२ मे, २०१४

समस्त लग्नाळु तरुण बंडू आणि बबलिसाठि कानमंत्र

समस्त लग्नाळु तरुण बंडू आणि बबलिसाठि कानमंत्र 



लग्ने न जमणे आणि जमली तर फार उशिरा जमणे हा एक कॉमन प्रोब्लेम झाला आहे. परवा चेन्नैला आमची एक वय वर्षे तीस वर्षाची जुनी मैत्रिण भेटली . अजून लग्न झालेले नाही . मी यकदम विचारले का ग ? मुद्दा असा कि ती गेल्या जवळ जवळ ८ ते १० वर्षापासून मुलगे पाहत आहे . पण लग्न जमत नाही . शिक्षणाने डोक्टर , आर्थिक द्रुश्ट्या उत्तम स्वयं पुर्ण , दिसायला बरी तरीही नाही जमत लग्न … मी विचारल का ग ?

तर म्हणे… कोणि पोट्टा क्लिक झाला नाही ना ! यश राज चोप्रा , शारुख खान आणि कोई ना कोई … कही ना कही। हर किसीके लिये बना है । ला साष्टांग दंडवत…. पण हे क्लिक होणे म्हणजे काय ? हृदयाने हृदयाला आणि हार्मोनने हार्मोनाला - जीवशास्त्रीय संप्रेराकाने घातलेली साद म्हणजे क्लिक ! हि जीवशास्त्राची हाक आहे पुनरुत्पादनासाठी …

जगातली दोनच खरी नाती … दोनच खर्या जाती म्हणजे …. स्त्री आणि पुरुष ! मग मी तिला विज्ञान आणि संख्याशास्त्र पुन्हा समजावून सांगू लागलो …










परतीच्या विमान प्रवासात एक जुना खास बुद्धिमान मित्र बरोबर होता त्याच्याशी मन मोकळेपणे गप्पा हाणायला गेल्या कित्येक महिन्यात मोकळा वेळच नव्हता मिळाला …. तो हि अविवाहित वय वर्ष ३२ …. सध्या उत्तम… आर्थिक द्रुश्ट्या सुस्थापित… दिसायलाही बरा … पण लग्न नाही केलेले … त्याच्या बौद्धिक अभिरुचीशी सुसंगत अशी बायको न मिळणे हि त्याची तक्रार होती … लग्न करण्या आधी विचार जुळले पाहिजेत हा हेका … मी विचारले विचार जुळणे म्हणजे काय ? मग मी त्याला विज्ञान आणि संख्याशास्त्र पुन्हा समजावून सांगू लागलो ……

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आमचे एक दूरचे चुलत मावस बंधू सध्या फ़्रस्ट्रेट झाले आहेत . वय वर्षे ३६ . आत्ताच फोनवर त्याच्याशी बोललो . म्हटला ना माझा एरेंज मेरेज जमला ना लव्ह मेरेज …. आता काय पुढे ? मग मी त्याला विज्ञान आणि संख्याशास्त्र पुन्हा समजावून सांगू लागलो ……
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुद्दा फकस्त लोजिकचा आणि स्टेटीक्स - संख्याशास्त्राचा आहे . लव्ह आणि एरेंज आणि बौद्धिक मेरेज एकाच वेळेला करायचे आहे . सगळ्याच लग्नाळू बंटी आणि बबलिचा हा मुद्दा त्याना अविवाहित ठेवतो आहे .










बर आता थोडसे संख्याशास्त्राविषयी बोलूयात . समजा तुम्हाला प्रेम विवाह करायचा आहे . तर पहिली अट अशी प्रेम उत्पन्न झाले पाहिजे . प्रेमात हार्मोन आहे तेस्तोस्तेरोन , इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्तेरोन नावाच्या स्त्री - पुरुष हार्मोनाची नाळ, वेळ आणि उद्दिपनाचा काळ जुळाला कि प्रेम होते. या दोन्ही बाजूच्या हार्मोनच्या एकत्रित उद्दिपानाची शक्यता किती ? बर ते जीवशास्त्र गेल तेल लावत ! मला एक सांगा प्रेम बसणे हि एक सिलेक्षन ची क्रिया आहे . इथे कोई ना कोई … कही ना कही। हर किसीके लिये बना है । मग त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीवर प्रेम बसू शकत नाही . कमीत कमी … दहातली एक व्यक्ती प्रेमासाठी योग्य वाटते ।

म्हणजे स्टेटीक्स - संख्याशास्त्रा नुसार प्रेमात पडायची शक्यता दहात एक ! पण प्रेम फक्त तुला वाटुन उपयोग नाही ... तिलाही वाटले पाहिजे !!

बरे हे प्रेम दोन्ही बाजूने झाले पाहिजे … स्त्री पुरुष अशा दोन्ही बाजूनी विचार केला तर या दोन्ही शक्यतांचा गुणाकार करावा लागतो. प्रत्येक पुरुषाला दहातल्या एका स्त्री विषयी प्रेम वाढणार आणि प्रत्येक स्त्री ला दहात्ला एकच पुरुष स्वप्नातला राजकुमार वाटणार .

प्रेम हि दोन्ही बाजूनी घडणारी क्रिया असल्याने १० गुणिले १० = १०० … १०० शक्यतातून एकदाच दोन व्यक्तींचे प्रेम जुळू शकते . म्हण्जे १०० मध्ये एक हा भिन्नलिंगी प्रेमाचा संख्याशास्त्रीय गुणक आहे .





  







बरे एरेंज मेरेजाचे काय ? एरेंज मेरेज च्या अटी कोणत्या ?

१) त्यात जात जुळली पाहिजे .
२) सांपत्तिक स्थिती जुळली पाहिजे
३) शिक्षण जुळले पाहिजे
४) परत जोतीशी पत्रिका जुळली पाहिजे
५) उमेदवार आपल्याच गावातला असावा

आपण ह्या सगळ्या शक्यता दहात एक लग्नाळू लोकांच्या जुळतील असे गृहीत धरू . त्याही पाचही शक्यातात बसणारे उमेदवार किती ? भारतात जर १०० उम्मेदवार लग्नाळू असतील तर त्यात तुमच्या जातीत दहात एक यापुढे मजल जात नाही . सांपत्तिक स्थिती जुळणारे किती ? त्यात पुन्हा दहात एक हेच कमीत कमी गुणोत्तर घेऊ … उरलेल्या अटीत सुद्धा दहात एक यापुढे जात नाहीत . ५ गुणिले १० = ५०… पन्नास्सातला एक उमेदवार लग्नासाठी योग्य ठरेल . म्हणजे एरेंज मेरेजचा संख्याशास्त्रीय गुणक ५० मध्ये एक असा आहे .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बरे विचार जुळण्याचे काय ?

कोणत्याहि दोन व्यक्तींचे विचार तंतोतंत जुळू शकत नाहीत , पण आपण सोयीसाठी दहात एक व्यक्तीचे विचार जुळतात असे गृहीत धरू मग … विचार जुळून लग्न करण्याचा योग दाहात एक असा होईल .

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आता मुद्दा असा आहे कि आई वडिलांनी (एरेंज मेरेज) निवडलेला उमेदवार क्लिक झाला ( प्रेम विवाह) कि मग त्याच्याशी विचार जुळले पाहिजेत . लव्ह आणि एरेंज आणि बौद्धिक मेरेज एकाच वेळेला करायचे आहे .

संख्याशास्त्रानुसार १०० गुणिले ५० गुणिले १० = ५०००० उमेदवारातून एक उमेदवार तुम्हाला निवडायचा आहे . याचा साधा सरळ अर्थ असा कि या -एरेंज मेरेज । प्रेम विवाह । विचार विवाह असे तिन्ही एकाच वेळेला करायचे असेल तर पन्नास हजार उमेदवारांची छाननी करणे आवश्यक आहे …
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आता त्यातला एकच करायचा कि त्यापैकी एकच अट घालायची ?एरेंज मेरेज? प्रेम विवाह? विचार विवाह ?? हे तुम्हीच ठरवायचे आहे . समस्त तरुण बंडू आणि बबलिसाठि कानमंत्र असा कि प्रेम करा आणि मजा करा …




४ टिप्पण्या:

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *