९ एप्रि, २०१४

आयुर्वेद : गुणकारी ? दुर्लक्षित ? कि निव्वळ बंडलबाजी ?

आयुर्वेद : गुणकारी ? दुर्लक्षित ? कि निव्वळ बंडलबाजी ? 

विज्ञानाच्या चष्म्यातून आयुर्वेद :






 

सर्वप्रथम आयुर्वेदाला साष्टांग दंडवत :

आयुर्वेदाविषयी माझ्या मनात कुतूहल आहे . चरक आणि सुश्रुत या महान संशोधक पूर्वजांविषयी अतिशय आदर आहे . पण विज्ञान सतत बदलत जाते . गेलिलिओ चे भौतीकशास्त्र न्युटन ने खोडून काढले म्हणुन गेलिलिओ लहान ठरत नाही . … कि न्युटन महान ठरत नाही . …. हाच न्याय चरक , सुश्रुत आणि आजच्या आधुनिक विद्न्यानालाहि लागू आहे .


आयुर्वेदात साइड इफेक्ट नाही . जुन्या दुखण्यांवर आयुर्वेद उपयुक्त आहे अशी चर्चा आणि कुजबुज सतत चालू असते. छोट्या मोठ्या मासिकातून , वर्तमान पत्रातून आयुर्वेदाची स्तुती करणारे भरपूर लिखाण चालू असते .  सांधे दुखीपासून , डायबिटिस पर्यंत आणि केन्सर पासून एडस पर्यंत अनेक रोगावर आयुर्वेदात उपचार आहेत असे सांगितले जाते . हे खरे आहे काय ? मग आयुर्वेद फक्त भारतातच का ? अमेरिका युरोप आदी प्रगत देशात आयुर्वेदाला उपचाराची मान्यता का नाही ? प्रस्तुत लेखात आपण आयुर्वेदाची वेगवेगळ्या अंगाने चर्चा करायची आहे .


काय आहे आयुर्वेद ? 


मान्य ग्रंथानुसार आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. चरक आणि सुश्रुत या आचार्यांनी स्थापन केलेल्या विचारशाला यात महत्वाच्या आहेत . आणि प्राचीन काळी इतरही अनेक मान्यवरांनी यात भर टाकली आहे . पण आयुर्वेद हि केवळ उपचार पद्धती नाही . वात , पित्त आणि कफ हे तीन दोष संतुलित असले तर मनुष्य निरोगी राहतो आणि त्यांचे असंतुलन झाले तर रोग होतात असे आयुर्वेद मानतो . नाडी, मूत्र, मल , जिंव्हा , शब्द, स्पर्श , दृक, आकृती, या आठ गोष्टी बघून आयुर्वेदात निदान केले जाते. त्यास अष्टविध निदान पद्धती असे म्हणतात.
                    


सोप्पे शास्त्र 

आजचे आधुनिक वैद्यक शास्त्र शरीरातील केमिकल रेणूंची तपासणी करते , एक्स रे , सिटी स्केन , मायक्रोस्कोप खाली रक्त परिक्षा , डिएनए परिक्षा यापैकी कशाचाही भानगडीत आयुर्वेद पडत नाही . आयुर्वेदाच्या कोणत्याहि ग्रंथात कोणत्याहि आधुनिक टेस्ट चा उल्लेख नाही . पण निव्वळ नाडिपरिक्षेतुन इसीजी पेक्षा अधिक माहिती वैद्याला कळते असे दावे मात्र आज आहेत . तीन दोष आठ निदान पद्धती खेळ खल्लास . बरे आजच्या माणसाला होणारे बहुसंख्य रोग हे जीवाणू आणि विषाणू यांच्या संसर्गाने होत असतात . चरक आणि सुश्रुत संहितेत या बापड्या जीवांवर भाष्यच नाही !


सबब आयुर्वेद हि जीवनपद्धती आहे …. मुळात आयुर्वेदानुसार जीवन जगले कि रोग होतच नाहीत …त्यामुळे जीवाणू विशाणुच्या शेकडो प्रजातीन्बद्दल भाष्य करण्याची गरज आयुर्वेदाला वाटतच नाही ! त्यामुळे रोगनिदानाच्या कोणत्याहि आधुनिक पद्धती शिवाय आणि जीवाणूच्या इन्फेक्शन कडे संपूर्ण दुर्लक्ष करत आयुर्वेद भारतात दुमदुमत राहतो . त्याकाळी धर्म शास्त्रानुसार मानवी शरीराच्या डिसेक्शन ला परवानगी नव्हती . त्यामुळे आयुर्वेदाला मानवी शरीराची ( सखोल रचना ) एनाटोमि नीटपणे माहित नाही . जसे कि मेंदूचे निरनिराळे भाग आणि त्यांची कार्ये.... चरक आणि सुश्रुत संहितेत यावर भाष्यच नाही !


                                                    


आधुनिक परिभाषेचा द्वेष 


हे अणु , ते रेणू , हि टेस्ट ती पेस्ट , हे एक्स रे ते इसीजी हे सारे पाश्च्यात्य शब्दांचे बुडबुडे आहेत . आधुनीक विज्ञानाच्या चष्म्यातून आमच्या प्राचीन शास्त्राकडे पहाणे चूक . मात्र डायबेटीस आदी आधुनिक विकारांवर मात्र जालीम औषध आमच्याकडे आहे असे हे आयुर्वेदाचे तर्कशास्त्र आहे. बदलत्या जीवनपद्धतीनुसार रोग बदलत असतात . त्या आधुनिक रोगांवरचे जालीम इलाज सांगणार्या प्राचीन शास्त्राला आधुनिक परिभाषेचा मात्र राग करावा लागतो . 








इफ़ेक्ट आणि साईड इफ़ेक्ट 


खडूची पुड आणि लाकडाचा भूसा मेणात कुस्करून खाल्ला तर साइड इफेक्ट काही नाही . पण त्याचा इफ़ेक्टहि नाही हा मुद्दा आहे . आयुर्वेदाने केंन्सर बरा केल्याचे राणा भीमदेवी दावे मी वाचले आहेत . पिडलेली किडनी , बिघडलेले यकृत आणि गेलेली स्मृती परत आणणारी चूर्णे, भस्मे आणि आसवे आयुर्वेदापाशी आहेत असेही बिनबोभाट लिहिले जाते . आधुनिक वैद्यक शास्त्रातले एखादे औषध मान्य होण्यासाठी त्याला कठोर परिक्षेतुन - क्लिनिकल ट्रायल मधून पास व्हावे लागते . सुरवातीला औषधाचे प्रयोग प्राण्यांवर आणि मग माणसांवर केले जातात . रुग्ण आणि निरोगी अशा दोघान्वरही प्रयोग केले जातात . प्लासिबो इफ़ेक्ट ची शहानिश केली जाते . सर्व संख्याशास्त्रीय चाचण्यातुन पास झालेले औषधच मग रोग्याला दिले जाते . त्यावेळी त्या आधुनिक औषधाच्या सर्व इफ़ेक्ट आणि साइड इफ़ेक्ट ची माहिती डॉक्टरला असते . क्लिनिकल ट्रायल मध्ये ती माहिती डोक्युमेण्ट झालेली असते . आजवर आयुर्वेदाचे एकही राणा भीमदेवी औषध एकही क्लिनिकल ट्रायल पार करू शकलेले नाही . इच्छुकांनी क्लिनिकल ट्रायल बद्दल अधिक माहिती अवश्य करून घ्यावी . आणि आयुर्वेदातलि सर्व औषधे यात साफ नापास होतात हेही जाणुन घ्यावे . नापास होण्याच्या भीतीने क्लिनिकल ट्रायल साठि बहुतेक प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधे उतरलीच नाहीत त्यामुळे त्यांचे दूरगामी साइड इफ़ेक्ट आपल्याला माहित नाहीत हे हि समजून घ्यावे .

http://en.wikipedia.org/wiki/Clinical_trial

http://www.openthemagazine.com/article/living/ayurveda-hoax-or-science





                               




आता थोडे अर्थशास्त्र 


एकेक गुणकारी औषधाचे पेटंट करोडो रुपयांना विकले जात असते . प्रोस्टेट केन्सरच्या एका औषधावर औषध कंपन्या डॉलरचा पाउस पाडत असतात . नवीन औषधांच्या संशोधनासाठी लाखो डॉलरचा अव्याहत खर्च चालू असतो . आयुर्वेदात एकजरी गुणकारी औषध असते तर या धंदेवाईक चालू कंपन्यांनी ते सोडले असते काय ? त्या औषधाचे स्वामित्व मिळवुन त्याचा जगभर व्यापार करण्याची संधी सोडुन द्यायला या कंपन्या मूर्ख आहेत काय ? आयुर्वेद फक्त भारतातच का ? अमेरिका युरोप आदी प्रगत देशात मेन्स्ट्रिम मध्ये  आयुर्वेदाला उपचाराची मान्यता का नाही ? 


दुर्बल मनाचे एकमेव आशास्थान : कोन्स्पिरसी थेअरी 

भाबड्या मनाचा काही गोश्टिवर ठाम विश्वास बसलेला असतो . पण हा विश्वास तर्कशास्त्राच्या आणि अर्थशास्त्राच्या सर्व पारड्यात गळून पडत असतो . बुद्धीला पटते पण मनाला पटत नाही मग …… आयुर्वेदाविरुद्ध या बहुराष्ट्रीय कंपन्यांची कारस्थाने सुरु आहेत …. आयुर्वेदाविरुद्ध अमेरिकेचा कट सुरु आहे अशा कोन्स्पिरसी थेअरिचा जन्म होत जातो . सशाविरुद्ध सिंह कट करत नसतात हे हि भाबड्या मनाला मग समाजात नाही


 . 
खरे दु:ख असे आहे :


मेडिकलच्या प्रवेश परिक्षेत अपघाताने दोन मार्क कमी पडले म्हणुन हुशार विद्यार्थी आयुर्वेद शाखेत प्रवेश करतो . मग स्वत:च्या व्यवसायाशी निष्ठा म्हणुन आयुष्यभर आयुर्वेदाची भलामण करत बसतो . जर दोन मार्क जास्त पडले असते तर ? आधुनिक वैद्यकाला प्रवेश मिळण्याएव्हढे मार्क मिळाले असते तर आयुर्वेदाला एडमिशन घेतली असती काय ? आणि तर आयुर्वेदाची भलामण केली असती काय ? 

मेडिकलची मिळणारी सीट नाकारून विश्वास म्हणुन आयुर्वेद स्वीकारलेले किती वैद्य मोजता येतील . कोल्ह्याला द्राक्षे आंबट असतात . जे त्या विद्यार्थांबाबत खरे आहे तेच भारतीय मानसिकतेबद्दल हि खरे आहे . वेदातल्या उडत्या तबकड्या , महाभारतातले एटम बोंब , रामायणातली विमाने आणि आयुर्वेदातले औषध ! पाश्चात्य सन्स्क्रुतिचा निषेध असो ! वेलीवर उंच लटकलेल्या द्राक्षाचां निषेध असो . 








प्लासिबू इफेक्ट 

पाद्र्याने हात लावला कि रोगी बरे होतात . मनाला बरे वाटले कि काही आजार बरे होतात . काही आजार मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती मुळे आपोआप बरे होतात . तसाच आयुर्वेदाच्या काही औषधांचा , काही लोकाना , काही वेळेला चांगला अनुभव येतो .
 हा व्यक्तिगत अनुभव म्हणजे विज्ञान नाही . 
क्लिनिकल ट्रायल् च्या संख्या शास्त्रीय मोजपट्टीवर पास झाले पाहिजे . दु:ख आयुर्वेदिक औषधे नापास होतात याचे नाही . दु:ख भारत सरकार नापास होते याचे आहे . एका अशास्त्रीय आणि परिणाम शून्य थेरपी चे शिक्षण देण्यासाठी महाविद्यालये चालवली जातात . अनुदानात सरकारी पैशाची उधळपट्टी सुरु राहते . अनेक हुशार विद्यार्थ्याना आयुर्वेदिक कालबाह्य काढे शिकत पाच वर्षे फुकट घालवावी लागतात . त्यातले अनेक पुढे जाउन आयुर्वेदाची प्रेक्टिस करतच नाहीत . त्याना ओ कि ठो न समजणारी आधुनिक औषधे देत बसतात . पेशण्ट च्या जीवाशी खेळतात . या सर्व लबाडिला भारत सरकार अनुदान देते . वैद्यांनी काढे , आसवे देत जीवन व्यतीत केले असते तर फक्त एका हुशार विद्यार्थ्याचे करिअर बरबाद होईल . त्यांच्या आंधळ्या एलोपेथि प्रेक्टिसने लाखो पेशनटचे हाल होतात. काही प्राणाला हि मुकतात . सर्व आयुर्वेदिक / होमिओपाथिक कोलेजांचे रुपांतर आधुनिक वैद्यकीय महाविद्यालयात केले पाहिजे . आणि त्या हुशार विद्यार्थ्याना आणि रुग्णाना न्याय मिळवुन दिला पाहिजे . आपल्या भारत देशात डॉक्टरांची संख्या कमी आहे . वैद्यकीय सुविधा कोमात आहेत . बालमृत्यू , कुपोषण , साथीचे रोग भारत देश पोखरत आहेत . आणी सरकारने आपला आर्थिक सट्टा आयुर्वेदाच्या प्लेसिबू इफ़ेक्ट वर लावला आहे . 




विज्ञान होणे सोप्पे नसते 

ज्योतिष पाहून आजाराचे निदान करण्याचे उल्लेख आयुर्वेदात आहेत . सापाचे विष उतरवायचे मंत्र आहेत. औषध सिद्ध करण्यासाठी पाच कुमारिकांनी त्याचे  पूजन करण्याचा विधी आहे .      मानवी भावनांचे आणि विचाराचे स्थान मेंदू नव्हे तर हृदय असे पारंपारिक आयुर्वेद मानतो . त्याला जीवाणू, विषाणू , डी  एन ए कश्शा  कश्शाचा आता पता नाही . तरी आयुर्वेदाला स्वत:स विज्ञान / शास्त्र म्हणवून घ्यायचे आहे . ठीक आहे. पण विज्ञान होणे सोप्पे नसते. 

आधुनिक वैद्यक शास्त्रावर कायद्याचा कडक वचक आहे . ती एक चांगली गोष्ट आहे . आयुर्वेदावर हे बंधन का नाही ? प्रथम औषध आणि त्याची परिणाम कारकता सिद्ध  करायची , पुन्हा ते औषध कसे बनवायचे ? याचा निर्बंध् सिद्ध करायचा … आणि जर पेशंटला त्याचा उपयोग झाला नाही - तोटा झाला   तर कोर्टाची पायरी चढायला मुक्तद्वार ठेवायचे . हे सर्व नियम आणि कायदे आधुनिक वैद्यक शास्त्राला आहेत . ते योग्य आहे पण भारत सरकारने या सर्व नियमातून आयुर्वेद आणि होमिओ पाथी ला सुट दिली आहे ! आयुर्वेदाच्या समर्थकाना   जर विज्ञान युगात यायचे असेल तर प्रथम हा कायद्याचा अंकुश   आमंत्रित केला पाहिजे . मंत्रित बुवाबाजीचे दिवस आता संपले . 

अमेरिकेतल्या कुठल्यातरी राज्यात आयुर्वेदाचे एखाद दुसरे  कोलेज आहे.  मोजकी आयुर्वेदिक औषधे क्लिनिकल  ट्रायल मध्ये बाजी मारू शकली आहेत . पण पुन्हा क्रोस ट्रायल घेतली तर त्यातलीच कित्येक हरतात . कधी संख्याशास्त्रीय माहितीतच  लोचा आढळून येतो .  अमेरिकन एफ डी  ए ने आयुर्वेदिक औषधे आमच्यातर्फे सिद्ध झालेली नाहीत असे वॉर्निंग लेटर हि प्रसिद्ध केलेले आहे.  ती पेशंट ने स्वत:च्या जवाबदारीवर वापरावीत। दुश्परिणामाना  आम्ही जवाबदार नाही   असेही म्हटले आहे . खरे पाहता आयुर्वेदात हेवी मेटल ची अनेक विषारी संयुगे वापरलि जातात . ती घातक आहेत आरोग्याला । दुसरीकडे आयुर्वेदाचा दावा आहे कि -   लिंबा पासून तुळशी पर्यंत सर्व औषधे सर्दी पासून केंसार पर्यंत सर्वांवर जालीम छावा   इलाज आहेत !  पुन्हा क्लिनिकल ट्रायल इल्ला . 



राणा भीमदेवी दावे : 


आयुर्वेदाची उपयुक्तता आधुनिक विज्ञानाने मान्य केली आहे असे दडपून खोटे लिहिले जाते . त्यासाठी अनेक उदाहरणे दिली जातात . सर्पगंधा नावाच्या एका आयुर्वेदिक औषधाचे उदाहरण चर्चेला घेऊ . 

सर्पगंधा हि वनस्पती उच्च रक्तदाबावर (हायपर टेन्शन वर ) चांगले औषध आहे . खरे आहे . आधुनिक औषधशास्त्र ती वापरते . या गोष्टीतून भलते अर्थ काढले जातात . 

आयुर्वेदात सर्प गन्धेचा उल्लेख आहे पण हायपर टेन्शनचा नाही . आयुर्वेदानुसार सर्प गन्धेचा हा श्लोक पहा :  

 सर्पगन्धा अति तिक्त  उष्णा रुक्ष कटु विपकिनी .
पित्तवृद्धिकारि रुच्या शूल प्रशमनी सरा.
कफ़वातहरा निद्रप्रदा ह्रुद्रव्सादिनी.
कामवसदीनी चैव हन्ति शूल ज्वर् क्रिमिन.
अनिद्रा भूत उन्माद अपस्मरं भ्रमं तथा.
अगनिमान्द्यं विषं रक्तवातधिक्यं व्यपोहति.

आयुर्वेदात सर्पगंधा पेन किलर - वेदनाशामक म्हणुन येते . पुन्हा तसेही नाही ! …  नेमके शास्त्र शुद्ध बोलेल तर तो आयुर्वेद कसला ? आयुर्वेदानुसार सर्प गंधा हे औषध चक्कर येणे , विषबाधा , मंद अग्नी  , पोटातले जंत , फेफरे येणे आणि वेडेपणावरहि  उपयुक्त आहे .  

आयुर्वेदानुसार सर्पगंधा रक्त दाबावारचे औषध  नाही .  हिंग पुस्तक आणि तलवारीचा अन्योन्य संबध … असा सगळा इल्ला कारभार आहे. परत बघा बघा रक्त दाबावरचे आयुर्वेदिक औषध सिद्ध झाले म्हणुन बोंब आहेच . हे सारे विवाद तर्कदुष्ट आहेत . फेलसी आहेत. 


विज्ञान सतत बदलत प्रगती करत जात असते . धर्माप्रमाणे हाजारो वर्षा पूर्वीच्या ग्रंथात अडकलेले नसते हे समजून घेतले पाहिजे .  वात पित्त कफावर आज्ज्या, काकू,  मावशा आणि पार्कातले आजोबा चर्चा करू शकतात म्हणुन त्याचे कुजबुज मार्केटिंग चालू राहते . कुजबुज मार्केटिंग म्हम्हणजे  विज्ञान नाही . विज्ञान होणे सोप्पे नसते . 

आधुनिक वैद्यकशास्त्राची पुस्तके दर वर्षी अपडेट होतात . हजारो  वर्षापूर्वी लिहिलेलि चरक आणि सुश्रुत संहिता आजही आयुर्वेदाचा मुख्य अभ्यासक्रम आहे . साध्या विंडोजचे  नवे व्हर्जन दर वर्षी येत असते .



जी  गोष्ट हजारो वर्ष बदलत नाही :


त्याला धर्म म्हणतात -  विज्ञान नाही. 


पुन्हा एकदा आयुर्वेदाला साष्टांग दंडवत :


आयुर्वेदाविषयी माझ्या मनात खरेच प्रेम  आहे . शिवाजी महाराजांचाही मी नितांत भक्त आहे म्हणून मी गाडी ऐवजी घोड्यावरून फिरावे काय ? 


चरक आणि सुश्रुत या महान संशोधक पूर्वजांविषयी  आदर आहे . पण विज्ञान सतत बदलत जाते . गेलिलिओ चे भौतीकाशास्त्र न्युटन ने खोडून काढले म्हणुन गेलिलिओ लहान ठरत नाही . … कि न्युटन महान ठरत नाही . 

मानवी बुद्धिमत्ता टप्प्या टप्प्याने आनि एकत्रितपणे काम करते . कालचे विज्ञान आज इतिहास ठरते . आयुर्वेद हा औषध शास्त्राचा महान इतिहास आहे . त्याचा जरूर अभ्यास व्हावा . 

इतिहासाच्या कला शाखेत आयुर्वेद शिकवला जावा . वैद्यकीय महाविद्यालयात नाही . आणि जर शिकवायचाच असेल तर अजून एक गोष्ट जरूर करावी . पाकिस्तानी सीमेवरील सैन्याच्या बंदुका, तोफा काढून घ्याव्यात आणि त्याना जिरेटोप , वाघनखे आणि ऐतिहासिक भाले बरच्या वाटण्यात याव्यात .

--------

७३ टिप्पण्या:

  1. वेल सेड अभिराम....मला जे म्हणायचेhहोते त्यास तू शब्दरुप दिलेस. हेच सारे होमिओपथिस लागू आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. अभिराम दीक्षित आपल्या या अतिश्योक्ती पूर्ण लेखाला हसावे कि कीव करावे तेच कळत नाही ....

    तरीही काही दिवसांपूर्वी लिहलेला एक साधा लेख आपल्या इतर वाचकांना उपयुक्त ठरेल ... तुम्ही त्याचा विचार केला नाहीत तरी उत्तम ....

    आयुर्वेद : निरोगी आयुष्यासाठी ब्रह्मदेवाने निर्माण केलेला पाचवा वेद !!!

    "आयुर्वेद" या एका अर्थपूर्ण शब्दापाशी आज जग आकर्षित होत आहे ... एकोणिसाव्या शतकात फार वेगाने जगभर आधुनिक उपचार पद्धत रूढ झाली ... आणि तितक्याच वेगाने तिचे दुष्परिणाम दिसू लागले ....

    याच काळात आयुर्वेदाचे फार नुकसान झाले ...
    पूर्वी भारतभरात गावोगावी वैद्य आढळत आणि बऱ्याचदा ते विनामुल्य उपचार करत ...
    आयुर्वेद म्हणजे उशिरा गुण येणारी औषधे ... आयुर्वेद म्हणजे कडू काढे .... आयुर्वेद म्हणजे चुर्णांच्या पुड्यांचा भरणा .....
    आधुनिक वैद्यकीय शास्त्राने असे वाट्टेल त्या पद्धतीने आयुर्वेदाचे खच्चीकरण केले ... अजूनही ते त्याचं पद्धतीने चालू आहे .....

    मात्र या झंझावातात अनेक सिद्धहस्त वैद्यांनी आयुर्वेद सातत्याने जिवंत ठेवला .... त्याचे संवर्धन केले .....

    आजही गावोगावी खेड्यापाड्यात काविळीचे औषध देणारे लोक ढिगाने सापडतात आणि ते काविळी सारख्या नाजूक आजाराची उत्तम पद्धतीने चिकित्सा देतात आणि याउलट मुंबई सारख्या अतीप्रगत शहरात मोठ्या मोठ्या पंचतारांकित हॉस्पिटल मध्ये काविळीचे असंख्य रुग्ण महागडी चिकित्सा देऊनही मृत्युमुखी पडतात .....

    अल्प दुष्परिणाम, एकाच आजारावर असंख्य औषधे , आजाराचे मूळ नष्ट करण्याची अदभूत क्षमता, खंगलेल्या शरीराला नवसंजीवनी देणारे रसायन कल्प यामुळे आयुर्वेदिक चिकित्सा जास्त फायदेशीर ठरते असेही दिसते .

    आयुर्वेदिक औषधे हजारो वर्षे आणि पिढ्यानपिढ्या उपयुक्त आहेत असे सिद्ध झाले आहे ....
    सगळे MBBS झालेले डॉक्टर LIV -52 नावाचे जे औषध यकृताच्या आरोग्यासाठी लिहून देतात ते १०० % आयुर्वेदिक आहे ....
    जुलाब थांबवण्यासाठी बिलाजील नावाचे आयुर्वेदिक औषध देखील सर्रास दिले जाते ...
    पचन संस्था , सुधारून आरोग्य स्थिर करणारी असंख्य औषधे आयुर्वेदात आहेत ...


    काढे , आसव , आरिष्ट , चूर्ण , रसकल्प , स्वर्ण कल्प , गुगुळकल्प, सिद्ध तेले , तूप वगैरे असंख्य आणि लाखो औषधे हे आयुर्वेदाचे एक दिव्य वैशिष्ट्य आहे .... ज्यातून आयुर्वेद चिकित्सा करणे हे येडेगबाळ्याचे काम नाही हेच लक्षात येते ...
    एवढी उत्तम विविधता कोणत्याच अन्य आरोग्य शास्त्रात आढळत नाही ....

    आयुर्वेदात नाडीपरीक्षा , नादपरीक्षा ,जिव्हा ( जीभ ), उदर परीक्षण , आणि अष्टविध निदान परीक्षा अशा अनेक पद्धतीनी आजाराचे मूळ शोधून त्यावर चिकित्सा दिली जाते ....

    वाढलेल्या आणि जुनाट आजारांवर पंचकर्म चिकित्सा अत्यंत उपयुक्त ठरते ... मात्र पंचकर्म चिकित्सा फार विचार करून द्यावी लागते ...
    केरळीय आयुर्वेद शास्त्रात पंचकर्म अतिशय विस्तृत पद्धतीने अभ्यासले गेल असून जगाला भुरळ पडेल इतक्या सुंदर पद्धतींनी पंचकर्म चिकित्सा देण्यात केरळ अग्रेसर आहे ....
    पण बाजारीकरण आणि पैसा या मोहापायी आज पंचकर्म करणे म्हणजे महागडी चिकित्सा होऊन बसली आहे .....
    त्यामुळे रुग्णांना "आवश्यकते"नुसार पंचकर्म देणारे वैद्य आज भेटणे दुरापास्त झाले आहे ....

    आयुर्वेद चिकित्सा आणि संशोधन या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत ....
    सुज्ञास सांगणे न लगे ....

    || श्रीकृष्णार्पणमस्तु ||

    वैद्य राहूल काळे , आयुर्वेदाचार्य .
    आयुःसिद्धी आयुर्वेद चिकित्सा आणि पंचकर्म केंद्र ,
    कळवा (ठाणे ) संपर्क क्रमांक : 07506178981
    09970791774 (watsapp आणि telegram साठी उपलब्ध )

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. १) ब्रम्हदेव कुठे राहतो हो?
      २) गावोगावचे काविळीवर औषधे देणारे लोक किती बदमाशी करतात ते जवळून बघितले आहे. कावीळ नसतानाही कावीळ आहे असे छातीठोकपणे सांगून त्यांचे औषध घ्यायला लावतात हेही पहिले आहे.

      हटवा
    2. जगाला भुरळ पडेल इतक्या सुंदर पद्धतींनी पंचकर्म चिकित्सा हा काय प्रकार आहे ? भुरळ घालविण्यासाठी ब्रह्मदेवाने आयुर्वेदात काय सांगितले आहे ?

      हटवा
  3. आयुर्वेद : गुणकारी ? दुर्लक्षित ? कि निव्वळ बंडलबाजी ? --अर्धवट ज्ञानामुळे दिशाभूल करणारा लेख

    १ अमेरिकेमध्ये स्टेट नुसार वेगवेगळे कायदे आहेत त्यात कालीफोर्निया मध्ये आयुर्वेदाचे कॉलेज ही आहे.
    http://en.wikipedia.org/wiki/California_College_of_Ayurveda
    या शिवाय युरोप मधील जर्मनी रशिया ऑस्ट्रिया या देशात आयुर्वेदाची चिकित्सा केली जाते.

    २ काय आहे आयुर्वेद
    आयुष्याचे ज्ञान म्हणजे आयुर्वेद .
    आयुर्वेद निदान पद्धति मधील अष्टविध निदान पद्धती हि एक आहे केवळ नव्हे .

    या नंतर च्या चित्रामध्ये असलेले महाशय हे डॉ अरविंद कुलकर्णी M.D., D.M.R.D. (Eng.), D.A.B.R. (USA) आहेत जे पुस्तक प्रकाशित करत आहेत .


    २ सोप्पे शास्त्र
    आजचे आधुनिक वैद्यक शास्त्र ज्या परीक्षा करते त्या सर्व तपासण्या आयुर्वेदीय चिकित्सक करतो. उदा मार्गावारोधजान्य कामलेमध्ये USG चा उपयोग
    या सर्व तपासण्या ह्या भौतिक शास्त्राच्या असून त्याचा उपयोग जसा आधुनिक वैद्यक शास्त्र करतो तसा अन्य कुठल्याही शास्त्र करू शकतो

    मायक्रोस्कोप चा शोध लागला नसल्याने जीवाणू विषाणू यांचे वर्णन आयुर्वेदात नाही तरीही,
    आगंतु असा व्याधीच्या प्रकारात infectious रोगांचे सविस्तर वर्णन व चिकित्सा दिलेली आहे . संसर्गजन्य रोग व जनपदोध्वन्स याचे वर्णन आहे.
    तीन दोष आठ निदान पद्धती खेळ खल्लास?
    १ तीन दोष त्यांचे संसर्ग सन्निपात (permutations combinations)
    २ दोन मानस दोष
    ३ दर्शन स्पर्शन प्रश्न अशी रुग्ण परीक्षा
    ४ निदान प्राग्रूप रुप उपशाय संप्राप्ती अशी रोग परीक्षा
    ५ दुष्य देश बल काल अग्नि प्रकृती वय सत्व सात्म्य आहार अशा १० अवस्था
    ६ साम अथवा निरमावस्था
    ७ सात धातू त्यांचा वृद्धी क्षय
    ८ हे काय कमी होता म्हणून आधुनिक औषधांचे सेवन त्यामुळे होणारे परिणाम व दुष्परिणाम

    एवढ्या व अजूनही परीक्षा करून मग रोग निदान करता येत.


    डिसेक्शन ला परवानगी नसली तरीही सुश्रुत संहिते मध्ये शव संरक्षण व विछेदानाची माहिती शरीर स्थानामध्ये आली आहे. (Susruta was, however, able to bypass this decree and achieve his remarkable knowledge of human anatomy by using a brush-type broom, which scrapped off skin and flesh without the dissector having to actually touch the corpse.)

    http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3039177/


    ३ आधुनिक परिभाषेचा द्वेष ?
    आयुर्वेद हे शास्त्र आहे आणि आयुर्वेदीय परिभाषा हीच शास्त्र समजायला योग्य आहे त्यामुळे ती वापरण्याचा आग्रह आहे.

    हे अणु , ते रेणू , हि टेस्ट ती पेस्ट , हे एक्स रे ते इसीजी हे सारे पाश्च्यात्य शब्दांचे बुडबुडे आहेत . आधुनीक विज्ञानाच्या चष्म्यातून आमच्या प्राचीन शास्त्राकडे पहाणे चूक . मात्र डायबेटीस आदी आधुनिक विकारांवर मात्र जालीम औषध आमच्याकडे आहे इत्यादि इत्यादी . हे एकीय मत आहे किंवा लेखकाचा आकस आहे . हा समस्त वैद्यावार्गाचा दृष्टीकोण नाही .
    तसेच रस्त्यावर तंबू टाकून व्यवसाय करणारे हे खरे आयुर्वेदीय वैद्य नव्हे.

    परिभाषेसंबंधी एक उदाहरण
    डायबेटीस म्हणजे आयुर्वेदानुसार मधुमेह असा सामान्य गैरसमज आहे .

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. लेखक महाशय आधुनिक तंत्रज्ञान च्या कसोटीवर आयुर्वेदिक औषधी योग्य आहे का नाहि हे तपासणे म्हणजे अक्कलशुण्यतां व मूर्ख पणाचा कळस आहे. आयुर्वेदिक कसोटीवर आधुनिक औषधी कुठे तपासली जाते, ज्या त्या शास्त्राचे विज्ञान वेगळे असते, दोन्ही बाजूचे ज्ञान नसून आपण बालिश बहु बायकात बडबडला प्रमाणेच करतं आहात, मुर्खांच्या नादी लागू नये म्हणुन येथेच थांबतो .आपण एमबीबीएस व्हा मग पाहू bams छोटे की मोठे हो ज्वारी गहू तांदूळ बाजरी पाले भाज्या खाणे बंद करा व alopathik च्या गोळ्यवर 1वर्ष जगा आणि मगच बोला

      हटवा

  4. इफ़ेक्ट आणि साईड इफ़ेक्ट.
    आयुर्वेदीय औषध हे गुणकारी नसल्याने त्याला दुष्परिणाम नाहीत असे लेखकाचे मत दिसते.
    आधुनिक औषधांची क्लिनिकल ट्रायल होते मग ते वापरले जाते व आयुर्वेदाचे औषध त्यात नापास होते म्हणून ते गुणकारी नाही असे म्हणणे म्हणजे ऑपेरा गायकाने भारतीय शास्त्रीय संगीत हे नुसते आरडा ओरड आहे असे म्हणण्या सारखे आहे. दोन्ही शास्त्र वेगळी असल्याने त्याच्या चाचण्या वेगळ्या आहेत. (आयुर्वेदीय औषधाच्या चाचण्या काय आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर रसाशास्त्राचे व भैषज्य कल्पनेचे ग्रंथ अभ्यासावेत. यामध्ये दूरगामी दुष्परिणामां ची विस्तृत माहिती आहे. )


    आता थोडे अर्थशास्त्र
    आधुनिक औषधाचे बाजारीकरण करून ५ पैशाचे औषध १-२ रुपयाला विकून नफेखोरी करणाऱ्या कंपन्या आयुर्वेदालाही सोडत नाहीत . लेखकाला कदाचित माहित नसेल परंतु निम्ब हरिद्रा अशा आयुर्वेदीय औषधांचे स्वामित्व हक्क patent घेण्याचे कुटील कारस्थान अमेरिका युरोप मधील देशांनी चालवले आहे.
    व हिंदुस्थान सारख्या गरीब देशाला परवडेल अशा अल्पमोली बहुगुणी आयुर्वेद शास्त्राविषयी स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या व पश्चिमेकडून आल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला न मानणाऱ्या बुद्धिवादी लोकांना अंध म्हणावयास पाहिजे.
    http://www.hindu.com/2005/03/09/stories/2005030902381300.htm
    http://www.twnside.org.sg/title/revoked.htm
    https://in.answers.yahoo.com/question/index?qid=20071117002930AA9JuHl
    http://www.thelancet.com/journals/lancet/article/PIIS0140-6736(05)63536-2/fulltext
    जलौका चरण ह्या चिकित्सा पद्धतीचा अमेरिकेत सर्रास वापर सुरु झाला आहे
    सुश्रुताल प्लास्टिक सर्जरी चा जनक मानतात
    आयुर्वेदाच्या पंचकर्म चिकित्सेसाठी परदेशी जनता भारतात येत आहे.
    http://www.aetna.com/cpb/medical/data/500_599/0556.html
    खरे दु:ख असे आहे?
    लेखकाच्या मते सर्व वैद्य हे केवळ २ -३ मार्क कमी मिळाले म्हणून आयुर्वेदाला आले.
    या गोष्टीत काही अंशी सत्यता असली तरी पुढील सर्व विधान हि उथळ वाटतात .
    आपल्या शास्त्राविषयी प्रेम आस्था वाटण्यात काहीच गैर नाही.
    खरे दु:ख असे आहे कि आपल्याच देशात आपलेच शास्त्र alternative medicine म्हणून उरते आणि आपल्याच लोकांना त्याविषयी गोडी अभिमान तर सोडाच साधी आस्थासुद्धा नाही . कोल्ह्याला द्राक्ष आंबट नाहीत तर गाढवाला गुळाची चव नाही.

    प्लासिबू इफेक्ट
    आयुर्वेदाची सर्व महाविद्यालये बंद करून त्या जागी आधुनीक वैद्यक शिकवावे असे म्हणणे पाश्चात्य धार्जिणे आहे.
    मी हे सांगू इच्छितो कि आयुर्वेदाचे अभ्यासक्रमामध्ये anatomy physiology pharmacology medicine surgery असे आधुनिक वैद्यकाचे सर्व विषय शिकवले जातात. त्यामुळे आयुर्वेदीय वैद्याला आधुनिक वैद्यकाचे ज्ञान ओ कि ठो पेक्षा नक्कीच जास्त आहे .



    शेवटी आयुर्वेद हे २००० वर्ष अनेक आंदोलन आक्रमण नैसर्गिक संकट झेलत तावून सुलाखून टिकलेले शास्त्र आहे.
    तो काल होता आज आहे आणि उद्या हि राहणार आहे
    व्यक्तिगत मताने त्याला काहीहि फरक पडत नाही.
    पण ज्या विषया मध्ये आपला अभ्यास नाही , आपली पात्रता नाही त्याविषयी असा मत पसरवणं खपवून घेतला जाणार नाही
    या विषयी कुठल्याही ठिकाणी चर्चा करायला आम्ही तयार आहोत.
    या विषयी अधिक माहिती हवी असेल तर ती द्यायला तयार आहोत.
    खडूची पूड आणि लाकडाचा भुसा सुद्धा ज्ञान असेल तर औषध म्हणून वापरता येते.
    बोटे दाखवणे सोपे असते हिम्मत असेल तर अभ्यास करून मत मांडा

    वैद्य प्रभाकर यशवंत शेंड्ये
    यशप्रभा आयुर्वेद चिकित्सालय पुणे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अशीच तोंडे फोडायला पायजेत या छिद्रान्वेषी हलकटपणा करणाऱ्यांची .....

      हटवा
    2. डॉ समीर बागवान६ मे, २०१५ रोजी १२:५५ PM

      Well said Dr.prabhakar
      अभ्यास करायचा नाही माहिती घ्यायची नाही आणि बिन्बोभात बोलत सुटायचं लक्ष वेधून घ्यायचं हा धंधाच झालाय. त्यात ही आयुर्वेद हा लोकांच्या दृष्टीने सॉफ्ट टार्गेट झालाय. मुळात आयुर्वेदाच्या वाढत्या लोकप्रियते मुळे पाया खालची जमीन सरकलेले डॉक्टर्स अश्या पद्धतीचे बिन बुडाचे आरोप करत सुटलेत.
      Penicillin पासून cephalosporins पर्यन्त एक ही दीर्घ काळ चालु शकणारे शाश्वत ओषध शोधू न शकणारे आज आयुर्वेदा कड़े शास्वती ची पावती मागत आहेत हे हास्यास्पद आहे. आयुर्वेदाच्या उगम पासून आज पर्यन्त हळद सुंठ सारखी ओषधे आजही तेच गुण दाखवतात , hazardous म्हणून ban न होता मानव जाती आजही उपकृत करतात हे यांना कोण सांगणार
      तसे तर बरंच काही लिहिता येइल पण डोळे मिटून दिसत नसल्याचा सोंग घेणार्याला कोण जागं करणार.
      कोणीतरी खरंच म्हंटले आहे कोल्ह्याला द्राक्षे आंबट नाही तर ते गाढवाला गुळीची चव काय असंच आहे

      हटवा
  5. Dear Dr. Abhiram,

    I must congratulate you for having the courage to say it. I lack this courage so I was not able to write it in this way.
    You really are not aware as what great work you have done. You might not have the slightest imagination as how many good things you have done by writing this blog. You are a real genius.

    उत्तर द्याहटवा
  6. Dear Dr. Abhiram,

    I have written an article in 'Symbiosis Health Times' on the similar topic. Which can be found here - http://www.schcpune.org/schcnewsite/health_times/Health_Times_May_2013.pdf#page=23.

    I have also created an article on Wikipedia over here - https://en.wikipedia.org/wiki/Clinical_trials_on_Ayurvedic_drugs

    Thanks.

    उत्तर द्याहटवा
  7. hi i am Ayurveda graduate and now persuing masters in Shalyatantra (surgery), dear Dr. Abhiram Dixit, i think you have not completly understood the ayurveda or i guess you have not read the samhitas properly. with context to side effect and adverse effects none of the classical texts says any of the drug is 100% safe, if it is prescribed by well qualified doctor even poison can act as medicine and if nectar prescribed by quack it can be a greates poison in the universe this is the statement mentioned in charak samhita.
    if you read the shastiupakrama from sushruta samhita chikitsasthana, first chapter, you will find the diffrent 60 procedure to treat the wound of diffrent etiologies, among it first 11 procedures aims at inflammatory pathology and remaining 30 aims at eradicating infection and remaining procedures aims at reconstructive and cosmetic enhancement of the affected body part.
    in astang sangraha and hridaya in uttartantra karnarogas (pathology and treatment of ear diseases) you can find the reference of infection as putikarna srava (purulent discharge), i agree that microbiology was not well developed in that era hence its clear description is not mentioned but if you refer to Krumi nidana you can find references of 2 types of krumi (microorganisms) mentioned in charak samhita that there are 2 types of krumi bhaaya (exogenous) and nija (internal) and among it nija is responsible in maintaining healthy equilibrium in the body, while bhaaya krumi are responsible for producing diseases.
    with reference to Prameha nidan one can find the great discription of type 1 and 2 diabetes mellitus as krusha pramehi- type 1 and sthoola pramehi as type 2, while krisha pramehi is due to bija dosha (genetic predisposition) while sthoola pramehi is due to improper diet and life style and hence their treatment also differs accordingly. but none of the text says prameha can be cured permanently, all have mentioned that prameha is yapyavyadhi i.e has to be kept under control throughout the life with help of strict regimen w.r.t diet and life style.
    even some of the disease like IBD- ulcerative colitis can be well managed with basti chikitsa (medicated enema) and that too within short period, i have clinical records which i managed with basti chikitsa, but due to lack of sample size can't mention here but in near future i will publish it.
    it is sad to hear that some quacks under banner of ayurveda plays with the health of people, its not fault of ayurveda but fault of our system that there are no proper regulatory bodies to tackle this quacks.

    उत्तर द्याहटवा
  8. Dr. Abhiram Dixit,
    This is Dr. Sushrut Sardeshmukh from Bharatiya Sanskriti Darshan Trust (BSDT), Wagholi, Pune. Saw your article which includes a photograph from The Cancer Centre program of BSDT, Wagholi, Pune. You have added the photo which includes eminent physicians related to the institute hailing from Ayurved as well as Modern Medicine. The photo has been put without any prior permission from the institute and is unethical and can be considered as an act of offence. You are to immediately remove the photograph and the institute owes a personal written apology from you . If not done so, the institute will be compelled to take the necessary legal action against you for your act.
    Your blog seems to be more of debating and misguiding than informative type. Moreover your information and knowledge about Ayurved seems to be very inadequate. Kindly orient yourself about the topic before making any comments or writing any articles.
    Hope you understand and do the necessary changes immediately.
    Dr. Sushrut S. Sardeshmukh
    For Bharatiya Sanskriti Darshan Trust, Wagholi, Pune.

    उत्तर द्याहटवा
  9. Dear Dr Sushrut Sardeshmukh.

    The Photo is Published on net. I have not put any comment on the Photo. Though I am Removing it as per your suggestion. Please en-light me about the fact that why Ayurvedic medicines do not pass Clinical trails ?

    उत्तर द्याहटवा
  10. आयुर्वेदावरच्या लेखावर चहु बाजूंनी टिका झाली . त्यात अनेक शिक्षित वैद्यानिहि भाग घेतला . बहुतेकांनी हेत्वारोप केले . आर्थिक लाभासाठी लिखाण करतो आहे असे म्हणणार्यांची संख्या कमी नव्हती . काहींनी " हे खपवून घेणार नाही " अशी उद्दाम भाषा हि वापरली . त्यामुळे या विषयावर अधिक खोलात जाउन लिहावे लागेल .… लवकरच येत आहे : आयुर्वेद : विज्ञान कि धर्म ?

    उत्तर द्याहटवा
  11. आयुर्वेद : विज्ञान कि धर्म ?

    लेख लिहण्यापूर्वी तुमच्याकडे आयुर्वेदाची कोणती डीग्री आहे ते स्पष्ट करावे म्हणजे तुमच्या प्रगाढ (?) ज्ञानातून उमललेले पुष्प पहावयास आनंद लाभेल.....

    तसं काही नसेल तर
    नवा लेख लिहून लेखण्या (किंवा किबोर्ड ची बटने ) झिजवत बसून निष्कारण बीपी वाढवायचा खटाटोप कशाला ?? पडलो तरी नाक वर....
    असं नाव ठेवा नव्या लेखाचं......

    उत्तर द्याहटवा
  12. हाताची बोटे पण खूप जास्त होतील एवढ्याच वैद्यांनी तुमच्या लेखाला प्रतिसाद दिला..त्यात एवढं चहू बाजूंनी (?)टिका , असं म्हणून हरखून जाण्यासारखं काहीही नाही...
    बहुतांशी आयुर्वेदिक चिकित्सक अशा टिकांना भीक घालत नाहीत....असो ..

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हाताची बोटे पण खूप जास्त होतील एवढ्याच वैद्यांनी तुमच्या लेखाला प्रतिसाद दिला..त्यात एवढं चहू बाजूंनी (?)टिका , असं म्हणून हरखून जाण्यासारखं काहीही नाही...खूप छान.....

      हटवा
    2. विज्ञान सतत बदलत प्रगती करत जात असते . धर्माप्रमाणे हाजारो वर्षा पूर्वीच्या ग्रंथात अडकलेले नसते हे समजून घेतले पाहिजे . वात पित्त कफावर आज्ज्या, काकू, मावशा आणि पार्कातले आजोबा चर्चा करू शकतात म्हणुन त्याचे कुजबुज मार्केटिंग चालू राहते . कुजबुज मार्केटिंग म्हम्हणजे विज्ञान नाही . विज्ञान होणे सोप्पे नसते .

      आधुनिक वैद्यकशास्त्राची पुस्तके दर वर्षी अपडेट होतात . हजारो वर्षापूर्वी लिहिलेलि चरक आणि सुश्रुत संहिता आजही आयुर्वेदाचा मुख्य अभ्यासक्रम आहे . साध्या विंडोजचे नवे व्हर्जन दर वर्षी येत असते .ज्योतिष पाहून आजाराचे निदान करण्याचे उल्लेख आयुर्वेदात आहेत . सापाचे विष उतरवायचे मंत्र आहेत. औषध सिद्ध करण्यासाठी पाच कुमारिकांनी त्याचे पूजन करण्याचा विधी आहे . मानवी भावनांचे आणि विचाराचे स्थान मेंदू नव्हे तर हृदय असे पारंपारिक आयुर्वेद मानतो . त्याला जीवाणू, विषाणू , डी एन ए कश्शा कश्शाचा आता पता नाही . तरी आयुर्वेदाला स्वत:स विज्ञान / शास्त्र म्हणवून घ्यायचे आहे . ठीक आहे. पण विज्ञान होणे सोप्पे नसते.

      आधुनिक वैद्यक शास्त्रावर कायद्याचा कडक वचक आहे . ती एक चांगली गोष्ट आहे . आयुर्वेदावर हे बंधन का नाही ? प्रथम औषध आणि त्याची परिणाम कारकता सिद्ध करायची , पुन्हा ते औषध कसे बनवायचे ? याचा निर्बंध् सिद्ध करायचा … आणि जर पेशंटला त्याचा उपयोग झाला नाही - तोटा झाला तर कोर्टाची पायरी चढायला मुक्तद्वार ठेवायचे . हे सर्व नियम आणि कायदे आधुनिक वैद्यक शास्त्राला आहेत . ते योग्य आहे पण भारत सरकारने या सर्व नियमातून आयुर्वेद आणि होमिओ पाथी ला सुट दिली आहे ! आयुर्वेदाच्या समर्थकाना जर विज्ञान युगात यायचे असेल तर प्रथम हा कायद्याचा अंकुश आमंत्रित केला पाहिजे . मंत्रित बुवाबाजीचे दिवस आता संपले .

      अमेरिकेतल्या कुठल्यातरी राज्यात आयुर्वेदाचे एखाद दुसरे कोलेज आहे. मोजकी आयुर्वेदिक औषधे क्लिनिकल ट्रायल मध्ये बाजी मारू शकली आहेत . पण पुन्हा क्रोस ट्रायल घेतली तर त्यातलीच कित्येक हरतात . कधी संख्याशास्त्रीय माहितीतच लोचा आढळून येतो . अमेरिकन एफ डी ए ने आयुर्वेदिक औषधे आमच्यातर्फे सिद्ध झालेली नाहीत असे वॉर्निंग लेटर हि प्रसिद्ध केलेले आहे. ती पेशंट ने स्वत:च्या जवाबदारीवर वापरावीत। दुश्परिणामाना आम्ही जवाबदार नाही असेही म्हटले आहे . खरे पाहता आयुर्वेदात हेवी मेटल ची अनेक विषारी संयुगे वापरलि जातात . ती घातक आहेत आरोग्याला । दुसरीकडे.… आयुर्वेदाविरुद्ध या बहुराष्ट्रीय कंपन्यांची कारस्थाने सुरु आहेत …. आयुर्वेदाविरुद्ध अमेरिकेचा कट सुरु आहे अशा कोन्स्पिरसी थेअरिचा जन्म होत जातो . सशाविरुद्ध सिंह कट करत नसतात हे हि भाबड्या मनाला मग समाजात नाही tyamule शेवटी आयुर्वेद हे २००० वर्ष अनेक आंदोलन आक्रमण नैसर्गिक संकट झेलत तावून सुलाखून टिकलेले शास्त्र आहे.
      तो काल होता आज आहे आणि उद्या हि राहणार आहे
      व्यक्तिगत मताने त्याला काहीहि फरक पडत नाही.
      पण ज्या विषया मध्ये आपला अभ्यास नाही , आपली पात्रता नाही त्याविषयी असा मत पसरवणं खपवून घेतला जाणार नाही
      या विषयी कुठल्याही ठिकाणी चर्चा करायला आम्ही तयार आहोत.
      या विषयी अधिक माहिती हवी असेल तर ती द्यायला तयार आहोत.
      खडूची पूड आणि लाकडाचा भुसा सुद्धा ज्ञान असेल तर औषध म्हणून वापरता येते.
      बोटे दाखवणे सोपे असते हिम्मत असेल तर अभ्यास करून मत मांडा maze mat mi abhyasatunch dile aahe karan mi J.J. yethe Dialysis Technician astana Heavy metal churna tasech arsenic aslele churna mule kidney failure patient pahile hote tasech tyanchi mahiti sudha ghetali hoti yaavarun he shstrनिव्वळ बंडलबाजी aahe.


      हटवा
  13. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  14. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  15. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  16. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  17. I really do not understand the reason of oppose to clinical trials? I do understand that some people may think it as unnecessary. But if some people will ask for it, they have right to go for it. One interesting thing we can observe is, due to wide spread use of internet, patients will also ask for clinical trials in the near future. There is no harm in knowing what a clinical trial is and the beautiful methods it has for finding out truth.

    I see clinical research as the future.

    And I would like to suggest to people who are feeling furious over the contents of the post that they can forget the points which they consider as weak or untrue and they can think of the points which they find useful. In academic debate, there is no point if we attack the person who is mentioning different point of view. This will lead to muting of the other side which has happened in past and is happening over here as well.

    I would really appreciate if people who are asking the blogger to read this and read that will read about clinical research and will understand it. (I have read both.)

    And in the end, we have to believe that truth comes out and is not dependent on opinions. Lets all be open to other sides. (Clinical research does not belong to any pathy and is a method of science which can give objective information)

    "One careful measurement is infinitely superior to thousand intelligent opinions" - Neil Bohr

    उत्तर द्याहटवा
  18. दीक्षितसाहेब,
    तुमचे लेखन अभ्यासपूर्ण असतं, तर्कशुद्ध असतं म्हणून मला ते आवडतं. पण सांगायला वाईट वाटतं की हा लेख मात्र अगदीच एकांगी आहे.
    माझा वैद्यकशास्त्राचा अभ्यास शून्य आहे. पण वाचनाची थोडीफार आवड असल्याने काही सामान्यज्ञान गोळा झाले आहे. तेवढ्यावरूनदेखील काही गोष्टी वास्तवाला धरून नाहीत हे लक्षात आले. जाणकार मंडळी उत्तरं देतच आहेत.
    वादविवाद चालू राहतील. पण या लेखामुळे वाईट वाटले. तुमच्याकडून एवढ्या पक्षपाती लेखनाची अपेक्षा नव्हती.

    - सागर विद्वांस

    उत्तर द्याहटवा
  19. आयुर्वेद हा आमच्यासाठी आज उपजीवीकेचे व रोजीरोटीचे साधन आहे - Is it the reason of disagreement? It can surely be. But is it the ONLY reason of disagreement? We need to think more clearly (if we are not confused enough) if it is it ONLY reason of disagreement. Because doctors are made for patients. They are made to treat them. Not the other way round necessarily.

    उत्तर द्याहटवा
  20. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी आहेत. - Thanks for saying that. But where is Dr. Abhiram denying it? And what you would like to say if such students feel 'cheated' ? I feel cheated. No doubt that I am the reason for it. I chose the path. And I am to blame for it. I take the responsibility of it. (What we can do other than that if we will not take its responsibility? Anyway.)

    And I still do not understand the reason of getting furious over the blog. That is the main difference in western sciences and us. We FEEL, we get EMOTIONAL over the scientific facts or non facts. And then we miss the point of other person. क्रोधात भवति समोह (and the cycle of it) (and finally) बुद्धी नाशात प्रणश्यति. I have seen many discussions missing the point if we get emotional.

    I would like to suggest Dr. Abhiram to be milder (as he rightly is in my opinion) (and I do not understand how to be more milder than he is. I would surely like to learn it if anyone can demonstrate it. I will surely like to learn it. I am not saying it only for the sake of saying it. I mean it)

    And do BAMS doctors feel the glories future as you said it? I have not seen it at least. (And I know that there are people who will say that you have not seen it because you have not worked hard enough. And let me tell you that it is a circular logic and there is no end to this particular circular logic.)

    Internal consistency measurement can be a way to break the circular logic it seems at least. (Which may be called as empirical proofs rather than biochemical proofs to start with).

    Thanks.

    उत्तर द्याहटवा
  21. don icchabhedi kha ani effect bagha placebo ka te kalel.... kuthe rajiv dhikshit ani kuthe he..... adhunik valyanchya pungya thight kelyamule yanchi chatugiri chalu....

    उत्तर द्याहटवा
  22. kuthe rajiv dikshit ani kuthe tu.... jya lokani ayurved treatment ghetli ahe asya asankha lokana vichar.... kiti diff janavato te... ayurved cha abhyas na karta bolnare tujhyasarkhe nave thvanare murkha astat...ekda tratment ghevun bagh modern science visrun jashil day today life madhe...ani ho chatugiri chalu asu e... tujhya hya karyas subheccha ...

    उत्तर द्याहटवा
  23. kuthe rajiv dikshit ani kuthe tu.... jya lokani ayurved treatment ghetli ahe asya asankha lokana vichar.... kiti diff janavato te... ayurved cha abhyas na karta bolnare tujhyasarkhe nave thvanare murkha astat...ekda tratment ghevun bagh modern science visrun jashil day today life madhe...ani ho chatugiri chalu asu e... tujhya hya karyas subheccha ...

    उत्तर द्याहटवा
  24. आयुर्वेदाविषयी लेख लिहून झाला पण त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांना एका आठवड्यात उत्तर देण्याच आपण आश्वासन दिलत.
    एक आठवडा झाला काहीही उत्तर नाही. असा का?
    आपल्या आठवणीसाठी पुन्हा प्रश्न देत आहे

    १) आयुर्वेद विषयी अशा प्रकारचा विश्लेषणात्मक लेख लिहिण्याची आपण आयुर्वेदाचा अभ्यास केला आहे काय?
    २) हा लेख लिहिताना आपण कोणत्या संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केला? अथवा कोणा तज्ञाचे मार्गदर्शन घेतले?
    ३) आयुर्वेद हे सोप्पे शास्त्र अस लिहिण्यामागे काय आधार आहे?
    ४)"आयुर्वेद फक्त भारतातच का ? अमेरिका युरोप आदी प्रगत देशात आयुर्वेदाला उपचाराची मान्यता का नाही ? " ह्याला आधार काय?
    ५) "एका अशास्त्रीय आणि परिणाम शून्य थेरपी चे शिक्षण देण्यासाठी महाविद्यालये चालवली जातात ." ह्याला आधार काय?
    ६)" चरक आणि सुश्रुत या महान संशोधक पूर्वजांविषयी अतिशय आदर आहे" हे जर मापल्या मते महान संशोधक होते तर त्यांनीच दिलेली औषधे अशास्त्रीय व प्लासिबू आहे असे आपणच का म्हणता ?
    ७) निंब हरिद्रा इत्यादी वनस्पतींचे पेटंट मिळवण्याची धडपड अमेरिका व युरोप मध्ये होते हे आपणास माहित नाही काय?
    ८)"त्यामुळे आयुर्वेदाला मानवी शरीराची ( सखोल रचना ) एनाटोमि नीटपणे माहित नाही . .... चरक आणि सुश्रुत संहितेत यावर भाष्यच नाही" ह्या विधानाला आधार काय
    ९)आपल्या मते आयुर्वेदाचे औषध व वनस्पतिज (herbal ) हे वेगळे आहेत का नाही?

    .
    कृपया या प्रश्नांची उत्तरे द्या अन्यथा आपण टाळाटाळ करत आहात आपणास उत्तरे द्यायची नाही असा समज पसरू शकतो.

    या उत्तरांची वाट शिक्षित वैद्य करीत आहेत

    उत्तर द्याहटवा
  25. अनेक दिवस प्रतीक्षा करून पुनःपुन्हा आठवण करून ही दीक्षित साहेबांच उत्तर आल नाही.
    आयुर्वेदावरील लेखावर निर्माण झालेले प्रश्न यांचा सखोल अभ्यास करून नवीन लेख लवकरच येणार असे जाहीर करून १ आठवडा झाला.अजूनपर्यंत तरी काही लेख ब्लोग वर आला नाही.
    उशीर का होत आहे याचे काही कारण दिले नाही. घोंगडे फार काळ भिजत राहणे चांगले नाही

    दीक्षित साहेबांच्या लेखामधील मूळ मुद्दे दुर्लाक्षले गेले अशी भावना काही जणांनी व्यक्त केली .
    त्यांचासाठी पुढील लेख येईपर्यंत आम्हीच एक लेख लिहित आहोत.

    'आयुर्वेद : गुणकारी ? दुर्लक्षित ? कि निव्वळ बंडलबाजी ? ' तथ्य किती सत्य किती

    उत्तर द्याहटवा
  26. 'आयुर्वेद : गुणकारी ? दुर्लक्षित ? कि निव्वळ बंडलबाजी ? ' तथ्य किती सत्य किती
    हा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक
    http://digitalayurveda.blogspot.in/

    उत्तर द्याहटवा
  27. अभिराम दीक्षित विसरले की काय ?

    महिन्याभरापूर्वी आयुर्वेदविषयक एक लेख दीक्षित महोदायानी लिहिला. त्यामध्ये त्यानी अनेक आयुर्वेदावर घणाघाती आरोप व टीका केली
    या लेखाविषयी सर्व स्तरावर आक्षेप घेतला गेला
    आयुर्वेदाच्या शिक्षित वैद्य मंडळींनी काही प्रश्न ही उपस्थित केले. या प्रश्नांना एका आठवड्या मध्ये उत्तर देतो असा महाशयांनी जाहीर केला पण आज ४-५ आठवडे उलटून गेले, लेखक महाशयांचे काही भाष्य नाही. मधल्या काळात इतर विषयावरचे २-३ लेख त्यानी प्रसिद्ध केले परंतु आयुर्वेदाच्या प्रश्नांचा त्यांना विसर पडलेला दिसतो.

    म्हणून अभिराम दिक्षित आपणाला अजून २ दिवसांची मुदत मी देत आहे.कृपया माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या, अन्यथा आपण केलेली विधाने बिनबुडाची आहेत असे मान्य करून आयुर्वेदाची नाहक बदनामी केल्याबद्दल माफी मागा.

    ही माझी शेवटची विनंती आहे. उत्तरे द्या अन्यथा आपले लेख हे अभ्यासहीन उथळ एकांगी आहे. व आपण प्रश्नांना उत्तरे न देऊन पळपुटेपणा केला असे माझे आणी आपल्या लेखाच्या followers चे मत होइल.
    नमो नमः

    उत्तर द्याहटवा
  28. Dr. Abhiram Dixit, are you an allopathic doctor, If yes, then kindly research on things like How many rupees of fund is allocated for doing research by Govt. in allopathy and Ayurveda, Maharshi Shusrut was first Known Surgeon but there is not a single MS course in Ayurveda thus Ayurvedic vaidya is not eligible for doing surgery. In your blog you have put lot of stress on Clinical Trial of Drugs, but can you elaborate more regarding why there are so many side effects of Allopathic Drug’s, after conducting so many Clinical Trial on animals and human.
    Medical means ‘science or practice of medicine’, if we think that this definition of Medical is correct the why only allopathy and not other pathys are taught in Govt. Medical college?
    This attitude of government department (Medical Education) shows the colonial viewpoint towards other ingenious pathys.

    उत्तर द्याहटवा
  29. प्रत्यक्ष प्रमाण, योग्य अनुमान आणि निश्चित रोगोपचार व त्याचबरोबर मर्यादांची जाणीव या असामान्य गुणांनी आधुनिक वैद्यकशास्त्र मंडित आहे. त्याची बाजू अभिरामने मांडली आहे. त्याला आयुर्वेदाच्या अभिमान्यांनी त्याचा प्रतिवाद करताना फार काळजी घेतली पाहिजे. येथे आजवर आलेल्या प्रतिक्रिया फार सुमार आहेत. अभिरामला आयुर्वेद नाही कळला तर कदाचित चालेल पण ज्यांचे पोट त्यावर त्यांनी किती सखोल गेले पाहिजे? आयुर्वेद फार अवघड कळायला. बारावीला दोन मार्क कमी पडोत वा जास्त त्याचा आयुर्वेदाच्या आकलनाशी काही संबंधच नाही. आयुर्वेद हे पोट भरण्याचे साधन नव्हे.

    उत्तर द्याहटवा
  30. डॉ.दीक्षित...खरं तर या लेखाकडे दुर्लक्ष करणार होतो; कारण अशा गोष्टी सतत चालूच असतात. पण अतिदुर्लक्ष घातक ठरू शकतं म्हणून लिहित आहे. आपण आम्हा तमाम वैद्यमंडळींकडून 'जाहीर मंचावर' या विषयावर चर्चा करण्यास निमंत्रित आहात. दूध का दूध; पानी का पानी होवून जावू दे!!

    उत्तर द्याहटवा
  31. छान आणि प्रामाणिक लेख! From comments it seems like it hurts to some people to call a spade, a spade, शेवटी कोल्ह्यांना द्राक्षं आंबटच लागणार ना!

    उत्तर द्याहटवा
  32. I am glad that there are at least few people like you, who have their sanity intact ! Great blog I must say ! Thank You for this one :-) !!! Keep writing !!!

    A pseudoscience is a pseudoscience! No matter US or UK or even Martians have colleges that teach Ayurveda :-D !!!

    The Earth was once flat ! The eclipses used to be sinister ! Now is the turn of these goat like Pseudosciences under the hide of Lion (read as science !!! ) !!!

    उत्तर द्याहटवा
  33. I would like to add, Birds eat clay or dig the walls ( made up of cement and sand) with their beaks, monkeys were found to nibble coal pieces and Dogs-Cats are found to lick their wounds, well, these existed even before the discovery of A'ved. I consider these as true 'nature based' doctors or Vaidya.

    Well, a simple question... would you let your wounded pet dog lick its wound for 10 days or would you rush to the nearest Vet for it ?
    Because since ancient times, dogs, cats, lions, etc. have been observed to have self healed themselves by licking their wounds :-)

    Yet, people always ALWAYS prefer the VET ! And not just for pets but for STRAY ANIMALS as well !

    ARE HUMANS inferior to these animals that we deprive them of actual medicines ???

    [ PS: I do not intend to project humans as superior to animals :-) ]

    -A

    उत्तर द्याहटवा
  34. As I keep pondering about the blog... I am getting more and more thoughts...

    1. Snake bites are curable to a larger extent by allopathic medicines than by any 'spells' or mantra tantra !

    2. Polio ! This was eradicated by Modern Meds and vaccination... So was small pox... :-) on the other hand ! patients used to be treated (not in the sense of cured or healed.. ) as Outcastes or Untouchables by people... for Eg. the lepers ! Mod Meds could at least give them a hope !

    -A

    उत्तर द्याहटवा
  35. आयुर्वेदाबद्दल कळवळा असणार्यांनी सर्वप्रथम आयुर्वेदाचे सर्वात मूळ गृहीतक जेकी वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष खरोखर अस्तित्वात असतात असे आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करावे. वर कुणीतरी उगाचच राजीव दिक्षितांचा उल्लेख केला आहे. तेतर आयुर्वेद ह्या भारतीय थोतांडाचेच नव्हे तर होमिओपॅथी ह्या पाश्चात्य देशांतून आलेल्या थोतांडाचेही कट्टर समर्थक होते. तिकडेतर आणखीनच मौजमजा आहे. कायतर म्हणे औषध जितके विरल तितके ते अधिक। गुणकारी, हाहाहा...आणि पाण्याला स्वत:ची स्मरणशक्ती असते बरंका माणसासारखी, हाहाहा..माझी अभिरामजींना विनंती आहे की आयुर्वेदावर आणखी एक लेख लिहिण्यापूर्वी त्यांनी होमिओपॅथी ह्या (युरोपियन ओरिजिनमुळे जगभर बोकाळलेल्या थोतांडावरही एक लेख लिहावा. म्हणजे आपण नास्तिक लोक हे फक्त विज्ञाननिष्ठ सत्याचे पुरस्कर्ते असून पाश्चात्यधार्जिणे किंवा भारतीयविरोधी वगैरे अजिबात नाही हे सिद्ध होऊन विषयाला चांगले वळण मिळेल़.

    उत्तर द्याहटवा
  36. लेख वाचून डॉ. शरदिनी डहाणूकरांची आठवण झाली. त्याही खरं तर आधुनिक वैद्यक शास्राच्या पदवीधर. पण आयुर्वेदही त्यांना प्रिय होता. हे त्यांनी त्यांच्या 'स्वास्थवृत्त' या पुस्तकात लिहीलंय.

    उत्तर द्याहटवा
  37. डाॅ अभिराम

    आपले विशेष अभिनंदन !

    अतिशय अभ्यास पूर्ण लेख..





    आयुर्वेदाचा स्वतः पदवीधर असुनही मला शिकत असताना जे सतत प्रश्न पडायचे त्यांनाच आपण शब्दरूप दिले आहे..

    उत्तर द्याहटवा
  38. आयुर्वेदातही साईड इफेक्ट असतात . ते आयुर्वेद ग्रंथ मान्य करतात . पारा गंधक युक्त औषधी जपून वापराव्या लागतात . प्रतिजैविक हि कल्पना आयुर्वेदाने स्पष्ट मंडळी नसली तरी गांधाकदि अनेक औषधी प्रतीजैविकांचे काम करतात . तसेच चरक हा फिजीसियन होता सुश्रुत हा सर्जन होता . आणि डीसेक्शन चे वर्णन आहे , प्रेत वनस्पतींमध्ये गुंडाळून सात दिवस नदीत बुडवून ठेवावे आणि नंतर कुंचल्याने त्वचा खरवडत डीसेक्शन करावे असे व

    उत्तर द्याहटवा
  39. आयुर्वेद- काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले, पुरातन असे भारतीय वैद्यक शास्त्र. या शास्त्राचा अंगिकार आज इतर देशही करत आहेत. आणि डॉ अभिराम सारखे 'देशद्रोही' आपल्या भारतीय शास्त्रालाच नावे ठेवत आहेत. धिक्कार असो!

    उत्तर द्याहटवा
  40. डॉ. अभिराम दिक्षित. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशीच आपली गत दिसते.
    आपण स्वतः MBBS आहात. ब्लॉग लिहिण्याच्या आधी आयुर्वेद/होमिओपथि बद्दल काही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आहात का?
    आपल्या लेखामध्ये आलेल्या काही गोष्टी जश्या -

    १) तीन दोष आठ निदान पद्धती खेळ खल्लास.
    २) आयुर्वेदाला मानवी शरीराची ( सखोल रचना ) एनाटोमि नीटपणे माहित नाही.
    ३) इच्छुकांनी क्लिनिकल ट्रायल बद्दल अधिक माहिती अवश्य करून घ्यावी . आणि आयुर्वेदातलि सर्व औषधे यात साफ नापास होतात हेही जाणुन घ्यावे ..
    ४) सशाविरुद्ध सिंह कट करत नसतात.
    ५) एका अशास्त्रीय आणि परिणाम शून्य थेरपी चे शिक्षण देण्यासाठी महाविद्यालये चालवली जातात.
    ६) आधुनिक वैद्यकशास्त्राची पुस्तके दर वर्षी अपडेट होतात . हजारो वर्षापूर्वी लिहिलेलि चरक आणि सुश्रुत संहिता आजही आयुर्वेदाचा मुख्य अभ्यासक्रम आहे. साध्या विंडोजचे नवे व्हर्जन दर वर्षी येत असते.
    ७) इतिहासाच्या कला शाखेत आयुर्वेद शिकवला जावा . वैद्यकीय महाविद्यालयात नाही .

    प्रश्नांवर मला उत्तर द्यावसे वाटते
    उत्तरे खाली बघा ( limited words मुळे)

    उत्तर द्याहटवा
  41. उत्तरे -

    १) आयुर्वेदाचा सखोल अभ्यास केल्यावरच आयुर्वेद कळतो. 'तीन दोष आठ निदान पद्धती खेळ खल्लास' म्हणणे फार सोपे आहे. शास्त्र वाचणे आणि समजण वेगवेगळ आहे. कृपया आधी आयुर्वेदाचे शिक्षण घ्यावे आणि मगच असले विधान करावे.

    २) यकृत, ह्रदय, सिरा, कंडरा, नाड्या, इ. चा शोध आयुर्वेदाने त्या काळात उपलब्ध साधने, आणि परिस्थिती अनुरूप लावला आहे. Leonardo da Vinchi ने केलेलं शव विच्छेदन आणि त्यावरून मिळवलेली माहिती हि आयुर्वेद मध्ये नमूद केल्या पेक्षा काही वेगळी नाही. फरक इथे पडतो कि पाश्चात्य देशाने त्याचे गांभीर्य लक्षात घेता त्यावर संशोधन करत राहिले आणि आता कुठे ते सूक्ष्म गोष्टी.चा अभ्यास मांडू शकतात आणि आपण आपल स्तराच संशोधन करण्याऐवजी त्यांच धरायला पळत सूटलोय.

    ३) Clinical trials मध्ये सर्व आयुर्वेदिक औषधे फेल होतात हे म्हणणे मूर्खपणाच आहे. आयुर्वेदिक औषधांचे प्रभाव allopathic parameters मध्ये मोजता येणार नाही.
    तुम्हाला कळावे म्हणून सोप्या (allopathic) भाषेत सांगतो- Diabetes चा औषधाचे प्रभाव तुम्ही रुग्णाचे blood sugar मोजून करता आणि त्यावरून ठरवता. म्हणजेच blood sugar हे parameter डोक्यात ठेवून Clinical trials मध्ये allopathic drugs पास होतात. Allopathic औषधांसाठी allopathic parameters जर आहेत तसच आयुर्वेदिक वनस्पतीचे प्रभाव चाचपडटाळून बघतांना आयुर्वेदिक parameters चा विचार करून बघायला हवे. विचार करून बघा उत्तर सापडेल आणि असले बिन बुद्याचे विधान करण्याची सवय तुटेल.

    ४) सशाविरुद्ध सिंह कट करत नसतात. अस असेल तर निंब, हळद ई. औषधांचे patent साठी का हा सिह लाळ पडत फिरतोय. आणि हो सिव्हांची संख्या कमी होत चालली आहे हे विसरू नये.

    ५) Allopathic चष्म्यातून आयुर्वेदाला बघणाऱ्याची अशीच गत असते.आयुर्वेदाला अशास्त्रीय म्हणतांना जरा आपल्या आई, वडील, आजी, आजोबांना विचारल तर लक्षात येईल कि आपला जन्म झाल्यावर आपणसुद्धा बाळगुटी घेऊनच मोठे झालात.
    ६) विंडोजचे नवे व्हर्जन दर वर्षी येत असते मान्य आहे. ते तसे का करत असतील याचा विचार केला का कधी. आपल्या operating system मधले उणीवे भरून काढण्यासाठी नवीन updates असतात.
    तसेच Allopathy चे सुद्धा दर वर्षी नवीन नवीन edition येतात, तरीही side effects, symptomatic treatment चाच ट्रेंड का? त्यांना ते कराव लागत कारण drug potency घडते. आयुर्वेदातील वनस्पती आजही तितक्याच प्रभावीपणे कार्य करतात जश्या हजारो वर्षापूर्वी उल्लेखल्या आहेत. आम्हाला १५ व्या एडीशन ऐवजी १६वे वाचत बसाव लागत नाही.
    सध्या प्रश्नाचे उत्तर द्यावे कि साधारण डोके दुखी च्या pt. ला तुम्ही लोक DISPRIN देऊन मोकळे होता. pt. गोळी घेऊन घेतो आणि गोळीचा effect संपल्यावर पुन्हा डोकेदुखी ने ग्रस्त होतोच.
    आता मला सांगा DISPRIN हे डोकेदुखी चे औषध असते तर एकदा घेतल्यावर आयुष्यात कधीही डोके दुखायला नको होते... पण तरीही डोके दुख्तेच. कारण डोके दुखी हा स्वतंत्र आजार नसून कुठल्यातरी आजारचे लक्षण असू शकते. डोकेदुखी हे लक्षण अतिश्रम, पोट बिघडल्यामुळे, इ. कारणांमुळे असू शकते याचा विचार करून तो आजार/सवय बरी केली तर आणि तरच डोके दुखी कायमच बरे होणार.
    पण Allopathy चा विचार इथेच कमी पडतो. Allopathic ट्रेंड मध्ये झटपट रिसल्ट मिळवण्यासाठी फक्त लक्षणांचा विचार केल्या जातो, मूळ आजाराचा नाही.
    साध सोप्प गणित आहे आजार बरा केला तर आणि तरच लक्षणे ओपोआप आणि पर्मनंट बंद होतील. आयुर्वेद आजाराला बरा करतो लक्षणांना नाही. हे लक्षात घ्यावे.

    ७) इतिहासाच्या कला शाखेत आयुर्वेद शिकवला जावा . वैद्यकीय महाविद्यालयात नाही हे म्हणनारे आपण कोण Alexander Fleming आहात का? शास्त्र वाचणे आणि समजण वेगवेगळ आहे. आशा आहे आपणास कळले असेल.
    मान्य आहे काही BAMS डॉक्टर्स आयुर्वेदिक प्रक्टिस करत नाहीत याचा अर्थ असा नाही कि ते अशिक्षित आहेत. आयुर्वेद शिकतांना BAMS स्टूडंट हा allopathy चा पण सम्मान पूर्वक अभ्यास करतोच. नाहीतर Software मध्ये symptoms टाकून औषध prescribe करणारे MBBS डॉक्टर्स पण आहेतच कि मग.

    सांगायला खूप काही आहे पण आपल्याला सर्ख्यांपुढे आणखी जास्त वेळ वाया घालवायला वेळ नाही.
    धन्यवाद.

    वैद्य. अर्चित कुमरवार.
    BAMS, MD, PG Dip. in Clinical Research (UK)

    उत्तर द्याहटवा
  42. brother, let i believe in you and i should kill my self. because your dodgy allopathic medecines were not able to cure my disease , which was successfully cured through ayurveda. brother you are best, thanks for giving me such an advice.

    उत्तर द्याहटवा
  43. dr abhiram ke alawa baki sab ke sab bandalbaaj hai sab ke sab

    उत्तर द्याहटवा
  44. उत्तम लेख सर. मध्यंतरी लोकसत्ता च्या लोकरंग या पुरवणीत आयुर्वेदीय गर्भसंस्कार या विषयावर लेख आले होते. माझे फॅमिली डॉक्टर हि BAMS आहेत., पण मला हि कळत नव्हते कि ते औषधें आयुर्वेदिक का देत नाहीत, आणि मुलाला BHMS ला घातले कि त्याला फ्री सीट मध्ये BAMS ला प्रवेश मिळत होता. असो छान लेख. असंच माहिती देत राहा...����

    उत्तर द्याहटवा
  45. अभिराम, जरा सारासार विचार करुन लिहीत जावा

    उत्तर द्याहटवा
  46. मी या निमित्ताने चर्चा सुरु केलि या बद्दल डॉ अभिराम दिक्षित यांचे अभिनंदन करतो

    आता मुळ मुद्द्या कड़े वलु या
    दिक्षित सर आयुर्वेद शाखेचे पदवीधर असतील असे त्याच्या लिखाणा वरुण वाटत नाही. जर असतील तर तो भाग वेगळ .आपण असे मानून चालु की ते या शास्त्रा विषयी फारसे अवगत नाही

    आधुनिक चिकित्सा पद्धति मध्ये एक खुप चांगली गोष्ट अशी आहे की एखाद्या डॉक्टर ला दुसऱ्या शाखेबद्दल फारसे द्न्यान नसले की तो त्यावर प्रतिक्रया देन टाळतो
    दिक्षित सर यानी आपण हा नियम जुमानत नसल्याचे दाखवून दिले आहे.

    आज आयुर्वेद चिकित्सक जर त्याच्या शास्त्र सम्मत निदान पध्हतिचा अवलंब करत असेल तर खर कोणाच्या पोटात दुखन्याचे कारण नाही पण ह्या निदान पध्हती द्वारे जर तो त्याच्या चिकित्सेच्या जवळ पोहोचत असेल तर ultimately रुग्नाला बरे करने हे उदेश्य साध्य होत असते
    तसेच याचा हवाला देताना चरक सुश्रुत याना जीवाणु विषाणु माहीत नव्हते असे म्हणजे आपली वैचारिक दिवाळखोरी म्हणावी
    कारण चरक सुश्रुत व अनेक आचार्यानी वेळोवेळी सूक्ष्म रक्षस म्हणजे जंतु याचा उल्लेख केला आहे
    परंतु ह्या आचार्याची त्याना जीवाणु विषाणु न म्हानान्याची चुक झाली असण्याची शक्यता आहे

    आता पुढचा मुद्दा
    शरीर रचना
    आयुर्वेद काळी शव विच्छेदन होत नव्हते हा आणखी एक जावई शोध
    शुश्रुत संहितेत मृत शोधन या नावाने dissection चा स्पष्ट उल्लेख आढळतो.
    तसेच अस्थि पेशी त्वचा याचे तपशील वार वर्णन ह्याशास्त्र व्यतिरिक्त कुठे ही सापडत नाही
    उत्तमंगीय नावाने रचानाशास्त्रत मेंदू सम्बंधित विचार समजतील


    आता टेस्ट्स कड़े जर वळल तर त्या मागचा व्यापारी व दलाल शाही दृष्टिकोण दिक्षित सर माझ्या पेक्षा जास्त चांगल सांगतील

    पुढचा मुद्दा ट्राइल संदर्भातील

    काही औषधे ही क्लिनिकल ट्राइल मध्ये अयशस्वी ठरली असतील पण त्याचा दोष शास्त्रास देने चुकीचे ठरेल
    यासाठी एक उदहारण बघू
    त्रिभुवन कीर्ति नावाचे एक औषध ज्वर यासाठी वापरतात
    पण हा ताप अपथ्य करुण बरेच दिवस दोष शरीरात साठून आल्यावर वरील औषध वापरतात
    पण क्लिनिकल ट्राइल वाले उंदीर व तत्सम प्रान्यास केवळ शरीर तापमान वाढेल असे द्रव्य देऊन त्रिभुन कर्ती ची कार्यकारिता बघतात
    आता हा विचार कोण करेल की दोष साठले नाहीत वा अपथ्य केले नाही तर हे औषध कसे बरे काम करेल
    पण नाही आयुर्वेदा च्या नावाने बोम्बा ठोकयाला मोकले


    आमचा विरोध आधुनिक शास्त्राला नाही पण अयुर्वेदाला आयुर्वेदाच्या कसोटी वर च पाहिले गेले पाहिजे
    त्या साठी आधी आयुर्वेद समजुन घेतला पाहिजे
    ज्या अमेरिकेचा आपण दाखला देत आहात तो देश देखिल या शास्त्राचे गंभीर पने अभ्यास करत आहे

    तरी हत्ती व घोडा यांच्या सामर्थ्य परीक्षा वेगळ्या आहेत व त्या त्यापध्हतिने बघाव्यात ही विनंती

    उत्तर द्याहटवा
  47. आयुर्वेद निदान परीक्षण व चिकित्सा विचार Hrudrog explanation by Vd. Rasik Pawaskar Pune


    हृद्रोग
    हृदि बाधां ......
    हृदयाच्या कार्यामध्ये बाधा येणे हे हृदय या अवयवाच्या व तत्संबद्ध भावपदार्थांच्या कर्मामध्ये विकृति असल्यास शक्य आहे. स्वतंत्र व परतंत्र अशा दोन्ही प्रकारचा हृद्रोग काही प्रमाणात पहावयास मिळालेला आहे. संतर्पणोत्थ व अपतर्पणोत्थ असे दोन्ही प्रकार पहावयास मिळतात.

    हृदयाशी संबद्ध भावपदार्थ
    प्राण
    व्यान
    उदान (हृदय - उरःस्थित अवयव)
    साधक पित्त
    अवलंबक कफ
    रस
    मांस
    मेद
    ओज
    सिरा
    मन

    सर्वात धोकादायक भाग हृदयाशी संबंधित मर्माघात. मर्मांचा प्राण, रक्त व ओजाशी असणारा संबंध लक्षात घेणे आवश्यक. त्यापैकी प्राण हा श्वासकृच्छ्रता, रक्त हे श्यावता व ओज हे भय, दौर्बल्य-क्लम, अभीक्ष्णं ध्यायति इ. लक्षणांवरुन जाणता येते. नीट पाहिल्यास हृद्रोगाची भरपूर पूर्वकल्पना मिळणे शक्य आहे. काही रुग्णांमध्ये 3-3 महिने आधी पूर्वकल्पना रुग्णांना देता आलेली आहे. माझ्या अपुऱ्या क्षमतेमुळे हे प्रत्येक वेळी शक्य झालेले नाही पण उत्तम वैद्य हे करु शकेल इतकी क्षमता शास्त्रात आहे याविषयी शंका नाही.
    विशेषतः श्वासकृच्छ्रता हे महत्वाचे लक्षण आहे. भाषणोत्तर, अध्वोत्तर, व्यवायोत्तर, भोजनोत्तर, मल प्रवृत्ति पश्चात् श्वासकृच्छ्रता यावरुन उदान, व्यान इ. वातांचा व प्राणाचा सम्प्राप्तिमधील संबंध लक्षात घेता येतो. व्यवहारातही हृद्रोगाची वेगावस्था या कारणांशी संबंधित दिसून येते.
    मन, रस, ओज व साधक पित्त यांचा संबंध मानस भावांशी संबंधित हृद्रोगामध्ये असतो. सध्याच्या काळात वाढलेल्या ambitions व त्याच्याशी संबंधित sacrifices व dilemma या "चिंत्या"नाम् अतिचिंतन अशा हेतुशी जवळचा संबंध आहे.
    गर्भावस्थेमध्ये 4 थ्या महिन्यात होणारी हृदयाची अभिव्यक्ति ही घटना गर्भज हृद्रोगामध्ये महत्वाची ठरते. त्या काळामध्ये मातेस चिंता, शोक, भय, क्षोभ या हेतुंमुळे बालकास हृदयविकृति आढळतात.
    वाग्भटाचार्यांनी तेषां गुल्मनिदानोक्तैः समुत्थानैः च संभवः असे सांगून गुल्माचा व हृद्रोगाचा संबंध स्पष्ट केला आहे. गुल्म चिकित्सेतील कर्म, आहार व औषधे हृद्रोगात उपयोगी पडतात.
    चरकाचार्यांनी त्रिमर्मीय चिकित्सेची सुरुवात उदावर्ताने करुन व नंतर हृद्रोग चिकित्सा सांगून उदावर्ताचे हृद्रोग सम्प्राप्ति व चिकित्सेमधील महत्व स्पष्ट केले आहे. याच

    यापैकी अनेक बाबींचा उपयोग अनेकविध रुग्णांमध्ये करता आला आहे.
    पुरुष रुग्ण वय 55 वर्षे - उरःशूल, तीव्र श्वासकृच्छ्रता, भयप्रचीति ही लक्षणे - त्यासाठी प्रत्येक वेळी ICCU मध्ये प्रवेशित, 3 वेळा Angiography - No diagnosis because investigations normal - निदान - हृदयगत वात - चिकित्सा शालिपर्णी क्षीरपाक - पूर्ण उपशय - आज गेल्या 5 वर्षांमध्ये एकदाही लक्षणोद्भव नाही
    पुरुष रुग्ण वय 45 वर्षे Police Inspector in Rural-Coastal Maharashtra (One can understand Hetus like Hectic Life, जागरण, Stress etc) - Three times MI in a space of 10 months, Three times Angioplasty with new coronary blockages every time - निदान - उदावर्त - उपद्रव वातज हृद्रोग - प्रमुख चिकित्सा - बृहत् वात चिंतामणी, लक्ष्मीविलास, हिंग्वष्टक, (हरीतकी, विश्व, पुष्करमूल, गुडुचि, आमलकी, सैंधव, हिंगु - चरक उदावर्त चिकित्सा 26 - मूळ संहितेमध्ये सिद्ध घृत आहे, मी घृत अनुपानाने वापरले), घृत हृदयपिचु - उत्तम उपशय - पुढील 3 वर्षांमध्ये लक्षणोद्भव नाही

    सहज पणे आठवलेल्या 2 केसेस येथे सांगितल्या आहेत. हेमगर्भ, बृहत् वात चिंतामणी (वातपित्तानुबंधि हृद्रोग), योगेंद्र (वातप्रधान हृद्रोग), त्रैलोक्यचिंतामणी (मंदाग्नि, ओजक्षीणता, तेजक्षीणता, मर्माघात), लक्ष्मीविलास (हृदय क्षीणता, ज्वरोपद्रव जन्य हृद्रोग), प्रभाकर वटी (पित्तानुबंधि हृद्रोग), नागार्जुनाभ्रक (मानस हेतु, हृदय क्षीणता, रक्तक्षीणता), हिंग्वष्टक (गुल्म हेतु, उदावर्तजन्य), आरोग्यवर्धिनी (मलसंचिती, ज्वर उपद्रव जन्य, संतर्पणोत्थ), अजमोदादि (संतर्पणोत्थ, सामता, आमवात उपद्रव हृद्रोग), आर्द्रक स्वरस हृदय स्थानी लेप (कफप्रधान किंवा संतर्पणोत्थ), नारायण तैल पिचु (अपतर्पणोत्थ), शालिपर्णी क्षीरपाक, महाकल्याणक घृत (साधक पित्त विकृति), वसंतकुसुमाकर (चिंता), विदारी-शतावरी-अनंता-यष्टीमधु क्षीरपाक (अपतर्पणोत्थ, रुक्ष, अल्प आहार, अति व्यायाम - अवलंबक कफक्षीणता) ही औषधे वापरलेली आहेत. वमन व बस्ति चिकित्सा वापरलेली आहे.

    हा विषय खूप मोठा आहे. संपूर्ण विषयाला न्याय देणे शक्य होणार नाही हे माहीत असूनही काही भाग जसा आठवला तसा लिहीलेला आहे.
    आदरणीय वैद्य रमेश नानल सरांनी प्रकाशित केलेला मधुजीवन हृद्रोग विशेषांकामध्ये अनेक aspects विस्ताराने दिलेले आहेत. पुरुषोत्तमोपनिषद् मध्ये हृद्रोगामध्ये जलौकावचारणाचा वापर हा उल्लेखनीय लेख वाचण्यासारखा आहे.

    उत्तर द्याहटवा
  48. वरील प्रमाने शास्त्रा अभ्यास करुन रुग्णांना १००% बरे करता येते.त्या करीता शास्त्रा चे सखोल ज्ञान हवे.

    उत्तर द्याहटवा
  49. Prevwntive health care म्हणून तरी आयुर्वेद उपयुक्त आहे का कृपया मार्गदर्शन करावे.....परवाच एका आजोबांना boil(गळू) चा त्रास झाला होता संडासच्या जागेला आत3,4 इंच....त्यांना तो त्रास 10 वर्षे होता,ते नेहमी ऍलोपॅथी डॉक्टरांकडेच जातात ....ऍलोपॅथी मध्ये कोणताच ठोस उपचार नाही असं ते डॉक्टर नेहमी सांगत.....पण नेहमी काही ना काही इनोव्हेशन होतच असते असे ते म्हणाले.....एक दिवस त्यांनीच स्वतः फोन केला आणि पुढील माहिती दिली"आयुर्वेद आणि ऍलोपॅथी चं फ्युजन म्हणून एक नवीन उपचार पद्धती आली आहे क्षार सूत्र म्हणून ,एक छोटस ऑपरेशन करावं लागेल 3,4 वेळा हे क्षार सूत्र बदलावं लागेल आणी हा एक खात्रीशीर उपाय आहे ."असं ते म्हणाले.आणी त्यांनी ते केलं आणी खरोखर ते10 वर्षाच दुखणं पूर्ण पणे बरं झालं.....शिवाय एक sitcom नावाची मूळव्याधीवरची गोळीदेखील आहे जे कि फ्युजन आहे या दोन शास्त्रांच म्हणे....आणी माझं इतकाच म्हणणं आहे कि जर आयुर्वेदिक वैद्य स्वतः येत नसतील काही औषधांची त्याची शास्त्रीय चाचणी घ्यायला तर ती तुम्ही स्वतः घ्यावी,बंद पडण्याच्या,चुकीचं ठरवण्याच्या उद्देशाने न्हवे तर खरोखर मानव जातिला काही तरी फायदा होईल म्हणून....आणी काही औषधे उपचार कालबाह्य झाले असतील हि पण काही अत्यंत उपयुक्त हि असू शकतील जर वैद्य हे करत नसतील तर निदान तुम्ही तरी लक्ष घालून सकारात्मक मानसिकतेने पुढाकार घेऊन आपलं आपण या गोष्टींची चिकत्सा करा....असं एक भाबडं मत आहे माझं....

    उत्तर द्याहटवा

  50. Viewers i am Geeta Kamar, am from India in new delhi, Me and my entire family has been suffering for hepatitis B from birth, We have gone to all the hospitals and there wasn't any solution even our family DR confirm it to us that there is no cure for this disease but can only be control even my first child is Hepatitis B positive, till this day a friend of mine told me about this Dr Osele who have help her to get rid of this incurable disease name Hepatitis B, That was how i give it a try, to my fullest surprise me and my entire families are now Negative of Hepatitis B even it was a surprise to my scientist Dr who graduated with PhD here in India, he now direct all his Hepatitis B positive patient to this wonderful Dr Osele who cured all diseases with herbal medicine, don't be left out contact him if you are diagnose with this same disease, after be cured he told me that he cured all manners of diseases,i am sharing this testimony both in internet and everywhere so that people who are diagnosed with kind of diseases should contact Dr Osele via email healthmedicallab@gmail.com whatsapp no. +27846531636

    उत्तर द्याहटवा
  51. नमस्कार, मला हा लेख जरा उशिरा वाचायला मिळाला. मला जन्मतःच Plateau iris syndrome with secondary glaucoma नावाचा autosomal dominant genetic disorder आहे. आधुनिक वैद्यकी शास्त्र नुसार treatment घेऊनही काही फरक पडत नव्हता. दृष्टी कमी होत होती. मला glaucoma surgery चाच सल्ला एकूण एक डॉक्टर ने दिला. मला औषध चालू असल्याने गर्भधारणा न करण्याचाही सल्ला दिला गेला. या सर्वावर सरतेशेवटी मी आयुर्वेदाचा आधार घेतला. माझी आता दृष्टी स्थिर आहे.

    उत्तर द्याहटवा
  52. अतुल सोमेश्वर कावळे, नागपुर२३ जानेवारी, २०१८ रोजी ८:०१ PM

    वरोरा, जिल्हा चन्द्रपुर जवळ चंदन खेडा नावाचे एक गाव आहे. तिथे एक आयुर्वेद तज्ञ राहतात. शिक्षण जेमतेम पाचवी. कुणीतरी गुरु केला आणि त्यांच्याकडून आयुर्वेदाचे सखोल ज्ञान प्राप्त केले. तुमचा कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण त्यांनी आपल्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीने हजारो रुग्णांना पुर्णपणे बरे केलेले आहे. तब्बल चाळीस वर्षे त्यांची ही रुग्णसेवा अहर्निशपणे सुरू होती. मी स्वतः त्यांच्या उपचार पद्धतीचा अनुभव घेतलेला आहे. आपल्या सूक्ष्म नाडी परीक्षेद्वारे ते रुग्णाचा कोणताही त्रास अचूकपणे ओळखत आणि त्यावर अचूक आयुर्वेदिक औषधोपचार करीत. एक स्त्रीला डॉक्टरांनी शेवटची घटका म्हणून दवाखान्यातून घरी न्यायला सांगितले. घरच्यांनी तिला घरी आणून खाली जमिनीवर झोपविले. प्राण निघायच्या आधी जमिनीवर झोपवितात तसे. कोणीतरी म्हणाले, एकदा शेवटचे अमूक वैद्यांना दाखवून बघा. त्यांनी शेवटची आशा म्हणून वरील आयुर्वेदिक तज्ञांना बोलविले. त्या तज्ञाने नाडी परीक्षा करताच संतप्त होऊन म्हटले - कोणी सांगितले ही मरनार आहे म्हणून, हिला आही बेडवर झोपवा. नंतर त्यांनी उपचार सुरू केले आणि थोड्याच दिवसात ती स्त्री पुर्णपणे बरी झाली. या कुटुंबाची त्या तज्ञावर एवढी श्रद्धा बसली की त्यांनी त्यांना विनंती केली की सध्या तुम्ही ज्या ठिकाणी बसून उपचार करता ती जागा अपूरी पडते, तेव्हा तुम्ही हयापूढे आमच्या घरी राहून रुग्णसेवा करा. ते दर महिन्याला तीन दिवसांसाठी चंद्रपूरला त्या कुटुंबाकडे राहून रुग्णसेवा करू लागले आणि हजारो लोकांना रोगमुक्त केले. अगदी जुनाट रोग सुद्धा बरे केलेत. म्हणून ज्या शास्त्राबद्दल आपल्याला परिपूर्ण ज्ञान नाही त्यावर वायफळ बडबड करू नये एवढेच सांगणे. एलोपैथीचा शोध लागण्यापुर्वी भारतात आणि जगभरात आयुर्वेदिक उपचारच होत असत हे कोणी नाकारू शकेल काय ? हजारो वर्षांपासून जी उपचारप्रणाली लोकांना रोगमुक्त करीत आली ती अवघ्या दोनशे वर्षात कशी काय कुचकामी ठरू शकते ?

    उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *