९ जाने, २०१३

पण लक्षात कोण घेतो ?

पण लक्षात कोण घेतो ?


(2013 साहित्य संमेलनातिल परशुराम वादाच्या निमित्ताने )








पण लक्षात कोण घेतो ?


(2013 साहित्य संमेलनातिल परशुराम वादाच्या निमित्ताने )

पृथ्वी एकदा निक्षत्रिय करता येईल ..... २१ वेळा कशी काय ? हा प्रश्न ह्या जाती वाद्यांना पडत नाही. पण लक्षात कोण घेतो ?. ब्रह्मणांच्यात जातीवाद पहिल्यापासून होताच . पण अखिल भारतीय ब्राह्मण संमेलनांचि उपस्थिती ब्रिगेड च्या उदयानंतर लक्षणीय वाढली ! आणी त्यानंतरच परशुराम सिक्स पेक बॉ डी बिल्डर झाला.........ब्राह्मण मराठा ह्या उच्च जातीचा संघर्ष चघळला जात आहे. जणु महाराष्ट्रात या दोनच जाती आहेत !! ह्या दोन जातींच्या पुस्तकी टोमणेबहादुरित सारा महाराष्ट्र वेठीला धरला आहे. 

ब्राह्मणांच्या घरात परशुरामाची कधीही पूजा होत न्हवती . ते उग्र दैवत आहे. ब्रिगेडच्या सामन्या साठी मैदानात उतरलेल्या चित्पावन महासंघाने प्रथम पुण्यात परशुरामाची भव्य पोस्टर लावली. सामन्यासाठी सिद्ध व्हावा म्हणुन त्याला जिम मध्ये धाडून सिक्स पेक पहिलवान बनविण्यात आले. देवतांचे स्वरूप कसे बदलत जाते ? ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

त्यामुळे परशुराम -- ब्रिगेड विरोधी ब्राह्मणांचे प्रतिक बनला . आता हे ध्यानात घेऊन संमेलनाच्या संयोजकांनी परशुराम टाळला असता तर बरे झाले असते. पण लक्षात कोण घेतो ? साहित्यिक समाजापासून तुटले आहेत याचे हे उत्तम उदाहरण आहे.
याची दुसरी बाजू अशी की दैवतांना स्थानिक महात्म्य असते. सर्वजातीय कोकणी लोक परशुरामाला मानतात. कोकणस्थ ब्राह्मण हि याच कारणाने त्याला मानतात. नाहीतर आंतरजातीय विवाहाची संतान असलेला परशुराम चित्पावन महासंघाचा हिरो कसा काय ठरला ? (परशुरामाची आइ क्षत्रीय होती... आणि बाप ब्राह्मण ).
देवतांच्या पुराणकथांना काही फारसा अर्थ नसतो. त्या ऐतिहासिक पुराव्याप्रमाणे घ्यायच्या नसतात. त्यात पुष्कळ परस्पर विरोध ठासून भरलेला असतो. पण लक्षात कोण घेतो ? चित्पावन महासंघाचा आंतरजातीय विवाहांना विरोध आहे तरी त्यांचा आयडॉल आंतरजातीय विवाहाची संतान असलेला परशुराम . कारण क्षत्रियांशि लढायला एक परशुधारी सिक्स पेक पहिलवान नको का ?
दुसरीकडे ब्रिगेडचा वर्णव्यवस्थेला ला विरोध आहे. ब्रिगेड म्हणते - " मराठे क्षत्रिय नसून ते शुद्र आहेत. त्यामुळे मराठ्याना आरक्षण दिलेच पाहिजे " आता ह्या बहुजन ब्रिगेडला त्या खर्या खोट्या क्षत्रियांशि देणेघेणे ठेवण्याचे काय कारण ? आणि क्षत्रिय संहारक परशुरामाला विरोध करण्याचे काय कारण ?
दाखवायचे दात बहुजन आणि खायचे दात क्षत्रिय असा हा ब्रिगेडी कावा आहे. बहुजन वादि ब्रिगेडी उच्चवर्णीय क्षत्रियांचि बाजू घेऊन रस्त्यावर येतात .... जातीय ब्राह्मण मराठ्यांना खिजवायला आपले नसलेले दैवत जिम मध्ये धाडतात..... साहित्यिक समाजापासून तुटलेले असल्याने ते हा घोळ अजून वाढवतात ....... दोन सुसंपन्न प्रस्थापित जातींच्या भंगार अस्मिता युद्धात सारा महाराष्ट्र वेठीला धरला जातो ......
आदिवासी उपाशी मरतात .. पाकडे आत घुसतात ... आसाराम बापू अकलेचे तारे तोडतात ....ब्राह्मण मराठ्याच्या अस्मितेशिवाय आपल्यासमोर दुसरे प्रश्न नाहीत काय ? महाराष्ट्रात या दोनच जाती आहेत काय ? ह्या अभिजनांच्या लढाईत .. आणि राजकीय फ़ंतुश्गिरिला मिडिया डोक्यावर घेऊन नाचतो ..... पण लक्षात कोण घेतो ??

३ टिप्पण्या:

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *