८ डिसें, २०१३

धर्म आणि धम्म या संपुर्ण वेगळ्या गोष्टी आहेत

इस्पश्ट बोलू का ? बोलतोच आता … बुद्ध हा एक चांगला धर्म वाटतो मला … 

इस्लाम , ख्रिस्चन , वैदिक किवा इतर कुठल्याही धर्मापेक्ष बुद्ध बरा . हिंदु धर्म नावाची काही चीज अस्तित्वात नाही . हिदु हा लोकसमुह आहे आणि त्याचे अनेक धर्म आहेत. आणि पारंपारिक बुद्ध हा वैदिकांचेच एक्स्टेनशन आहे असे सोनावणि सरांचे म्हणणे आहे . बाकी बाबासाहेबांचे नवयान - भिमयान जवळ जवळ निधर्मी आधुनिक माणसाचे बायबल वाटले . त्यात धर्म गिरी काही नाही . (भाईगिरी च्या चालीवरची ! )

पण जर धर्मगिरी संपवायचीच असेल तर … धर्मांतर हा शब्द का ? धर्म आणि धम्म या संपुर्ण वेगळ्या गोष्टी आहेत असे बाबासाहेब स्पष्ट म्हणतात . एक तर धम्म स्वीकार म्हणावे - किंवा धर्म नकार म्हणावे . धर्मांतर हा शब्द चुक आहे .

धरमगिरी नाकारण्यासाठी जरा वेगळ एप्रोच पाहिजे .

धर्मगिरी (भाईगिरी ) म्हणजे राजकारणात धर्म आणणे . उपरे सर यांचा हेतू राजकारण आहे ? धर्मगिरी आहे ? समाजकारण आहे ? कि अध्यात्मिक ?

हनुमंत उपरे सर विपश्यनेच्या मार्गाने बौद्ध झालेले नाहीत. त्यांचे हेतू अध्यात्मिक नाहीत हे स्पष्ट आहे. त्यांच्या धर्मांतराच्या हेतुमागे राजकारण नाही …. असे सप्रमाण सिद्ध करावे लागेल . त्यासाठी त्यांच्या धम्म स्वीकाराचा हेतूही स्पष्ट करावा लागेल . तसे झाले तर Sanjay Sonawani सर त्यांना पाठिंबा देतील असे वाटते . आपला माझा अंदाज .

बाबासाहेबांनी मी भारत बुद्धमय करेन अशी सिंह गर्जना केली होती . त्या काळी भारताचे समाजकारण बदलून टाकण्यासाठी त्यांना ते अत्यावाश्यक वाटले होते. आता काळ भरपूर बदललेला आहे … अणि यापुढे त्याहून झपाट्याने बदलणार आहे . धर्म आणि धर्मांतराचे संदर्भ बदलत चालले आहेत . . आज भारतात फार मोठ्या प्रमाणावर बुद्ध धम्माचा प्रचार चालू आहे . विपश्यनेच्या मार्गातून हे काम चालू आहे . माझ्या अंदाजाप्रमाणे हे फार मोठे अभियान चालू आहे . आणि त्याची फळे काही वर्शातच दिसतील . फकस्त वैचारिक हाणामारीचा
रोमांन्स त्यात मिळणार नाही . तो बुद्धाचा मार्गही नव्हे . आणि विपश्यनेचे विरोधक कोण आहेत हेही माहित करून घेतले पाहिजेच .

आजचे धार्मिक सनातनी - विज्ञान विद्यार्थ्यांच्या खुनाला दात विचकून हसत हिडिस समर्थन करतात … तेंव्हा हि धर्म भाईगिरी नाकारणे हि एक स्वाभाविक प्रतिक्रिया बनते .

पण धरमगिरी नाकारण्यासाठी दुसरी धरमगिरी उभी करायची का बाबासाहेबांनी सांगितलेला धम्म आजमवायचा . त्याहून महत्वाचे म्हणजे आपल्या सेक्युलर संविधानाला आजचा धर्म ग्रंथ का मानु नये ?

भारत बुद्धमय करायचा हेच अंतिम ध्येय ठेवून आपण चालू . हे मुस्लिमांना आणि ख्रिस्चनांना आधी विश्वासात घेऊन का सांगितले जात नाही ? कि बहुजन हिंदु समाज बुद्ध झाला कि मुस्लिम ,ख्रिस्चन आणि नास्तिक धर्महिनांना सरप्राइज द्यायचे आहे ? कि भारतात इतर धर्म अस्तित्वातच नाहीत ? भारत हे काय हिंदुराश्ट्रा आहे ? आणि त्याचे बुद्ध राष्ट्र बनवायचे आहे ?

आपला देश सेक्युलर राहिला पाहिजे आणि ते धर्मराष्ट्र बनता कामा नये . मग तो धर्म कोणताही असो . धरमगिरी चालणार नाही . आपल्या देशाचे संविधान हीच आपली स्मृती आहे , कुराण आहे , बायबल आहे . आणि ते तसेच राहिले पाहिजे .

असो मला या वितंडवादात पडायची इच्छा नाही . धर्म म्हण्जे काय ? त्याची व्याख्या काय ? धर्माचे इंटर्प्रिटेशन कसे करावे ? यापेक्षा अनेक महत्वाची कामे अजून बाकी आहेत .

पण एक मात्र नक्की नास्तिक अभिरामला देव मान्य नाहित. धर्म हि नाही . (कम्युनिझम हा पण एक धर्मच आहे ). माझा देश हा माझ्यासाठी देव आहे . आणि भारताचे संविधान हा धर्म ग्रंथ .

परंपरेच्या जोखडातून मुक्ती मिळाली पाहिजे . आणि बौद्ध होऊन जर ती मिळणार असेल तर ते समर्थनीय ठरते . मात्र तो धम्मस्वीकार आहे का ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *