फेसबुक पोस्ट

पुरोगामी लॉजिक 

१३ ओक्टोबर २०१४ 

( दादरी येथे झालेला दु:खद खून , पानसरे , कलबुर्गी आणि दाभोलकर इत्यादी नावे घेत पुरोगामी म्ह्णवणार्या लेखकांनी स्वत:ला मिळालेले पुरस्कार सरकारला वापस देण्याचा सपाटा लावला ) 

खैरलांजित दलित कुटुंबाची निर्घुण हत्या झाली तेंव्हा पुरस्कार का परत केले नाहीत ?

 हे ढोंग खपायला लोकांना मूर्ख समजून राहिले काय राव ?

आणि मग दोन चार साहित्यिक मोदिंचा निषेध म्हणून साहित्य अकादमीचा पुरस्कार परत करतात - मग त्यावर डावे पुरोगामी नेहमिचे मंत्र जपत कामाला लागतात ! त्यावेळी हे भंपक लोक दाभोळकर , कलबुर्गी, दादरी खून खून फेसिझम.....सरकारचे अपयश अशी नावे घेत रडत असतात !

१) दादरी ची घटना युपीत घडली … बरे युपीत कोणाचे सरकार आहे ? समाजवादी मुलायम सिंग !
२) कलबुर्गिंचा खून कर्नाटकात झाला . तिथे कोन्ग्रेस चे सरकार आहे . आरोपी पकडलेले नाहीत .
3) दाभोळकरांचा खून झाला तेंव्हा महाराष्ट्रात कोन्ग्रेस चे सरकार होते - आरोपी पकडलेले नाहीत .

पानसरेंच्या खुन्यांना कोणि अटक केली ? 
पुरावे मिळाले तर सनातन वर बंदि घालू असे कोण म्हणाले ? 
भाजपाचे मुख्यमंत्रि असे म्ह्टले आहेत  !

आणि निषेध कोणाचा ? तर भाजपाचा ?? म्हणुन पुरस्कार परत केला ? कोणाला ?? तर साहित्य अकादमीला - - - साहित्य अकादमी आणि युपी चे गृहखाते याचा काय संबंध ? अरे काय टाइम पास लावला आहे हा ??

आता हि पोस्ट लिहिली म्हणून अभिराम हा भाजपाचा माणुस आहे अशी अटकळ आणि कोन्स्पिरसि थेअरी मांडायला डाव्या मेंदुस एक मिनिट सुद्धा लागणार नाही .

डाव्या कम्युनिस्टांनि भारताच्या इतिहासाची , राजकारणाची , समाजकारणाची आणि विचार विश्वाची पुरती वाट लावली आहे . यांच्या भंपक थेअर्या सार्या पुरोगाम्यांनी मम म्हणून स्वीकारल्या आहेत … डाव्या विचारात घटना महत्वाच्या नसतात - फ़्याक्ट महत्वाचे नसतात - त्यांच्या फालतू थेअर्या महत्वाच्या असतात … यांच्या या मुर्खपणाने भाजपा तहहयात सत्तेत राहणार आहे …

 कारण सर्वसामान्य ... अल्पशिक्षित भारतीयास.... पुरोगाम्यां हुन अधिक बुद्धी आहे . डाव्या हुन जास्त अक्कल आहे … उपलब्ध पर्यायातला शहाणा पर्याय ते निवडतात .

--------------------------------------------------------

.... लॉजिक 


१) कायदा आणि सुव्यवस्थे बद्दल कधी राज्य सरकार जवाबदार असते / तर कधी केंद्र सरकार जवाबदार असते ! गुजरात मध्ये दंगे घडतात तेंव्हा राज्य सरकार जवाबदार असते ! आणि दादारीत दंगे घडतात तेंव्हा केंद्र सरकार जवाबदार असते !! (कारण्कि समाजवादी मुलायम आहे ना तिथे !)

२) पानसरेंचा खून भाजपाच्या राजवटीत झाला … पोलिसांनी मारेकरी पकडला . गृहखाते देवेंद्र फडणविसांकडे आहे . मुख्यमंत्र्यांनि पुरावे मिळाल्यास सनातन वर बंदि घालू असेही म्ह्टले …. दाभोळकरांचा खून झाला तेंव्हा कोङ्ग्रेसचि राजवट होती . खुनी मिळाले नाहीत …. मग फुरोगामी लॉजिक म्हणते भाजपाचा निषेध करा !!

३) अरे पुरस्कार कसले परत करताय ? ते काही तुम्हाला मोदीने दिलेले नाहीत ! म्हणजे घ्यायच कोन्ग्रेस कडुन आणि परत द्यायचं मोदिला ?

हे लोक्स लय भारी आहेत राव !!
--------------------------------------------------------
(पोस्ट हिट्ट - ७२२ लाइक आणि २८१ शेअर हून अधिक  ---
आता तरी पुरोगामी विचार करतील काय ? काहीतरी चुकते आहे काय ? मला वाटत नाही तसे. धर्म शास्त्राला बुद्धिवादाच्या कसोटीवर मोजले पाहिजे …हा पुरोगामी विज्ञान निष्ठ विचार मान्य आहे …।
पण हे तर्क विज्ञान राज्यशास्त्र आणि समाज शास्त्र हे विषय आले कि कोमात जाते … कि पुरोगामी देवदूत असून त्यांना अत्मचींतनाचि काही गरजच नाही ? …. कि मोदिविरुद्ध काहीहि बोलले कि ते पुरोगामी असते ?
हा शब्द आज शिविसारखा बनला आहे …आणी त्याला पुरोगाम्यांचे बेजवाबदार वर्तन कारणीभूत आहे … तुमच्या स्वप्नातला गोबेल्स नव्हे !)



फेसबुक वरील इतर लोकप्रिय पोस्ट पाहण्यासाठी  : 

1 टिप्पणी:

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *