३० डिसें, २०१५

इस्लाम प्रचारक : दत्त प्रसाद : दाभोलकर

इस्लाम प्रचारक : दत्त प्रसाद :  दाभोलकर

इस्लाम धर्माचा प्रचार करण्याचे व्रत दाभोलकर दत्तप्रसाद यांनी घेतले आहे, ते तसे का वागतात हे आपण या लेखात पाहायचे आहे.   अल्लाचा धर्म भारत भूमीला व्याप्त करावा अशी दाभोलकर साहेबाची  आंतरिक इच्छा या भाषणात स्पष्टपणे दिसते. हे  साहेब इकडचे तिकडचे   उतारे केवळ गंमत म्हणुन उधृत करत नाहीत . हजारो मुस्लिमाच्या गर्दीत - सार्वजनिक कार्यक्रमात त्याला एक अर्थ आहे . तो अर्थ कोणता आहे ? तर प्रस्तुत भाषणात  दाभोलकर म्हणतात की "जे विवेकानंद सांगतायात ते आज मी तुम्हाला वेगळ्या कारणाने सांगतोय. " (१) हे वेगळे कारण कोणते आहे ? तर मुहम्मद पैगंबर जयंती.   

त्यानिमित्त दाभोलकर  सर  भाषण देत आहेत . अर्थात दत्त जयंती प्रतिगामी आणी मुहम्मद जयंती पुरोगामी असते  असे लॉजिक महाराष्ट्राला कळून चुकले आहे . हे दाभोलकर  साहेब  कधी असहिष्णू हिंदुच्या धार्मिक  कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माझ्या ऐकिवात नाही , पण मुहम्मदाच्या जयंतिचे अध्यक्ष त्यांनी व्हावे हा किती थोरपणा आहेय ! हे आहे पुरोगामित्व !!





डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्याकडुन मी बुद्धिवाद , विज्ञान निष्ठा आणि धर्मनिरपेक्षता शिकलो . त्या अर्थाने मी डॉक्टरांचा शिष्य आहे.   त्यांच्या भावाविषयी हा लेख लिहिणे दु:खद असले तरी आवश्यक आहे  . त्याशिवाय पुरोगामित्वाचे स्वरूप लक्षात येणार नाही .  दत्तप्रसाद दाभोलकरांच्या  संपुर्ण भाषणाचे ट्रानस्क्रिप्ट आणि व्हिडियो क्लिप प्रस्तुत लेखाच्या शेवटी आहे .
(संदर्भाचे क्रमांक ट्रानस्क्रिप्टचे  )

मुहम्मद पैगंबराच्या जयंतिनिमित्त अगदी ताजे भाषण जे दाभोलकरांनि सातार्यात केले त्यानिमित्त  मुजाहिद (इस्लामी धर्मयोद्धा ) हि पदवी त्यांना  देण्यास काहीच हरकत नाही . अशाप्रकारे हजारो मुस्लिम माणसे जोडण्याचा जो सुबुद्ध धार्मिक उपक्रम या  मुजाहिद दाभोलाकारानी  चालवला आहे त्याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे .

पण मी त्यांना मुजाहिद म्हणणार नाही कारण …   

दाभोलकरांच्या  अध्यक्षिय  भाषणाची जाहिरात करण्यासाठी जी पत्रके वाटली गेली  ती विशेष पहाण्यासारखी आहेत . त्यात दत्तप्रसाद दाभोलकर यांचा उल्लेख ज्येष्ठ विचारवंत असा केला आहे . इस्लाम हा एकमेव सत्यधर्म असल्या कारणाने   मुस्लिमांनी दत्तोपंताना दिलेली  उपाधी या लेखात वापरायची आहे . ज्येष्ठ विचारवंत हि ती पदवी  आहे.






बर ज्येष्ठ विचारवंत दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या कार्यक्रमाची जाहिरात कोणि केली ? तर मुस्लिम जागृती अभियान ! हे थोर आहेय !! मुस्लिम जागृती अभियान याने परिवर्तन वादि  संघटनांशी  समन्वय साधण्यासाठी काही मंच उभा केल्याचे पत्रकातच स्पष्ट दिसते. पत्रकातल्या फोन नंबरशी  जमाते इस्लामी ब्रिगेडचे धागे आमच्या काही पत्रकार मित्रांनी जुळवले आहेत . मला त्या विषयात जायचे नाही . माझा मुद्दा इतकाच कि -- या पत्रकावरून कार्यक्रम इस्लामी  धार्मिक हे स्पष्ट होते . पत्रकात जिहादचा गौरव आहे . ज्येष्ठ विचारवंत  दाभोलकरांनि सुद्धा स्वत:च्या भाषणात जिहादचा गौरवपूर्ण उल्लेख केला . (२) तो तसा का केला ? जिहादचा अर्थ काय ? इतकेच आपण प्रस्तुत लेखात समजून घ्यायचे आहे .

वरील इस्लामी पत्रकात कुराणाच्या काही आयतीचे क्रमांक  कंसात दिले  आहेत त्याद्वारे इस्लाम गौरव करण्याचा उद्देश पत्रकात स्पष्टपणे दिसतो. असो . पण पत्रकातले एक वाक्य फार महत्वाचे आहे. ते वाक्य असे की - " " स्वातंत्र्य समता आणि बंधुता हि त्रिसूत्री मुहम्मद पैगंबरांनि प्रथम मांडली "" . त्यापुढे कुराणातल्या चार  आयतिंचे क्रमांक दिले आहेत. या इस्लामी पत्रकात इतरत्र  सर्वत्र  आयतिंचे क्रमांक कंसात दिले कि मग कुराणाचे तिथल्या  तिथे मराठीत भाषांतर दिलेले आहे . पण स्वातंत्र्य समता बंधुता वाल्या आयतिचे मराठि भाषांतर मात्र दिलेले नाही . अर्थात ज्येष्ठ विचारवंत  दाभोलकर याना त्या  कुराणि आयती माहित असणारच ! मला माहित नव्हत्या म्हणून मी सहजच गुगल करून पाहिले . त्यातली पहिली आयात १८:२९ या क्रमांकाची आहे . त्याचे मराठी भाषांतर दाभोलकरांच्या पत्रकात दिलेले नाही . फक्त आयतीचा क्रमांक दिला आहे . वाचकांच्या सोयीसाठी आम्ही ते भाषांतर इथे उधृत करत आहोत : -

कुराण १८:२९ -  "  कोणि (इस्लामवर ) श्रद्धा ठेवेल , तर कोणि ठेवणार नाही. त्यांना  नास्तिक राहुदे , नक्कीच त्यासाठी आम्ही (अल्लाने ) नरकातील अग्नी तयार ठेवला आहे. अग्नी काफिर नास्तिकांना वेधून टाकेल. जर (नास्तिकांनि ) पाण्याची भीक मागितली तर त्यांना उकळते धातुतेल  दिले जाइल . त्याने त्यांची  तोंडे जळून जातील . कसे वाटते हे खतरनाक  (dreadful) पेय अणि सैतानी बैठक (नास्तिकांना ) बसायला .  http://quran.com/18/29 

या कुराणि आयतीत समता आहे कि ? बंधुता ? कि स्वातंत्र्य ? हे ज्येष्ठ विचारवंत दाभोलकरांना ठाउक असावे . दाभोलकरांनि त्यांच्या भाषणात काही थोर विधाने केली आहेत. त्यातली मोजकी  विधाने जशीच्या तशी पाहुया. विचारवंत  म्हणतात : -

"इस्लाम ने प्रथम स्त्रियांना समानतेचा हक्क दिला. (३)"(प्रचंड टाळ्या ) 
त्यांनी कशाच्या आधारावर हे भाष्य केले ते आमच्या बालबुद्धीस कळणे अवघड आहे . ज्येष्ठ विचारवंत बुरखा , एकतर्फी तलाक आणि बहुपत्नीत्वाला समता म्हणत असावेत .  पण त्यांचे वाक्य सोलो नाही . दाभोलकर म्हणतात   वैदिक धर्म स्त्रियांना प्रचंड त्रास द्यायचा आणि …। हि गोष्ट खरी आहे. कि इस्लाम ने प्रथम स्त्रियांना समानतेचा हक्क दिला. (३) 

ज्येष्ठ  विचारवंतानि इथे हा वैदिक धर्म कोठून आणला हे कळावयास मार्ग नाही . पण मुहम्मदाच्या जयंतित इतर काफिर धर्माची नालस्ती करून एकमेव सत्यधर्मात ( इस्लाम ) मध्ये आवतण देण्याची प्रथा आहे . त्यास इस्लाम मध्ये दावत असे म्हणतात. जमाते इस्लामीच्या वेब साइटवर असे काफ़िरांना इस्लामची दावत देण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. दावत   चे अनेक प्रकार प्रख्यात मौलाना झाकीर नाईक ने डेव्हलप केलेले आहेत. ते सर्व यु ट्यूब पाहता येतील .  कठमुल्ला झाकीर पेक्षा आपले ज्येष्ठ विचारवंत तसूभर कमी नाहीत . (अल्ला त्यांना सुख  देवो )

तर दत्तोपंत दाभोलकर यांनी विवेकानंदाचा दाखला देत १० मिनिटाच्या भाषणात अनेकदा  - विवेकानंदाने हिंदुधर्मावर घणाघाती टिका केली असे खडे बोल सुनावले आहेत . घण मारून नष्ट करण्यात येते . याने अल्लाचे  श्रोते अनंदित झाले असणार. बर त्याला ज्येष्ठ विचारवंताने अशीही पुस्ती जोडली आहे कि , विवेकानंदानि सर्व धर्मावर टिका केली आहे . हे एक त्यांनी बरे केले  असे आम्हाला वाटते  ! पण विवेकानंदानि इस्लाम वर काय टिका केली आहे ? घण नसेल निदान हातोडा तरी ?? हे काही विचारवंत  सांगत नाहीत !!

पंत  असे म्हणतात कि , मशिदीत मुस्लिम स्त्रियांना प्रवेश हवा - अहाहा काय हे पुरोगामित्व !! मग लगेच हेही सांगुन टाकतात कि

" … आणि आजच्या कार्यक्रमात सारख्याच संख्येने किंवा   किमान १० -२० % स्त्रिया उपस्थित आहे - हि ती चळवळ हि ती रचना हाही जिहाद (२) आपल्याला हातात घ्यावा  लागेल …. "

सबब इस्लाम मध्ये इतकीच सुधारणा सहिष्णू दाभोलकरांना  आवश्यक वाटते ! आणि ते सुधारणा या पैगंबर जयंतीला १० % - २०% स्त्रिया उपस्थित राहिल्या त्यात आहेच - अशी मखलाशी आहे ….  बर मागणी अशी कि स्त्रिया मशिदीत येवोत . नमाज पढोत ! अल्लाहू अकबर !! त्यासाठी जिहाद (पराकाष्ठा) हातात घेण्याची  त्यांची  तयार आहे .  पंत आधी डॉ आंबेडकरांचे नाव घेतात आणि भाषणाला सुरवात करतात. अर्थात ते ज्येष्ठ विचारवंत असल्याने त्यांनी आंबेडकरांची पुस्तके वाचली असणार आणि बाबासाहेबांनी बुरख्याचा किती उद्धार केला आहे ते त्याना ठाउक असणारच ! डॉ  आंबेडकर लिहितात : -





ज्येष्ठ विचारवंत हे धार्मिक मूळतत्वाचा भाषणभर प्रसार करत आहेत . तेव्हा या साक्षात पुरोगामित्वास - डॉ आंबेडकर तोंडी लावण्या पुरते बोलायचे आणि इस्लाम मधील मूळ तत्वाकडे जावे असे खचितच वाटत असणार . तेव्हा पवित्र कुराण स्त्री मुक्तीविषयी काय म्हणते ते पाहुया : -

"पुरुष हे स्त्रियांचे मालक आहेत . हे अल्ला ने  - पुरुष स्त्रियांवर जो खर्च (सांभाळ ) करतात त्यासाठी दिलेले आहे . स्त्रियांनी माज केला तर प्रथम त्यास समजावून पहा , नाही ऐकले पलंगावर तिच्यावर बहिष्कार टाका , तरीही नाही ऐकले फटके मारा … पण त्यांनी आज्ञा पालन केले तर  मात्रा त्याना हानी पोचवू नका . अल्ला  कृपाळू आहे . (कुराण ४:३४) http://quran.com/4/34

अल्ला खरोखर कृपाळू आहे , आणि त्याची कृपा दाताप्रसाद दाभोलकर यांच्या स्त्री पुरुष समतेवर कायम राहो ! बाकी  पंतानि इस्लामचा प्रचार अवश्य करावा . तो त्यांचा घटनात्मक अधिकार आहे . पण दाभोलकर जे हिंदु मुस्लिम प्रश्ना बद्दल बोलले ते खरोखर गंभिर आहे . ते म्हणतात : -

" भारतात बाहेरून येउन किंवा इथल्याच काही इतर अतिवादी इतर धर्मियांनी जर दंगल केली नाही , तर हिंदुस्थानातले मुसलमान हे समता संदेश मानणारे आहेत. ते सामंजस्य करणारे आहेत. (४) "

इथले स्थानिक मुस्लिम दंगल करत नाहीत . एका तर बाहेरून चे लोक्स… म्हणजे कोण कोणास ठाउक ?  किंवा इथले इस्लाम सोडुन इतर धर्मातील इतर अतिवादी  दंगल घडवतात . ज्येष्ठ विचारवंताचे म्हणणे  अगदी योग्य आहे . आता इथल्या अतिवादी लोकांनी दंगल केली तर आणि तरच गरीब बिच्च्यार्या मुस्लिमांनी  उत्तर द्यायला नको काय ??  भारतातील दंगली कोण सुरु करते याचे संख्याशास्त्र कोणीही  उपटून काढू नये . आझाद मैदानावर शांतता धर्माच्या लोकांनी जी दंगल केली त्यामागे ब्रम्ह्देशातील काफ़िरांचा हात होता !!


दाभोलकरी तत्वज्ञान : 

एक धरम घेतला तर समदे  घ्या . नाय तर समदे सोडा. कुराण वेद इत्यादीचा आधार घेऊनच मानव बनता  येते . वगैरे सर्व धर्म समभाव  दाभोलकर सांगत आहेत . हे सारे ते विवेकानंदाच्या नावे बोलत आहेत . प्रथम  हे समजून घेतले पाहिजे कि ,  विवेकानंद काही पुरोगामी वगैरे नव्हते . ते अध्यात्मिक होते . त्यांना साक्षात्कार होत असत . विवेकानंदाना वेदांत वगैरे  गोष्टीची आवड होती . विवेकानंदानि इथल्या वर्ण जातीव्यवस्थेचे  वगैरे भरपूर कौतुक  केलेले आहे . विचारवंती भाषेत सांगायचे झाले तर १९८७ साली रामकृष्ण मठाने प्रसिद्ध केलेल्या पाचव्या खंडात हे सारे १४८ आणि १७४ व्या पानावर मिळेल. असल्या ट्रिक्स  करून काही भले होणारे नाही . वेदा  कडुन इस्लाम सहिष्णुता शिकला आणि इस्लाम कडुन हिंदु समता शिकले असा काही त्यांचा विचार दिसतो . तो सत्याच्या जवळपास सुद्धा नाही . पहिली गोष्ट म्हणजे हिंदु काही समता वगैरे शिकलेले नाहीत . आणि इस्लाम कडून ती कशी शिकता येईल ? तिकडे कुठे आहे समता ? बर वेदाकडुन इस्लाम सहिष्णुता शिकला म्हणजे काय ?  हिंदु भ्याड आहेत . होते आणि राहतील . त्याला दाभोलकर सहिष्णुता म्हणतात . इस्लाम मधील बुरखा , तलाक वगैरे त्याना स्त्री पुरुष  समता वाटते. बाकी मुस्लिम स्त्रियांनी मशिदीत जावे म्हणून आमचे ज्येष्ठ विचारवंत  जिहाद करायला तयार आहेत .

 चालायचंच !

डॉ अभिराम दिक्षित

--------------------------------------------------------------------
 ---------------------

ज्येष्ठ विचारवंताचे व्हिडियो भाषण आणि त्याचे लिखित स्वरूप संदर्भासाठि खाली देत आहोत : - (संदर्भाचे क्रमांक ट्रानस्क्रिप्टचे  )

https://www.youtube.com/watch?v=hyfoNY-Znfc 










सन्माननीय विचारमंच ,  आणि विचारमंचा समोरील सन्माननीय मान्यावर… खूप वेळ झालाय याची मला जाणिव आहे . नाहीतर तुम्हाला  माहित आहे कि मी जेव्हा बोलायला उभा राहतो तेव्हा  तेव्हा तासभर घेतो. आज मी पाच दहा मिनिटाहुन जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही आधीच खूप थकलाय दमलाय याची मला जाणिव आहे. आजच्या कार्यक्रमाच वेगळेपण मोठेपण या पाच मिनिटात मला पुन्हा अधोरेखित करायचंय. मगाशी आपण वेगवेगळ्या धर्मांचे विचार ऐकले. सर्व विचार तुम्हाला पटले असतील अस नव्हे -- मलाही पटले असतील अस नव्हे . त्यावर सविस्तर वेगळी चर्चा होऊ शकते. यातून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल - पुन्हा पुन्हा सांगता येईल  तर हि कि सर्व धर्म कळत नकळत मानवता धर्म सांगतात. माणुस माणुस म्हणून त्याला बनवतात . माणुसकी हि सर्व धर्मांची खरी ओळख असते. आज त्याच्या पुढे जायची गरज आहे . काही जणांना पटणार नाही . पण जे राजर्षी शाहूनि सांगितलय  - महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडरांनी सांगितलय - विवेकानंदानिहि तेच सांगितलय आजच्या जगाला सर्व धर्म सद्भाव आणि सर्व धर्म समभाव यांची गरज आहे. सर्व धर्म सद्भाव आणि सर्व धर्म समभाव हे प्रर्त्यक्षात आणण सोप आहे - हे आपण सर्व धर्मांची मूळ तत्व पाहिली तर लक्षात येत .

याची चर्चा आपण आज करतोय कारण आज पैगंबर जयंती आहे आणि पैगंबर म्हटलं कि आधी सलिवुल्लाहि वसल्लम अस म्हणाव ;लागत याची मला कल्पना आहे . मला त्यांच्याबद्दल आदर आहे . पण आपण पैगंबर जयंतिला हे म्हणतोय आणि त्याला एक वेगळ महत्व आहे हे मला तुम्हाला सांगायचय . सर्व धर्म समभाव ज्यांनी सांगितलाय त्यामध्ये विवेकानंद येतात. विवेकानंदांनी सर्व धर्मांच्यावर टिका केलीय, आणि हिंदु धर्मावर घणाघाती टिका केलीय. त्यांनी सांगितलय अस्पृश्यता पाळणारा माझा धर्म हा धर्म नव्हे हा सैतानाचा बाजार आहे. पण हे सांगत असतानाच त्यांने सर्व धर्म समाभाव सांगितला आणि तो शक्य आहे अस सांगितल .

तो कसा साकारावा हेही सांगितल आणि धर्म म्हणजे काय ? याची व्याख्याही सांगितली. माणसाला जो माणुस बनवतो तो धर्म हि सर्व धर्मांची एकमेव व्याख्या आहे . त्यामुळे एक धर्म स्वीकारला तर तुम्हाला सारे धर्म स्वीकारावे लागतील. आणि एक धर्म नाकारला तर सारे धर्म नाकारावे लागतील. आणि कोणताही धर्म न मानणारी पण खर्या अर्थाने धार्मिक असलेली माणसंही तुमच्यापुढे असतील. जे विवेकानंद सांगतायात ते आज मी तुम्हाला वेगळ्या कारणाने सांगतोय. (१)

आपल्याला आश्चर्य वाटत १२० वर्षापूर्वी ३ ओगस्ट १८९५ , विवेकानंदानि अमेरिकेत भाषण दिलाय ते त्यांची शिष्या व्होयली बोवल यांनी शब्दांकित केलेलं आहे . तिसर्या खंडात १९९ पानावर आहे . विवेकानंदना तिने म्हटलंय …. विवेकानंदानि ख्रिश्चन माणसे आणि ख्रिश्चन धर्म गुरुंसमोर , मुहम्मद पैगंबरांनी केलेलं कार्य आणि त्यांच मोठेपण याच्यावर भाषण केलाय (टाळ्या )

आपण हे विसरून जातो , विवेकानंदानि हे जे भाषण दिलय, विरा करंदिकर त्यांची तीन पुस्तक आहेत , विश्व मानव स्वामी विवेकानंद … केवढी आनंददायक  गोष्ट आहे , केवढी आशादायक गोष्ट आहे , केव्हढा चमत्कार आहे…. एक हिंदु संन्यासि अमेरिकेतल्या ख्रिश्चनांच्या समोर आणि ख्रिस्ती धर्म गुरुंच्या समोर, मुहम्मद पैगंबरांच योगदान याच्यावरती बोलतोय.

विवेकानंद एकदाच बोललेले नाहीत - त्यानंतर विवेकानंदानि २१ सप्टेंबर एकोणिशे म्हण्जे मृत्युपूर्वी दोन वर्ष आधी असाच भाषण दिलाय आणि ते त्यांनी पुन्हा अमेरिकेत दिलय. ते तुम्हाला विवेकानंद ग्रंथावलिच्या नवव्या खंडात शेवटी मिळेल. त्यामध्ये विवेकानंदानि पुन्हा पुन्हा सांगितलय कि तुम्ही जर धर्म मानत असाल तर तुम्हाला ,सर्व प्रेषीतांचा आदर करावा लागेल . सर्व प्रेशितांना समजावून घ्याव लागेल. आणि त्या प्रेशितांनि काय सांगितलय ते समाजावून घ्याव लागेल . आणि हे समजावून घेताना -- धर्म हे ग्रंथावर आधारित नाहीत - तर ग्रंथ हे धर्मावर आधारित आहेत .  ग्रंथानि जी मूलतत्व सांगितली ती आणि धर्माने जी मूलतत्व सांगितली ती जर वेगळी असतील तर ती आपण तपासून घेतली पाहिजेत. मगाशी एकान सांगितल की वैदिक धर्म स्त्रियांना प्रचंड त्रास द्यायचा आणि …। हि गोष्ट खरी आहे. कि इस्लाम ने प्रथम स्त्रियांना समानतेचा हक्क दिला. (प्रचंड टाळ्या ) (३)

पण विवेकानंद पुढे काय म्हणतात ते आपण विसरूतो. विवेकानंदानि हिंदुधर्मावर घणाघाती टिका करताना सांगितलय, की रजस्वलेने मंदिरात जाऊ नये अशी भंपक चर्चा करत हा धर्म उभाय आणि विवेकानंद   म्हणतात कि वेश्यांनाहि मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे -- पण त्यावेळी विवेकानंद विचारतात  - कि हे जर आपण सांगतोय आणि जर आपण मुहम्मद पैगंबरांना समजावून घेतलय…. तर आपल्याला हे हि कदाचित सांगाव लागेल….  की मशिदीतही स्त्रियांना हक्क मिळाला पाहिजे - ज्यावेळेस आपण सर्व धर्म समभाव आणि सर्व धर्म सद्भाव म्हणतो - त्यावेळी स्त्री पुरुष समानता आहे . आणि आजच्या कार्यक्रमात सारख्याच संख्येने किंवा   किमान १० -२० % स्त्रिया उपस्थित आहे - हि ती चळवळ हि ती रचना हाही जिहाद (२) आपल्याला हातात घ्यावा  लागेल …. 


हे जर करायचं असेल तर या देशात ते फार सोप्पय … हे  विवेकानंदानि सांगितलय - ते म्हणाले - सोप्प आहे याच कारण अस्य कि हि गोष्ट ज्याला करायचीय --- त्यांनी हि गोष्ट समजली पाहिजे कि केवळ माणसाला जो माणुस बनवतो तो धर्म -- आणि एक धर्म स्वीकारला तर सार्या धर्मांचा स्वीकार करावा लागतो . आणि एक धर्म नाकारला तर सारे धर्म नाकारावे लागतात. इथे थांबता येणार नाही … तर समोरच्या धर्मातली जी चांगली गोष्टय त्यांचा आपण आदर  केला पाहिजे - सन्मान केला पाहिजे . आणि त्याच वेळी आपल्या धर्मात नसलेली आणि दुसर्या धर्मात असलेली जी गोष्ट्य… ती आपण घेतली पाहिजे. आणि विवेकानंदानि भारताच्या संदर्भात सांगितलय … ते हि लक्षात घ्या …. विवेकानंदानि  १० जून १८९८ ला सर्फराज मुहम्मद हुसेनना  पाठवलेले पत्रय.  १० जून १८९८ …. विवेकानंदान अमोराहून सर्फराज मुहम्मद ला पाठवलेल पत्रय - ते लिहितात … आमच्या अद्वैत वेदांतातले सिद्धांत कितीही सूक्ष्म आणि सुंदर असले तरीही समतेचा संदेश सर्वप्रथम व्यवहारात आणला तो इस्लामनेच. आणि पुढे सांगतायत हे सर्व धर्म काळाच्या एका चौकटीत बंदिस्त झालेत . आणि पुढे सांगतायत - जिथे वेद नाही कुराण नाही आणि बायबल हि नाही अशा ठिकाणी  आपल्याला मानवजातीला घेऊन जावे लागेल. आणि हे काम आपल्याला वेद बाउबल आणि कुराण यांचा आधार घेऊनच कराव लागेल . हा मुद्दा बाजूला ठेवू पण त्यांनी सांगितलय  कि इस्लामने  प्रथम समतेचा संदेश दिला आणि पुढे हे हि सांगितल कि इस्लाम आणि इंग्रज यांच्या राजवटी मुळे  हिंदु धर्मात थोडी फार समता आली    .

 हे हि विवेकानंदांच्या भाषणात आहे. पण विवेकानंद हीही गोष्ट दुसर्या प्रकारे सांगतात. विवेकानंदांचा  अमेरिकेत ट्वेण्टिएथ सेंच्युरी होल मध्ये त्यांचा फार मोठा एक आसा परिसंवाद झाला. त्यानंतर त्यांची एक संपुर्ण मोठी अशी मुलाखत झाली होती आणि वेदांताच काम यावर ते बोलले होते . ते म्ह्टले इस्लाम पासून आम्ही समताच शिकलो. आणि इस्लाम वेदांतापासुन सहिष्णुता शिकला. आणि म्हणून विवेकानंद असे म्हणतात कि , भारतातला इस्लाम हा जगभरच्या  इस्लामचा एक भाग आहेच …  पण तो जग भरातल्या इस्लाम पेक्षा अधिक सहिष्णू आहे. विवेकानंद म्हणतात  भारतात बाहेरून येउन किंवा इथल्याच काही इतर अतिवादी इतर धर्मियांनी जर दंगल केली नाही , तर हिंदुस्थानातले मुसलमान हे समता संदेश मानणारे आहेत. ते सामंजस्य करणारे आहेत (४) आणि हे होऊ नये अस वाटत असेल तर या दोन धर्मांचा समन्वय या देशात पाहता येईल.

हे सांगताना विवेकानंद याच्याही पुढे गेलेत . विवेकानंदांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणि ते अंबाल्याला गेलेत आणि ते अंबाल्याला का गेलेत माहितेय ? ते अंबाल्याला गेले कारण अंबाल्यामध्ये आर्य समाजी  आणी इस्लाम  यात काही कुरबुर सुरु आहे अस त्यांना कळल म्हणून ते तिथे गेले. त्यांनी दोन्ही धर्मियांच्या प्रमुखाशी शंका केली . ते त्यांनी, ते संकट टाळल आणि त्यांनी अंबाल्याला फक्त एकाच संस्थेला भेट दिली . ते म्ह्टले  हिंदु मुसलमान मुल जिथे एके ठिकाणी शिकातात , आणि हिंदु मुसलमान मुलीही येतात अशा शाळेत मला जायचय. मित्रहो विवेकानंदांनि जे सांगितलं तो सर्व धर्म समाभाव आहे.

आपण मगाशी जे पाहिलं तो ही सर्व धर्म समभावय  आणि  सर्व धर्म समाभाव सर्व धर्म सद्भावा जवळही गेला  पाहिजे. हे सांगताना विवेकानंद आपल्या आयुष्याच कार्य सांगतायत - सर्व धर्मातल्या सर्व धर्म ग्रंथातल्या ज्या गौण गोष्टी आहेत. त्या गौण गोष्टींचा त्यांच्या मूलभूत तत्त्वांशी संबंध नाही . त्यांच्यावर खुल्या मनानी चर्चा झाली पाहिजे - आणि ते बदलायचं असेल तर बदलल पाहिजे आणि हे सांगताना विवेकानंदानि जे सांगितल डिव्हिनिटि ऑफ मेन बद्दल ते मी त्यांच्याच शब्दात वाचून दाखवतो आणि थांबतो . त्यांनी सांगितल जो हिंदुंचा ब्रम्ह आहे -- पारशांचा उर्मनय आहे , बौद्धांचा बुद्ध आहे , ज्युंचा जेहोवा आहे , ख्रिस्तांचा आकाशातील देव आहे आणि मुस्लिमांचा मुहम्मद पैगंबर आहे तो एक आहे . हे मी जाणतो - आणि तो एक आहे हे मी जाणतो तेंव्हा मी माणुस बनतो - 

मित्रहो -- सर्व धर्म समभावाचा हा संदेश आहे . आणि हा संदेश खर पाहता , आपल्याला आजच्या दिवशीही मिळतो आजच्या सर्व मोठ्या माणसांच्या कार्तुत्वातून मिळतो . एक चांगला कार्यक्रम इथे संपन्न झालाय . खूप वेळ असूनही आपण थांबलात . सर्व वक्त्यांनी चांगली भाषण दिली . आणि एक अतिशय चांगला कार्यक्रम इथे संपन्न झाला . आपण सर्व आलात . आपणा सर्वांचे आभार .

व्हीडियो भाषण





२७ डिसें, २०१५

संघ परिवारातील वैचारिक गोंधळ

संघ परिवारातील वैचारिक गोंधळ : राम माधव आणि देवेंद्र फडणवीस

अखंड  भारत आणि मेकोलेच्या शिक्षण पद्धतीवर या दोन महानुभावांनी आज प्रचंड हाश्य कल्लोळ  विधाने केली आहेत. प्रथम अखंड भारताची गंम्मत पाहुया !

 भारत पाकिस्तान आणि बांग्लादेश हे पुन्हा एकत्र येतील आणि मग त्यांचा अखंड भारत निर्माण होईल असे राम माधव यांना वाटते . हे सर्व युद्धाने नाही तर  लोकशाहीच्या सार्वमताने (पोप्युलर कन्सेंट ) ने शक्य होईल असेही त्यांना वाटते ! म्हणजे राम माधव म्हणतात कि भारत पाकिस्तान आणि बांग्लादेशातले नागरिक एक  राष्ट्र होऊ इच्छितात !! हा भाबडेपणा आहे कि साबणाचे फुगे आहेत  ? बांग्लादेश स्वातंत्र्य संग्राम लढून १९७१ ला भारताच्या मदतीने पाकिस्तान हून वेगळा झाला ती काय गंमत होती का ? भाषिक राष्ट्रवाद कशाशी खातात ? दार उल इस्लाम , दार उल हरब इत्यादी गोष्टी ठाउक आहेत का ?

निदान डॉ आंबेडकरांचे फ़ाळणिवरिल प्रसिद्ध पुस्तक तरी वाचले आहे का ? संघात वाचन बंदि  आहे. सगळा भर बौद्धिक नावाच्या प्रोपोगांडावर !   





बरे समजा राम माधव यांच्या कल्पनेतले अखंड भारत तयार झाले . तर त्यात (भारत + पाक + बांग्ला = अखंड भारत ) = मुस्लिम लोकसंख्या जवळ जवळ ४०% असेल ! चाळीस टक्के !!

मग संघ परिवारातील नेते जे हिंदु लोकांना प्रजनन क्षमता वाढवा - हिंदु टक्का खतरेमे - पोरे पैदा करा असे आदेश देत असतात त्याचे काय करायचे ? हिंदुना काय स्पीडने पोरे पैदा करावी लागतील ? काय विनोदी प्रकार आहे हा ? देशाच्या इतक्या महत्वाच्या मुद्द्यावर अभ्यास नसेल तर  बोलू नये.

राम माधव यांच्या कल्पना सृष्टीत उद्याचा अखंड भारत तयार झाला आहे . त्याला सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणतात बर का . म्हणजे काय तर हे पहा - कराचीत गोशाळा बांधल्या जात आहेत . लाहोर ला रामनवमी साजरी होत आहे. इस्लामाबादेत महाआरती सुरु आहे. बलुचीस्तानाताल्या गोसंशोधन केंद्रात गायी चे तूप जाळून ऑक्सिजन तयार करण्याचा शोध लागला आहे . संघाच्या राष्ट्रीय मुस्लिम मंचाने ढाक्याची महानगरपालिका शिवसेनेकडून जिंकली आहे ! आता काहीही बरळायचे  म्ह्टले तर !! रावळपिंडी मधील काझीमुल्ला ब्राम्हण भोजनात सरसंघचालक स्वत:च्या हाताने तूप वाढत आहेत आणि….
 40% मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भारतात भाजपाचे राज्य यावच्चंद्र दिवाकरौ चालो  असे आशीर्वाद  त्या भोजनावळित मिळत आहेत !!  ज्यांना वाढ्त्या मुस्लिम लोकसंखेची चिंता आहे. बांग्लादेशींच्या घुसखोरी मुळे जे अस्वस्थ आहेत असे हिंदुत्ववादी..... ४०% मुस्लिम लोकसंख्येच्या अखंड भारतासाठि आग्रही  असतात... हा एक विनोदच आहे. (संदर्भ पहिल्या कोमेंटित )

हिंदू लोक शेतकरी. जमिनीला माता मानणारे. भूगोलावर त्यांचे लैच प्रेम. त्यांचा मनात अखंड भारतमाता घर करून बसली आहे. पण अखंड भारत म्हण़जे केवळ भुगोलांची बेरीज न्हवे. त्यात लोकसंख्येची बेरीज आहे. इतिहासाची वजाबाकी आहे आणी धर्माचा भागाकार आहे. 

मुस्लिम हा हिंदुपेक्षा राजकीय दृष्ट्या अधिक सजग आहे.  हिंदुंकडची एकमेव जमेची बाजू म्हणजे त्यांची लोकसंख्या. अखंड भारतात त्या एकमेव जमेच्या बाजूचे महत्व झपाट्याने कमी होणार होते. फाळणी केवळ भूभागांची झाली नाही. फाळणी मुस्लिम लोकसंख्येची झाली . अन भारतातल्या मुस्लिमांचे सांख्यीकी महत्व खाडकन  उतरले. फाळणी हा गेल्या हजार वर्षातला हिंदुंचा सर्वात मोठा विजय आहे . हिंदू च्या सर्वात जास्त भाग्याची गोष्ट आहे.  गुलामी रक्तात इतकी भिनली आहे काय ? कि पुन्हा लोकशाही मार्गाने  देशाचे इस्लामिस्तान बनवू पाहत आहात ? ४० % मुस्लिम लोकसंख्येच्या च्या अखंड भारतात भाजपा सोडा कोन्ग्रेस तरी निवडुन येईल का ? असदुद्दिन ओवेसिला ( पंतप्रधान)  वजीरे आझम करायचे असेल तर अखंड भारत हा एक लोकशाही मार्ग आहे. 

---------------
---------------

दुसरे विनोदी विधान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे आहे . फडणवीस साहेब म्हणतात कि देशातील १८५४ पूर्वीची शिक्षण व्यवस्था आपली मूळ शिक्षणपद्धती होती ती इंग्रजांनी मोडून काढली आणि भारतविरोधी शिक्षण पद्धती लादून इथला मूळचा विचार बिघडवला, त्यातून इथले ते सगळे टाकाऊ व पाश्चात्त्य ते सगळे चांगले हा विचार रुजवला. येथील संस्क्रुत पाठशाळा इंग्रजांच्या म्हणजे मेकोलेच्या शिक्षण पद्धतीने बंद पडल्या असा फ़डणविसांचा आक्षेप आहे . संघाच्या बौद्धिकांतुन त्याना हे "ज्ञान"  मुख्यमंत्र्यांना  मिळाले असावे . हे म्याकोलेचे भूत लवकर खांद्यावरुन उतरवलेले बरे !  (संदर्भ दुसर्या कोमेंटित )

मेकोलेने  संस्क्रुत वेदपाठशाळा बंद केल्या नाहीत . त्याला सरकारी अनुदान थांबवले. तसाही संस्क्रुत वेदपाठशाळेत किती हिंदुना प्रवेश होता ? आणि वेद घोकून देशाचे काय भले होणार होते ?  मेकोलेने या शिवाय अरबी मदरशांचेही अनुदान बंद केले होते . पुन्हा निट ऐका - मेकोलेने इस्लामी मदरशांचे सरकारी अनुदान बंद केले होते. त्याचा अर्थ समजतो का ? मदरसे आणि वेद पाठशाळा याचे महत्व कमी करून -- धार्मिक शिक्षणाचि मर्यादा ओलांडुन --- मेकोलेने भारतासाठी भविष्याची दारे उघडी केली होती . लोर्ड मेकॉले या आधुनिक भारताच्या भाग्य विधात्याला शत्रू मानणे हा कृतघ्नपणाचा  कळस आहे .






मी स्वत: मेकोलेपुत्र आहे . आणि त्याचा मला अभिमान आहे .आधुनिक वैद्यकशास्त्र शिकलो बरे आयुष्य जगू शकतो ….  नाहीतर  कुठल्यातरि  वेद्पाठशाळेत उघडाबंब अवस्थेत शेंडी ठेवून  जुनाट ऋचा घोकत बसलो असतो. बर मी एकटा मेकोलेपुत्र नाही . तुम्ही सारे वाचक मेकोलेपुत्र आहात . गांधीजी,  नेहरू , सावरकर , आगरकर , आंबेडकर , टिळक हे सारे मेकोलेपुत्रच  आहेत . ब्यारिस्टर आहेत , वकील आहेत पदवीधर आहेत . आधुनिक शिक्षणाने हि व्यक्तिमत्वे उभी राहिली आहेत. मेकोलेपुत्रांनि भारताला स्वातंत्र्य मिळवुन दिले. ब्रिटांशाच्या गुलामीचे उद्गाते वेदांती पेशवे दुसरे बाजीराव होते.  इतकेच काय खुद्द देवेंद्र फडणवीस सुद्धा मेकोलेपुत्र आहेत. वेदपाठशाळेतिल याद्निक नव्हे.

इमोशनल करायला आणि पोलिटिकली करेक्ट  म्हणून  शिवाजी महाराज यात न आणलेले बरे . नाहीतर पेशवाई आणि शिवशाहीत कायद्याच्या आणि शिक्षण व्यवस्थ्येच्या अनुषंगाने ५ - १०% सुद्धा फरक मिळणार नाहि. हे सत्यही सांगावे लागेल

 -------------------
चौदा विद्या व चौसष्ठ कला कोण शिकवत होते? भारतात जे वेद्पाठशाला सोडुन  इतर शिक्षण होते त्याचे काय ? तक्षशीला आणि नालंदा इत्यादी विद्यापीठात काय शिकवले जात होते . हृदयावर हात ठेवून ऐका . त्यापेक्षा अधिक चांगली शिक्षण व्यवस्था  लॉर्ड थॉमस बॅिबग्टन मेकॉले याने भारतात आणली .या विषयातील तज्ञ रा भा पाटणकर यांनी या विषयावर बरेच संशोधन आणि अभ्यास केला आहे .
-------------------------

रा भा पाटणकरांनि भारतातील प्राचीन आणि अर्वाचीन शिक्षण पद्धतीचा सखोल वेध घेणारे पुस्तक लिहिले आहे. अपुर्ण क्रांती असे त्या पुस्तकाचे नाव आहे.  त्यांनी भारतातील जुनी शिक्षण व्यवस्था (वेदपाठशाला सोडुन इतर ) किती मागास होती याचा योग्य वेध घेतला आहे. आणि मेकोलेच्या शिक्षण पद्धतीला अधिक आधुनिक आणि उपयुक्त करण्यासाठी काय बदल केले पाहिजे याचाही वेध घेतला आहे. संघात वाचन बंदि  असावी . नायतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानि इतके विनोदी विधान केले नसते.

------
 प्राचीन भारतात इतिहास हा विषय कोण्या राजकुमारांनि शिकला होता का ? भूगोल हा विषय राजे महाराजांनी अभ्यासला होता काय ? साध्या नकाशा या शब्दाला संस्क्रुत शब्द का मिळत नाही ? पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर डोलते असे उत्तर पेशवाईच्या अंतापर्यंत तज्ञात एकमत होते । बीजगणित भूमिती दैनंदिन हिशेबापलिकडे गेली होती काय ? उत्तर नाही असे आहे . पदार्थ विज्ञान आणि रसायनशास्त्र हे तर विषय नाम सुद्धा इंग्रजीतून  भाषांतरीत आहे. मेकोलेने हे सर्व विषय आणि रूपरेखा भारतात आणल्या पण या बोडसभक्तांना वेदातली काल्पनिक विमाने दिसतात . प्रत्यक्षातले ज्ञान दारिद्र्य नाही . दुर्दैव ! तथाकथित भारतीय शिक्षण पद्धतीत काही वैगुण्य असल्याशिवाय भारत गुलाम झाला का ?

"आता राहिला प्रश्न मेकॉले यांच्या नावावर खपवल्या जात असलेल्या भारत विरोधी  उताऱ्यांचा. ते साफ खोटे आहे . शुद्ध थाप . त्यातला पहिला इंग्रजी शिक्षणामागील तथाकथित कुटिल हेतूबाबतचा उतारा हा मेकॉले यांचा नाहीच. हा उतारा ३५चा, पार्लमेन्टमधल्या भाषणातला, असे सांगण्यात येते. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये होणाऱ्या भाषणांच्या संग्रहाला हॅन्सार्ड असे म्हणतात. त्याच्या कोणत्याही प्रतीतील कोणत्याही तारखेत हा उतारा नाही. कसा असणार? 1835 ला मेकॉले इंग्लंडमध्ये नव्हतेच. ते भारतात होते. शिवाय या मूळ इंग्रजी उताऱ्यातील विचार तर सोडाच, भाषाही त्यांची नाही. ती फारच अलीकडची आहे. तेव्हा हा उतारा बनावट आहे. मग तो कोठून आला?" बाकी आधुनिकता आणि विज्ञान यात स्वकीय परकीय वगैरे काही नसते . मदर तेरेसा अंधश्रद्ध प्रतिगामी आहे म्हणून तिचा विरोध करा - --. मदर तेरेसा आणि न्यूटन यांना एका मापात मोजू नका . विज्ञान युरोपात जन्मले ते शिकले पाहिजे . स्वातंत्र्य , समता , बंधुता आणि राष्ट्रवादाचा आधुनिक विचारही युरोपियन फ्रेंच राज्यक्रांतिचे अपत्य आहे . मी स्वत: राष्ट्रवादी आहे . इथे राहणार्या सर्व माणसांचे हित असा माझ्या राष्ट्रवादाचा आशय आहे . पण आधुनिकतेचा निषेध करत संस्कृतीचे पाढे घोकणे  हा तुमचा राष्ट्रवाद असेल तर आग लागो असल्या देशभक्तीला ! गोमातेच्या जेनेटिक वंशजांना दुसर्याला ब्राउन साहेब म्हटले कि गोमुत्र प्यायल्या एव्हढे पवित्र वाटत असले पाहिजे !

मेकोलेच्या वरील सर्व खोट्या आरोपांचा समाचार घेणारे विस्तृत अभ्यासपूर्ण पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.  डॉ. जनार्दन वाटवे , डॉ. विजय आजगावकर या लेखक द्वयीने अतिशय अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे. निर्वाचन आयोग बंद करून  ते वाचले पाहिजे. ( लिंक तिसर्या कोमेंटित )

संदर्भ :


१) http://timesofindia.indiatimes.com/india/India-Pakistan-and-Bangladesh-will-reunite-to-form-Akhand-Bharat-Ram-Madhav/articleshow/50333856.cms

२) http://mumbaitarunbharat.in/Encyc/2015/12/25/%E2%80%98%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE-.aspx#.Vn8P5vl96Ul
३) http://www.globalmarathi.com/20140127/4912419355158098324.htm


संघाची तीन मुले : नेमकी भूमिका काय आहे ?

संघाची तीन मुले : नेमकी  भूमिका काय आहे ?

हिंदु कुटुंबात कुटुंब नियोजन नको - किमान तीन मुले असली पाहिजेत  असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडुन आलेले आहे. जास्तीत जास्त किती असावीत ? याचा निर्णय मात्र उदार मनाने समाजानेच घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे !

संघ हि जगातली सर्वात मोठी सामाजिक संस्था असल्याच मी ऐकलय  . कसही असल तरी संघ हि भारतातली फार मोठी सामाजिक - राजकीय मतप्रणाली आहे यात शंका नाही . त्यांच्या मतांचे पालन करणाराही मोठा वर्ग हि आहे . त्यामुळे या मतामागाची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे .  हि मागणी संघाच्या अखिल भारतीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वर्गानंतर - - संघाच्या सहकार्यवाहांनि घेतलेली अधिकृत भूमिका आहे . त्यामुळे हि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अधिकृत, धोरणात्मक  आणि गंभिर भूमिका आहे . उडत उडत केलेले विधान नव्हे .

बातमीची लिंक :

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/--/articleshow/24788881.cms

  आमचे एक पुरोगामी प्राध्यापक मित्र यास - - ब्रह्मचारी फौजेचे - लैंगिक आव्हान -- म्हणत टर उडवते झाले. या भूमिकेचे आंधळे समर्थन किंवा थिल्लर विरोध यातून मात्र काहीही साध्य होणारे नाही . एका मुलभुत प्रश्नाबद्दल यात भाष्य आणि संघाची भूमिका आलेली आहे . तो प्रश्न आहे लोकसंख्येच्या  धार्मिक प्रमाणाचा … सत्य काय आहे ?

संघाची भूमिका काय आहे ?

मुस्लिम लोकसंख्या वाढते आहे . ती इतर भारतीय धर्मांपेक्षा अधिक वेगाने वाढते आहे . असेच चालू राहिले तर काही वर्षात हा देश लोकसंख्येच्या मार्गाने मुस्लिम राष्ट्र बनेल आणि इतर भारतीय धर्म अल्पसंख्य बनतील . इथे संघाच्या अधिकृत प्रकाशनातही हिंदु अल्पसंख्य बनतील असे न म्हणता ''भारतीय  धर्म'' अल्पसंख्य बनतील असे म्हटलेले आहे .  अशाप्रकारे बहुसंख्या टिकवण्यासाठी. आणि हा देश इस्लामी बनण्यापासून वाचवण्यासाठी  कुटुंब  नियोजन धिक्कार आणि प्रजननाचा पुरस्कार करण्यात आलेला आहे.
मेकोले म्याकोले पुत्र







६ डिसें, २०१५

असहिष्णुता - डॉ आंबेडकर काय म्हणतात ?

असहिष्णुता - डॉ आंबेडकर काय म्हणतात ?

सध्या असहिष्णुतेची बरीच चर्चा सुरु आहे. दादरी च्या निमित्ताने हे घडले . दादरी सारख्या अमानुष आणि नीच कृत्याचा राजकाराणासाठि वापर करणे त्याहून वाइट आहे . पण बिहारच्या निवडणुकीच्या तोंडावर तेथील १९%  मुस्लीम मतासाठी हा विषय तापवण्यात आल्याचे स्पष्ट होते . बिहार निवडणुकीच्या निकालानंतर एकाएकी बटण दाबल्यासारखी पुरस्कार वापसीची लाट थांबली . आणि असहिष्णुता हा शब्द मिडियाच्या शेवटच्या पानावर गेला .  अर्थात यामुळे जातीय भाजपाचा पराभव केल्याचा लाक्षणिक आनंद काही लोकांना होईल . पण दुर्दैवाने हा आनंद फार काळ टिकणार नाही . याची प्रतिक्रिया हिंदू समाजात कोणती लाट आणु शकते ? याचा शांतपणे विचार करायला हवा. अशी असहिष्णुतेच्या पेल्यातली वादळे नेमकी कोणाला बळ देतात ? यामुळे अंतत: कोणत्या शक्ती यशस्वी होतात ? आजपर्यंत काय घडले आहे ?

जे स्वत:ला आधुनिक / नास्तिक / पुरोगामी समजतात त्यांनितरि हा विचार करायला हवा .

असहिष्णुता या विषयावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय विस्तृत लिखाण केलेले आहे . आपण प्रस्तुत लेखात डॉ आबेडकरांचे विचार पाहायचे आहेत . हा लेख वाचताना एक निट लक्षात ठेवले पाहिजे कि घटनाकार बाबासाहेब अजिबात हिंदुत्व वादि नाहीत . किंबहुना हिंदु लोकांचे धर्म , सामाजिक व्यवस्था, इतिहास पुराणे आणि धर्मग्रंथ याना ते अमानुष  आणि जाळण्या योग्य मानतात . . 

बाबासाहेब हिंदुच्या धर्माचे विरोधक आणि शत्रू आहेत. त्यामुळे होते असे कि , बाबासाहेबांच्या या इस्लाम धर्मा विषयीच्या मतांना वा असहिष्णू तेच्या चर्चेला तटस्थ चिकित्सेचा गंभिर आयाम प्राप्त होतो .

[(८ - ३२०)  हा संदर्भ डॉ आंबेडकर समग्र वाङ्ग्मयाच्या,  ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र  शासनाने  प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत  रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे.  मा शरद पवारांच्या मुख्यंमत्री कार्यकाळात हे ग्रंथ प्रकाशित झाले . बरेचसे  मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English)  मध्ये कंसात दिले आहेत.  ]



इशारा : हिंदु अधिक आक्रमक होत जातील  

 बाबासाहेबांनी ७५  वर्षा पुर्वी दिलेला इशारा आज महत्वाचा  ठरताना दिसतो आहे . बाबासाहेब लिहितात :-

"मुसलमान राजकारणात (असहिष्णुता ) गुंडगर्दि आणत आहेत .या  दंगली त्याचे पुरावे आहेत.  मुसलमान  मुद्दाम   (हिटलरि ) नाझिंचे  अनुकरण करत आहेत.  जोपर्यंत एकटे मुस्लिम आक्रमक होते तोवर हिंदु मार खात होते.  भूतकाळ गेला आणि  आज हे सत्य राहिले नाही . हिंदु लोक प्रतिकार शिकाले आहेत (learned to retaliate ) आणि  मुस्लिमाना भोसकण्यात त्याना लाज  वाटत नाही . गुंडगर्दिचा विरोध सवाई गुंडगिरीने करणे हा हिंदुचा नवा चष्मा  बिभत्स आहे. ( ugly spectacle ) (८-२६९)



" मुस्लिम अतिरेक (असहिष्णुता ) हा  (native endowment) अंगभुत आहे, हिंदुपेक्षा जुना आहे  आणि त्यांच्या संस्कृतीचे अंग आहे..  हिंदुचा अतिरेक हा  आजकाल नव्याने प्रतिक्रिया म्हणुन तयार होतो आहेआज या बाबतीत मुसलमान पुढे असले तरी हे असेच जर चालू राहिले तर….   कदाचित भविष्यात हिंदु त्याना मागे टाकतील . " (८-२४९) 
हे दोन समाज अशाच प्रमाणे धर्मावरून भांडत राहिले तर , भारताचे काय होईल याचे चित्र  बाबासाहेब आपल्यासमोर १९४० साली उभे करतात .आज  फाळणी होऊन गेली आहे. काही वर्षाच्या शांततेत भारताने पाकिस्तान आणि बांग्लादेश च्या तुलनेत दैदिप्यमान प्रगती केलेली दिसते . मात्र हिंदु मुस्लिम संघर्ष राजकीय आणि धार्मिक स्वरूपात सुरूच आहे . त्यामागच्या राजकारणाची आंबेडकरांनी  केलेली चिकित्सा अवश्य पाहिली पाहिजे .




 धार्मिक राजकारणाचा आंबेडकरी अन्वयार्थ      

हिंदु मुस्लिम राजकारणाच्या फियास्कोसाठी आंबेडकर हिंदु महासभा  आणि कॉंन्ग्रेस या दोघांना जवाबदार ठरवतात . बाबासाहेब लिहितात "भाबड्या मनाच्या हिंदु सभेच्या देशभक्तांना वाटते कि हिंदुनि हिंसक पावित्रे घेतले कि मुसलमान सरळ होतील…. खरे तर   हिंदु महासभा संवादाच्या प्रगतीच्या मार्गातला अडथळा आहे कारण त्याना एकता नकोच आहे. उदाहरणार्थ : ( ३५ % मुस्लिम असलेल्या अखंड हिंदुस्थानाच्या वास्तवात   )  " हिंदुस्थान हिंदुचा ! "  अशी घोषणा हिंदु  सभेच्या अध्यक्षांचि आहे . वास्तव स्थिती  पाहता हि घोषणा अतिशय अहंकारी आणि अक्षरश :  अर्थहिन आहे .  " (८-२७०) 


कोंग्रेसच्या मुस्लिम अपिसमेंट मुळे   हिटलरचे चोचले पुरवणार्या युरोप  प्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . : डॉ आंबेडकर  

कॉंग्रेसचेहि  मुस्लिम / इस्लाम बाबतीतले  धोरण पूर्णपणे चुकलेले आहे  असा आंबेडकरांचा आरोप आहे. कोंग्रेसच्या धार्मिक राजकारणाला आंबेडकरांनी  मुस्लिमांचा अनुनय / लांगुलचालन (Appeasement ) असे विशेषण वापरले आहे.  अशी  विशेषणे  पाकिस्तान वरील पुस्तकात कोन्ग्रेस साठी शेकडो वेळा वापरली  आहेत  . एकट्या पान २७० वर  लांगुलचालन (Appeasement ) हा शब्द सहा वेळा आलेला आहे. आंबेडकर लिहितात : -
" कॉंंग्रेसला  अपिसमेंट  आणि सेटलमेंट  यातला फरक सुद्धा कळत नाही. अपिसमेंट - अनुनय म्हणजे लांगुलचालन! आक्रमकाचे हृदय जिंकण्या साठी त्यांनी केलेल्या खून, बलात्कार आणि निष्पापांच्या लूटमारी कडे दुर्लक्ष करणे   हि कोङ्ग्रेसि अपिसमेंट ची नीती आहे . त्याला कोणत्याही मर्यादा नाहीत .. सेटलमेंट म्हणजे  दोन्ही बाजू समाधानी होतील अशी मर्यादित तडजोड होय . मुस्लिमाना धार्मिक आधारावर सवलती दिल्यास त्यांची आक्रमकता वाढीस लागलेली दिसते या सवलतिंचा अर्थ हिंदुचा भ्याडपणा (defeatism) असे  मुस्लिम मनास वाटते.  कोंग्रेसच्या अपिसमेंट मुळे   हिटलरचे चोचले पुरवणार्या दोस्त राश्ट्रांप्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . "   (८ - २७०) 

सवाई गुंडगिरिचि आक्रमकता  किवा लांगुलचालन यापैकी कोणत्याही मार्गाने हिंदु मुस्लिम प्रश्न सुटणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे. 



इस्लाम मध्ये  स्वत:च्या लोकांना तरी सामजिक  सहिष्णुता आहे का ?

पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथात बाबासाहेबांनी या विषयावर एक पुर्ण प्रकरण लिहिले आहे.  त्या प्रकरणाचे नाव आहे सोशल स्टेग्नेशन . या प्रकराणाच्या पहिल्या पानावरचे त्यांचे  वाक्य असे आहे .
"केवळ हिंदुत सामजिक वैगुण्ये आहेत आणि मुस्लिमात नाहीत हा भ्रम आहे . असा कोणता सामजिक दुर्गुण आहे जो हिंदुत आहे आणि मुस्लिमात नाही ? " ( ८ -२२५) 
बालविवाह इत्यादी सामाजिक दुर्गुण हिंदु आणि मुस्लिम अशा दोघातहि  आहेत हे त्यांनी सांख्यिकी आधाराने  दाखवले आहे. इस्लाम धर्मातील विषमता , गुलामी आणि जातिव्यवस्था याबद्दल बाबासाहेब लिहितात :
" इस्लाम बंधुत्वाचि भाषा करतो. सर्वाना वाटते कि जणु  इस्लाम  मध्ये गुलामी नाही …. आज गुलामी जगभरातून गेली असली तरी जेंव्हा गुलामी होती तेंव्हा तिच्या समर्थनाचा प्रारंभ   इस्लाम धर्म आणि इस्लामिक   देशातून झाला होता . " (  … support was derived from Islam and Islamic Countries) ( ८- २२८)
इस्लाम धर्मात गुलामी आणि विषमतेची मुळे आहेत यावर चर्चा  करताना आंबेडकर  म्हणतात , " गुलामांना माणुसकीने वागवा असे प्रेषित कुराणात म्हणतो पण त्याना मुक्त करा असे म्हणत नाही . इस्लाम धर्मानुसार गुलामाना मुक्त करण्याचे बंधन मुस्लीमावर नाहि. गुलामाला चांगले वागवत (!) गुलाम ठेवणे हा  उल्लेख आंबेडकरांनी जाणीवपूर्वक केला आहे. धर्मातली विषमता हि वेगवेगळी रूपे घेत टिकून राहते -  इस्लाम धर्मात गुलामी असल्याने ती विषमतेच्या  रूपाने  टिकून राहिली आहे  , हे दाखवून देत बाबासाहेबांनी मुस्लिमातील जातींचे भलेमोठे कोष्टक पानभर  दिले आहे . (८-२२९)

मुस्लिम समाजात त्रैवर्णिक व्यवस्था असून अश्रफ , अजलफ आणि अर्जल अशी त्या वर्गांची नावे आहेत . मुस्लीमातल्या  अर्जल वर्गाला बाबासाहेबांनी डीग्रेडेड क्लास - पददलित म्हणुन संबोधले आहे . सेन्सस सुप्रिटेंडंट चे दाखले देत बाबासाहेब म्हणतात " मुस्लिमात जातीबाहेर लग्नाला प्रतिबंध  आहे  , व्यवसायावर  जाती निर्धारण  आहे.  " (८-२२९,३०) त्यापुढे जाउन आंबेडकर लिहितात :

" नक्कीच ,  हिंदुप्रमाणे मुस्लिमातहि  सर्व वाइट चाली  आहेत आणि काही हिंदुहुन अधिक वाइटहि  आहेत . अधिकच्या  वाइट चालीपैकी एक म्हणजे बुरखा "
 : डॉ आंबेडकर (८-२३०)



नक्कीच ,  हिंदुप्रमाणे मुस्लिमातहि  सर्व वाइट चाली  आहेत आणि काही हिंदुहुन अधिक वाइटहि  आहेत . अधिकच्या  वाइट चालीपैकी एक म्हणजे बुरखा : डॉ आंबेडकर (८-२३०)

.
मुस्लिम स्त्री हा एक दयनीय  प्राणि आहे . इस्लामी धार्मिक जुलमाचे ते प्रतिक आहे अशी बाबासाहेबांची मांडणी दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी जेंव्हा धर्म घेतो तेंव्हा - त्याची चिकित्सा करताना - डॉ.  आंबेडकरांच्या  लेखणीला वेगळीच धार येत असे . धर्म चिकित्सा करताना बाबासाहेब निर्भिडपणे - सर्व धर्मांची चिकित्सा करत असत . हा गुण दुर्दैवाने आज लोप पावला आहे . आज भारतात इस्लाम चिकित्सा केली जात नाही हे सत्य आहे.  तटस्थ , द्वेष रहित  पण धारधार  चिकित्सेची प्रेरणा बाबासाहेबांपासुन घेतली पाहिजे . डॉ  आंबेडकर बुरख्याबद्दल लिहितात  : -

" रस्त्या वर चालणार्या  बुरखाधारी स्त्रिया हे भारतातील एक भीषण आणि गलिच्छ दृश्य आहे . (most hideous site ) बुरख्याचे आरोग्यावर गंभिर दुष्परिणाम होतात  . मुस्लिम स्त्रियात अनिमिया , टीबी आणि पायोरीया सारखे रोग जास्त प्रमाणात आहेत. अनेकांची  शरीरे क्षतिग्रस्त , हात पाय व्याधीग्रस्त , हाडे बाहेर आलेली आणि कणे वाकलेले आहेत . पेल्व्हिक आजार आणि हृदयरोग यांचे प्रमाणही अधिक आहे. बुरखा - मुस्लिम स्त्रीचे  शारीरिक आणि मानसिक पोषण होऊ देत नाही "  ( ८ - २३० , २३१) 






 पडदा पद्धतीच्या उगमाची आणि परिणामाची चर्चा करताना बाबासाहेब लिहितात - " बुरख्याची कारणे लैंगिक साशंकतेत आहेत. त्याचे मुस्लिम स्त्रिया आणि पुरुषांवर गंभिर परिणाम झाले आहेत. मुस्लिम पुरुषांचा घराबाहेरील स्त्रियांशी स्वच्छ मोकळा संपर्क बाधित झाला आहे. अशाप्रकारची बंधने पुरुषांच्याहि नितीमात्तेवर  घातक परिणाम करतात. स्त्री - पुरुषांचा संपर्क तोडणारी अशी समाजव्यवस्था वाइट प्रवृत्तीस जन्म देते हे सांगायला कोण्या मानसशास्त्रज्ञाची गरज नाही . अशा धार्मिक बंधनांमुळे लैंगिक अतिवासना आणि इतर अनैसर्गिक रोगट सवयिंचा प्रादुर्भाव या समाजात होतो . बुरख्यामुळे  हिंदु मुस्लिम संवादात हि  बाधा येते कारण  - अतिशयोक्त वाटले तरी-  हिंदुचे म्हणणे  खरेच आहे कि - एका बाजूचे स्त्रीपुरुष आणि दुसर्या बाजूचे फक्त पुरुष यांचा निर्भिड संवाद होणार तरी कसा ? " (८- २३०, २३१)

जातीय  स्तर आणि स्त्री / पुरुष अशा दोन्ही प्रकारची विषमता मुस्लिमात आहे आणि त्याचे समर्थन / प्रारंभ   इस्लामी धर्मशास्त्रात आहे असा बाबासाहेबांचा निष्कर्ष  दिसून  येतो.  


बौद्ध धर्माचा  विनाश का झाला ?

सर्व धर्मांची चिकित्सा करून झाल्यावर बाबासाहेबांना बुद्धाचा मार्ग योग्य वाटला होता. बुद्ध धम्मा च्या ऐतिहासिक उदय आणि अस्ताची  त्यांनी तपशीलवार मिमांसा केली आहे. अनेक ठिकाणी त्याची वेगवेगळी कारणे दिली आहेत .  माझे सर्वात शेवटचे मत प्रमाण मानावे असे त्यांनी अनेकदा आपल्या अनुयायांना निक्षुन सांगितले आहे . त्यामुळे या विषयावर त्यांनी सर्वात शेवटी दिलेले भाषण पाहूया.  साहेबांच्या महानिर्वाणापुर्वि सहा महिने २३ जून १९५६रोजी अखिल भारतीय बौद्धजन समितीच्या दिल्लीतल्या सभेत ते म्हणाले : -
" मुसलमानांनि या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून , बौद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्याना बूत  शिकन म्हणजे मूर्ती फोडणारे असे म्हटले जाते. बूत  हा मुर्तिसाठीचा शब्द म्हणजे बुद्ध या शब्दाचे (अपभ्रंश ) रूप आहे. मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहित आहे.….मुसलमानांनि बौद्ध व हिंदु धर्मावर आक्रमण केले होते . दोघांची मंदिरे उध्वस्त केली होती … .  बर्याच बौद्ध भिक्कुची कत्तल झाली आणि काहींनी देशाटन केले. त्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण कोणाचे अनुसरण करावे ? हेच कळेनासे झाले . बौद्ध अनुयायी अंध:कारात चाचपडत राहिले  " ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )
अगदी असेच मत १० जून १९५० च्या जनता पत्रातील लेखातही व्यक्त केले आहे . ( खंड १८ -३ पान : २१५)



 दुर्दैवाने घटनाकारांचे  लवकरच महानिर्वाण झाले. या विषयावर ग्रंथ लिहणे  जमले नाही .  पण आयुष्याच्या  शेवटी आंबेडकर अशा निर्णयाप्रत आलेले दिसतात कि, - मुस्लिमांकडुन विद्वान भिक्कुंचि कत्तल झाली वा  त्यांना देशत्याग करावा लागला .   मार्गदर्शन न मिळालेले बौद्धजन आता कोठे  जातील ? तिकडे बोलघेवडे ब्राम्हण पुरोहित   जन्मजात आयते तयार  होत होतेच !  त्यासाठी भिक्कू प्रमाणे कठिण प्रशिक्षण - संस्काराची गरज नव्हती .  इस्लामी  आक्रमणामुळे  वैचारिक   नेतृत्व हरवलेला बौद्ध समाज पुढे ब्राम्हणी धर्माच्या तोंडप्रचारी तडाख्यात अडकला असा निष्कर्श   बाबासाहेबांनी काढला आहे. आणि इस्लामी आक्रमण हे बुद्ध धर्माच्या नाशाचे  एक महत्व पुर्ण कारण मानले आहे. ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )
    

मुस्लिम इतिहासाचे आंबेडकरी आकलन :  


मुसलमान भारतात का आले ? त्यांच्या येण्या मागची कारणे - राज्य स्थापनेचे  हेतू आणि भविष्यातील धार्मिक योजना याचे मुद्देसूद विवेचन घटनाकारांनि केलेले आहे. बाबासाहेब लिहितात : -


भारतातील मुस्लिम प्रवेश  हे  केवळ जमीन आणि लुटमार यासाठी नाहीत . आर्थिक - राजकीय कारणाप्रमाणे भारतात इस्लामचा प्रसार करणे हे धार्मिक कारणही आक्रमणा मागे महत्वाचे  आहे. ( ८-५५).  बाबासाहेबांनी मुस्लिम आक्रमणाचा धार्मिक हेतू सिद्ध करण्यासाठी अनेक मुस्लिम इतिहासकारांचि अवतरणे उधृत केलेली आहेत.  उदा : तैमुर बादशाहाची बाबासाहेबांनी उधृत केलेली वाक्ये आहेत :

माझ्या हिंदुस्थान वरील आक्रमणाचा हेतू काफ़िरांविरुद्धचि मोहीम चालवून त्यांना अल्लाच्या धर्मात आणणे हा आहे. प्रेषित मुहम्मदाच्या आज्ञेनुसार काफिरी श्रद्धांचे भंजन करून  ,  सर्वदेवता समभावाचे उच्चाटन करून ,  देवळे आणि मुर्त्या यांच्यापासून हिंदुस्थान मुक्त केला तर मला गाझी आणिमुजाहिद म्हटले जाइल ." (८-५६)


भारतात मध्ययुगात हिंदु मुस्लिम एकता वगैरे अजिबात अस्तित्वात नव्हती.  अगदी १८५७ चे बंड हा मुस्लिमांनी केलेला ब्रिटिश विरोधी जिहाद होता.  सहाशे वर्ष मुसलमान या देशाचे मालक म्हणुन वावरत होते . ब्रिटिश राज्यात त्यांना हिंदुच्या समान नागरी दर्जा मिळाला हे  मुस्लिमांच्या दृष्टीने अपमानास्पद होते. म्हणुन त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला . १८५७ साली भारताला दार उल इस्लाम करण्यासाठी  मुस्लिमांनी केलेला तो जिहाद होता. असे आंबेडकरांचे  मत होते  (८-४९, २९५)  


मुस्लिम हल्ल्यांमागच्या धार्मिक हेतूचे विवेचन करताना बाबासाहेब लिहितात  
  • "इस्लामी धर्माने जगाची वाटणी दोनच भागात केली आहे ….  दार उल हरब म्हणजे शत्रूभूमिचे रुपांतर  -   दार उल इस्लाम मध्ये करण्यासाठी … जिहाद करणे हे मुस्लिमाचे धार्मिक कर्तव्य आहे. " येथे बाबासाहेबांनी अनेक जिहादी युद्धांचे संदर्भ दिले आहेत.    (८-२९५, २९६) 
मुस्लिम आक्रमण - राज्य स्थापना - कर पद्धती यामागचे हेतू हि धार्मिक होते असे बाबासाहेबांचे मत आहे . हे मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकर कटाक्षाने मुस्लिम इतिहासकार किंवा बादशहा यांचेच संवाद आपल्या पुस्तकात पुन्हा उधृत करताना दिसतात .


 झिजीया कर लादण्यामागचा हेतू स्पष्ट करण्यासाठी त्यांनी  अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्या काझी चा संवाद  संपुर्ण पणे  उधृत केला आहे . हा संवाद पुरेसा बोलका आहे .

 " अल्लाह सांगतो कि हिंदुना हीन गुलामीत (धीम्मी ) ठेवणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे . कारण ते आपल्या प्रेषीतांचे कडवे शत्रू आहेत. आणि प्रेषीतांनिच आपल्याला आज्ञा केली आहे कि , हिंदुना इस्लामी बनवा नाहीतर ठार मारा , बंधक बनवा , त्यांची मालमत्ता लुटा . …. आपण सज्जन  हनिफी  मुस्लिम असल्यामुळे त्यांना झिजीया घेऊन सोडतो तरी.…  हनिफी सोडुन इतर पंथात झीजियाचा पर्याय नाही. हिंदुपुढे  दोनच पर्याय आहेत - "  इस्लाम  किंवा मृत्यू " (८-६३) 

या उधृता नंतर निष्कर्ष काढताना आंबेडकर म्हणतात : मुहम्मद गझनी पासून अहमदशहा अब्दाली पर्यंतचि  ७६२ वर्षांची कालकथा हि अशी आहे.  (८-६३) 



पाकिस्तान का बनले ?

डॉ. आंबेडकर फाळणीचे पुरस्कर्ते होते. हिंदु आणि मुस्लिम यांचे सहजीवन अवघड आहे . भारत अखंड राहिला तर धार्मिक संघर्ष इतके जास्त होतील कि हिंदुंचा  सामजिक सुधार अशक्य होऊन बसेल त्यामुळे फाळणी करावी असे त्यांचे मत होते . पाकिस्तान बाबतीतले इस्लामी धर्म शास्त्र उलगडून सांगताना ते म्हणतात : 
"मुस्लिमांच्या दृष्टीने हिंदु काफिर आहेत .काफ़िरांचि लायकी मान सन्मानाची नाही . इस्लाम नुसार काफिर जन्मानेच नीच  (low born )  आणि दर्जाहीन (without status) असतात. काफिर शासित देशाला दार उल हरब असे म्हणतात. हे सर्व पाहता मुसलमान लोक हिंदु सरकारचे  आदेश पाळणार नाहीत हे सिद्ध करायला आणखी पुराव्यांची गरज नाही . "( ८ - ३०१) 
पाकिस्तानवरील पुस्तकाचे एक प्रकरण राष्ट्रीय फ़्रस्ट्रेशन  नावाचे आहे . त्यातील ३२८ -३३० या पानांवर बाबासाहेबांनी हिंदु मुस्लिम प्रश्नाची चिकित्सा केलेली आहे . बाबासाहेब लिहितात "  ब्रिटिशांच्या फोडा आणि झोडा या नीतीमुळे हिंदु मुस्लिम संबंध बिघडले हे खरे नाही . ब्रिटिशांच्या पूर्वीपासून  भांडणे होतीच.  (८-३२८)  हिंदु आणि मुस्लिमातील राजकीय भांडण हा ऐतिहासिक, धार्मिक , सांस्कृतिक आणि सामजिक घटक परस्पर विरोधी ( Antipathy) असल्याचा परिणाम आहे. (8-229) . अकबर आणि कबीर  या सुधारकांच्या कार्याचा इष्ट परिणाम झालेला नाही . "  (८-३३०) याचे अधिक विश्लेषण करताना आंबेडकर लिहितात : -
" इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी  नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा ( Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत . जे मुस्लिम बंधुसंघाबाहेर आहेत त्यांकरता घृणा आणि शत्रुत्व याशिवाय काहीही नाही .....  भारताला आपली मातृभूमी आणि हिंदुना बांधव मानण्याची परवानगी - इस्लाम धर्म सच्च्या मुस्लिमाला  देत नाही . "  (८-३३०)



अशा धार्मिक कारणांमुळे हिंदु मुस्लिम ऐक्य अशक्य आहे म्हणुन बाबासाहेबांनी फाळणीला पाठींबा दिला होता.

फ़ाळणिपुर्वि १ ९ ४ ० साली आंबेडकर म्हणाले होते - " जर फाळणी झाली नाही तर भारत हे एक, परिणामशुन्य राज्य बनेल- जणु जिवंत प्रेत, न पुरलेला मृतदेह " (८-३४०) 

फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५  साली -  बाबासाहेब म्हणाले होते. --  " पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " (१-१४६)

त्यावेळच्या  अखंड भारतातले मुस्लिम लोकसंख्येचे  ३५% हे प्रमाण लक्षात घेतले तर आंबेडकरांच्या लेखनाची खोली लक्षात येते आणि तत्कालीन कोन्ग्रेस किंवा हिंदुसभेला हि  गोष्ट कशी कळली नाही ? याचेही आश्चर्य वाटते .  

त्यापुढे जाउन बाबासाहेब असेही म्हणतात  कि - " जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे " (१-१४६)


समस्येवरील दोन उपाय  

 वकिली कायदे आणि सेटलमेंट  करून हिंदु मुस्लिम प्रश्न हाताळावा लागतो - अपिसमेंट अथवा गुंडगिरी  करून नाही -  याची प्रचीती अजून भारतीय राजकारणाला झालेली नाही. फाळणी घडून  भूतकाळात जमा झाली . आजच्या भारतातील हिंदु आणि मुस्लिमाना  सहजीवन अपरिहार्य आहे .  जुन्या मानसिकता जुने प्रश्न आजही तसेच्या तसे जिवंत आहेत . मुस्लिमांचा धार्मिक उन्माद , आक्रमकता, हिंदूची सवाई गुंडगिरी वा सवाई लांगुलचालन आजही तसेच आहे .



१) सेक्युलारीझम :  यावर बाबासाहेबांनी सुचवलेला उपाय सेक्युलारीझम हा आहे . सेक्युलारीझम हा सर्व धर्म समभावाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे . त्यात  धर्माचे स्थान फक्त पारलौकिक श्राद्धेपुरते मर्यादित असते. इहलोकात कसे वागावे ? किती विवाह करावेत ? बुरखा   घालावा का ? याचे कोणतेच धार्मिक स्वातंत्र्य मिळत नाही . सर्व गोष्टी कायदा आणि  शासनाच्या अखत्यारीत येतात . बाबासाहेबांची घटना आणि त्यातील कलमे सेक्युलर आहेत . त्यात कोणत्याहि धर्मास फाजील स्वातंत्र्य नाही . मात्र दुर्दैव असे कि   याच घटनेत अनुसृत्य असणारा समान नागरी कायदा अजूनही होत नाही . कोंग्रेसच्या नाही - भाजपाच्या राज्यातही नाही .. शासन सेक्युलर रहात नाही . तलाक पिडीत मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी समान नागरी कायदा केला जात नाही .  

 २) धर्म सुधारणा :  मुस्लिम समाजात समाज सुधारणा आणि धर्म सुधारणा करण्याची प्रोसेसच अस्तित्वात नाही. धर्म चिकित्सा  हा विषय त्याज्य मानला गेला आहे . जी काही लाहान सहान सुधारक मंडळे आहेत ती कुराणाच्या परीभाषेबाहेर जात नाहीत . बुद्धीवादाचे समर्थन करण्यासाठी हदीस मधली पैगंबर वचने शोधली जातात. त्यामुळे  मुस्लिमांचे प्रचंड नुकसान होणार आहे. विज्ञान निष्ठा  आणि बुद्धिवाद याचा मुस्लिम समाजात प्रसार करणे  बाबासाहेब आवश्यक मानतात. त्यासाठी त्यांनी रेनन ला उधृत केले आहे : 
  • " इस्लाम विज्ञानाला सततच  शत्रू समजत आला आहे. हे त्या धर्माचे एकनिष्ठ एकमेव सातत्य आहे . पण हे सातत्य धोकादायक आहे. इस्लामच्या दुर्दैवाने इस्लामला यश मिळत आले. विज्ञानाचा  - बुद्धीवादाचा वध  करून खरे तर इस्लामने स्वत:चाच वध  केला आहे. जगाचे शाप घेतले आहेत आणि हीनत्व पत्करले आहे " ( ८ - २३५)      
मुस्लिमांनी विज्ञान निष्ठेचा, बुद्धिवादाचा , आणि धर्म चिकित्सेचा स्वीकार केल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही इतरांचेही भले होणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे .




समारोप 


 हिंदुच्या भल्यासाठी त्यांची   धर्म चिकित्सा  आणि प्रबोधन अत्यावश्यक आहे . पण मुस्लिमाना यापासून वंचित ठेवण्याचे काही कारण नाही . इस्लामची चिकित्सा केली तर हिंदुत्व वाद्यांना फायदा होतो या भ्रमातून आता बाहेर पडायला हवे . आणि इस्लाम हा मुक्तिदाता , समतेचा , शांततेचा धर्म आहे या कम्युनिस्टांनि पसरवलेल्या अंधश्रद्धेतुन हि  मुक्त झाले पाहिजे .  कम्युनिस्टांचे प्लेन आणि डोकी अभ्यासू असली तरी पुरोगामी वा  संविधानिक  निश्चित नाहीत. आपण  आपले मेंदु कम्युनिस्टांकडे गहाण टाकण्याची  गरज नाही .या विषयावर बाबासाहेबांचे विचार अभ्यासले पाहिजेत .

बाबासाहेबांनी इस्लामची कठोर चिकित्सा केली. त्या धर्मात  समता नाही  - सहिष्णुता नाही -  आधुनिकता नाही -  असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे. मुस्लिम बांधवांना धार्मिक दलदलीतून बाहेर काढणे हे आंबेडकरांचा अनुयायी म्हणुन मला माझे कर्तव्य वाटते . विज्ञान आणि विवेक याच्या प्रचारा शिवाय हे अशक्य आहे . इस्लाम धर्म चिकित्सा अटळ आहे. आपल्याला  चिकित्सक बुद्ध्यांक वाढवावा लागणार आहे. बाबासाहेबांच्या   Thoughts on Pakistan च्या मुळ आवृत्तीतल्या पहिल्या पानावरचे कोटेशन होते :


"“More brain, O Lord, more brain! or we shall mar 
Utterly this fair garden we might win.”
―George Meredith


 मेंदू दे देवा, मेंदु दे - बुद्धी दे देवा, बुद्धी दे
अन्यथा 
मरेल  विजयाची - सुनिश्चित आशा  !








--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
[(८ - ३२०)  हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र  शासनाने  प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत  रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे.  बरेचसे  मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English)  मध्ये कंसात दिले आहेत.  ]

संदर्भ ग्रंथांचे तपशील :

(1) - Volume 1. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(८ )- Volume 8.   Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 8. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989)
(१८-३) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे : खंड १८ भाग ३ (मराठी ). उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन (२००२)

२६ नोव्हें, २०१५

२६ नोव्हंबर संविधान दिन



२६ नोव्हेंबर संविधान दिन

या संविधान दिनी एक प्रतिज्ञा करू कि आपला  धर्म आणि भारतीय संविधान यात अंतर आले , तर आपण संविधनाचे पालन करू . भारत देश आज एक आहे - जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे - त्याची बीजे संविधानात आहेत …।  संविधनाचा मुलभुत ढाचा आणि राज्यघटनेतिल मार्गदर्श तत्वे याचे अनुसरण  राजकाराण  आणि समाजकारणात व्हावे  म्हणून प्रयत्नशील राहू .

--------------------
भारतीय संविधनाचि मूळ प्रत : अतिशय दुर्मिळ अशी  हि केवळ १००० प्रतींची आवृत्ती आहे : यात भारतातील विविध धर्म , परंपरा , राजे यांची चित्रे आहेत .  हि संविधानाचि पहिली प्रत होय . हीच प्रत डॉ. आंबेडकरांच्या चित्रात / पुतळ्यात दिसते :  त्याची पीडीएफ कोपि इंटर्नेट वर उपलब्ध आहे   http://dl.wdl.org/2672/service/2672.pdf

२५ नोव्हें, २०१५

आमिरचे इस्लामी अंतरंग


आमिर  खान चे ग्रेट पूर्वज मौलाना जमालुद्दीन यांनी सहिष्णू अकबर बादशहा  विरुद्ध  जेहाद पुकारला होता हे कोणाला माहित आहे ? जेहाद म्हणजे काय ? अथवा देश सोडुन जाणे - हिजरत याचा इस्लामी पारिभाषिक अर्थ किती लोकांना समजतो ? इस्लाम बद्दल संपुर्ण अज्ञान बाळगणारी जमात म्हणजे हिंदु . आणि इस्लामला  दुध पाजून गोंजारणारा घटक म्हणजे पुरोगामी हिंदु . ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंग या धर्माने शीख असल्याने त्यांच्याजवळ हिंदु पुरोगाम्या एव्हढी सद्गुण विकृती नाही . म्हणून त्यांनी खांन साहेबाच्या असहिष्णू परदेश वापसी वर सणसणीत गुगली टाकली.   ती गुगली टोलवण्याच्या नादात आमिरचा  त्रिफळा  अल्ला, कुराण  आणि हिजरत च्या रूपाने प्रकटला . तवलिन सिंग यांनी स्पष्टच विचारले कि इस्लामी दहशत वादाबद्दल  भारतीय असहिष्णुते इतकी काळजी वाटते का ?  त्यावर चर्चा घडली . या प्रश्नोत्तराचा अर्थ  हिंदू लोकांना कळणार नाही कारण त्याना इस्लामचा अर्थ आणि संदर्भ बिल्कुलच  समजत नाही . हिंदुत्व वाद्यात अभ्यासाची परंपरा नाही . आणि पुरोगामी अभ्यासकात इस्लामचे खोटे कौतुक करण्याची परंपरा आहे . आमिरची  भूमिका  समजून सांगायला हा लेख लिहित आहोत.  अमीर फार मोठ्या इस्लामी खानदानाचा चिराग आहे . त्याच्या घराण्याचा इतिहासही समजून घ्यावा लागणार आहे .

आमिर खानचे  केवळ त्या घराण्यात असणे   महत्वाचे नाही . तर त्यांचे विचारही  पूर्वजांशि जुळतात   ते महत्वाचे आहे . 

एकाच मुलाखतीत भारताला असहिष्णू  … इस्लामला  सहिष्णू आणि … भारत सोडण्याला वर्धिष्णू असे आमिर खान का म्हणाला ? याचा उलगडा लेख वाचल्यावर होऊ शकेल . आणि हे केवळ मुस्लिम व्होट बेंक पोलिटिक्स नव्हे - जिता जागता इस्लाम आहे .  याचीही प्रचीती येईल .




त्रिफळा : आमिरची असहिष्णुता , आझादांचा करार  आणि जमालुद्दीन चा जेहाद 


असे भारत सोडुन जायचे आवाहन आमिरच्या खानदानात अनेकांनी केलेले आहे . त्याला इस्लामी परिभाषेत हिजरत असे म्हणतात .  आमिरचे मामे आजोबा म्हणजे अबुल कलाम आझाद आणि या मामुजान चे  ग्रेट पूर्वज म्हणजे मौलवि जमालुद्दीन होय . (१)  या तिघांचे रक्ताचे थेट नाते तर आहेच शिवाय इस्लामी मेंदुच्या ताराही जुळलेल्या आहेत . आमिरची असहीष्णूता समजून घ्यायची असेल तर प्रथम मामुजान मौलाना  आझादांची हिजरत समजून घ्यावी लागेल  आणि त्या आधी  त्याचे ग्रेट पूर्वज मौलवी जमालुद्दीन यांचा जिहाद समजून घ्यावा लागेल.  तर आमिरचे ग्रेट पूर्वज मौलाना जमालुद्दीन यांनी सहिष्णू अकबरा विरुद्ध  जेहाद पुकारला होता .  (२)

या दोन पूर्वज मौलानांशी  आमिर खानचे विचार कसे जुळतात ते  पाहुया.  


जमालुद्दीन चा अकबरा विरुद्ध  जेहाद   


बादशहा अकबर हा मध्ययुगातला विचारी राजा आहे. आणी नव्या अनुभवानी.... नव्या विचारानी माणसे बदलतात.... याचे उदाहरण आहे. सुरवातीला पारंपारिक जुलमी असलेला अकबर पुढे भारतातील वेगवेगळ्या पंडितांशि चर्चा करू लागला . धार्मिक विषयांवर चर्चा करण्याचा छंद अकबराला लागला आणि त्यासाठी इबादतखाना नावाचे नवे ऑफिस अकबराने उघडले . 

शिया, सुनी, पारशी, शीख, जैन, बौद्ध, वैष्णव, शैव असे वेगवेळ्या पंथांचे पंडित बोलावून - इबादतखान्यात अकबर त्यांच्याशी चर्चा करू लागला. येथे चार्वाकाचे अनुयायी येवून गेल्याचे नोंद आहे. या चर्चात परस्पर मतांचे मंडन , खंडन होत असे. कफिरांना कुराणचे खंडन करायचा अधिकार देणे मौलवींना पटण्याजोगे न्हवते. हळूहळू सर्वच धर्म खरे आहेत अशा भुमिकेवर अकबर येवून पोचला. शेवटच्या चार्वाकाचा ऐतिहासिक उल्लेख अकबर बादशहाच्या काळात आढळतो . हा शहाणा अकबराची भेट घेऊन त्याला आपली नास्तिकता पटवून देत होता . उत्तर आयुष्यात १५८२ साली अकबराने इस्लाम धर्म सोडून दिला आणि दिने इलाही नावाचा नवाच धर्म काढला .त्याच्या या नव धर्माला - धर्म ग्रंथच नव्हता . मौलवी / पंडित हि भानगड पण नव्हती . या नव धर्म स्थापनेवर कदाचित चार्वाक मताचा अंशत: प्रभाव असावा.  

अकबराने  हिंदुवर लावलेला झिजीया कर  रद्द करून टाकला पुढे मुस्लिम धर्मगुरूंचा ब्लास्फेमीचा अधिकार  काढून घेतला. इस्लामचे प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांवर कुणी टीका केली तर मुसलमान ते सहन करू शकत नाहीत. अशी टीका करणार्यांचा छळ करण्याचा अधिकार मुस्लिम धर्मगुरूंकडे असतो. आजही सर्व मुस्लीम देशात हा कायदा आहे. १५७९ साली अकबराने हा कायदा रद्द केला. (२)





अकबराने ब्लास्फेमीचा कायदा रद्द केल्यामुळे मौलवी चिडले. त्यांनी अकबराविरुद्ध बंड केले. कलक्त्त्याला मोठे बंड झाले. अकबराचा पाडाव झाल्याशिवाय भारतात इस्लामला भविष्य नाही असे मौलवींना वाटत होते. त्यांनी अकबराला काफर म्हणून जाहीर केले आणी अकबराविरुद्ध जिहाद पुकारला. अकबराने उलेमा आणी मौलवींचे बंड क्रूरपणे चिरडले. अनेक शेख आणी फकीर हद्दपार केले. अनेकांना कंदाहरच्या बाजारात विकले. त्यांच्या दर्गे आणी मशीदिंच्या जमिनी जप्त केल्या. राजकीय गोंधळ घातल्यास वक्फ च्या जमिनी जप्त करणारा आणी इस्लामी धर्मवेड्यांना गुलाम करून कंदाहरच्या बाजारात विकणारा, अकबर हा पहिला आणी शेवटचा भारतीय. 

 अकबर त्याच्या धर्म चिकित्सक बुद्धीमुळे आणि धर्म सहिष्णू राज्य कारभारामुळे तो सर्व धर्मीय प्रजेत लाडका होता . दिने इलाही या नव्या धर्माचा संस्थापाक  म्हणून  तो निर्वातला .  शिवाजी महाराजांनीही अकबराची स्तुती केल्याचे उल्लेख इतिहासात येतात. 

ज्यांनी अकबराविरुद्ध जिहाद केला   - अशा प्रसिद्ध मुल्ला मौलवित जमालुद्दीन हे नाव फार महत्वाचे आहे. ते मेहदवि चळवळीचे पाठीराखे होते . सय्यद नुरुद्दीन या आपल्या पूर्वजाचा वारसा ते चालवत होते . सय्यद नुरुद्दीन यांनी इस्लामी राजेरजवाड्यांनी इस्लामची मुल तत्वे सोडून भरकटू नये म्हणून हि चळवळ चालवली होती .  सय्यद नुरुद्दीन आणि जमालुद्दीन या प्रसिद्ध मौलवींच्या वंशात मौलाना आझादांचा जन्म झालेला आहे . (२) मौलाना आझाद हे अमीर खानचे मामे आजोबा होत . 


आझादांचा करार  


भारताच्या राजकारणात मुल्ला मौलाविना आणण्याचा अग्रमान मौलाना आझादांकडे जातो. १९१२ साली मौलाना आझाद यांनी 'अल हिलाल' नावाचे उर्दू साप्ताहिक  काढले आणि राजकारणात धर्म (इस्लाम ) आणला पाहिजे याचा ते जोरदार प्रचार करू लागले . (२). त्यांच्याच प्रेरणेने जमियत उलेमा हिंद नावाची उलेमांचि संघटना स्थापन झाली  आणि मौलविंनि धर्माचे आवाहन करून मुस्लिमांना उत्तेजित करायला सुरवात केली . ब्रिटिशांचे शासन आल्यामुळे भारत हा दार उल हरब (शत्रू भूमी ) बनलेला आहे . सबब ब्रिटिशांना हाकलून देऊन कुराण आणि शरियत वर आधारित राज्यव्यवस्था आली पाहिजे अशी मागणी मौलवी करू लागले. ब्रिटिशांना  विरोध करण्यासाठी या मौलविंनि कोन्ग्रेस शी हातमिळवणी केली म्हणून त्याना राष्ट्रवादी मुसलमान म्हटले जाते .  मौलाना आझादांच्या 'अल हिलाल' मध्ये अशी शिकवण दिली जात होती कि , 

"एका हातात धर्म आणि दुसर्या हातात राजकारण पाहिजे, पण कुराण मात्र दोन्हीकडे पाहिजे . (इमानवंत  हो = अल्लाहशी एकनिष्ठ ) तुम्ही अजिबातच हिंदुना घाबरू नका . फक्त अल्लाहची भीती बाळगा. तुम्ही अल्लाहने दिलेला गणवेश टाकून दिलेला आहे . तो अंगावर घाला म्हणजे सारे जग तुम्हाला घाबरू लागेल .  तुम्ही अल्लाहने पाठवलेले पृथ्वीचे शासन कर्ते आहात.   '(३)



मध्ये  आझादांनी कुराणाचा सहिष्णू अर्थ लावण्याचा प्रयत्न केला होता पण तो फसला .  या अक्षम्य गुन्ह्याबद्दल मौलविंनि त्याना तीन वेळा दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा दिली . हा  काल्पनिक फतवा  कधी आमलात आणला गेला नाही . पण मुस्लिम समाजाचे राजकीय नेते होण्यासाठी काय करावे ? वा करू नये ? याची पुन: शिकवण आझादांना मिळाली. 

काफ़िरांशि संबंध ठेवण्याचे ३ इस्लामी मार्ग :

जिहाद , करार आणि हिजरत हे इस्लामनुसार काफ़िरांशि राजकीय व्यवहार करण्याचे तीन महत्वाचे मार्ग आहेत. जिहाद (प्रयत्न  / पराकाष्ठा ) प्रथम स्वत:च्या मनातल्या गैर इस्लामि वृत्तीविरुद्ध करायचा आहे . नंतर वाणी आणि लेखणीने काफ़िरांना इस्लाम मध्ये बोलवायची दावत देण्यासाठी जिहाद करायचा आहे . इतके समजावूनही काफिर मुस्लिम झाले नाहीत तर मात्र (जिहाद बा सैफ ) तलवारीचा जिहाद करावा अशी कुराणाची आज्ञा आहे . अर्थात जिहाद करण्या एव्हढी शक्ती प्राप्त होई पर्यंत काफ़िरांशि करार (मोइदा ) करून राहता येते. तेही न जमल्यास दार उल हरब (शत्रू भूमी)  ला सोडुन  . दार उल इस्लाम मध्ये स्थलांतर करावे लागते . अशाप्रकारे देश सोडुन जाण्याला हिजरत असे म्हणतात .

मौलाना आझादांच्या मते काफिर हिंदुशि करार (मोइदा ) करून भारतात रहावे. इंग्रजांविरुद्ध जिहाद करण्यासाठी मौलाना आझादांनी  हा निर्णय घेतलेला आहे . हिंदुशि केलेला हा करार हा कुराण आणि शरियत या इस्लामी कायद्यानुसारच आहे अशी आझादांचि धारणा आहे .  असगर आली इंजिनिअर  लिहितात : (४ )

" हिंदु मुसलमान यांनी एका राज्यात रहावे यासाठी , आझाद प्रेषित मुहम्मद यांनी ज्युंबरोबर केलेल्या मदिना कराराचा आधार घेत असत ."  ते प्रेषीतांचे उदाहरण असल्याने शरियतचा भाग होत होता . या मदिना करारात शरियतचे राज्य असणार होते . राज्याचे प्रमुख प्रेषितच होते. कायदे करणारे , त्यांचा अंमल करणारे व न्याय देणारे तेच होते . हे प्रेषीतांचे अधिकार मौलाना आझादांना इमामासाठी पाहिजे होते . इमामाच्या  राज्याखाली हिंदुनि रहावे असे त्यांना वाटत होते . (४,५)
जमालुद्दीनचा जिहाद आणि आझादांचा करार समजून घेतला कि आमिरची असहिष्णुता समजण्यास मदत होईल . इस्लामची जुजबी ओळख झाल्यावर आता , तवलीन सिंग आमिर खान आणि मुलाखतकार यांच्यात काय चर्चा झाली ते पाहू :



आमिरचा इस्लाम वाद  : दहशतवादाला धर्म नसतो पण असहिष्णुतेला देश असतो !


भारतात असहिष्णुता वाढली आहे काय ? याचे उत्तर आमिर खान ने होकारार्थी दिले . बायकोचे नाव घेऊन भारत देश सोडुन जाण्याविषयी बोलला . तिचेअसहिष्णू  मत आमिरानेच सार्वजनिक केले आणि ते मान्य असल्याचेही सांगितले .  पण हि चर्चा इथे थांबत नाही . आमिरला दहशत वादाविषयी प्रश्न विचारल्यावर मात्र त्याने दहशतवादाला कोणताच धर्म नसतो असे उत्तर दिले . इस्लामी दहशतवाद असे म्हणू नये  असे आमिरने ठासून सांगितले . मग उगीच इतरही धर्माची  नावे घेतली ! दहशतवादाला धर्म नसतो पण असहिष्णुतेला देश असतो असे हे लॉजिक ! पिके चित्रपटात हिंदुच्या देवाधर्माची चिकित्सा आणि चेष्टा  करणारा पुरोगामी आमिर खान इस्लाम बद्दल भलताच आस्तिक निघाला !

आमिर खान चा जन्म इस्लाम मधील अतिशय महत्वाच्या मौलविंच्या घरातला आहे . त्या सांस्कृतिक वारशातून आणि बहुश्रुत , वाचनातून त्याला इस्लाम बद्दलच्या सर्व चर्चा ठाउक आहेत. आमिरचा ब्लोग पाहिला तर त्याच्या या संबंधिच्या ज्ञानावर सहज प्रकाश पडेल. 





तवलीन सिंग यांनी हि चर्चा पुढे वाढवली , त्यांनी म्हटले 
"इस्लामला वाचवण्यात काहीहि  अर्थ नाही. प्यारिस मधील हल्लेखोरांच्या हातात कुराण होते . ते अल्लाहू अकबर ओरडत होते. भारत जितका सहिष्णू वा असहिष्णू आधी होता तितकाच आताही आहे . आमिर जर तू  (हिंदुंच्या ) असहिष्णुते बद्दल इतका संवेदनशील आहेस तर या दहशत वादी हल्ल्यांबद्दल तुझी संवेदना काय आहे ? … वहाबी इस्लामच्या वाढत्या प्रसाराबद्दल तुझे काय मत ? "

यावर उत्तर देताना खान साहेबांनी वहाबी इस्लाम बद्दल चकार शब्द काढला नाही. उलट इस्लाम किती गोंडस आणि शांततेचा धर्म आहे हे ते पटवत बसले . अशाप्रकारे  मोडरेट लोक्स  धर्माचे रक्षण करतात. आणि धर्मातून  नवे   दहशतवादी तयार होत रहातात.

हिंदुच्या असहिष्णुतेने चिंताक्रांत झालेला आमिर खान इस्लामी दहशतवादाबद्दल कशी  धर्म रक्षक भूमिका घेत होता ते वाखाणण्या जोगे होते.

तवलीन सिंग यांनी असेही सुचवून पाहिले कि गालिब चा भारतीय इस्लाम आणि वहाबी आक्रमक इस्लाम यात फरक केला पाहिजे . आमिरने हा सल्ला धुडकावुन लावला  . सारा इस्लाम निष्पाप आहे आणि इस्लाम हिंसेला परवानगी देत नाही अशीच रट शेवटपर्यंत लावली. आमिर मौलाना आझाद आणि मौलाना जमालुद्दीन यांची पेन इस्लामिक भूमिका मांडत राहिला .

कुराणात काही सुरा मक्का शहरात  अवतीर्ण झाल्या आहेत आणि काही सुरा मदिना शहरातल्या आहेत . शक्ती कमी असताना इस्लाम धर्माचे गोड बोलून रक्षण आणि शक्ती वाढली कि परधर्म निर्दालन अशी कुराणाची स्पष्ट शिकवण या वरून समजते . जामाते इस्लामीचे संस्थापक मौलाना मौदुदि आणि नास्तिक अभ्यासक नरहर कुरुंदकर यांनी या विषयावर बरेच भाष्य केलेले आहे . (७)

एकतर आमिरची भूमिका कुराणाला धरून पडत्या काळातील गोड बोलून  धर्म रक्षणाचि असेल……  किंवा तो इस्लामची चिकित्सा करायला भीत असेल .

जर तो इस्लाम बद्दल बोलायला भीत असेल आणि हिंदुच्या असहीष्णूतेबद्दल एल्गार करत असेल तर - सहिष्णू कोण ? हे आमिरनेच समजून घेतलेले बरे.

 काही कलाकार याआधी भारत सोडतो वगैरे बोलले होते पण त्यांनी कोणतीही धार्मिक वा राजकीय टिप्पणी केली नव्हती .  आमिरने ती केली .

आमिर खान च्या इंटरर्व्ह्यु मधील ४ मिनिटे (व्हिडियो )



इतक्या अतिरेकी हल्ल्यांनंतरही इस्लामला हिंसक ठरवणे
चुकीचे आहे....
बर  मग..
दोन - चार घटनांवरून माझ्या देशाला तुम्ही असहिष्णू का ठरवताय ?"

याचे उत्तर  आमिर खान ला आज ना उद्या  द्यावे लागेल


अमिर खानची हिजरत 


ज्या देशात इस्लामचे भवितव्य कठिण दिसते त्या देशातून निघून जावे - हिजरत करावी  अशी इस्लामी धर्माज्ञा आहे. त्यानुसार आमिर खान ने भारत सोडुन जाण्याची भाषा केली आहे .

जमालुद्दिनचा जिहाद हरला ,  आझादांचा करार फसला आता देश सोडुन अन्यत्र जाणे (हिजरत) हि इस्लामी धर्माज्ञा आहे.  हिंदुत्व वादि पक्ष एकाहाती सत्तेत  आल्याने आमिरच्या पुर्वजांचे इस्लामिक भारताचे स्वप्न फसले आता हिजरत हा एक पर्याय तो सुचवू पाहतो आहे . खरे पाहता आमिरची भीती अनाठाई आहे . हिंदुत्व वाद्यांची  मर्यादा आत्गौरव आणि सनातनी पणा इतकीच आहे . वस्तुत: इस्लामचे पालन पोषण करण्यास (पुरो/प्रती) सर्वच हिंदु कटिबद्ध आहेत .

तरी  आमिरची हिजरत मागील  भूमिका समजून घेण्यासाठी त्यांचे  बडे  मामूजान मौलाना आझाद हिजरत विषयी काय म्हणतात ते पाहुया . ( साल १९२० खिलाफ़तच्या दरम्यान )

" शरियतच्या सर्व तरतुदी , सद्य:कालीन घटनाक्रम , मुस्लिमांचे हित आणि राजकीय साधकबाधकता या सर्वांचा विचार करून माझे समाधान झाले आहे कि , …. भारतीय मुसलमानांना भारतातून हिजरत (देशांतर ) केल्याशिवाय अन्य कोणताच पर्याय उरलेला नाही . … जे लगेच हिजरत करू शकत नाहीत त्यांनी हिजरत करणार्यांना (मुहाजीरीन ) मदत केली पाहिजे. " (६)

आमिर खान स्वत: अत्ता हिजरत करू शकत नाही हे उघड आहे ,  त्याचे आर्थिक हितसंबंध भारतात आहेत . कदाचित तो इतर इमान वंतांना तसे सुचवत असावा . खरे पाहता त्याची गरज नाही . सनातनी हिंदुत्व वादी आणि इस्लाम रक्षक हिंदु पुरोगाम्यांच्या भारत देशासारखी सुपीक जमीन इस्लामला कोठेच मिळणार नाही .

जमालुद्दिनचा जेहाद , आझादांचा करार आणि आमिर खान  ची हिजरत अशी एका माळेचे मणि ! बडे मामू  मौलाना आझाद खिलाफातीसाठी लढत इमान्वंत मुस्लिमाना हिजरत करण्याचे आवाहन करीत . त्यानुसार १९२० सालच्या आसपास १८००० इमानवंत हिजरत करून अफगाणिस्तान ला गेले होते . परंतु लगेच अफ़गाणिस्तानच्या आमिराने आपल्या सरहद्दी त्यांच्यासाठी बंद केल्या - मग हि हिजरत मोहीम थांबली. (५)

आज कोणि हिजरत करतो म्हणाला तरी हेच परिणाम दिसतील !

हज यात्रेला जाउन मुसलमान सैतानाला  दगड मारण्याचा एक विधी करत असतात . अर्थात हा विधी प्रतिकात्मक आहे . खर्या सैतानाला वाळूचे कण मारून काही उपयोग नाही --  धोंडे मारले पाहिजेत हे इमान वंतांना चांगलेच कळते . अशाच प्रकारे हि आमिरची प्रतीकात्मक हिजरत आहे . खरी खरी नाही !

तरीही इस्लामी जगतात हिजरत कि मोहिदा यावर  चर्चा सुरु झाली आहे . आजच ओवेसीने हिजरत करणार नाही म्हणून सांगितले . हि चर्चा सुरु करण्याचे श्रेय आमिर खान कडे जाते .


पवित्र हज यात्रेत सैतानाला दगड मारताना श्री आमिर खान 



मुसलमान जर ‘खरे’ मुसलमान बनले तर संघर्षच उरणार नाही.अशी आमिर खान ची भूमिका दिसते.   हे ‘खरे’ अमुक बनावे काय? हा प्रश्न एकदा ‘ओशों’ना विचारला गेला. ते म्हणाले “अरे भाई अगर कच्चा हिंदू और कच्चा मुसलमान इतना खतरनाक है, तो जरा सोचो! सच्चा हिंदू और सच्चा मुसलमान कितना खतरनाक होगा!!”
-------------------------------------------------------------------

ताजा कलम : संगीतकार ए आर रहमान यांनीही असहिष्णुते बद्दल भूमिका घेतली आहे .
ए आर रेहमान  यांच्या  या भूमिकेचे स्वागत . 

रहमान यांनी आमिर प्रमाणे इस्लाम धर्म रक्षण केलेले नाही तर …. रजा अकेडमि च्या धर्मांध फ़तव्यावर भाष्य केलेले आहे . संगित गैरीस्लामिक आहे . प्रेशितावरील एका चित्रपटाला रहमान ने संगित दिल्यामुळे रजा एकेडमी ने ए आर रहमान विरुद्ध फतवा काढला होता .

"आता ए आर रहमान धर्म भ्रष्ट झाला….  मुस्लिम होण्यासाठी त्याने पुन्हा कलमा पढला पाहिजे . काफिर झाल्याने लग्न रद्द ! आता शरीयत नुसार रहमान ने पुन्हा लग्नाचे विधी केले पाहिजेत असे रजा अकेडमि चे म्हणणे आहे .(८, ९ )
भिवंडितिल पोलिस हवालदार हुतात्मा जगताप आणि गांगुर्डे च्या खुनात दोषी आणि आझाद मैदानावर दंगल घडवणारी हीच ती रजा एकेडमी . ए आर रहमान ने रजा अकेडमि चा निषेध केला .

या इस्लामी फतव्या बरर्हकुम 'दिल्ली 'आणि 'युपीच्या' * कथित सेक्युलर  * मुख्यमंत्र्यांनि  रहमानचा कार्यक्रम  टाळणयाचा प्रयत्न केला  त्यांचाही उल्लेख  रहमान ने केला आहे . . यानंतर या तापल्या तव्यावर पोळी भाजत - इस्लाम मध्ये संगितसेवा जमत नसेल तर हिंदू व्हा ! असे घर वापसीचे बाष्कळ आवाहन करणार्या विश्व हिंदु परिषदेवरही ए आर रहमान टिका केली आहे .

वरील  सर्व गोष्टीना रहमान असहिष्णुता असे म्हणतो . 

धार्मिक बाबतीत टिका टिप्पणी करताना - त्या विषयाची जाण असावी आणि खरी सेक्युलर भूमिका घ्यावी हि बुद्धी ए आर रेहमान कडे आहे .पुरोगाम्याला तेव्हढि अक्कल नाही हा मुद्दा आहे . (८, ९ )

डॉ अभिराम दीक्षित 

------------------------
संदर्भ :

१) आमिरचे मावस आजोबा म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद आणि आझादांचे जिहादी पूर्वज म्हणजे मौलवी जमालुद्दीन: अमीर खान त्याच्या मामे आजोबांवर म्हणजे मौलाना आझादांवर चित्रपट बनवणार आहे , अशा बातम्या आधी येउन गेल्या आहेत .
  

२) आकलन : नरहर कुरुंदकर : मौलाना आझाद एक पुण्यस्मरण / अकबर 

३) लेखसंग्रह:  अप्रिय पण भाग २ . शेषराव मोरे  , २००८

४ ) पृष्ठ ११० , इस्लामिक स्टेट : असगर आली इंजिनिअर , विकास पब्लिकेशन,  १९९४ 

५) पृष्ठ १५६ आणि पृष्ठ १८४ , अखंड भारत का नाकारला , प्रा मोरे , राजहंस प्रकाशन , २०१२ 

६)   Page 219 , Gandhi : Pan Islamism , Imperialism and Nationalism in India , OUP , 1989

७)  जागर : नरहर कुरुंदकर , दवत उल कुरआन : मौलाना मौदुदि 

८) http://indianexpress.com/article/entertainment/entertainment-others/fatwa-against-a-r-rahman-majid-majidi-for-film-on-prophet/

९) http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/a-r-rahman-identifies-with-aamir-khan-says-he-too-faced-similar-situation/articleshow/49917936.cms


सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *