२१ जून, २०१५

वागळे कि दुनिया

त्याच काय झाल - कि कोणि तरी जोशी नावाच्या इसमाने वागळेना रात्री उशिरा मेसेज पाठवला म्हणे . गेट वेल  सून  असा तो मेसेज होता - त्यावर उत्तर म्हणून वागळेनि त्याला असा धुतला - जातीवर शिव्या दिल्या -भटजी म्हणाला - पार्श्वाभागात्ला दम , पादणे वगैरे भाषा वापरली -  ती सारी क्लिप अवश्य ऐका - 

हि क्लिप पुरेशी मनोरंजक आहे -





रात्री अपरात्री मेसेज येणे ! यात गैर काय आहे ? ! मेसेज मध्ये खाली नाव लिहिणे कम्पल्सरी असते ? सामाजिक जीवनात पडल्यावर -लोकाना धुवून काढल्यावर - प्रतिक्रिया नको म्हणणारे वागळे - - आणि वागळे भक्त - हीही हाहा - लय हुसश्श्हार ! लोकशाही मार्गाने येणार्या प्रतिक्रिया - वेळ पाहून याव्या असे वाटत असेल तर - पत्रकारिता सोडुन कुठेतरी कारकुनी करावी -

ज्या अर्थी वागळे ना फोन नंबर वरून - विचार - सभासदत्व - जन्म आणि कर्म कळते तो निखिल वागळे हा - सनातनच्या पप्पू आठवल्याचा बाविसावा अवतार आहे असे आम्ही आज जाहीर करत आहोत !
निखिल वागळे हा पत्रकार म्हणून मला काल आवडायचा . आजही आवडतो . त्याच्या इतकी चांगली मराठी भाषा - भूमिका - तर्क - वाद - विवाद - मांडणी मराठी न्यूज पत्रकारात अभावानेच आढळते . पण वागळे चे सदर जोशी प्रकरण त्याने स्वत:च लिक केले असावे किंवा घडवून आणले असावे - किंवा मुद्दाम अतिशयोक्त कोमेंट देऊन प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न केला असावा ….

आपणा सगळ्यांनाच दररोज जाहिरातीचे ५ - ५० निनावी मेसेज येत असतात - त्यात इतक चिडण्यासार्ख काय आहे ? - वागळे पहिल्यांदाच ढोंगी वाटले - गेट वेल सून इतक्या साध्या मेसेज वरून थेट सांप्रदायिक उल्लेख करावा - आरोप करावेत हे काही नैसर्गिक वाटत नाही.


सनसनाटी निर्माण करून चर्चेत राहणे यात मला नैतिक दृष्ट्या काही चूक वाटत नाही . पत्रकार आणि राजकारणी यांचा हा व्यवसाय आहे . त्यामुळे ठाकरे , मोदि , गांधी या सार्यांचे सन्सनाटि तंत्र वागळेनी वापरले . इतकेच !
घिसिपिटि फुरोगामी नाटके आता फारशी सन्सनाटि निर्माण करू शकत नाहीत . हे वागळे ना अजून समजलेले नाही . त्याबद्दल फक्त बुद्धीची दया करता येईल …
पण … जर हे नाटक नसून - सहज उद्गार असतील तर वागळे ना फक्त अपरिपक्व म्हणुन सोडून देता येणार नाही . त्याना समाजकंटक म्हणावे लागेल . आणि ....जर वागळे समाज कंटक नसेल ..... तर.........यापुढे चुकीच्या वेळेस फोन किंवा गेटवेळसून असे भाबडे मेसेज तर सोडाच ....साधा गुड मोर्निग असा मेसेज जरी मला पाठवला... तर ... याद राखा - तुमच्या जाती धर्माचा उद्धार मी करणार आहे …… पुरोगामित्वाची हि अट असेल तर …हि …… जातीवरून शिव्या द्यायची परिक्षा सुद्धा द्यावीच लागेल !

जातीवर चिडण्यााला तुम्ही पत्रकारिता आणि पुरोगामित्व मानत असाल तर धन्य आहे ! निखिल चुकलाच आणि यावेळी त्याची बाजू घेणे त्याहून चूक .

बाकी दलिताना आणि शोशिताना उच्च्वर्णियावर चिडण्याचा पुर्ण हक्क आहे - वागळेचि बडबड वायफळ आयडेंटिटि क्रायसेस आहे - कंपुबाज लोक्स…

वागळे कायस्थ वा सारस्वत आहेत - त्यांची जात डाउट्फ़ुल आहे- सारस्वत ब्राम्हण त्रीकर्मी वेदोक्ताचे षट्कर्म त्याना नाही -- कायस्थ लोक्स वेदो क्ताचे अधिकारी आहेत पण ब्राम्हण नाहीत - टोकाच्या एक्सट्रिम भूमिका घेतल्याशिवाय त्याना राजकारणातल्या जातीय गटात जाता येत नाही .

ठाकरेंच्या तीन पिढ्या याची साक्ष आहेत . एक टोकाची भूमिका घेतली कि कायस्थाना यश मिळु शकते - ते दोन्हीकडे जाऊ शकतात - वागळेना अशाच जातीय मार्गावर जाण्याचा मोह झाला आहे - कायस्थ हे ब्राम्हण आहेत असे काहीना वाटते. वस्तुत: कायस्थ हे उच्चवर्णीय क्षत्रिय असतात. टिळक शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाच्या भूमीवर आजही महार्श्ट्रातले आदिम भूतकालीन बाबा आदम राजकारण चालते - महाराष्ट्रातल्या जातीय गटात सामील होण्यासाठी कोणत्या तरी एका बाजूने टोकाची भूमिका घेणे - आणि त्याचे समर्थन करणे हि शुद्ध फालतुगिरी आहे.

संदर्भ नसताना जातीचा उल्लेख करणे - आणि परत त्यात शाहू फुले आंबेडकरांना ओढणे योग्य आहे ? पत्रकाराला सामाजिक भान नसावे ? या मुळे एक दिवस असा येईल कि खरोखरच्या बामणी काव्यावर किंवा जातीवादाव्रर टिका केली तरीही ते लोकांना खोटे ढोंग वाटेल --- नव्हे तो दिवस आलेलाच आहे . असो .



सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *