंभ   इस्लाम धर्म आणि इस्लामिक   देशातून झाला होता . " (  … support was derived from Islam and Islamic Countries) ( ८- २२८).  धर्मातली विषमता हि वेगवेगळी रूपे घेत टिकून राहते -  इस्लाम धर्मात गुलामी असल्याने ती विषमतेच्या  रूपाने  टिकून राहिली आहे  , हे दाखवून देत बाबासाहेबांनी मुस्लिमातील जातींचे भलेमोठे कोष्टक पाकिस्तान या पुस्तकात पानभर  दिले आहे . (८-२२९)
मुस्लिम समाजात त्रैवर्णिक व्यवस्था असून अश्रफ , अजलफ आणि अर्जल अशी त्या वर्गांची नावे आहेत . मुस्लीमातल्या  अर्जल वर्गाला बाबासाहेबांनी डीग्रेडेड क्लास - पददलित म्हणुन संबोधले आहे . सेन्सस सुप्रिटेंडंट चे दाखले देत बाबासाहेब म्हणतात " मुस्लिमात जातीबाहेर लग्नाला प्रतिबंध  आहे  , व्यवसायावर  जाती निर्धारण  आहे.  "  (८-२२९,३०) 
बाबासाहेबांच्या विचारावर चालायचे असेल तर समाजसुधारणा आणि त्यासाठी धर्मसुधारणा करावी लागते . ओवेसी ना हि समता मान्य  आहे का ? 



५) धर्म चिकित्सा : हिंदुच्या अमानुष वर्ण व्यवस्थेचे निर्दालन करण्यासाठी बाबासाहेबांनी धर्माच्या चिकित्सेचे सुयोग्य शस्त्र आणि शास्त्र दिले आहे. बुद्ध धम्माचा स्वीकार हा त्यातला अंतिम टप्पा आहे . सारा भारत बुद्धमय करीन हि बाबासाहेबांची गर्जना आहे. ओवेसी आणि त्यांचा पक्ष हे शत प्रतिशत भारतीय आहेत . बाबासाहेबांच्या विचारातल्या अंतिम टप्प्याचा - धम्माचा स्वीकार करायला कदाचित काही वेळ द्यावा लागेल. पण तोवर धर्म चिकित्सेचा तरी अंगिकार केला पाहिजे . आणि बुद्ध धम्मातली  श्रेष्ठ तत्वे थोडी का होईना अंगिकारली पाहिजेत. तेही अवघड वाटत असेल तर निदान बुद्ध धम्माच्या विरोधी आचरण नको .  बाबासाहेबांनी भारतातील बुद्ध धम्माच्या ह्रासाची कारणे सांगणारे शेवटचे भाषण महानिर्वाणापुर्वि सहा महिने २३ जून १९५६ रोजी अखिल भारतीय बौद्धजन समितीच्या दिल्लीतल्या सभेत दिले होते . बाबासाहेब म्हणाले होते : 
" मुसलमानांनि या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून , बौद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्याना बूत  शिकन म्हणजे मूर्ती फोडणारे असे म्हटले जाते. बूत  हा मुर्तिसाठीचा शब्द म्हणजे बुद्ध या शब्दाचे (अपभ्रंश ) रूप आहे. मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहित आहे.….मुसलमानांनि बौद्ध व हिंदु धर्मावर आक्रमण केले होते . दोघांची मंदिरे उध्वस्त केली होती … .  बर्याच बौद्ध भिक्कुची कत्तल झाली आणि काहींनी देशाटन केले. त्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण कोणाचे अनुसरण करावे ? हेच कळेनासे झाले . बौद्ध अनुयायी अंध:कारात चाचपडत राहिले…   " ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ ) अगदी असेच मत १० जून १९५० च्या जनता पत्रातही त्यांनी व्यक्त केले आहे. 
  वैचारिक   नेतृत्व हरवलेला बौद्ध समाज पुढे ब्राम्हणी धर्माच्या तोंडप्रचारी तडाख्यात अडकला असा निष्कर्श   बाबासाहेबांनी काढला आहे.   इस्लामी बूत  शिकन वृत्ती   हे बुद्ध धर्माच्या नाशाच्या अनेक कारणापैकी  एक महत्व पुर्ण कारण मानले आहे. 

बुतशिकन वृत्तीचा प्रत्यय तालिबानने अफ़गाणिस्तानातील  बुद्ध मूर्ती फोडून नुकताच दिला आहे . हि  वृत्ती नष्ट करण्यासाठी आणि धर्मसुधारणा करण्यासाठी ओवेसी कटिबद्ध आहेत का ? निदान जमाते इस्लामी अथवा इतर   संस्थानि  त्यांच्या धार्मिक शिक्षणाच्या  कोर्सेस मध्ये बूत -शिकन या संकल्पनेचा  गौरवपूर्ण उल्लेख टाळावा - त्यास प्रोत्साहन देऊ नये  असे आवाहन तरी  ओवेसी करतील का ?  

केवळ हिंदूची समाजसुधारणा आणि धर्म चिकित्सा  करणे  हा पक्षपात ठरेल . त्यामुळे   हिंदुचे हित होईल आणि मुसलमान मागासच राहतील . असा पक्षपात करणे बाबासाहेबांना मंजुर नव्हते. ते लिहितात "केवळ हिंदुत सामजिक वैगुण्ये आहेत आणि मुस्लिमात नाहीत हा भ्रम आहे . असा कोणता सामजिक दुर्गुण आहे जो हिंदुत आहे आणि मुस्लिमात नाही ? " ( ८ -२२५)  



हिंदु मुस्लिम ऐक्य  

खरोखरचे ऐक्य घडवायचे असेल तर बाबासाहेबांच्या विचाराल पर्याय नाहि. बाबासाहेबांनी १९४०- ४५  दरम्यान  पाकिस्तान संदर्भात अनेक मते मांडली आहेत . पाकिस्तान का ? याची कारण मिमांसा करताना ते लिहितात "  ब्रिटिशांच्या फोडा आणि झोडा या नीतीमुळे हिंदु मुस्लिम संबंध बिघडले हे खरे नाही . ब्रिटिशांच्या पूर्वीपासून  भांडणे होतीच.   हिंदु आणि मुस्लिमातील राजकीय भांडण हा ऐतिहासिक, धार्मिक , सांस्कृतिक आणि सामजिक घटक परस्पर विरोधी ( Antipathy) असल्याचा परिणाम आहे.  (८-३२८,३२९) . 

 अकबर आणि कबीर  या सुधारकांच्या कार्याचा इष्ट परिणाम झालेला नाही .  अधिक विश्लेषण करताना आंबेडकर लिहितात : - " इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी  नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा ( Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत . जे मुस्लिम बंधुसंघाबाहेर आहेत त्यांकरता घृणा आणि शत्रुत्व याशिवाय काहीही नाही .....  भारताला आपली मातृभूमी आणि हिंदुना बांधव मानण्याची परवानगी - इस्लाम धर्म - सच्च्या मुस्लिमाला  देत नाही . "  (८- ३३०) "इस्लामी धर्माने जगाची वाटणी दोन भागात केली आहे ….  दार उल हरब म्हणजे शत्रूभूमिचे रुपांतर  -   दार उल इस्लाम मध्ये करण्यासाठी … जिहाद करणे हे मुस्लिमाचे धार्मिक कर्तव्य आहे. "   (८-२९५, २९६) 

 धर्माच्या आधारावर एकदा फाळणी घडून गेलेली आहे . बाबासाहेबांनी चर्चा केलेला  हिंदु मुस्लिम लोक संख्येच्या  आद्लाबदलिचा (८-११७) मुद्दा आज चर्वित चर्वण करण्यात अर्थ नाही . आज भारतात हिंदु आणि  मुस्लिमाना सहजीवन अपरिहार्य आहे . पण ज्या कारणाने पूर्वी मने दुभंगलि ती कारणे पुन्हा घडता कामा नयेत . शांतते शिवाय विकास आणि सामजिक क्रांति अशक्य आहे. त्यासाठी हिंदुप्रमाणे मुस्लीमानही  प्रयत्न करावे लागणार  आहेत. धर्म सुधारणा कराव्या लागणार आहेत . राजकीय ढोंग करणे ओवेसिंच्या परंपरेत नसेल , तर बाबासाहेबांचे विचार स्वीकारले पाहिजेत.  

स्वातंत्र्य ,समता , विज्ञान निष्ठा , धर्म चिकित्सा आणि सेक्युलारीझम तथा हिदू मुस्लिम ऐक्य याची कारणे स्वरूप आणि उपाय बाबासाहेबांच्या विचारातून ओवेसी समजून  घेतील आणि त्यानुसार आचरण करतील अशी आशा बाळगुया.

बोलिवुड आणि पेज थ्री विचारवंतानि  हिंदु मुस्लिम प्रश्नाचे एक चित्र आणि चरित्र आपल्यासमोर उभे  केले आहे .  बाबासाहेबांचे विचार त्यापेक्षा अतिशय भिन्न आहेत , सखोल आहेत , अभ्यासपूर्ण आहेत . मुस्लिम समाजाचे ओवेसिंना हित करायचे असेल तर १०० कोटि हिंदुचे निर्दालन उपयुक्त नाही. आंबेडकरी विचाराचे पंचशिल आवश्यक आहेत . त्यासाठी  ओवेसी या पाच महत्वाच्या  विचारांचा  स्वीकार करतील तर  या देशाचेच  रुपांतर स्वर्गात (जन्नत) मध्ये होईल.  आणि जन्नत प्राप्ती साठी वेगळा जिहाद (पराकाष्ठा) करायची गरजच उरणार नाहि.


 संदर्भ : 

[(८ - ३२०)  हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र  शासनाने  प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत  रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे.  बरेचसे  मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English)  मध्ये कंसात दिले आहेत.  ]

१९ एप्रि, २०१५

"कोर्ट" आणि "व्हॉट अबाउट सावरकर?" : चित्रपट परिक्षण

 "कोर्ट"  आणि  " व्हॉट अबाउट सावरकर ?"  : चित्रपट परिक्षण 


"कोर्ट"  आणि  "व्हॉट अबाउट सावरकर?" असे दोन वेगळे सिनेमे आजच झळकले. मी मुंबईच्या प्लाझा थेटरात दोन्हीचे फ़र्स्ट डे - फ़र्स्ट शो लागोपाठ पाहिले. गंमत म्हणजे असे दोन्ही चित्रपट लागोपाठ पहाणारे अजून एक दोन माझ्यासारखे ' गयने ' सुद्धा मला तिथे भेटले ! पण हा अपवाद आहे . सहसा असे घडणार नाही. सिनेमा - संगित - कला हा समाजाचा आरसा आहे . या दोन चित्रपटाच्या पटकथा एकामागोमाग एक वाचल्या तरी महाराष्ट्राचे प्रतिबिंब त्यात दिसेल . आरशात दिसणारे प्रतिबिंब भेसूर आहे जी सुस्वरूप आहे ते आपणच ठरवावे . या दोन्ही सिनेमात काही साम्य आणि भेद स्थळे आहेत . गुणात्मक फरकही प्रचंड आहे .  

या दोन सिनेमातले साम्य : " कांबळे " आडनावाच्या व्यक्ती दोन्ही सिनेमात महत्वाच्या स्थानी आहेत. देश , समाज आणि जात यावर दोन्ही सिनेमात भाष्य आहे .

या दोन सिनेमातला फरक : एक बाळबोध आहे दुसरा सहज आहे . कोणता सिनेमा काय आहे ? हे प्रेक्षकांनि आणि वाचकांनी स्वत:च ठरवायचे आहे . या दोन्ही सिनेमा  विषयी प्रस्तुत लेखात  पाहू. 

८ एप्रि, २०१५

चार्वाक नावाचा चमत्कार

.
हजारो वर्षापूर्वी भारतात  विज्ञान  होते का   ?

उत्तर होय असे आहे.

पुराणातली विमाने म्हणजे विज्ञान  नाही . विज्ञान हि विचार करायची पद्दत आहे . त्याला बुद्धिवाद  - अथवा -    विज्ञाननिष्ठा असे म्हणतात. चमत्कार म्हणजे अपुरे  ज्ञान .  प्रत्येक घटनेला कार्य कारण भाव असतो . तो शोधत येऊ शकतो . दाखवता येतो .  म्हणुन प्रत्यक्ष  हेच प्रमाण मानले पाहिजे. असा उद्घोष हजार वर्षापूर्वी  दुमदुमत होता .  आपण अतिशय अभिमानाने जगातल्या पहिल्या बुद्धीवाद्याचे कौतुक केले पाहिजे .

चार्वाक हा प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी विचार येथे होता. हजारो वर्षापूर्वी -  भारतात .

वेदप्रामाण्य धिक्कारामुळे  वैदिक धर्माने त्यांना नास्तिक ठरवले   तर ऐहिक सुखांचा आनंद   शोधल्यामुळे  जैन, बुद्ध अशा  श्रमण मार्गाच्या तत्त्ववेत्त्यांनीही त्यांची कठोर निंदा केली. शरीर पीडेचा  वा दु:ख मुक्तीचा श्रमण मार्ग  चार्वाकाला अप्रस्तुत वाटतो . चार्वाक सुखवादी अहे.



------------------------------------------------------------------------------------------------------------------------
यावज्जीवेत्‌ सुखं जीवेत्‌ नास्तिमृत्युरगोचर:।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:।।

जग रे भावा समाधाने - सुखी रहा इहलोकी  ।   
राख झाली देहाची की - उरते ती सारी माती ।।

परिश्रम  कर . पराक्रम कर.  आणि  समाधानाने सुखाने जग . म्रुत्युनंतर  एकदा शरीराची राख झाली कि सारे संपते . पुनर्जन्म चांगला मिळावा या  भितिपोटि  कर्मकांड करत बसू नका . समाधी अवस्था झूट . केवल  ज्ञान थाप . आत्मा बकवास . निब्बाण  अशक्य .
------------------------------------------------------------------------------------------------------------------------






चार्वाकाचे  हे उपदेश  विशुद्ध ऐहिक - जडवादी आहेत .त्याला परलोक तुच्छ , वेंद  नको, उपनिषद नको, ब्राम्हण  , अरण्यक - स्मृती इत्यादी ग्रंथ नको.

 बुद्धाच्या अष्टांग मार्गावर त्याचा विश्वास नाही.  जैनाची केवल ज्ञान हि चार्वाकाला  थाप वाटते .   जैन, बौद्ध,  वैदिक या सार्यांची टीका सहन करत आणि त्यांची उलटी खिल्ली उडवत चार्वाक -  भारतात हजारो  वर्षे दुमदुमत राहिले .

शेवटच्या चार्वाकाचा ऐतिहासिक उल्लेख  अकबर बादशहाच्या  काळात आढळतो . हा शहाणा  अकबराची भेट घेऊन त्याला आपली नास्तिकता पटवून देत होता . धर्माची  चर्चा आणि चिकित्सा करण्यासाठी अकबराने इबादतखाना नावाचे नवे ऑफिस उघडल्याचे इतीहासाने नोंदवले आहे. तिथे त्याने सगळ्या धर्माच्या पंडितांशि चर्चा केल्या .   उत्तर आयुष्यात १५८२ साली  अकबराने इस्लाम  धर्म सोडून दिला आणि दिने इलाही नावाचा नवाच  धर्म काढला .त्याच्या  या नव धर्माला -  धर्म ग्रंथच  नव्हता . मौलवी / पंडित हि भानगड पण नव्हती . या  नव धर्म  स्थापनेवर कदाचित चार्वाक  मताचा अंशत: प्रभाव  असावा. अकबर कृत  दिने इलाहीच्या काही मताशी  चार्वाकाचे विलक्षण साम्य आढळून येते .




------------------------------------------------------------------------------------------------------------------------
न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिकः ।
नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिकाः ॥

स्वर्ग नाही, मोक्ष नाही, परलोकीचा  आत्मा नाही 
वर्ण -आश्रम ,  कर्मकांडे फळ  तुला  देणार नाहीत ।।
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम्‌ ।
बुद्धिपौरुषहीनानां जीविका धातृर्मिता ॥

यज्ञाचे ते अग्निहोत्र, तीन वेद, त्रिदंड , राख फासती अखंड 
बुद्धी आणि पौरुष नाही   -  त्या षंढांच्या पोटाचा  धंदा ।।
------------------------------------------------------------------------------------------------------------------------



कर्म करत रहा, फळ अत्ता मागू नकोस, पुढल्या जन्मी तुला ते मिळेलच. त्यानुसार तुझी जात/ वर्ण  ठरेल अन त्यावरून लायकी; ही धार्मीक शिकवण म्हणजे आपला  सुप्रसिद्ध कर्म- फल  सिद्धांत होय . ती त्याकाळची अर्थव्यवस्था सुद्धा आहे . पण त्यात शोषण आहे . आणि ते जन्मजात आहे .  

कर्म सिद्धांत , पुनर्जन्म , चातुर्वण -  वंशशुद्धी व तिच्यामुळे येणारा अहंकार यावर चार्वाकांनी कठोर टीका केली. पुनर्जन्म हा मुर्खपणा मानून हिणवला .  वंशशुद्धी ही वस्तुस्थिती नसून आभास आहे, तो आपले वरिष्ठत्व टिकविण्यासाठी केलेला प्रचार आहे असे चार्वाक मानतात.चार्वाक विचार वेदप्रामाण्य, ईश्वराचे अस्तित्व, पुनर्जन्माचा सिद्धान्त, यज्ञादी कर्मकांडाची उपयुक्तता हे सर्व एकाच वेळी नाकारतो . केवळ 'प्रत्यक्ष' हेच प्रमाण मानतो .

बौद्धांचि दु:ख्मुक्तीची धडपड , निर्वाण ,  जैनांचा अनेकांतद - सारी दर्शने   - चार्वाक काहीच  जुमानत नाही. यज्ञाच्या आगीत बुधलाभर  तूप जाळून परलोकाची हाव   धरण्यापेक्षा….  तेच  तूप पिऊन शरीर व मन धष्टपुष्ट आणि  सशक्त  करा - असा जगण्याचा सरळ  साधा सोपा  आणी सुंदर  अर्थ चार्वाकाला अभिप्रेत आहे.




------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कृषिगोरक्षवाणिज्यदण्डनीत्यादिभि: बुधै:।
एतेरैव सदोपायैर्भोगाननुभवेद्भुवि ।।

शहाण्यांनी या जगात शेती, गोपालन, व्यापार, प्रशासन सेवा इत्यादी कामे करून
 मिळालेल्या द्रव्याच्या साह्याने सुखोपभोग घ्यावेत, हाच लोकायतांचा आदर्श आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------




चार्वाक हि प्राचीन नास्तिकांचि भारतीय उपाधी आहे. यात ब्राह्मण आहेत, राक्षस आहेत, दैत्य आहेत, ऋषिमुनी आहेत,राजे महाराजे - गोर गरीब सारे आहेत ---- गम्मत  म्हणजे  कधी कधी देव पण आहेत  ! ( ज्याना इथर पोथ्या देवता म्ह्णतात ते) देवांचा गुरू बृहस्पती हा पहिला चार्वाक असल्याचे मानले जाते. शंकर- पुरंदर-  बृहस्पती अशी चर्वाकांची वैचारिक परंपरा सांगितली जाते. हि परंपरा अस्तिकांच्या ग्रंथातुन शोधता येते  . चार्वाक लोक्स ग्रंथ लिहिण्याचा भानगडीत पडले नसावेत किंवा आस्तिकांनि ते ग्रंथ नष्ट केले असावेत .

हे चार्वाक लोक  हजार वर्ष आस्तिकांना धर्माविषयी प्रश्न विचारून भंडावून  सोडत आले आहेत . या प्रश्नावर डोकी खाजवत - त्याचे खंडन मंडन  आणि  त्या चर्चेतून विविध भारतीय दर्शने - श्रद्धा  अणि तत्वज्ञ तयार झाले  असे अनेक अभ्यासक मानतात. चार्वाक विचारतो : -




------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शुश्चेन्निहतः स्वर्गं ज्योतिष्टोमे गमिष्यति ।
स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते ॥

यज्ञामध्ये बोकड मेला - जर तो आता स्वर्गी जाइल   ।
 यजमानाच्या पित्यासाठी मार्ग गवसला आम्हाला  ॥

यज्ञामधे बळी दिलेले बोकड जर स्वर्गात जात असतील तर यजमानाच्या  बापाला त्याच रस्त्याने थेट स्वर्गात का पाठवू नये ?  
------------------------------------------------------------------------------------------------------------------------





प्रत्यक्ष हेच प्रमाण. बाकी सब झुट . बाप  दाखव नाही तर श्राद्ध  कर - काल्पनिक थेअर्या चालणार नाहीत . जे प्रयोगात समजले तेच विज्ञान . प्रत्यक्षात दिसले तेच ज्ञान .  प्रत्यक्ष, अनुमान व शब्द या तीन प्रमाणांच्या आधारे घटना, परिस्थिती यांची चिकित्सा करून सत्यासत्यता पडताळून पाहता येते असा सिध्दांत चार्वाकांनी मांडला.

धार्मिक छू छा  मंतर  - वेद मंत्र -  इत्यादी लिहिणारे हरामखोर -   भंड, धूर्त, आणि निशाचर आहेत.असे स्पष्टपणे सांगितले .




------------------------------------------------------------------------------------------------------------------------
त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचराः ।
जर्भरीतुर्फरीत्यादि पण्डितानां वचः स्मृतम्‌ ॥

वेदांचे कर्ते भंड, धूर्त, आणि निशाचर   । 
जर्भरी, तुर्फरी, वगैरे अर्थहिन बकवास   ॥

जर्भरी, तुर्फरी असे (निरर्थक) वा आर्ष रानटी शब्द वेदात येतात . त्याची चार्वाकाने चेष्टा केली आहे
------------------------------------------------------------------------------------------------------------------------




आज ज्याला नास्तिक बुद्धिवादी विचार  म्हणून जगभर ओळखले जाते -  तो विज्ञान निष्ठेचा  विचार या भारत  भूमीत हजारो वर्षा आधी बहरून उठला होता याचा मला अभिमान आहे. लोकायत म्हणजे इहलोकविषयक प्रणाली. हे चार्वाक लोक अतिशय  नीतिमान होते. मृदुभाषी होते . सभ्य होते .  चार्वाक चे मराठी भाषांतर गोड बोलणारा असे होते.  चारू म्हणजे  गोड, मनाला रुचेल तेच आणि वाक्‌ म्हणजे सांगणारा. 

 धर्म निंदा - ईश्वर निंदा सोडुन -  त्यांचा कोणताही गुन्हा आणि पाप आस्तिकांच्या ग्रंथात सुद्धा नोंदवलेले  नाहीत.  य़ज्ञाचे कर्मकांड, त्यात होणारा वेळेचा व द्रव्याचा नाश आणि त्यातील प्राणी  हिंसा हे चार्वाकांच्या यज्ञविरोधामागील कारण होते. चातुर्वण्य हे संस्कृतीचे अधिष्ठान मानायलाही त्यांचा विरोध होता. युक्तिवाद आणि चर्चा करणार्या  एका चार्वाक पंथी ब्राम्हणाला - तू तर राक्षस आहेस - असे संबोधून आस्तिक ब्राम्हणांनी  जाळून मारल्याची नोंद महाभारतात येते . 

परंतु चर्वाकांच्या हिंसेचे - चोरीचे - खुनशी वृत्तीचे एकही उदाहरण मिळत नाही . एकही नाहि. विरोधकांच्या ग्रंथात हि नाही.  






 जीवनाचे ध्येय | असे सुखप्राप्ती
सुखानेच तृप्ती | माणसांना



- विंदा करंदिकर (चार्वाक दर्शन )




शरीराला आणि इंद्रियाना होणार्या सुखमय भावनाना चार्वाक सुख मानतात . इथे सारा न्याय प्रत्यक्ष हेच प्रमाण असा आहे. मनाला होणारा संतोष  हि त्याना अभिप्रेत आहे. प्रियेच्या बाहुपाशात खरे सुख अशा अर्थाची चार्वाक वचने आहेत. 

जगाला बुद्धिवाद आणि नैतिकता शिकवणारे चार्वाक अतिशय सुखाने स्वत:चे संसारि आणि व्यावसायिक जीवन जगत असावेत असे मानायला जागा आहे. 

 गम्मत म्हणजे काही सवाई चार्वाक देखील तयार होते . लोकायतचे अपडेटेड व्हर्जन म्हणजे :

 तत्त्वोपप्लव सिंह अर्थात विचारावर झडप घालणारा सिंह .

  तत्त्वोपप्लव सिंह हा चार्वाक मताचा एकच ग्रंथ सध्या शिल्लक दिसतो .  त्याचा लेखक  जयराशी भट्ट हा  सातव्या  शतकांत होऊन गेला.  वैदिक, बौद्ध आणि जैन यांच्यावर या ग्रंथात  सडकून टीका केलेली आहे. पण तो चार्वकालाहि जुमानत नाही . इझम किंवा विचारसरणि चूक आहे . अनुभव आणि विवेक बुद्धी माणसाला प्रयत्न पूर्वक मिळवता येते . सर्व लोकांच्या अधिकतर हितासाठी विवेक वापरावा . चार्वाका सकट  कोणत्याही पुस्तकी इझम च्या नादि लागू नका असे जय्रराशी भट्ट स्पष्टपणे सांगतो . चार्वाक मताला जुनाट म्हणणारे नवे चार्वाक जन्माला येत होते . यालाच   विज्ञान निष्ठ विचार  असे म्हणतात .  भारतात लघु रुपाने  का होईना - पण हा विचार होता . हे अतिशय अभिमानस्पद आहे 

आजचे बुवा, बाबा, जटा, दाढ्या -  जनावरांचे मूत्र पिणारा भारत - हे  वास्तव पाहिले कि चार्वाक येथे जन्मावा हे  एक आश्चर्यच वाटते .   जणु चमत्कार !  




(प्रस्तु लेख अनेक संदर्भ ग्रंथ व इंटर्नेट वरील उपलब्ध लेखांचे एकत्रित संकलन आहे.  संस्कृत श्लोकांचे मराठी रुपांतर लेखकाने केले आहे. )


अधिक वचनासाठी संदर्भ ग्रंथ :


चार्वाक - इतिहास आणि तत्त्वज्ञान - सदाशिव आठवले (प्राज्ञपाठशाळा - वाई)
'आस्तिकशिरोमणी चार्वाक' - आ.ह. साळुंखे
भारतीय तत्वज्ञान - श्रीनिवास दीक्षित 
लोकायत - स. रा. गाडगीळ - लोकवाङ्मय गृह
वेध चार्वाकाचा - उदय कुमठेकर - अभय प्रकाशन नांदेड.
चार्वाकमंथन - संपादकः उदय कुमठेकर - परामर्श प्रकाशन, तत्त्वज्ञान विभाग्, पुणे 
चार्वाकवाद आणि अद्वैतवाद - डॉ. प्रदीप गोखले - टिळक महाराष्ट्र विद्यापीठ 
लोकायत (इंग्रजी ) - देविप्रसाद चट्टोपाध्याय - 
सर्वदर्शनसंग्रह - माधवाचार्य - प्र. फोटोझिंको प्रेस पुणे, (शासकीय प्रकाशन)
'भारतीय जडवाद'  -  राममनोहर लोहिया 
'जडवाद' - मानवेन्द्रनाथ रॉय ( अनुवाद : बा.र. सुंठणकर  ) कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे 
'विचारमंथन - स.रा. गाडगीळ 

३ एप्रि, २०१५

डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम

 मुस्लिमांचे शत्रू किंवा द्वेष्टे म्हणुन नाही  -   तर त्यांचे हितचिंतक म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  इस्लाम धर्माची   चिकित्सा केली आहे . धर्म चिकित्सेशिवाय प्रगती अशक्य आहे.  हि चिकित्सा तटस्थ भूमिकेतून आहे - त्यामुळे ती चींतनिय आहे.  प्रत्यक्ष बाबासाहेबांच्याच शब्दात त्यांची इस्लाम धर्म  विषयक मते या लेखात पाहूया . आणि मुस्लिम समाजाच्या हितासाठी - प्रगतीसाठी  घटनाकारांनि  काय उपाय सांगितले ते हि पाहूया.

--------------------------------------------------------------------------------
डॉ आंबेडकरांनी आपल्या लेखनात इस्लाम धर्मावर चिकित्सेची कुर्हाड चालवलेली आहे,
हा लेख वाचताना एक निट लक्षात ठेवले पाहिजे कि घटनाकार बाबासाहेब अजिबात हिंदुत्व वादि नाहीत . किंबहुना हिंदु लोकांचे धर्म , सामाजिक व्यवस्था, इतिहास पुराणे आणि धर्मग्रंथ याना ते अमानुष  आणि जाळण्या योग्य मानतात . . बाबासाहेब हिंदुच्या धर्माचे विरोधक आणि शत्रू आहेत.
#################################
त्यामुळे होते असे कि , बाबासाहेबांच्या या इस्लाम धर्मा विषयीच्या मतांना तटस्थ चिकित्सेचा गंभिर आयाम प्राप्त होतो .
#################################
--------------------------------------------------------------------------------






[(८ - ३२०)  हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र  शासनाने  प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत  रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे.  बरेचसे  मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English)  मध्ये कंसात दिले आहेत.  ]



इस्लाम मध्ये  समता आहे का ?

पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथात बाबासाहेबांनी या विषयावर एक पुर्ण प्रकरण लिहिले आहे.  त्या प्रकरणाचे नाव आहे सोशल स्टेग्नेशन . या प्रकराणाच्या पहिल्या पानावरचे त्यांचे  वाक्य असे आहे .
"केवळ हिंदुत सामजिक वैगुण्ये आहेत आणि मुस्लिमात नाहीत हा भ्रम आहे . असा कोणता सामजिक दुर्गुण आहे जो हिंदुत आहे आणि मुस्लिमात नाही ? " ( ८ -२२५) 
बालविवाह इत्यादी सामाजिक दुर्गुण हिंदु आणि मुस्लिम अशा दोघातहि  आहेत हे त्यांनी सांख्यिकी आधाराने  दाखवले आहे. इस्लाम धर्मातील विषमता , गुलामी आणि जातिव्यवस्था याबद्दल बाबासाहेब लिहितात :
" इस्लाम बंधुत्वाचि भाषा करतो. सर्वाना वाटते कि जणु  इस्लाम  मध्ये गुलामी नाही …. आज गुलामी जगभरातून गेली असली तरी जेंव्हा गुलामी होती तेंव्हा तिच्या समर्थनाचा प्रारंभ   इस्लाम धर्म आणि इस्लामिक   देशातून झाला होता . " (  … support was derived from Islam and Islamic Countries) ( ८- २२८)
इस्लाम धर्मात गुलामी आणि विषमतेची मुळे आहेत यावर चर्चा  करताना आंबेडकर  म्हणतात , " गुलामांना माणुसकीने वागवा असे प्रेषित कुराणात म्हणतो पण त्याना मुक्त करा असे म्हणत नाही . इस्लाम धर्मानुसार गुलामाना मुक्त करण्याचे बंधन मुस्लीमावर नाहि. गुलामाला चांगले वागवत (!) गुलाम ठेवणे हा  उल्लेख आंबेडकरांनी जाणीवपूर्वक केला आहे. धर्मातली विषमता हि वेगवेगळी रूपे घेत टिकून राहते -  इस्लाम धर्मात गुलामी असल्याने ती विषमतेच्या  रूपाने  टिकून राहिली आहे  , हे दाखवून देत बाबासाहेबांनी मुस्लिमातील जातींचे भलेमोठे कोष्टक पानभर  दिले आहे . (८-२२९)

मुस्लिम समाजात त्रैवर्णिक व्यवस्था असून अश्रफ , अजलफ आणि अर्जल अशी त्या वर्गांची नावे आहेत . मुस्लीमातल्या  अर्जल वर्गाला बाबासाहेबांनी डीग्रेडेड क्लास - पददलित म्हणुन संबोधले आहे . सेन्सस सुप्रिटेंडंट चे दाखले देत बाबासाहेब म्हणतात " मुस्लिमात जातीबाहेर लग्नाला प्रतिबंध  आहे  , व्यवसायावर  जाती निर्धारण  आहे.  " (८-२२९,३०) त्यापुढे जाउन आंबेडकर लिहितात :

" नक्कीच ,  हिंदुप्रमाणे मुस्लिमातहि  सर्व वाइट चाली  आहेत आणि काही हिंदुहुन अधिक वाइटहि  आहेत . अधिकच्या  वाइट चालीपैकी एक म्हणजे बुरखा "
 : डॉ आंबेडकर (८-२३०)



नक्कीच ,  हिंदुप्रमाणे मुस्लिमातहि  सर्व वाइट चाली  आहेत आणि काही हिंदुहुन अधिक वाइटहि  आहेत . अधिकच्या  वाइट चालीपैकी एक म्हणजे बुरखा : डॉ आंबेडकर (८-२३०)

.
मुस्लिम स्त्री हा एक दयनीय  प्राणि आहे . इस्लामी धार्मिक जुलमाचे ते प्रतिक आहे अशी बाबासाहेबांची मांडणी दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी जेंव्हा धर्म घेतो तेंव्हा - त्याची चिकित्सा करताना - डॉ.  आंबेडकरांच्या  लेखणीला वेगळीच धार येत असे . धर्म चिकित्सा करताना बाबासाहेब निर्भिडपणे - सर्व धर्मांची चिकित्सा करत असत . हा गुण दुर्दैवाने आज लोप पावला आहे . आज भारतात इस्लाम चिकित्सा केली जात नाही हे सत्य आहे.  तटस्थ , द्वेष रहित  पण धारधार  चिकित्सेची प्रेरणा बाबासाहेबांपासुन घेतली पाहिजे . डॉ  आंबेडकर बुरख्याबद्दल लिहितात  : -

" रस्त्या वर चालणार्या  बुरखाधारी स्त्रिया हे भारतातील एक भीषण आणि गलिच्छ दृश्य आहे . (most hideous site ) बुरख्याचे आरोग्यावर गंभिर दुष्परिणाम होतात  . मुस्लिम स्त्रियात अनिमिया , टीबी आणि पायोरीया सारखे रोग जास्त प्रमाणात आहेत. अनेकांची  शरीरे क्षतिग्रस्त , हात पाय व्याधीग्रस्त , हाडे बाहेर आलेली आणि कणे वाकलेले आहेत . पेल्व्हिक आजार आणि हृदयरोग यांचे प्रमाणही अधिक आहे. बुरखा - मुस्लिम स्त्रीचे  शारीरिक आणि मानसिक पोषण होऊ देत नाही "  ( ८ - २३० , २३१) 






 पडदा पद्धतीच्या उगमाची आणि परिणामाची चर्चा करताना बाबासाहेब लिहितात - " बुरख्याची कारणे लैंगिक साशंकतेत आहेत. त्याचे मुस्लिम स्त्रिया आणि पुरुषांवर गंभिर परिणाम झाले आहेत. मुस्लिम पुरुषांचा घराबाहेरील स्त्रियांशी स्वच्छ मोकळा संपर्क बाधित झाला आहे. अशाप्रकारची बंधने पुरुषांच्याहि नितीमात्तेवर  घातक परिणाम करतात. स्त्री - पुरुषांचा संपर्क तोडणारी अशी समाजव्यवस्था वाइट प्रवृत्तीस जन्म देते हे सांगायला कोण्या मानसशास्त्रज्ञाची गरज नाही . अशा धार्मिक बंधनांमुळे लैंगिक अतिवासना आणि इतर अनैसर्गिक रोगट सवयिंचा प्रादुर्भाव या समाजात होतो . बुरख्यामुळे  हिंदु मुस्लिम संवादात हि  बाधा येते कारण  - अतिशयोक्त वाटले तरी-  हिंदुचे म्हणणे  खरेच आहे कि - एका बाजूचे स्त्रीपुरुष आणि दुसर्या बाजूचे फक्त पुरुष यांचा निर्भिड संवाद होणार तरी कसा ? " (८- २३०, २३१)

जातीय  स्तर आणि स्त्री / पुरुष अशा दोन्ही प्रकारची विषमता मुस्लिमात आहे आणि त्याचे समर्थन / प्रारंभ   इस्लामी धर्मशास्त्रात आहे असा बाबासाहेबांचा निष्कर्ष  दिसून  येतो.  







बौद्ध धर्माचा  विनाश का झाला ?

सर्व धर्मांची चिकित्सा करून झाल्यावर बाबासाहेबांना बुद्धाचा मार्ग योग्य वाटला होता. बुद्ध धम्मा च्या ऐतिहासिक उदय आणि अस्ताची  त्यांनी तपशीलवार मिमांसा केली आहे. अनेक ठिकाणी त्याची वेगवेगळी कारणे दिली आहेत .  माझे सर्वात शेवटचे मत प्रमाण मानावे असे त्यांनी अनेकदा आपल्या अनुयायांना निक्षुन सांगितले आहे . त्यामुळे या विषयावर त्यांनी सर्वात शेवटी दिलेले भाषण पाहूया.  साहेबांच्या महानिर्वाणापुर्वि सहा महिने २३ जून १९५६ रोजी अखिल भारतीय बौद्धजन समितीच्या दिल्लीतल्या सभेत ते म्हणाले : -
" मुसलमानांनि या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून , बौद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्याना बूत  शिकन म्हणजे मूर्ती फोडणारे असे म्हटले जाते. बूत  हा मुर्तिसाठीचा शब्द म्हणजे बुद्ध या शब्दाचे (अपभ्रंश ) रूप आहे. मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहित आहे.….मुसलमानांनि बौद्ध व हिंदु धर्मावर आक्रमण केले होते . दोघांची मंदिरे उध्वस्त केली होती … .  बर्याच बौद्ध भिक्कुची कत्तल झाली आणि काहींनी देशाटन केले. त्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण कोणाचे अनुसरण करावे ? हेच कळेनासे झाले . बौद्ध अनुयायी अंध:कारात चाचपडत राहिले  " ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )
अगदी असेच मत १० जून १९५० च्या जनता पत्रातील लेखातही व्यक्त केले आहे . ( खंड १८ -३ पान : २१५)



 दुर्दैवाने घटनाकारांचे  लवकरच महानिर्वाण झाले. या विषयावर ग्रंथ लिहणे  जमले नाही .  पण आयुष्याच्या  शेवटी आंबेडकर अशा निर्णयाप्रत आलेले दिसतात कि, - मुस्लिमांकडुन विद्वान भिक्कुंचि कत्तल झाली वा  त्यांना देशत्याग करावा लागला .   मार्गदर्शन न मिळालेले बौद्धजन आता कोठे  जातील ? तिकडे बोलघेवडे ब्राम्हण पुरोहित   जन्मजात आयते तयार  होत होतेच !  त्यासाठी भिक्कू प्रमाणे कठिण प्रशिक्षण - संस्काराची गरज नव्हती .  इस्लामी  आक्रमणामुळे  वैचारिक   नेतृत्व हरवलेला बौद्ध समाज पुढे ब्राम्हणी धर्माच्या तोंडप्रचारी तडाख्यात अडकला असा निष्कर्श   बाबासाहेबांनी काढला आहे. आणि इस्लामी आक्रमण हे बुद्ध धर्माच्या नाशाचे  एक महत्व पुर्ण कारण मानले आहे. ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )
    

मुस्लिम इतिहासाचे आंबेडकरी आकलन :  


मुसलमान भारतात का आले ? त्यांच्या येण्या मागची कारणे - राज्य स्थापनेचे  हेतू आणि भविष्यातील धार्मिक योजना याचे मुद्देसूद विवेचन घटनाकारांनि केलेले आहे. बाबासाहेब लिहितात : -


भारतातील मुस्लिम प्रवेश  हे  केवळ जमीन आणि लुटमार यासाठी नाहीत . आर्थिक - राजकीय कारणाप्रमाणे भारतात इस्लामचा प्रसार करणे हे धार्मिक कारणही आक्रमणा मागे महत्वाचे  आहे. ( ८-५५).  बाबासाहेबांनी मुस्लिम आक्रमणाचा धार्मिक हेतू सिद्ध करण्यासाठी अनेक मुस्लिम इतिहासकारांचि अवतरणे उधृत केलेली आहेत.  उदा : तैमुर बादशाहाची बाबासाहेबांनी उधृत केलेली वाक्ये आहेत :

" माझ्या हिंदुस्थान वरील आक्रमणाचा हेतू काफ़िरांविरुद्धचि मोहीम चालवून त्यांना अल्लाच्या धर्मात आणणे हा आहे. प्रेषित मुहम्मदाच्या आज्ञेनुसार काफिरी श्रद्धांचे भंजन करून  ,  सर्वदेवता समभावाचे उच्चाटन करून ,  देवळे आणि मुर्त्या यांच्यापासून हिंदुस्थान मुक्त केला तर मला गाझी आणि मुजाहिद म्हटले जाइल ." (८-५६)


भारतात मध्ययुगात हिंदु मुस्लिम एकता वगैरे अजिबात अस्तित्वात नव्हती.  अगदी १८५७ चे बंड हा मुस्लिमांनी केलेला ब्रिटिश विरोधी जिहाद होता.  सहाशे वर्ष मुसलमान या देशाचे मालक म्हणुन वावरत होते . ब्रिटिश राज्यात त्यांना हिंदुच्या समान नागरी दर्जा मिळाला हे  मुस्लिमांच्या दृष्टीने अपमानास्पद होते. म्हणुन त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला . १८५७ साली भारताला दार उल इस्लाम करण्यासाठी  मुस्लिमांनी केलेला तो जिहाद होता. असे आंबेडकरांचे  मत होते  (८-४९, २९५)  


मुस्लिम हल्ल्यांमागच्या धार्मिक हेतूचे विवेचन करताना बाबासाहेब लिहितात  
  • "इस्लामी धर्माने जगाची वाटणी दोनच भागात केली आहे ….  दार उल हरब म्हणजे शत्रूभूमिचे रुपांतर  -   दार उल इस्लाम मध्ये करण्यासाठी … जिहाद करणे हे मुस्लिमाचे धार्मिक कर्तव्य आहे. " येथे बाबासाहेबांनी अनेक जिहादी युद्धांचे संदर्भ दिले आहेत.    (८-२९५, २९६) 
मुस्लिम आक्रमण - राज्य स्थापना - कर पद्धती यामागचे हेतू हि धार्मिक होते असे बाबासाहेबांचे मत आहे . हे मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकर कटाक्षाने मुस्लिम इतिहासकार किंवा बादशहा यांचेच संवाद आपल्या पुस्तकात पुन्हा उधृत करताना दिसतात .


 झिजीया कर लादण्यामागचा हेतू स्पष्ट करण्यासाठी त्यांनी  अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्या काझी चा संवाद  संपुर्ण पणे  उधृत केला आहे . हा संवाद पुरेसा बोलका आहे .

 " अल्लाह सांगतो कि हिंदुना हीन गुलामीत (धीम्मी ) ठेवणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे . कारण ते आपल्या प्रेषीतांचे कडवे शत्रू आहेत. आणि प्रेषीतांनिच आपल्याला आज्ञा केली आहे कि , हिंदुना इस्लामी बनवा नाहीतर ठार मारा , बंधक बनवा , त्यांची मालमत्ता लुटा . …. आपण सज्जन  हनिफी  मुस्लिम असल्यामुळे त्यांना झिजीया घेऊन सोडतो तरी.…  हनिफी सोडुन इतर पंथात झीजियाचा पर्याय नाही. हिंदुपुढे  दोनच पर्याय आहेत - "  इस्लाम  किंवा मृत्यू " (८-६३) 

या उधृता नंतर निष्कर्ष काढताना आंबेडकर म्हणतात : मुहम्मद गझनी पासून अहमदशहा अब्दाली पर्यंतचि  ७६२ वर्षांची कालकथा हि अशी आहे.  (८-६३) 



पाकिस्तान का बनले ?

डॉ. आंबेडकर फाळणीचे पुरस्कर्ते होते. हिंदु आणि मुस्लिम यांचे सहजीवन अवघड आहे . भारत अखंड राहिला तर धार्मिक संघर्ष इतके जास्त होतील कि हिंदुंचा  सामजिक सुधार अशक्य होऊन बसेल त्यामुळे फाळणी करावी असे त्यांचे मत होते . पाकिस्तान बाबतीतले इस्लामी धर्म शास्त्र उलगडून सांगताना ते म्हणतात : 
"मुस्लिमांच्या दृष्टीने हिंदु काफिर आहेत .काफ़िरांचि लायकी मान सन्मानाची नाही . इस्लाम नुसार काफिर जन्मानेच नीच  (low born )  आणि दर्जाहीन (without status) असतात. काफिर शासित देशाला दार उल हरब असे म्हणतात. हे सर्व पाहता मुसलमान लोक हिंदु सरकारचे  आदेश पाळणार नाहीत हे सिद्ध करायला आणखी पुराव्यांची गरज नाही . "( ८ - ३०१) 
पाकिस्तानवरील पुस्तकाचे एक प्रकरण राष्ट्रीय फ़्रस्ट्रेशन  नावाचे आहे . त्यातील ३२८ -३३० या पानांवर बाबासाहेबांनी हिंदु मुस्लिम प्रश्नाची चिकित्सा केलेली आहे . बाबासाहेब लिहितात "  ब्रिटिशांच्या फोडा आणि झोडा या नीतीमुळे हिंदु मुस्लिम संबंध बिघडले हे खरे नाही . ब्रिटिशांच्या पूर्वीपासून  भांडणे होतीच.  (८-३२८)  हिंदु आणि मुस्लिमातील राजकीय भांडण हा ऐतिहासिक, धार्मिक , सांस्कृतिक आणि सामजिक घटक परस्पर विरोधी ( Antipathy) असल्याचा परिणाम आहे. (8-229) . अकबर आणि कबीर  या सुधारकांच्या कार्याचा इष्ट परिणाम झालेला नाही . "  (८-३३०) याचे अधिक विश्लेषण करताना आंबेडकर लिहितात : -
" इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी  नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा ( Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत . जे मुस्लिम बंधुसंघाबाहेर आहेत त्यांकरता घृणा आणि शत्रुत्व याशिवाय काहीही नाही .....  भारताला आपली मातृभूमी आणि हिंदुना बांधव मानण्याची परवानगी - इस्लाम धर्म सच्च्या मुस्लिमाला  देत नाही . "  (८-३३०)



अशा धार्मिक कारणांमुळे हिंदु मुस्लिम ऐक्य अशक्य आहे म्हणुन बाबासाहेबांनी फाळणीला पाठींबा दिला होता.

फ़ाळणिपुर्वि १ ९ ४ ० साली आंबेडकर म्हणाले होते - " जर फाळणी झाली नाही तर भारत हे एक, परिणामशुन्य राज्य बनेल- जणु जिवंत प्रेत, न पुरलेला मृतदेह " (८-३४०) 

फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५  साली -  बाबासाहेब म्हणाले होते. --  " पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " (१-१४६)

त्यावेळच्या  अखंड भारतातले मुस्लिम लोकसंख्येचे  ३५% हे प्रमाण लक्षात घेतले तर आंबेडकरांच्या लेखनाची खोली लक्षात येते आणि तत्कालीन कोन्ग्रेस किंवा हिंदुसभेला हि  गोष्ट कशी कळली नाही ? याचेही आश्चर्य वाटते .  

त्यापुढे जाउन बाबासाहेब असेही म्हणतात  कि - " जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे " (१-१४६)



इशारा : हिंदु अधिक आक्रमक होत जातील  

 बाबासाहेबांनी ७५  वर्षा पुर्वी दिलेला इशारा आज महत्वाचा  ठरताना दिसतो आहे . बाबासाहेब लिहितात :-

"मुसलमान राजकारणात गुंडगर्दि आणत आहेत .या  दंगली त्याचे पुरावे आहेत.  मुसलमान  मुद्दाम  सुटेडन जर्मन नाझिंचे  अनुकरण करत आहेत. (झेक बाबतचे)  . जोपर्यंत एकटे मुस्लिम आक्रमक होते तोवर हिंदु मार खात होते.  भूतकाळ गेला आणि  आज हे सत्य राहिले नाही . हिंदु लोक प्रतिकार शिकाले आहेत (learned to retaliate ) आणि  मुस्लिमाना भोसकण्यात त्याना लाज  वाटत नाही . गुंडगर्दिचा विरोध सवाई गुंडगिरीने करणे हा हिंदुचा नवा चष्मा  बिभत्स आहे. ( ugly spectacle ) (८-२६९)




" मुस्लिम अतिरेक हा  (native endowment) अंगभुत आहे, हिंदुपेक्षा जुना आहे  आणि त्यांच्या संस्कृतीचे अंग आहे..  हिंदुचा अतिरेक हा  आजकाल नव्याने प्रतिक्रिया म्हणुन तयार होतो आहे. आज या बाबतीत मुसलमान पुढे असले तरी हे असेच जर चालू राहिले तर….   कदाचित भविष्यात हिंदु त्याना मागे टाकतील . " (८-२४९) 
हे दोन समाज अशाच प्रमाणे धर्मावरून भांडत राहिले तर , भारताचे काय होईल याचे चित्र  बाबासाहेब आपल्यासमोर १९४० साली उभे करतात . आज  फाळणी होऊन गेली आहे. काही वर्षाच्या शांततेत भारताने पाकिस्तान आणि बांग्लादेश च्या तुलनेत दैदिप्यमान प्रगती केलेली दिसते . मात्र हिंदु मुस्लिम संघर्ष राजकीय आणि धार्मिक स्वरूपात सुरूच आहे . त्यामागच्या राजकारणाची आंबेडकरांनी  केलेली चिकित्सा अवश्य पाहिली पाहिजे .




 धार्मिक राजकारणाचा आंबेडकरी अन्वयार्थ      

हिंदु मुस्लिम राजकारणाच्या फियास्कोसाठी आंबेडकर हिंदु महासभा  आणि कॉंन्ग्रेस या दोघांना जवाबदार ठरवतात . बाबासाहेब लिहितात "भाबड्या मनाच्या हिंदु सभेच्या देशभक्तांना वाटते कि हिंदुनि हिंसक पावित्रे घेतले कि मुसलमान सरळ होतील…. खरे तर   हिंदु महासभा संवादाच्या प्रगतीच्या मार्गातला अडथळा आहे कारण त्याना एकता नकोच आहे. उदाहरणार्थ : ( ३५ % मुस्लिम असलेल्या अखंड हिंदुस्थानाच्या वास्तवात   )  " हिंदुस्थान हिंदुचा ! "  अशी घोषणा हिंदु  सभेच्या अध्यक्षांचि आहे . वास्तव स्थिती  पाहता हि घोषणा अतिशय अहंकारी आणि अक्षरश :  अर्थहिन आहे .  " (८-२७०)

कोंग्रेसच्या मुस्लिम अपिसमेंट मुळे   हिटलरचे चोचले पुरवणार्या युरोप  प्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . : डॉ आंबेडकर  

 कॉंग्रेसचेहि  मुस्लिम / इस्लाम बाबतीतले  धोरण पूर्णपणे चुकलेले आहे  असा आंबेडकरांचा आरोप आहे. कोंग्रेसच्या धार्मिक राजकारणाला आंबेडकरांनी  मुस्लिमांचा अनुनय / लांगुलचालन (Appeasement ) असे विशेषण वापरले आहे.  अशी  विशेषणे  पाकिस्तान वरील पुस्तकात कोन्ग्रेस साठी शेकडो वेळा वापरली  आहेत  . एकट्या पान २७० वर  लांगुलचालन (Appeasement ) हा शब्द सहा वेळा आलेला आहे. आंबेडकर लिहितात : -
" कॉंंग्रेसला  अपिसमेंट  आणि सेटलमेंट  यातला फरक सुद्धा कळत नाही. अपिसमेंट - अनुनय म्हणजे लांगुलचालन! आक्रमकाचे हृदय जिंकण्या साठी त्यांनी केलेल्या खून, बलात्कार आणि निष्पापांच्या लूटमारी कडे दुर्लक्ष करणे   हि कोङ्ग्रेसि अपिसमेंट ची नीती आहे . त्याला कोणत्याही मर्यादा नाहीत .. सेटलमेंट म्हणजे  दोन्ही बाजू समाधानी होतील अशी मर्यादित तडजोड होय . मुस्लिमाना धार्मिक आधारावर सवलती दिल्यास त्यांची आक्रमकता वाढीस लागलेली दिसते या सवलतिंचा अर्थ हिंदुचा भ्याडपणा (defeatism) असे  मुस्लिम मनास वाटते.  कोंग्रेसच्या अपिसमेंट मुळे   हिटलरचे चोचले पुरवणार्या दोस्त राश्ट्रांप्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . "   (८ - २७०) 

सवाई गुंडगिरिचि आक्रमकता  किवा लांगुलचालन यापैकी कोणत्याही मार्गाने हिंदु मुस्लिम प्रश्न सुटणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे. 




समस्येवरील दोन उपाय  

 वकिली कायदे आणि सेटलमेंट  करून हिंदु मुस्लिम प्रश्न हाताळावा लागतो - अपिसमेंट अथवा गुंडगिरी  करून नाही -  याची प्रचीती अजून भारतीय राजकारणाला झालेली नाही. फाळणी घडून  भूतकाळात जमा झाली . आजच्या भारतातील हिंदु आणि मुस्लिमाना  सहजीवन अपरिहार्य आहे .  जुन्या मानसिकता जुने प्रश्न आजही तसेच्या तसे जिवंत आहेत . मुस्लिमांचा धार्मिक उन्माद , आक्रमकता, हिंदूची सवाई गुंडगिरी वा सवाई लांगुलचालन आजही तसेच आहे .



१) सेक्युलारीझम :  यावर बाबासाहेबांनी सुचवलेला उपाय सेक्युलारीझम हा आहे . सेक्युलारीझम हा सर्व धर्म समभावाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे . त्यात  धर्माचे स्थान फक्त पारलौकिक श्राद्धेपुरते मर्यादित असते. इहलोकात कसे वागावे ? किती विवाह करावेत ? बुरखा   घालावा का ? याचे कोणतेच धार्मिक स्वातंत्र्य मिळत नाही . सर्व गोष्टी कायदा आणि  शासनाच्या अखत्यारीत येतात . बाबासाहेबांची घटना आणि त्यातील कलमे सेक्युलर आहेत . त्यात कोणत्याहि धर्मास फाजील स्वातंत्र्य नाही . मात्र दुर्दैव असे कि   याच घटनेत अनुसृत्य असणारा समान नागरी कायदा अजूनही होत नाही . कोंग्रेसच्या नाही - भाजपाच्या राज्यातही नाही .. शासन सेक्युलर रहात नाही . तलाक पिडीत मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी समान नागरी कायदा केला जात नाही .  

 २) धर्म सुधारणा :  मुस्लिम समाजात समाज सुधारणा आणि धर्म सुधारणा करण्याची प्रोसेसच अस्तित्वात नाही. धर्म चिकित्सा  हा विषय त्याज्य मानला गेला आहे . जी काही लाहान सहान सुधारक मंडळे आहेत ती कुराणाच्या परीभाषेबाहेर जात नाहीत . बुद्धीवादाचे समर्थन करण्यासाठी हदीस मधली पैगंबर वचने शोधली जातात. त्यामुळे  मुस्लिमांचे प्रचंड नुकसान होणार आहे. विज्ञान निष्ठा  आणि बुद्धिवाद याचा मुस्लिम समाजात प्रसार करणे  बाबासाहेब आवश्यक मानतात. त्यासाठी त्यांनी रेनन ला उधृत केले आहे : 
  • " इस्लाम विज्ञानाला सततच  शत्रू समजत आला आहे. हे त्या धर्माचे एकनिष्ठ एकमेव सातत्य आहे . पण हे सातत्य धोकादायक आहे. इस्लामच्या दुर्दैवाने इस्लामला यश मिळत आले. विज्ञानाचा  - बुद्धीवादाचा वध  करून खरे तर इस्लामने स्वत:चाच वध  केला आहे. जगाचे शाप घेतले आहेत आणि हीनत्व पत्करले आहे " ( ८ - २३५)      
मुस्लिमांनी विज्ञान निष्ठेचा, बुद्धिवादाचा , आणि धर्म चिकित्सेचा स्वीकार केल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही इतरांचेही भले होणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे .




समारोप 


 हिंदुच्या भल्यासाठी त्यांची   धर्म चिकित्सा  आणि प्रबोधन अत्यावश्यक आहे . पण मुस्लिमाना यापासून वंचित ठेवण्याचे काही कारण नाही . इस्लामची चिकित्सा केली तर हिंदुत्व वाद्यांना फायदा होतो या भ्रमातून आता बाहेर पडायला हवे . आणि इस्लाम हा मुक्तिदाता , समतेचा , शांततेचा धर्म आहे या कम्युनिस्टांनि पसरवलेल्या अंधश्रद्धेतुन हि  मुक्त झाले पाहिजे .  कम्युनिस्टांचे प्लेन आणि डोकी अभ्यासू असली तरी पुरोगामी वा  संविधानिक  निश्चित नाहीत. आपण  आपले मेंदु कम्युनिस्टांकडे गहाण टाकण्याची  गरज नाही .या विषयावर बाबासाहेबांचे विचार अभ्यासले पाहिजेत .

बाबासाहेबांनी इस्लामची कठोर चिकित्सा केली. त्या धर्मात  समता नाही  - सहिष्णुता नाही -  आधुनिकता नाही -  असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे. मुस्लिम बांधवांना धार्मिक दलदलीतून बाहेर काढणे हे आंबेडकरांचा अनुयायी म्हणुन मला माझे कर्तव्य वाटते . विज्ञान आणि विवेक याच्या प्रचारा शिवाय हे अशक्य आहे . इस्लाम धर्म चिकित्सा अटळ आहे. आपल्याला  चिकित्सक बुद्ध्यांक वाढवावा लागणार आहे. बाबासाहेबांच्या   Thoughts on Pakistan च्या मुळ आवृत्तीतल्या पहिल्या पानावरचे कोटेशन होते :



"“More brain, O Lord, more brain! or we shall mar 
Utterly this fair garden we might win.”
―George Meredith


 मेंदू दे देवा, मेंदु दे - बुद्धी दे देवा, बुद्धी दे
अन्यथा 
मरेल  विजयाची - सुनिश्चित आशा  !








--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
[(८ - ३२०)  हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र  शासनाने  प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत  रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे.  बरेचसे  मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English)  मध्ये कंसात दिले आहेत.  ]

संदर्भ ग्रंथांचे तपशील :

(1) - Volume 1. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(८ )- Volume 8.   Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 8. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(१८-३) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे : खंड १८ भाग ३ (मराठी ). उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन (२००२)

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या लेखमालेत भारतातील मुस्लिम राजकारणाचा रंजक वेध घेतला आहे. त्यासाठी काही देखणे  चरित्रनायक निवडले  आहेत .
त्यांच्या चशम्यातून ……

१) कुरुंदकरांचा अकबर : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_6.html 
२) 1857 चा (मोरेंचा ) जिहाद : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_8496.html
३) जनतेचा प्यारा अश्फाक : http://drabhiram.blogspot.in/2012/09/blog-post_1247.html
४) मौलाना अबुल कलामांची आझादी : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post.html
५) हमीदचे मुसलमान : http://drabhiram.blogspot.in/2014/02/blog-post_15.html
६) मुकादमांचा इस्लाम : http://drabhiram.blogspot.in/2014/03/blog-post.html
७) डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम: http://drabhiram.blogspot.in/2015/04/blog-post.html

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *