१७ ऑग, २०२०

बडवा - ( कडव्या हिंदूची बखर )

 बडवा - ( कडव्या हिंदूची बखर )  



*************** * हिंदुत्वाची चळवळ .. लाट ..त्याच्या बर्या  वाइट बाजू  - एक थरार कादंबरी ***************** 





त्या पोलिसानी मागून विनोदला धरला. उचल्ला. एका हातात गचांडी आणी दुसर्या हातात गांडीवरची पैंट. विनोद च्या हातातली कुर्हाड  गळून पडली होती. गळा आवळल्यान गोरा चेहरा लाल होऊ लागला. किश्या न ताबड्तोप हालचाल केली. विनोद ला अस धरल्यान खाड्कन रक्त चडलं त्याच्या डोळ्यात. किश्यान सरळ पोलिस इंन्स्पेक्टरच्या रोव्हॉल्वर ला हात घातला. त्याक्षणी इंन्स्पेक्टरन धाडकन विनोदला खालती आदळला. आणी किश्याच्या खणखणीत मुस्काडात ठेवून दिली. दोघाना सांगीतलं "नीचे बैठो''. आळीपाळीनं दोघाना चार चार लाथा लगावल्या. आदळला गेल्यान आधीच ओठ फाटला होता विनोदचा. रक्त वहात होतं तरीही दात ओठ चावत तो ओरडला '' जय भवानी'' ....... ''जय शिवाजी '' किश्यानही साथ दिली.

नीनू यारू ? मराठी ? संताप संताप झाला त्याचा. कानडी पाटी ऊखडतात काय? हरामखोर लेकाचे .  चांगली अद्दल घडवली पाहीजे ह्या शिवसेनावाल्याना. रात्रि टिपू सुलतान नगर मधली ड्युटी म्हणजे काहि ना काहि तरी लफड व्हायचच. इंस्न्पेक्टर बन्गोंडाला सवयच होती त्याची. पण त्याच्या कर्यक्षेत्रात एकही लफड फार मोठं होउ द्यायचा नाही तो. ही विशितली फाल्तू मराटी पोरं, आज अस्सा दांडू देउ त्याना की सारा बेळगाव याद राखेल.

इंन्स्पेक्टर साठी हिशोब सरळ होता. पोरं बडवायचि , साहेब तर खुश होइलच , पण कानडी पेपर मधे झक्कपैकी फोटो पण छापुन येइल. इंन्पेक्टर बन्गोंडा हि तशी अजब वल्ली होती. प्रामाणिक आणी हिरोइक तरुण. देशभक्त, कडक आणि स्वतच्या मायबोलिवर - कानडीवर जिवापाड प्रेम करणारा. पण तितकाच भडक आणि उथळ. टिपू सुल्तान नगरची जी कानडी पाटी हि पोर उखडू पाहत होती; त्या पाटीखालिच गाडावं साल्याना !.................पण ..... थोड्या लाथा हाणल्यावर बर वाट्लं त्याला. पोराच्याही थोबाडातून रक्त वाहत होतं. ........तेही पाहून राग थोडा कमी झाला त्याचा.


' बिचारं तरूण पोरगं, कपडे बरे होते... चेहराही चांगला गोरा गोमटा होता. बर्या घरचा वाटतोय . बरोबरचा मात्र गूंडय . विनाकारण या राजकारण्यांच्या नादि लागतात आणि करिअर खराब करून घेतात. चांगलं बडवून काढ्ल्याशिवाय अक्कल येणार नाही भडव्याना' .. असा विचार करत इंन्स्पेक्टर बनगोंडा चालू लागला, आणि त्या पाटी काढणार्या पोराना शिव्या घालत, त्यांची वरात पोलिस स्टेशन कडे ढकलू लागला.

दोन्ही पोरं जुना मार विसरून जणु काहि झालच नाही अशा थाटात छाति पुढे काढुन चालत होती. एकमेकाशी मराठीत बोलत होती आणी टाळ्या देउन हसत होती. ह्या बनगोंड्याला बिल्कूल भिक घालणार न्हवते ते. त्यांच्या मराठी गप्पांचा अर्थ काय असावा ह्याचा अंदाज करत इंस्पेक्टर त्याना ढकलत होता. पण त्यांची बेगुमान आणि निडर वागणुक त्याचा संताप वाढवत होती. ह्यांची कशी सालटी सोलावित? हा इंन्स्पेक्टर बन्गोंडाचा विचार पूर्ण होइपर्यंत ते सगळे पोलिस स्टेशन मधे पोचले होते. उद्या बेळगाव मधल्या पेपर मधे काय बातमी द्यायची याचा विचार करत बन्गोंड्यान दुकलीकडे रोखून पाहिल .......
विनोद च्या डोळ्यात बघत आणी एका हाताने त्याची गचांडी धरत इंन्स्पेक्ट्रर बन्गोंडा ने विचारले -मराठी हं ?

निन्ना हेस्सार्येन्नू ? नाम क्या है तेरा ?

" विनोद बडवे ... और सुनो मराठी -- कानडी कुछ नही जानता मै. गर्व से कहो हम हींदू है. ये टीपू सुल्तान कटुवे का नाम नही चलेगा इधर.उसके नाम का सिर्फ बोर्ड ही नही निकालूंगा मै, उसके नाजायझ औलादोंको पाकिस्तआन भी भगाउंगा. जो उखाडना है उखाडले ....''


बनगोंड्याच्या हाताची पकड ढिली होत होती. आणी डोळ्यातला राग निवळत होता ......

**********************************************************************************************


खरं तर विनोद न आपल्या पहिल्या वाक्यातच अर्ध मैदान मारलं होतं. इंन्स्पेक्टरची पकड ढिली होउ लागताच, आपल्या पल्लेदार्, रसरशीत आणी मुलुखमैदान तोफेसमान वक्तृत्वाने....... तो त्या पोलिस स्टेशन लाच......सभेचे व्यासपीठ बनवणार होता. आपल्या ह्या कष्टाने कमावलेल्या कलेचा बरा वाईट उपयोग कसा करायचा ? हे त्याला चांगलच ठाउक होतं.

 जेमतेम पाच फूट उंची, पण कष्टान कमावलेलं पिळदार शरीर; त्याला शोभणारी तलवार कट मिशी आणी चटकन डोळ्यात भरेल असा तेजस्वी रंग ल्यालेला तो, हाताची तर्जनी उंचावून खडे भाषण सुनावू लागला. त्याचे मोठे काळेभोर डोळे भाषण देता देता प्रत्येक श्रोत्याच्या नजरेला नजर भिडवत होते आणी ह्रुदयाचा ठाव घेत होते. नियतीला माहित होतं, याच अमोघ भाषणाने तो त्या पोलिस स्टेशन मधल्या सार्या स्टाफला जींकणार होता............ फक्त एक अपवाद सोडून !

शांत खोल आणि धीरगंभीर आवाजात विनोदनं बोलायला सुरवात केली, त्याच्या हालचाली संथ होत्या आणी डोळ्यात अतिशय सौम्य भाव होते. " शिवाजी महाराज सिर्फ मराठियोंके लिये लडे थे क्या ? रानी चेन्नम्मा का खून कर्नाटक के लिये बहा था क्या ? सुभाषबाबू सिर्फ बंगाल के सुपुत्र थे क्या ?क्या भगतसिंग सिर्फ पंजाब के आजादी के लिये फासी पर लटका था ? हिंदुकुश पर्वत से हिंद महासागर तक, जो भी हिंदू खून बहा है ..... उसको गाली मत दो! कुछ नही मराठी, कुछ नही बंगाली, कुछ नही पंजाबी, कुछ नही कानडी, कुछ नही तामिळी.... कुछ नही तुळू ..... हम बस हींदू !

 इतिहास पढो . छोडो....... अगर नही पढना तो मत पढो. ......लेकिन रोज का पेपर तो पढो ..... कश्मीर से केरल तक जो भी बम फूटे है, जितना भी हिंदू खून बहा है .... किसने बहाया है ? और क्यों ? क्यों जादातर बम शुक्रवार को फटते है ? मस्जिद मे शुक्रवार का नमाज पढनेवाले उनके मुल्ले भाई सुमडीमे बच निकल्ते है ... फिर भी हमारे होष ठिकाने नही आते. वो सब छोडो .... जब हिंदूओंको मारते हुए वो नही देखते की ये कानडी है या मराठी ? तो हम क्यों देखते है ? जब उन्हे काफिर हिंदुओंको मारते हुए भाषा से फर्क नही पडता .. .. तो हमे क्यों फरक पडता है ? ये गद्दार बैंड बजा रहे है पूरे देश की.... और हम लोकोंने तमाशा कर रखा है हिंदुत्व का ! मेरा नाम है विनोद बडवे , बडवा का मतलब मालूम है आपको ?

भड्वा नही बडवा....... बडवा ......बडवा मतलब मंदिर के आगे ढोल बजाने वाला पुजारी....लेकिन ..... मै ढोल नही बजाता,......... गद्दरोंकी ** बजाता हूं ..... हां मै आया हूं शिवाजी महाराज के महारष्ट्र से.... बस........एकही मक्सद लेके ......" हळू हळू विनोद बडव्याचा आवाज चढू लागला होता.अणुकुचीदार गोरं नाक लाल लाल होउ लागलं होतं. डाव्या हाताची मूठ कमरेवर विराजमान झाली होती. उजव्या हाताचे दुसरे बोट उंचावून तो बोलत होता. काळी रम जशी धमन्या धमन्यात पसरते, तसेच त्याचे विचार श्रोत्यांच्या अंगात भिनत होते. पोलिस स्टेशन चा सारा कानडी स्टाफ त्याकडे कुतुहलान बघत होता. संशयान बघत होता तो तिथला एकमेव मराठी पोलिस. सब इंन्स्पेक्टर राजवीर पाटील निप्पाणीकर . इंन्स्पेक्टर बनगोंड्याचा ज्युनिअर.


विनोद पुढे बोलू लागला ''और मेरा मक्सद है हिंदूओंको एक साथ जोडना, एकसाथ खडा करना. एक साथ खडे होकर हमने मूत दिया , तो भी साले १३% वाले बह जायेंगे. भाषा भेद, प्रांत भेद, जाती भेद और वर्ण भेद को भूलकर हींदुओंको एक साथ चलना होगा. एक साथ लडना होगा. समय बदल रहा है. इतिहास करवट ले रहा है. बाद्शाहोंद्वारा मंदिर गिराने का वक्त गया........ बाबरी तोडनेवाला  यह वर्तमान है.

कराची, पेशावर तो क्या .... काबूल कंदाहरतक परमपवित्र भगवा ध्व्ज लहरायेगा, यही दुनिया का भविष्य है. हमारी विजय सुनिश्चित है.. हिंदू बंधूओ........... क्योंकी उस विजयगाथा का पहला अध्याय हमने ६ दिसंबर को ही लिख दिया है. मैं छत्रपती शिवाजी महाराज के महाराष्ट्र से आया हूं सोता सिंह जगाने, हर दिल मे आग लगाने, हिंदू साथ जूटाने ........... दो दिन पहले हमारे महाराष्ट्र से राष्ट्रवादी कोंग्रेस का एक मराठी मंत्री इधर आया था और कह रहा था" -- महाराष्ट्राला बेळगाव नाही मिळाल, तर इथं रक्ताचे पाट वाहतील ---- " वाह रे मर्द .... उधर भिवंडी, मुंब्रा पाकिस्तान मे जानेका टाइम आया है.....मूंबई सम्हाली नही जाती .और ये बेलगाव मांग रहे है....... " विनोदचा सूर टिपेला पोचला होता. एक कसलेला कलाकारही होता तो. हातवारे करताना त्याच्या हाताची बोट थरथरत होती. चेहरा लालभडक झाला होता. त्याला विश्वास होता शेवट्च्या दोन वाक्यात आपण सारं पोलिस स्टेशन जींकलेलं आहे. मराठी माणसान कर्नाटकात अशी भूमिका घेतली , की तो लोकप्रिय होतोच ! पण त्याचा विश्वास खोटा ठरवण्यासाठीच सब इंन्स्पे़क्टर राजवीर पाटिल निप्पाणीकर त्याच्या दिशेने शांतपणे पाउलं टाकत येत होता.


राजवीर पाटिल. सडसडीत उंच नकेला आणि सावळा. टोल डार्क ऐंड हैंडसम . पण त्याचा बॉस बनगोंडा प्रमाणे तो ऐंग्री यंग मॅन मात्र न्हवता. अतिशय संयमी आणी परिस्थितीनं खोल बनवलेलं व्यक्तिमत्व होतं त्याचं. निपाणी जवळच्या अर्जुनी गावचे पाटिल. मराठी बोलणारा सारा अर्जुनी गाव सीमप्रश्नात कर्नाटकात आलेला. राजवीर पाटिलचे आजोबा क्रांतिसिंह नाना पाटलांचे सहकारी होते. प्रतिसरकारचे मंत्री होते. त्यांनी घरची लाखोंची इस्टेट स्वातंत्र्य लढ्यात फुकून टाकलेली होती. राजवीर ला ऐहीक संपत्ती काही ठेवली न्हवती त्यांनी. ठेवली होती ती कड्व्या देशभक्तीची परंपरा आणी....विचारांची संपत्ती शाहु महाराजांच्या विचारांची. आणी महात्मा फुलेंच्या सच्च्या सत्यशोधकी विचारांच सोनं . गरीबीशी दोन हात करत तो शिकला आणी बेळगाव पोलिसात चिकटला.


एव्हाना विनोदच्या भाषणाचा स्वर वरच्या सा पर्यंत पोचला होता " यह सब काँग्रेस का खेल है हम हींदूओंको आपस मे लडवाते है. जाती और भाषा के नाम पे. और देश्द्रोही मुल्लों के दाढी को धी शक्कर लगाते है............... भारत मे परिवर्तन होगा, भगवा ध्वज लहरायेगा | हिंदू हींदू एक रहेगा, राम राज तब आयेगा |"

सब इंन्पेक्टर राजवीर पाटिल एव्हाना विनोद च्या जवळ येउन पोचला होता आणि एक शब्दही न बोलता त्यानी विनोदची झडती घ्यायला सुरवात केली. त्याच्या या क्रुत्याने भाषणामुळे भारावलेलं आणि भांबावलेलं कर्नाटक पोलिस दल पण ताळ्यावर येउ लागलं होतं. पण ..... विनोदच्या खिशात काहीही न्हवत. अक्षरश। रिकामे होते खिसे त्याचे. तसंही असल्या कामगिरीवर जाताना खिशात पास्पोर्ट ठेव्ण्याएव्हढा मूर्ख नक्कीच न्हवता तो. विनोदनं राजवीरकडे विजयी मुद्रेनं पाहिलं. राजवीरनंही हसून आपला मोर्चा विनोद च्या मित्राकडे वळवला. नाम क्या है तेरा ?

किश्या... आपलं क्रिश्ना जाधव.....
किश्याची झडती सुरू असतानाच विनोद विचार करत होता, -- नियतीचा फेरा कोणाला कोठे घेउन जाइल याचा नेम नाही. नाहीतर १२ वीला गणीत आणी विज्ञानात ९८% मार्क मिळवणारा आपल्यासारखा हुशार सोफ्ट्वेअर इंजिनिअर........या आड बेळगावातल्या पोलिस स्टेशनात रात्री दोन वाजता काय करतो आहे ?........... त्याची विचारमालिका तुटली ती इंन्स्पे़क्टर राजवीरच्या सण्सणीत आवाजाने...


ये क्या है ? त्यान क्रुष्णा जाधवच्या खिशातून एक निळ्या रंगाचं पत्रक काढलं ..
ते पत्रक राजवीरला मिळालेलं पाहून विनोदच्या चेहर्यावरचा रंग ऊड्त होता, आणी रा़जवीरच्या चेहर्यावरचे रंग बदलत होते. कधी आनंद, कधी क्रौर्य तर कधी राग असे राजवीरचे भाव बदलत होते.
पत्रकाच्या शेवट्ची सही त्यानं वाचली. ----- विनोद बडवे.

हे पत्रक कामगिरीला जाताना आणल्याबद्दल विनोद क्रूश्णा कडे खाउ का गिळू अशा नजरेने पहात होता. आणी बरोब्बर तशाच नजरेने राजवीरही विनोद कडे पाहत होता. फक्त त्याला आश्चर्य वाटत होतं... की हे बारकं सालं कुणाच्या जिवावर उडतय ?


त्याच वेळी पोलिस स्टेशनच्या बाहेर ....... पायर्‍यांवर ......कुणाची तरी भारदस्त पावले वाजत होती ............


( क्रमशः )

------------
पूर्वसूत्र :  तशाच नजरेने राजवीरही विनोद कडे पाहत होता. फक्त त्याला आश्चर्य वाटत होतं... की हे बारकं सालं कुणाच्या जिवावर उडतय ?
त्याच वेळी पोलिस स्टेशनच्या बाहेर ....... पायर्‍यांवर ......कुणाची तरी भारदस्त पावले वाजत होती ............




इंन्स्पेक्टर राजवीर पाटील विनोद कडे खाउ का गिळू अशा नजरेने बघत होता; त्याचवेळी त्याला कोणकोणत्या कलमात लटकवता येइल याचाही विचार करत होता. पाटी उखडण्याबद्द्ल बरीच कलमे लावण्यासारखी होती. पण त्यापेक्षा पाटी उखडण्याबद्द्ल एकच कलम लावावं सरकारी मालमत्तेच्या नासधुशीचं. आणी बाकी सारी कलमं लावावी या निळ्या पत्रकाच्या केस साठी. पण एकच केस केली तर जादा लटकतील आणी जामीन पण लवकर होणार नाही. काही असो पण या भट बडव्याला सॉलिड लटकवायचा .


हिंदू म्हणे ! कावाय साल्यांचा. बिनकामाचे भांडणं लावतात आणी शिवाजीचं नाव घेतात.....भट हरामखोर ठग. राजवीरचे आजोबा नेहमी म्हणायचे आपल्या तलवारीमुळे शेंड्या वाचल्या. पण उंदराच्या शेपटीवानी वेदोक्तात अडकल्या. शाहू महाराजांना वेदोक्त संस्कार करणार नाही म्हणणार्यांच्या अवलादींबद्द्ल एक घ्रुणाच होती राजवीरच्या मनात. त्यातही तो 'भीमरूपी महारूद्रा' वाला हिंदुत्ववादी असेल तर फारच लबाड. कितीही असले भ्रष्ट| तरी म्हणे आम्हीच श्रेष्ठ|| हिंदू मुस्लिम भांडणाच रा़जकारण करणारे भट पिंजर्‍यात पाठवायला हात शिवशिवत त्याचे. पण त्याचे शिवशिवणारे हात यावेळी तरी त्याला बहुतेक खिशातच ठेवावे लागणार होते.


त्याचा बॉस इंन्स्पेक्टर बनगोंडा खुर्चीतून उठून उभा राहिला होता. कारण जिन्यावर वाजणारी पावलं पोलिस स्टेशनच्या आत पोचली होती. त्या पावलांना आदर देण्यासाठी बनगोंडा ला उठणं भागच होतं.

 निष्णात कायदेपंडीत, बेळगावातल्या १८ हॉटेलांचे मालक, आर्य समाजाचे प्रमुख, माजी आमदार अ‍ॅड्व्हकेट एम के शिंदे. यावेळी फक्त ४३ मतांनी पडले ते, पण बेळगावची महापालिका त्यांच्याच खिशात होती. राजवीर त्याना ओळखत न्हवता..... त्याला जॉइन होउन महीनाही उलटला न्हवता म्हणून. पण अ‍ॅड. शींदेंच्या एकूण भारदस्त व्यक्तिमत्वाने तोही प्रभावित झाला होता. साडे सहा फूट उंची, अडीच फूट रुंद खांदे, कडक स्टार्च केलेला पांढरा झब्बा कूडता आणी त्यांच्या विस्तीर्ण भालप्रदेशावर शोभणारे केशरी अष्टगंध. हे सगळं कमी होतं म्हणून की काय, त्यांनी हल्लीच (त्यांच्या लाडक्या एकुलत्या कन्यारत्नाला आवडत नसे तरीही) खांद्यावर भगवी शाल वागवायला आरंभ केला होता.


ताड ताड पावलं टाकत ते आत आले आणी राजवीरकडे पहात म्हणाले हे कोण हे ? नवीन का? मग त्यानी बनगोंडाकडे पहात विचारलं,किसने मारा मेरे छोकरेको? क्यों मारा ? बनगोंडाने मौन धारण केले होते. पण तरा तरा पुढे होत राजवीर म्हणाला. "टीपू सुलतान नगरची पाटी उखडत होते,कुर्हाड  घेउन"

अ‍ॅड. शिंदेंच्या चेहर्‍यावर समाधानाची लकेर दिसली. हवालदाराने सरकवलेल्या खुर्चीवर बसत बसत त्यांनी आपला उजवा हात बनगोंडाच्या टेबलवर ठेवला. आणी पेपरवेटशी चाळा सुरू केला. पण विनोदला कळत होतं; शिंदे सर अत्ता रिलॅक्स दिसत असले तरी ते केवळ त्यांना अजून   पत्रकाच्या केस बद्द्ल कळलेले नाही म्हणून. त्या केसचा संबध फक्त शिंदे सरांशीच येणार न्हवता तर त्यांच्या मुलीशी - नियती शिंदेशीही हा विषय निगडीत होता. पेपरवेट हाताने गोल फिरवत - फिरवत आपल्या नेहमीच्या खर्ज्या आवाजात, शिंदे म्हणाले " कोण म्हणतं टिपू सुलतान नगर ? त्याच नाव बदललेलं आहे. ....आजपासून..... महर्षी दयानंद सरस्वती नगर असं त्याचं नामकरण झालेलं आहे. महापालिकेने नामकरणाचा ठराव काल केला.

 त्या भागातल्या नगरसेवकाने पाटी बदलण्यासाठी या पोराना कंत्राट दिलेलं होतं. त्यानुसार ही पोरं काल महापालिकेच्या कंत्राटावर काम करत होती. म्युन्सिपाल्टी के काँट्रॅक्टर समझे बन्गोंडा ? "

चक्क खोटं बोलत होते अ‍ॅड्व्हकेट शिंदे. ते साफ खोटं बोलतायत हे इंन्सपेक्टर बनगोंडाला ही कळत होतं आणि राजवीरलाही. पण अशी कागदपत्रं महापालिकेतून २ तासात बनवून आणणं हा शींदेंच्या डाव्या हातचा मळ होता. महापालिकेचे प्रशासन आणि नगरसेवक शिंदेनी सांगितलं तर रस्त्यात नागडा  भांगडाही खेळायला कमी करणार नाहीत. हे बनगोंडा पुरता जाणून होता.

त्यांच्या ताकदीची कल्पना न्हवती ती राजवीरला.

" मग सोडताय ना पोराना ? " शिंदेंचा करडा आवाज घुमला.
"नाही साहेब" राजवीरचं उत्तर हजर होतं. " पत्रकाची सिरीयस केस आहे त्यांच्यावर"
"कोणतं पत्रक ?" शिंदेनी चिंतायुक्त स्वरात विचारलं.
"ते कोर्टात हजर केलं जाईल" राजवीर.
"निळ्या रंगाचं का ? " शिंदेंच्या आवाजात मार्दव निर्माण झालं होतं.
" मी सांगायला बांधील नाही" राजवीर उत्तरला.

अ‍ॅड्व्हकेट मल्हारराव केशवराव शिंदे. मनात कितीही खळबळ उडालेली असली तरी चेहर्यावर दिसायचं नाही त्यांच्या. त्यांनी विनोदकडे प्रश्नार्थक कटाक्ष टाकला. त्यानं मानेनंच हो म्हटलं आणि आणि क्रुष्णा जाधवकडे पहात मान उडवली.

शिंदे काय समजायचं ते समजले. "पत्रक कुणाकडे मिळालं ?" त्यांनी इंन्स्पेक्टर राजवीर कडे पाहत विचारलं. " त्याला ठेवा उरलेल्याला सोडा."

" शक्य नाही. पत्रक आरोपी क्र २ कडे मिळालं आणी त्यावर आरोपी क्र १ ची सही आहे." एफ आय आर  लिहिण्यासाठी सरसावत राजवीर म्हणाला.

" आरोपी ? " आता मात्र शिंदेचा पारा चढला होता. असल्या फालतू इंन्सपेक्टराशी वावदूकी करायची सवय नाही मला. बन्गोंड्या अभि के अभी छोडो दो इसे. नही तो म्युन्सिपाल्टी के काँट्रॅक्टर पर जानलेवा हमला करनेका केस लगाता हू तुझपर. कल सुबह ५ हजार कार्यकर्ता आपसे मिलने... मोर्चा लेकर आयेंगे वो अलग. और बाकी बात मै कमिश्नर साब से कर लूंगा.

*********************************************************************************

शिंदे आणि विनोद पोलिस स्टेशनच्या पायर्‍या उतरत होते तेंव्हा पहाटेचे साडेचार वाजले होते. पत्रकाची केस फाइल झाली होती. क्रिश्ना पोलिसांच्याच ताब्यात होता. विनोदला सोडला होता. पण तारखेला कोर्टात हजेरी लावायची होती. जाता जाता राजवीर ला " फिर मिलेंगे" म्हणायला शिंदे विसरले न्हवते. राजवीरनही बिनदिक्कत उत्तर दिलं होतं " शौकसे ". पण त्यावेळी राजवीरला शिंदेंच्या ताकदीची कल्पना न्हवती आणी शिंदेनाही राजवीरच्या  कडक पणाचा  अंदाज आला न्हवता.
ड्रायव्हरने मर्सडीझचं दार उघडलं. आत बसता बसता शिंदेंनी विनोदला विचारलं " ही पाटीची भानगड काय आहे ? "

"सर मी आणि किश्या टिपू सुल्तान नगर च्या दाराशी उभे होतो. बाकीची पोरं पोचायची होती. किश्याच्या हातात कुर्हाड  होती. माझ्याकडे पण रामपुरी होता पण पोलिस बघून मी तो त्या पाटीमागे लपवत होतो.     माझे हात पाटीच्या मागे आणी किश्याच्या हातातली कुर्हाड  बघून -  त्या माकड बनगोंड्याला वाटलं मी पाटीच उखडतोय ! तसली कामं बालवाडीत करायचो सर!
 पण पडत्या फळाची आज्ञा प्रमाण मानून मी पण बोल्लो बन्गोंड्याला चल उखड्तो पाटी...... काय उपटणार तू ?

मग भरपूर आरडाओरडा झाला. आपल्या तिथे येणार्या कार्यक्रर्त्यांनी तो ऐकला. आणी ते तुम्हाला कळवतीलच हे माहित असल्याने मी आणी किश्या हसत होतो. त्यावर पण उखडल बेनं आणी वाइट धुतला हो....." विनोद.


शिंदे दरवाजा लावताना म्हणाले " चल आपण खरं कशासाठी जमणार होतो....ते तर समजलं नाही ना पोलिसाना ... बरं झालं. जाउन झोप आता. संध्याकाळी ये वाड्यावर बैठकीसाठी   . ती पत्रकाची केस बघू आपण .फार लागलं नाही ना ?"


"देश आणी धर्मासाठी काय पण सर ! " असं म्हणून विनोदने सरांना नमस्कार केला. रूमकडे जाताना तो विचार करत होता, - सराना वाटतंय तितकी   केस सोपी जाणारी नाही. कमित कमी आपल्याला आणी नियतीला तर नाहीच नाही. पण अती ताण आला की तो नियतीचा ,सरांच्या मुलीचा विचार करत असे. आणी सरांनी ''५५५'' साठी वाड्यावर बोलावलंय तेव्हा हजारात एक शक्यता अशीही होती की आपण   केस ला काही वेगळे वळण देउ शकू. असा पॉझीटिव्ह विचार करत करत विनोद त्याच्या रूम कडे चालत होता.


*********************************************************************************



शिंदेच्या पाया पडताना विनोद म्हणाला होता " देश आणे धर्मासाठी काय पण सर! " गाडीतून वाड्याकडे जाता जाता, शिंदे विनोदचाच विचार करत होते. त्यांचा मानसपुत्रच बनला होता तो. विनोदच्या मुंबईच्या भानगडीनंतर महाराष्ट्रात रहाण अवघडच झालं होतं त्याचं, . आपण तेव्हढ्यासाठी त्याला इथं बेळगावात घेउन आलो. मुंबईत पक्षाच्या अधिवेशनात पहिल्यांदा भेटला तेंव्हा सामान्य कार्यकर्ता होता तो. पण इथे आल्यावर पहाता पहाता कार्यकर्त्यांचा अनभिषिक्त हृदयसम्राट बनून गेला, काय भाषण ठोकतो लेकाचा ! पब्लीक ला नुस्त वेड लावतो वेड. हाच बनू शकतो आपला राजकीय वारसदार. पोरीचं लग्न एकदाचं उरकून टाकलं की कौटुंबीक जवाबदारी संपलीच आपली. मग आपली सारी संपत्ती, सारी संचित पुण्यायी, सारा वेळ........ फक्त विनोदला राष्ट्रीय रा़जकारणात प्रस्थापित करण्यासाठीच वापरायचा.

हो बेळगावातल्या विहिरीतला बेडूक बनवायचा नाही त्याला.गल्ली नाही दिल्ली.... काय हिंदीवर कमांड आहे बेट्याची ! आपणही लहान असताना असेच होतो. हिंदू एकता आंदोलन गा़जलं होतं ते फक्त आपल्या भाषणांमुळेच. पण कोणी रा़जकारणातला गॉडफादर न्हवता म्हणून....., नाहितर कमीत कमी भारताचा गृहमंत्री झालो असतो आज. आपला समाज नेता ड्रीव्हन आहे. चांगला कणखर नेता पाहिजे राष्ट्रीय पातळीवर तरच काही भविष्य आहे या देशाला. नाहीतर चीन पाकिस्तान आणी इथलेच गद्दार हिरवे साप .... वाट लावतील वाट.

बरोबर एक वर्षाने लोकसभेची निवडणूक आहे. तोपर्यंत व्यवस्थित लाँच झाला पाहिजे विनोद. आपल्याला कुणी गॉडफादर मिळाला नाही पण विनोदचे गॉडफादर बनू आपण. काय मस्त प्लान आहे आपला....... पुर्या बेळगावची  "ती"   ठसठसती जखम.... आपल्या एका कामगिरीने मलम लावणार विनोद.... फक्त ६ महिने गायब करायचा विनोद ला त्यानंतर. आणी परत आणायचा तो हत्तीवरच्या मिरवणुकीतूनच....आणी मग थेट खासदारकी ला उभा करायचा. पक्षातल्या ओळखी कामी येणार कधी ? आणि ' त्या ' कामगिरीच्या बळावर सहज निवडून ही यील तो.

कामगिरीचं सगळ कसं व्यवस्थित जमवून आणल होत आपण. पण ऐन वेळी तो बनगोंड्या तडमडला. पाटीची नस्ती भानगड करून ठेवली. त्यात त्या येड्झव्या किश्या ने पत्रक नेलं ! एव्हढ्या महत्वाच्या कामगिरीवर जातान बरोबर पत्रक काय घेउन जातो ? बावळट ! असो पण दाबू सहज केसेस. विनोदची केस लवकर निल करून घ्यायला पाहिजे. कामगिरी नंतर ६ महिने गायब रहावं लागणार त्याला... त्यावेळी केस चालू असेल तर ? ... तर तारखेला स्टेटस फरार दिसेल त्याचं.... नकोच ... त्यापेक्षा केस निल होइस्तवर पुढे ढकलावी कामगिरी. फालतूत आठवडा जाइल फुकट..... विचार करता करता ते ड्रायव्हरला म्हणाले. ती सेतुनिर्माण ची सीडी लाव रे. विनोदचीच कविता होती ती..त्याच्याच आवाजातली..पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात वाचली होती हि कविता त्यानी.... वेड लागलं होतं पबलिकला. ..... ही सगळी कामं नियती बघायची. पक्षाच्या आय. टी. विभागाची प्रमुखच होती ती. भाषणांच्या सीड्या बनवणं, यु ट्युब वर अपलोड करण वगैरे. तिला लांब नाही द्यायची फार.....बेळगावातलंच एखादं चांगलं खानदानी मराठ्याच घर शोधलं पाहिजे. आठवडाभर कामगिरी पुढे ढकलाविच लागणार आहे तर हा वेळ तिच्यासाठी स्थळं शोढण्यात सत्कारणी लावू. नंतरच्या भानगडींमधे वेळ नाही मिळायचा. त्यांची विचारमालिका तुटली ती सीडी च्या आवाजाने ...


सेतुनिर्माण....
स्वर्णीम पृश्ठ गतकालके
पढतेही कंपित हृदय, प्रस्फूर्त बाहुद्वय |
जो नस नस मे थी दौडी
बि़जली हमारी रगोंमे
हतवीर्य आज वह विद्युत
जीवन हुवा श्वानवत, या फूटी अपनी किस्मत|
किस्मत पे न रोते थे
खुद भविष्य अपना लिखते थे,
हस्तरेखाओंकी दिशा, मुट्ठी से बदलते थे |
ना कायरोंके...............
" पॉज कर पॉज कर" शिंदे म्हणाले.

शिंदेंचा मोबाइल वाजत होता. " बोला चौगुले साहेब." शिंदेंचे चौगुले नावाचे मामेभाउ बेळगाव पोलिसात एसीपी होते त्यांचा फोन होता. त्यांना टिपू सुल्तान नगर पोलिस चौकीत झालेला प्रकार कळला होता. " शिंदे साहेब... एवढ मनावर नका हो घेउ.. तो राजवीर पाटील आपलाच पोरगा आहे. पाहुण्यातला. आपल्या शरूताइंची मुलगी दिलीय त्याच्या भावाला.....".

कसल्यातरी विचाराने खुश होत शिंदे म्हणाले, " बर - बर.. आज त्याला घेउन ये जेवायला वाड्यावर............ नको नको संध्याकाळी नको. संध्याकाळी ५५५ चा कार्यक्रम आहे. दुपारीच आण"
आणी आनंदात शीळ घालत ड्रायव्हर ला म्हणाले " हं प्ले कर सीडी"

हस्तरेखाओंकी दिशा,
मुट्ठी से बदलते थे
ना कायरोंके बच्चे
वह चट्टानो से कट्टे मरहट्टे ही सच्चे |
चालक शिवशाही के,
गोपाल वे मुकुंद के
या खालसे गोविंद के,वानर हनुमंत के |
शिवाजी उनका राजा,राष्ट्र्धर्म रक्षण वादा |
परत एकदा पॉज कर. फोन परत वाजला होता.   नंबर बघून त्यांनी तो कट केला.

*********************************************************************************


पहाटेचे पाच वाजत आले होते. इकडे विनोद चालत चालत रूम पर्यंत पोचला होता. त्याला झोप अनावर झाली होती. त्यानं धाडकन् पलंगावर अंग टाकलं.  संध्याकाळि शिंदे सरांबरोबर बैठकीला बसायचं होत . त्या  वेळेला शिंदे सरांपुढे आपले मुद्दे कसे मांडायचे याचा विचार करायचा होता त्याला. पण   अतिताणानी झोप लागली आणी चित्र - विचित्र स्वप्ने पडू लागली. - नियतीची स्वप्ने.



@@@@@@@


चांगलंच फटफटलं होतं तेंव्हा. समोरच्या खिडकीतून प्रकाश येत होता. विनोदच्या डोळ्यावर आदळत होता. डोळे गच्च मिटलेले असले आणी समोर प्रकाश असेल तर वेगवेगळे रंग दिसू लागतात. सोनेरी - गुलाबी - लालसर - केशरी. रंगांची वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. संथ पाण्यात दगड टाकल्यावर निर्माण होतात तशी. वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. त्या पाण्यात विनोद आपलं प्रतिबिंब पहायचा प्रयत्न करतोय. पण त्याला त्याचा चेहरा त्यात दिसत नाही.कारण त्या वर्तुळात फेर धरलाय नियतीनं. तिच्या अरंगेत्रम ला धरला होता तसाच. भरत नाट्याचे नवरस नवरंग उधळले जातायत.तिच्या बोटांच्या हालचालीत, डोळ्यांच्या विभ्रमात, हातांनी अवकाशात काढलेल्या रेखात एक ग्रेस आहे. तिच्या कमरेवर हात ठेवण्यात, नाराज झाली की ओठ मुडपण्यात, हसताना जमिनीकडे बघण्यात एक नजाकत आहे. तिच्या नेत्रकटाक्षात, तिनं विनोदला दिलेल्या आव्हानात, तिच्या पहिल्या चुंबनात बिजलीचा झटका आहे.

जो नस नस मे थी दौडी
बि़जली हमारी रगोंमे
हतवीर्य आज वह विद्युत
हिजड्यानो .........

"हिजड्यानो" तो म्हातारा ब्राह्मण ओरडला. अंग घामानी थबथबलंय त्याचं. त्याचा उजवा तुटका हात उंचावून पुन्हा किंचाळतो " हिंदूत एकपण मर्द पोरगा शिल्लक राहिला नाही काय ? " सूड घ्या. सूड. हाताला हात, पायाला पाय, डोळ्याला डोळा. मुली ला मुलगी. बदला घ्या बदला. अंगात आल्यासारखा तो घुमू लागतो. अर्धनारीनटेश्वरासारखा नाचू लागतो, गोल ,गोल. वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. बर्फाचा खडा स्कॉच मधे टाकल्यावर निर्माण होतायत. " विनोद ही कामगिरी तुलाच पार पाडावी लागेल. बेळगावची ठसठसणारी जखम तूच सांधू शकतोस." शिंदे सरांचा ग्लास बोलतोय. बर्फ वितळतोय. स्कॉच चा रंग डायल्युट होतोय. चॉकलेटी - पिवळा - फि़क्कट - पांढरा. वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. विनोद डोळे चोळत ऊठला. तेंव्हा दुपारचे तीन वाजले होते.

*********************************************************************************


आज सकाळी  शिंदे सरानी राजारामशास्त्री भागवताना घरी एका खास कामासाठी बोलावलं होतं. बेळगावातील सुप्रसिद्ध नटेश्वर मंदिराचे मुख्य पुजारी आणी शिंदेंचे अध्यात्मिक गुरु. तेजस्वी गोरा वर्ण, गर्द निळ्या रंगाच सोवळं आणी त्यांच्या उघड्याबंब शरीरावर शोभणारं जानवं. शास्त्रींनी वाड्याचा उंबरठा ओलांडताच शिंदेंनी चरणस्पर्श केला. राजारामशास्त्रींनी डाव्या हातानेच आशिर्वाद दिला. हो कारण उजवा हात न्हवताच त्यांना.
मोहसीननी म्हणजेच उस्मान च्या भावानी कुर्हाडीच्या एका घावात त्यांचा उजवा हात मनगटापासून ऊडवला होता. त्यांची १९ वर्षाची कोवळी सुंदर पोरगी. सुनेत्रा तिचं नाव. घराण्याला बट्टा लावत आणी शास्त्रीजिंच्या संस्कारावर बोळा फिरवीत उस्मान च्या प्रेमात पडली. कोवळी नासमज पोर. एका कत्तलखाना चालवणार्या पोरात तिला काय दिसलं कुणास ठाउक ? शास्त्रींनी परोपरीनं समजावलं तिला. शिंदेही म्हणाले " पोरी असा वाह्यात पणा करू नकोस. तु म्हणशील त्या हिंदू मुलाशी लग्न लावून देतो तुझं. माझी सारी संपत्तीही त्याच्या नावे करतो. तू आणी नियती दोनीही माझ्या मुलीच."

"पण काका मी वचन दिलय उस्मान ला. माझ मन अर्पण केलंय त्याला." सुनेत्रा.
शेवटी ती अजिबातच ऐकत नाही म्हटल्यावर तिला घरातच कोंडून ठेवण्याचा सल्ला दिला होता त्यांनी शास्त्रींना.


गेल्या वर्षीच्या शिवरात्रीला रात्री २ वाजता उस्मान शास्त्रींच्या घरात घुसला. बरोबर त्याचे पंचवीस भाउबंद होते. त्यांच्या हातात कुर्हाडी, कुदळी आणी तलवारी होत्या. सरळ उचलून खांद्यावर टाकलं त्यानी सुनेत्राला. शास्त्रीजी तिचा हात धरून ओढत होते त्याचवेळीच. खाट्कन कुर्हाड मारली मोहसीन नं.

शास्त्रींच्या तुटक्या हाताकडे बघवत नसे शिंदेंना. त्यांना बसायला खुर्ची देत शिंदे म्हणाले. शास्त्रीबुवा पत्रिका जुळवायचीय नियतीची. आमच्या तोलामोलाचं स्थळ आहे. पदरही जुळलाय. शिंदेनी दिलेली पत्रिका उचलताना शास्त्रींनी उपरण्याने कपाळावरचा घाम पुसला.

सर्रकन काटा आला शिंदेंच्या अंगावर. त्यांच्या डोळ्यांसमोर त्या वर्षभरापूर्वीच्या बैठ्कीचा प्रसंग उभा राहिला. बेळगावातल्या तमाम हिंदुत्ववाद्यांची बैठक भरली होती. घामाने डबडबले होते शास्त्रीजी तेंव्हा. आणी उपरण्याचा पदर पसरून सूडाची भीक मागत होते. परिस्थितीच तशी होती. बापाचा हात तुटूनही सुनेत्राने उस्मान सय्यद बरोबरच रहाण्याचा निर्णय घेतला होता. कायद्याने आता सज्ञान होती ना ती. हात तोडल्याबद्द्ल मोहसीन ला फक्त एक वर्षाची सजा सुनावली गेली. पण सय्यद पतिपत्नी सुखाने नांदत होते, गावातल्या सर्वात जुन्या मंदिराच्या मुख्य पुजार्याची ही दशा पाहून सारा बेळगाव हळ्हळला होता. हिंदुत्ववाद्यांच्या हृदयात खोल जखम झाली होती. काय करायचं ? ते ठरवायला बैठक भरली होती. किश्या म्हटला सर्व सय्यदांचे हात तोडू. विनोद म्हटला सय्यद रहातात ते अख्ख टीपू सुल्तान नगर जाळून टाकू. "मी सांगतो उपाय" शास्त्रीजी म्हणाले, शात्रीजी बोलायला उभे राहिले तेंव्हा त्यांच्या डोळ्यातून अंगार बरसत होता. अंग घामाने डबडबले होते. ते जी कामगिरी उपाय म्हणून सांगणार होते. त्यामुळे सारेच आवाक झाले होते. बेळगावातल्या एकाही हिंदूने असे क्रुत्य याआधी केलेले न्हवते.



" सूड घ्या. सूड. हाताला हात, पायाला पाय, डोळ्याला डोळा. मुली ला मुलगी. बदला घ्या बदला." संतापाने थरथरत शास्त्रीजी म्हणाले.

कोयत्याने खीमा बनवतो सगळ्या सय्यदांचा, दात ओठ चावत कृष्णा उत्तरला. " आपली तयारी आहे २० वर्ष तुरुंगात खडी फोडायची. पण धर्माला डाग लागू देणार नाही. "

त्याचा हात ओढत विनोद म्हणाला, " शांत व्हा रे सारे... थंड डोक्यानी काम घ्या. पोरगी तर हातची गेली शास्त्रीजिंच्या. तिला विधवा करून काय मिळवणार आपण?.. थंड म्हणजे षंढ न्हवे. सूड हवाच. पण तो विचार्पूर्वक, योजनाबद्ध आणि त्यांच्या जमातील गारद करणारा असला पाहिजे. ते सय्यद राहतात ते टीपू सुलतान नगर जाळून टाकू. बेघर करू भडव्यांना. हाकलून देउ इथून. येत्या माघी अमावस्येला ही कामगिरी पार पाडू. सरांच्या मतदारसंघात हिरवी कीड नकोच ही. त्यांच्या फुगीर संख्येनेच पडलो आपण मागच्यावेळी. फक्त ४३ मतांनी...".


"तुम्ही येउन जाउन राजकारणच करणार ! " साने बोलला. सदाशिव साने.(स.सा.) १२ इंच छातीचा, २ दात पुढे आलेला सनातन प्रभातचा बेळ्गाव आव्रुत्ती संपादक. त्याच्या बावळट थोबाडावर सणसणीत ठोसा मारून - त्याला डेंटल ट्रीट्मेंट द्यायचा मोह - फार फार वेळा आवरला होता विनोदनं." राजकारण हा तुझ्यासारख्या सशांचा विषय नाही भाड्या. तुम्ही जेंव्हा यज्ञात तूप ओतायच्या पळीची लांबी किती असावी ह्यावर परिसंवाद रंगवत होतात, तेंव्हा आल्लाउद्दीन खिलजि नालंदा जाळत होता." इती विनोद.


सदाशिव साने आतून तंतरला होता पण चाचरत बोलला " धर्माचरण नाही म्हणून मार खातो आपण. कामगिरीला अमावस्येचे मुहूर्त काढणारे... विनोद साहेब -- शिंदे सरांबरोबर स्कॉच पिणार. शिंदेंच्या मुलीबरोबर सुनेत्रा स्टेजवर नाचणार. संस्कार नाहीत धर्माचरण नाही इथे .अमीर खान आणि सलमान खान चे    सिनेमे बघणार्या पोरी पळणारच की मुसलमानांबरोबर.. ..."

शिंदेंची डावी भुवई वर चढली आणी ती खाली होण्याआधी विनोदच्या उजव्या हाताचा ठोसा सशाच्या थोबाडावर बसला होता. कोलमडलंच ते. त्याला पुरता ठेचायला क्रूष्णा धावला.


शिंदेनी हाताच्या इशार्याने त्याला थांबवलं, आणी शांतपणे म्हणाले " राजकारण ही शिवी नाही साने. हिंदूचा राजकीय जय म्हणजेच हिंदुत्व. आणी सुनेत्रा ही बेळगावातली एकच केस नाही.... इंजिनिअरिंग कॉले़जच्या १० -१२ पोरींना फूस लावून पळवलय लांड्यांनी. लव्ह जिहाद म्हणतात ते त्याला. त्यासाठी बकायदा मशीदीतून प्रोत्साहन दिलं जात, आणी मक्केशा ट्रस्ट मार्फत पैसा पुरवला जातो.लोकसंख्या वाढवून राजकीय ताकद वाढवण्याचा डाव आहे हा. त्यांच आक्रमण राजकीय अन धार्मिक आहे. त्यामुळे त्याला उत्तरही तसंच आहे. असलं पाहिजे. यापुढे बैठ़कीला तुला आमंत्रण नाही. क्रिष्णा बाहेर काढ याला.... "
मान खाली घालून साने निघाला; जाताना पुटपुटला " संस्कार नाही.... धर्माचरण नाही... सत्संग नाही .. सनातन धर्मशास्त्राचा मुहूर्त...."


तेव्हढ्यात विनोद ने मागुन आवाज दिला " ए सशा अमावस्येच्या अंधार्या रात्री लढाया मारून स्वराज्य उभारलं महाराजानी.. तेंव्हाही तुझ्यासारखे भुस्कट ज्योतीशी बकतच होते .. हो चालता... .आणी ऐका सर्वानी ....टीपू सुल्तान नगर पेटवा .. ह्या माघी अमावस्येला अंधाराचा फायदा घेत तिथे घुसायचं.. शिमगा करायचा.... आणी येत्या शिवरात्रीला विजयादशमी साजरी करायची. देव मस्तकीं धरावा | अवघा हलकल्लोळ करावा | मुलुख बडवा कां बडवावा की........ जाळावा | धर्मसंस्थापनेसाठी || "


शास्त्रीजी कडाडले. " काय फरक पडेल त्याने ? त्यांनी माझी पोरगी नुस्ती पळवली नाही. तिला बाटवली. धर्मानी... शरीरानी... आणी मनानी पण. बापाचा हात तोड्णार्या सय्यदांच्या घरात सुखानी नांदतीय अवदसा. जशास - तसे. तरच तो खरा सूड. धटासी आणावा धट | उत्धटासी पाहिजे उत्धट | खटनटासी खटनट | अगत्य करी" || सयदांच्या घरची पोरगी पळवा. तिला हिंदू करा. लग्न करून नांदवा.. आणी ती फक्त सुरवात असू द्या... मी देतो प्रोत्साहन हिंदू तरूणांना... प्रत्यकाने मुस्लीम पोरींशी लग्न करून धर्म वाढवा.. १ महिन्यात घाबरून शरण येतील हरामखोर सय्यद. भित्री जमातआहे त्यांची. एकही हिंदू पोरगी बाट्णार नाही त्यापुढे......."

 एव्हाना शिंदेंतला मुत्सद्दी राजकारणी जागा झाला होता आणी याची राजकीय गणीते बांधू लागला होता. हे क्रुत्य करणारा तरूण -- शास्त्रींसाठी हळहळणार्या -- सार्या बेळगावचा हिरो बनणार हे निश्चित होतं.
पण आग लावण्यासाठी सळसणारे कार्यकर्ते, अग्निप्रदक्षिणेसाठी मात्र तयार होत न्हवते. कारण उघड होतं - जात बुडण्याची भीती! जातीशिवाय हिंदू नसतोच! किंवा जातीचा कुळाचार त्यातली कर्मकांडे, सण वार हाच हिंदूचा धर्म असतो. आपण मुसलमानिणीशी लग्न केलं तर.. तर, पै पाव्हणे वाळीतच टाकतील की! आपल्या बहिणींशी लग्न कोण करेल मग ? परंपरेचा अभिमान बाळगणार्यांना ती परंपराच हतबल बनवत होती. षंढ बनवत होती. धर्माभिमान्यांना धर्मच पंगू बनवत होता.ओळखलं ते शिंदेंनी. विनोदच्याही लक्षात आलं . मगाशी डरकाळ्या फोडणारा वाघ गाय झाला होता. दबक्या आवाजात तो म्हणाला, " शास्त्रीजी पण त्या उस्मान च्या बहिणीशी सूत नाही जमलेलं आपल्यापैकी कुणाचं ."

"हिजड्यानो" शास्त्री ओरडले. अंग घामानी थबथबलंवतं त्याचं. त्यांचा उजवा तुटका हात उंचावून पुन्हा किंचाळले " हिंदूत एकपण मर्द पोरगा शिल्लक राहिला नाही काय ? काय लागतं पोरगी पटवायला ? जे उस्मान कडे आहे आणी तुमच्याकडे नाही ते ? कळू तरी द्या मला. आणी नसेलच पुरुषार्थ तुमच्यात तर सांगतो बेळगावातल्या सगळ्या मुलींना... जा सय्यदांकडे नाहितर शेखांकडे नांदायला. आहे काय त्या उस्मान कडे ? जरासा बरा चेहरा आणी गुलुगुलु भाषा"

शांतता. फुलपाखराचा पंख फड्फड्ला असता तरी कानठळ्या बसल्या असत्या अशी शांतता.
कोणीच पूढे येत नाही असे पाहून शिंदे दुखावले. म्हणाले " काम होइल शास्त्रीजी.. फक्त कोणीतरी सुरवात केली पाहिजे. एकदा सुरवात झाली की प्रथाच पाडू बेळगावात... अशा लग्नांची . मक्केशा ट्र्स्ट्च्या आयला ! मी दीन आर्थीक मदत आपल्या पोराना."

जातीपातीपलीकडे पोचलेला आणी चळवळीसाठी घर दार सोडलेला एक कार्यकर्ता होता त्यांच्याकडे. त्यांच्या त्या मानसपुत्राला खासदारकीसाठी लाँच करायची हीच नामी संधी होती...तो दिसायलाही उजवा होता. बोलायलाही चतुर होता. त्यांनी आपली नजर विनोद कडे वळवली. त्यांच्या नजरेत आशा होती , विश्वास होता आणी आज्ञा होती.


त्यावेळी नाही म्हणायची छाती न्हवती विनोद्ची. आणी त्याचं आणी नियतीचं प्रेम प्रकरण सरांना सांगायची ती वेळ ही न्हवती. तो मानेनेच हो म्हणाला. शिंदेंचा उर दाटला.

*********************************************************************************


झर्रकन सारा प्रसंग अ‍ॅडवकेट शींदेंच्या डोळ्यासमोरून तरळून गेला. आज शास्त्रीजींचा तुटका हात पाहून सारं पुन्हा आठवलं. आज नियतीला स्थळ म्हणून दाखवायचं होतं त्यासाठीच शास्त्रीजींना बोलावल होत. भावी जावयशी आजच नीट ओळख होणार होती. पहिल्या भेटीत उद्दाम वाटला होता तो शींदेना. पण पदर जुळलेलं खानदानी ९६ कुळी मराठ्याच घर. शिंदेना स्वत:चं तारुण्य आठवलं. उद्दाम बेदरकार स्वभाव. उंच हँडसम पर्सनॅलिटी. समोरची बाजू कितीही मोठी असली तरी - भीक घालणार नाही. अशी ताठ तत्वनिष्ठा. इंन्स्पे़क्टर राजवीर पाटील.
राजवीर आणी एसीपी चौगुले काही मिनिटातच पोचणार होते. आपल्याला चौगुले साहेब कुठे नेतायत ते राजवीरला माहित न्हवतं.
सच्या सत्यशोधकी परंपरेतला राजवीर शास्त्री आणी पत्रिका पाहून काय प्रतिक्रिया देइल ? याचाही अंदाज शिंदेनाही न्हवता.

*********************************************************************************

नियतीने पायात घुंगरू बांधले. ता तै तम धित तै तम. भारतीय शास्त्रीय न्रुत्यप्रकार पाच.
प्रत्येक पंचतत्वाच्या नावाने एकेक. त्यातले भरतनाट्यम म्हणजे अग्निनृत्य.
ता तै तम धित तै तम.



 सूत्रल अदवू चा पदन्यास सुरू झाला.
त्यात चार हस्तमुद्रा वापरतात.




 पाची बोटे एकत्र असलेली पताका,

दुसरी अलपद्म् ,

तिसरी अंगठा आणी शेजारच्या दोन बोटांनी बनवलेले हरणाचे तोंड - कटकमुख

आणी चौथी मुद्रा शिखरमुद्रा .

 ता तै तम धित तै तम

. नियतीने नमस्कारम करून दोन्ही हाताच्या पताका उंचावल्या.
 दोन्ही पताका डोक्यावर इकडून तिकडे फिरू लागल्या

. झेंडे.. झेंडे ...झेंडे... झेंडे. ता तै तम धित तै तम.

मग नियतीच्या उजव्या हाताच्या पताकेचे उमललेल्या कमळात - अलपद्मात रूपांतर झाले. चारी बोटे बाहेर ताणलेली अन करंगळी मनगटाजवळ आलेली. अलपद्म डोलून डोलून विचारत होते.

कोणाचे झेंडे ? कोणाचे झेंडे ? ता तै तम धित तै तम॥

नियतीच्या दोन्ही हातांची कमळे डोक्यावर उधळली गेली. पावसाच्या सरींप्रमाणे कमळे अंगावर कोसळू लागली. त्या लाडीक सुखाने, सुवासाने नियतीचा चेहरा सुखाचे प्रसन्न भाव दाखवत होता.

 ता तै तम धित तै तम.

 पितृप्रेमाचा जास्वंद, प्रियकराचा मोगरा, फुलेच फुले होती माझ्या आयुष्यात. पण मधेच उपटले हे - दोन्ही हाताच्या पताका आभाळात फेकत नियतीने दाखवले - झेंडे.. .
अलपद्म डोलून डोलून विचारत होते. कोणाचे झेंडे ? कोणाचे झेंडे ?

 ता तै तम धित तै तम

मूठ बंद अंगठा सरळ ताठ वर - दोन्ही हाताच्या शिखरमुद्रा नियतीने समोरासमोर धरल्या.
 कल्प्नेतला राजमुकुट शिखरमुद्रांनी डोक्यावर चढवला. विचारले -राजकारणाचे झेंडे ?
 पताका परत आभाळात फेकत विचारले - जातीचे झेंडे ? धर्माचे झेंडे ?
 अलपद्म डोलून डोलून विचारत होते. कोणाचे झेंडे ? कोणाचे राजकारण ? कोणाचा धर्म ? कोणाच्या जाती ?

 ता तै तम धित तै तम ॥



पित्याचा जास्वंद, प्रियकराचा मोगरा अंगावर पडायचा थांबला. कारण मधेच उपटले हे - झेंडे..
 शिखरमुद्रा नियतीने उलटी धरली. अंगठ्याने कपाळावर उभे गंध रेखाटले.

आणी दाखवला - पुरुष..... पुरुषांची आडनावे. पुरुषांची वंशशुद्धी, पुरुषांच्या जाती, पुरुषांचे धर्म, पुरुषांचे राजकारण.
 झेंडे.. अलपद्म डोलून डोलून विचारत होते. का? का? का? का ?

ता तै तम धित तै तम॥

अंगठा आणी शेजारच्या दोन बोटांनी नियतीने हरणाचे तोंड तयार केले.
करांगुली आणी अनामिकेचे दोन कान झाले. कटकमुद्रा अवकाशातले कण तोंडाने वेचू लागली.
 नीयतीच्या आयुश्यातले क्षण होते ते.

 पित्याने डोक्यावर उचलून ज्योतिबाला नेले तो क्षण, मातृहीन मुलीला घास भरवले ते क्षण, मुक्या मुलीला व्यक्त होता यावे म्हणून भरतनाट्यम शिकवले ते क्षण.
 प्रियकराने कंबरेवर हात ठेवला तेंव्हा उठलेला थरार, त्याची अमोघ भाषणे ऐकताना अंगावर उठलेला रोमांच, त्याच्या ओठांच्या स्पर्षातली जादू.

 कटकमुद्रा सारे क्षण सार्‍या भावना टिपत होती. ते सारे आता पुन्हा का मिळणार नाही ? अलपद्म डोलून डोलून विचारत होते. का? का? का? का ?

 ता तै तम धित तै तम॥

शिखरमुद्रांनी उचलून नियतीने राजमुकुट फेकून दिला. प्रियकर काय निवडेल ? राजमुकुट की मोगरा ?

 पिता काय निवडेल झेंडा की जास्वंद ?

ता तै तम धित तै तम.

अलपद्म डोलून डोलून विचारत होते. नियतीने फेर धरला.

नाहीतरी पुरुषांच्या या महान भारतीय नाट्यात मुकी नियती काय करू शकणार होती? नियतीचे अग्नीनृत्य पेटत चालले, फेर्यांचा वेग वाढत राहिला. ता तै तम धित तै तम, ता तै तम धित तै तम ॥



*********************************************************************************
 : भरत नाट्यम :

चाल : अइ गिरी नंदिनि सारखी 

घुंगरुत घालुन हे नियती तव पायच नृत्यच भारत गे 
भरतच नृत्यच रे भर सूत्रल आवडु आदवु नृत्य भरे
जल अवकाश जमीन व वायु भडाग्नि त पेटतसे भरते 
जय जयहे नियती चरणी तव भारत नित्यच नृत्य करे 

कटक मुखे अंठा नियते नियती हरिणा नयने अंगुली 
कमळ फुले अलपद्म् कमाल सुहास्य फुलेल मना भुलवी   
शिखरणि रत्नप्रभा मुकुटांचि पताक ध्वजा दिसते जगती  
जय जहे नियती चरणी तव भारत नित्यच नृत्य करी  

नमन करी नमो ध्वज ही तर धर्म ध्वजा मम जाति ध्वजा  
भगवति मी नियती अलपद्म पुसे मजला कवण ध्वज हा 
पदकमले कमळे फुलती मनि ही कमळे नयनी फुलता
जय जहे नियती चरणी तव भारत नित्यच नृत्य कथा 

करिसि कृपा नित पालन पोषण रम्य पीता कनवाळु पिता    
सुमन सुगंधित किंचित तांबुस जास्वंद देव घरी फुलला 
त्रिभुवन भीषण तूचि करी नित सुस्वर हर्ष भरे मजला 
जय जहे नियती चरणी तव भारत नित्यच नृत्य कथा 

जवळ करी प्रिय प्रेम भरे जवळी अधरी चुंबला चुंबला
थरथरली तुझियाच मिठीत थरारत रोम च रोम उभा       
सळसळलेचि मनोहर सुंदर मोहक मोगगरा फुलला 
जय जहे नियती चरणी तव भारत नित्यच नृत्य कसा  

मधुर मधाहुनि फूल फुले तकथै तकथै करि नर्तन मी 
कुणि नटले पुरते कुणि अर्ध नटेचि पिता नट नायक ही
मज पुढती फुलले सगळे मृदु जास्वंद मोगगरे पुरुषी   
जय जहे नियती चरणी तव भारत नित्यच नृत्य करी  


तव तुकडे तुकडे नियते  तव धर्म करी तव जात करी  
अति अति क्रोधित क्रंदन तांडव दानव हे असले पुरुषी    
पसरत रक्तसडे धरणीवर पौरुष जात अधर्म धरी
जय जहे नियती चरणी तव भारत नित्यच नृत्य करी  

तुडवित छिन्न विछिन्न सभोवर घालि धुमाकुळ ते पुरुषी  
उचलुनि आपटिला रणि मानव गंड असे अति क्रूरकृती
थयथय नाचति गुंड ऋषीवर हा ध्वज जिंकती ते जगती 
जय जहे नियती चरणी तव भारत नित्यच नृत्य करी 



*********************************************************************************

शिंदे सर जरासे उखडले होते. राजवीर सोबतची बैठक विषेश जमली न्हवती पण अजून आशेला वाव होता. नियती सुंदर असली तरी मुकी होती. तिला चांगल्या घरी उजवायला थोडेबहुत कष्ट पडणारच. आज बरेच विषय मार्गी लागायला हवे होते. पत्रकाची केस, टीपू सुल्तान नगरची कारवाई, हे घरगुती विषय, विनोदचा राजकारण प्रवेश. सगळ्या विषयांवर विनोद्शी सविस्तर बोलणे आवश्यक होते.

दिवेलागणी  झाली होती. विनोदही येउन पोचला होता . 

बैठकीला  सुरवात झाली होती. 

पेग पहिला : - 
पेग पहिला


शिंदे सरांनी स्कॉचचे दोन लार्ज पेग बनवले. विनोद च्या ग्लासात थंड सोडा भरला. स्वतःच्या ग्लासात बर्फाचे तीन खडे टाकले फक्त.... बर्फ ग्लासात घोळवत घोळवत ग्लास आदळला आणी म्हणाले " चिअर्स... विनोद तुला माहितिय ? ही चीअर्स ची प्रथा कशी सुरू झाली ते ? तसा तू ....या विषयात नवाच ! मी बर्‍याच गोष्टी ऐकल्यात चीअर्स बद्दल. युरोपातली प्रथा आहे म्हणतात. .....युद्धानंतर शत्रूपक्षातले जनरल लोक वाटाघाटी करायला बसायचे.... त्यावेळी बिअर ढोसायचे. कधी कधी बिअर मधूनच एकमेकाना विषप्रयोग करायचे. त्यावर उपाय म्हणून चिअर्स आलं. चिअर्स च्या वेळी ग्लास आदळायचे.... मग दोन्ही ग्लासातली बिअर इकडे तिकडे मिसळते.... बियर मधला अर्क मिसळला कि   विषप्रयोगाचा धोका टळतो. म्हणून ! चिअर्स ! "

विनोदनं पहिल्यांदा एक खणखणीत घोट ओढला. शर्टाच्या बाहीन ओठ पुसले. स्कॉच प्यायची ही पद्धत नव्हे खर तर. पण शेवटी दारू ती दारूच. अर्धा झालेला ग्लास टेबलावर ठेवत विनोद बोलला '' आपण जनरल तर आहोत सर; पण शत्रूपक्षातले नाही. तेंव्हा विषप्रयोगाचा धोका नाहीच ! आणी खरं युद्धही अजून सुरू व्हायचय.. "

" आणी रणांगणावर माझा सेनापती विजयी होणारच. तेंव्हा थ्री चीअर्स फॉर यू विनोद. पहिल्यांदा पत्रकाची केस निल करून  देतो. केस निल झाली की, टार्गेट : उस्मान ची बहीण नाजरीन ... १८ वर्षाला सहा महीने कमी आहे वय तिच. उचलायची तिला. आणी मग हो गायब ६ महीन्यांसाठी. लग्नाच कायदेशीर वय झाल की सहा महीन्यानी बेळगावच्या नटेश्वर मंदिरातच धडाक्यात लग्न लावतो तुमचं. हिंदूची पोरगी पळवल्याचे परिणाम कळू दे साल्याना. त्यानंतर फक्त चार --- सहा महिन्यात लोकसभेची निवडणूक लागेल. चमत्काराला नमस्कार होतोच विनोद. आणी आपला हिंदू समाज मेल्या आईच दूध प्यालेला नाही. पराक्रमाला मतदान होतंच. हजारो भाषणांपेक्षा एक बाबरी काम करते आणी देशाचं सरकार बदलते... राजकारणात जनतेची नाडी कळली पाहीजे. मला बेळगावच्या मतदाराची नाडी माहितीय विनोद. शास्त्रीजींची सुनेत्रा उस्मान न पळवली आणी कट्यार खुपसली बेळगावच्या काळजात. ती जखम सांधणारा खासदार होणारच. आणी तुझी पक्षाकडून उमेदवारी फिक्स करायची जवाबदारी माझी ! निवडुन आणण्यासाठी जी काही ' गडबड '  करावी लागेल त्याचीही जवाबदारी माझी . तेंव्हा भावी खासदार श्री विनोदभाउ बडवे.. चीअर्स.. थ्री चीअर्स फॉर यू !" ग्लास उंचावत शिंदे म्हणाले; आणी मग त्यानी एक हलका सीप मारला.

गडबडलाच विनोद. खर तर त्याला त्याच्या आणी नियतीच्या प्रेम प्रकरणाविषयी सरांशी बोलायच होतं. पण सरांची गाडी वेगळ्याच रूळांवर धावू लागली होती. ही खासदारकीची गाडी विनोद सोडणार न्हवता. पण नियतीची मधुर साथसोबतही सोडू इच्छीत न्हवता. गोंधळलेल्या चेहर्यान सरांकडे बघत त्यानी ग्लास उचलला आणी एका दमात तो संपवत म्हणाला " जरा गोंधळलोय मी सर. आपल मागे बोलण झाल्यानुसार नाझरीनच्या मोठ्या बहिणीशी क्रीष्णान सूत जुळवलंवतं; तिला उचलायला आम्ही टीपू सुल्तान नगर पाशी गेलो आणी मग सगळा राडा झाला..."

ग्लास संपवत शिंदे म्हणाले " प्लॅन चेंज विनोद... क्रीष्णा आणी तू दोघानी सय्य्दांच्या पोरी उचलायच्या. क्रीष्णाच लग्न लगेच लावायच. तू नाबालिक नाझरीन ला घेउन ६ महीने गायब रहायच. म्हणजे सहा महिने विषय मिडियात तापत राहिल. तिच लग्नाच कायदेशीर वय झालं की प्रकटायचं. आणी निवडून यायचं". तू निवडुन येण्यासाठी जो दंगाधोपा आणि खूनखराबा करावा लागेल त्याची जवाबदारी माझी.....
गोंधळलेल्या चेहर्यान विनोदने दोघांचे पेग भरले आणी म्हणाला " धक्का बसला सर."

पेग दुसरा

पुढचे दोन तीन घुटके मारताना शिंदे शांतपणे विनोदकडे पहात होते. म्हणाले " गडबडून जाउ नको विनोद.. मी अतीशय विचारपूर्वक योजना बनवलीय. तू नाझरीनला घेउन गायब व्हायच. पहिल्यांदा पोलीस तुला कुठे शोधतील ? बेळगावात. पण तू त्याना सापडणार नाहीस. कारण तू तेंव्हा पंढरपुरात असशील. तिथल्या गर्दीत मिसळलेला. तुझं वडीलोपार्जीत घर आहे तिथं. त्याबद्द्ल कोणालाही माहीत नाही. त्या घरी रहायचं मागच्या दारानं एन्ट्री घ्यायची आणी सुमडीत रहायचं वरच्या सोप्यावर. कार्यकर्ते शिधा पोचवतील तुला. बाकी पोलीस तुला शोधतील मुंबई पुण्यात पण त्याना काय मिळणार ? केळं.... ! बाकी पोरगी एकदा अठरा वर्षाची झाली की लावू वाजत गाजत लग्न. तेव्हा पहिल मिशन म्हणजे नाझरीनला फूस लावून पटवणे. बाकी ते जमेलच तुला. तुझ्यासारख्या देखण्या राजकुमाराची वाटच पहात असतात पोरी."

" सर तुमच्याशी नियतीबद्दल बोलायचं होतं थोडसं " विनोद चाचरत म्हणाला.

दोन पेग होत आले. शिंदे भावूक झाले. ग्लास संपवत शिंदे म्हणाले मला पण बोलायचय तिच्याविषयी. " बाकी तू आणी नियती मला मुलं दोन. दोघही दिसायला सुंदर सर्वगुणसंपन्न की काय ते ! पण मुकं लेकरू नियती. पोरीच्या बापाच्या चिंता कळायच्या नाहीत तुला विनोद. "

विनोदचं डोकं भणाणलं होतं. आपण कोण कुठले पोरके भटके. आपल्यासारख्या अनाथाला शिंदे सरानी मायेने जवळ घेतलं , नेता बनवल ....  मुलगा मानलं, राजकीय वारसदार मानलं, त्यांच्या मुलीबद्दलच्या भावना कशा सांगाव्या त्याना ? त्यांच्या आपल्याबद्दलच्या योजनांवर पाणी कसं फिरवायच ? कस खेळायचं त्यांच्या आणी  खर तर आपल्याही राजकीय स्वप्नांशी ?  भानावर येत विनोद म्हणाला " नियतीबद्दल बोलत होता सर ... "

ग्लासातले बर्फखडे खुळखुळवत शिंदे म्हणाले. '' हो तिच्यासाठी स्थळ बघितल आज. स्थळ ऐकून धक्का बसेल तुला.. इंन्पेक्टर राजवीर पाटील ! मुलगा मोठा उमदा वाटला मला. पण पक्का .. हिंदुत्वाचा विरोधक. आधी मानवता - माणुसकी  वगैरे बडबडला. कशाला पायजे धर्मावरून भांडणं वगैरे वगैरे... त्यानंतर तेच तेच बामन बामन बामन बामन करत बसला, वेदोक्त प्रकरण बामनी कावा वगैरे.. मी विचारलं त्याला - हिंदुत्व  ? काय आहे हिंदुत्व ? बामणाला आंदण कुणी दिल ? कुणि दिली मक्तेदारी हिंदुत्वाची भटाला  . काय आहे हिंदुत्व ??

ग्लास टेबलावर ठेवला. दोन्ही हात मानेमागे ठेवत ते म्हणाले " मग मी राजवीरला त्याच्याच आजोबांची गोष्ट सांगीतली. त्याचे आजोबा ...माझ्या चुलत्यांचे मामेभाउच ते ..... पाहुण्यापैकि आमच्या ...नाना पाटलांबरोबरचे  स्वातंत्र्यवीर होते. ते कम्यूनिस्ट. पण निजामी राज्यातल्या रझाकरांची मस्ती उतरवायला. नानांची तूफान सेना धावली होती....तेव्हा राजविरचा आजा हातात ठासणीची बंदुक घेऊन धावला होता ....... ते हिंदुत्व "

"माझा देश... देशावरच प्रेम... देशद्रोह्यांची चीड म्हणजे हिंदुत्व... माणुसकी हाच खरा धर्म बरोबराय.. घराला कुलुप घालू नये ही पण एक आदर्श गोष्ट आहे... पण जोपर्यंत या जगात खुनी आहेत बलात्कारी आहेत; तोपर्यंत घराला कुलुपांची आवश्यकता आहे... माणुसकी हाच खरा धर्म असला तरीही जोपर्यंत इस्लामी जिहादची दारू पिउन या लांड्या  डुकरांचा दहशतवादी नंगानाच या देशात सुरू आहे तोपर्यंत आम्ही हिंदुत्वाचे रणशिंग फुंकतच राहणार. ....शेंडीच्या गाठीत, जानव्याच्या दोरीत, गायीच्या मुतीत हिंदुत्व नाही...... पुराणातल्या वांग्यात, तीर्थाच्या भांड्यात, उपासाच्या सांडग्यात हिंदुत्व नाही..... वेदांच्या उक्तीत ..., यज्ञाच्या आगीत , ब्राह्मणांच्या पंगतीत हिंदुत्व नाही... देशद्रोह्यांची दाढी उपटायला मर्द हिंदूंची मूठ वळते -  त्यात -आणि त्यातच हिंदुत्व आहे..त्या वळत्या मुठीत ... पेटत्या डोळ्यात ...... सीमेवरच्या जवानांत , जवानांच्या हौतात्म्यात , त्यांच्या चीतेतल्या निखार्‍यात हिंदुत्व आहे. कारसेवकांच्या अंगारात हिंदुत्व आहे. वीरपत्नींच्या त्यागात - अश्रूत हिंदुत्व आहे..... त्यांच्या डोळ्यातले एक थेंब पाणी लाख  लाख तरुणांचे रक्त उकळवते त्यात हिंदुत्व आहे. त्या उकळत्या रक्तात, रक्ताच्या नात्यात हिंदुत्व आहे. हिंदुचे बंधुत्व म्हणजे हिंदुत्व ! "
"मग काय म्हणाला राजवीर ?" पेग भरत विनोद ने विचारले.

पेग तिसरा 

 राजवीर फार नेमकं बोलतो. हिंदूनी एक व्हायला कुणाचीच अडकाठी नाही, पण हिंदुत्वाचा वटवृक्ष जर वाढायचा असेल तर त्यावरची सनातनी बांडगुळं भवानी तलवारीनी छाटावी लागतील म्हणाला तो. ठीकय. पण त्यावर जास्तीची मल्लीनाथी करत म्हणाला, पण त्यासाठी हिंदू आणी मुस्लीमात अविश्वास तयार करायची काहीच गरज नाही. तसं करू नका तुम्ही लोक". शिंदेनी राजवीरची भाषा ऐकवली.

ग्लास टेबलावर आदळत विनोद म्हणाला "आईच्या गावात गेला विश्वास."

शिंदेनी खांद्यावरची शाल काढून सोफ्याच्या पाठीवर टाकली. स्कॉचचा एक हलका सिप मारला आणी डोळे बारीक करत विनोद कडे पहात, स्मितहास्य करत ते म्हणाले " कसा जाईल आइच्या गावात ? पानिपतात पूर्वीच मेला नाही का तो ? मग मी राजवीरला ९२ च्या दंगलीवेळची एक गोष्ट सांगीतली.

 बेळगावाचा आमदार होतो मी तेंव्हा. भल्या पहाटे एक कार्यकर्ता माझ्याकडे आला म्हणाला बडी मशीदीत मुस्लीमांनी शस्त्र लपवलियात..... मग पहाटेच्या नमाजाच्या वेळेलाच -- दोनशे कार्यकर्ते घेउन धडकलो मशीदीत. सरळ आत घुसलो. मला पाहून सारी मुसलमानं भीतीने चळाचळा कापत उभी होती. ....सगळी मशीद शोधली. तपासली.... एकही शस्त्र न्हवतं... मग दुसरा कार्यकर्ता बोलला इथे नाही सर ...अल निर्मा मशीदीत पेट्रोल बाँम्ब आहेत... मग आम्ही तीही मशीद तपासली. तिथंही काही मिळालं नाही. त्यादिवशी बेळगावातल्या तब्बल पंधरा मशीदी तपासल्या आम्ही.... एकाही मशीदीत काडी सुद्धा   मिळाली नाही . तलवारी आणी पेट्रोल बाँम्ब सोडाच. शाट्ट मिळाल नाही .. पोपट झाला माझा तेंव्हा. पण आजही कुणी मला मशीदीत शस्त्र लपवल्याची टीप दिली तर मी तपासायला जाईनच तिथं. कारण काय ? अविश्वास ! अविश्वास आहे आपल्या देशात मुसलमानांबद्द्ल...... मशीदीत शस्त्र लपवल्याची बातमी कोणालाही खरीच वाटेल. पण प्रश्न असा आहे की का नाही बसत विश्वास अल्पसंख्यांवर? पाकिस्तानातल्या हिंदूनी मंदिरात शस्त्र लपवल्याची टीप तिथल्या मुसलमानाना कुणी दिली तर ? काय प्रतिक्रीया असेल त्यांची ? दाताड विचकटून हसतील ते पाकडे ! आता कळलं का नाही बसत विश्वास .....

त्यांची वागणूक, आचार आणी अनुभवच असे आहेत की विश्वास ठेवूच शकत नाही मी."

" मग मी राजवीरला म्हणालो तुला पोपटाची गोष्ट महितीय का ? एक सुंदर राजकन्या असते. एका राजकुमाराचं तिच्यावर फारफार प्रेम असतं. एकदा एक दुष्ट राक्षस त्या राजकन्येला पळवून नेतो. मग राजकुमार काय करणार ? झक्कत जातो लढायला राक्षसाशी. पहिल्यांदा राक्षसाचा हात छाटतो. लगेच दुसरा हात उगवतो. पाय उडवल्यावर नवीन पाय उगवतो. मुंडकं कापल्यावर नवं मुंडकं उगवतं. आता राजकुमाराला प्रश्न पडतो की याला मारायचा कसा? मग त्याला तिथं एक पोपट दिसतो. पोपट. हिरवागार. लाल चुटुक चोचीचा. राजकुमार त्या पोपटाची मान पिरगाळतो. राक्षस आचके विचके देत जमनीवर धाडकन पडतो. जीभ बाहेर लटकते त्याची. कारण राक्षसाचे प्राण त्या पोपटात असतात........ महाराजांनी त्यांच्या वाघनखानी अफझलखान उभा फाडला. पण संसदेवर हल्ला करणारा भडवा..... अफझलगुरू जन्माला येतोच आहे.  . एक अफझल फाडला तरी दुसरा तयार होतोच.... ह्या अफझुल्ल्यांचे प्राण कशात आहेत ? त्यांच्या पोपटाची मान पिरगाळल्याशिवाय हे अफझल सत्र थांबणार नाही. तो ईस्लामी धार्मीक शिकवणुकीचा पोपट आहे. जिहादचा पोपट छाटला पाहिजे. हिंदू म्हणून ताठ मानेन या देशात जगणे. हा माझा हक्क आहे. और मै कीसी आने वाली पीढीओंके लिये नही लढ रहा. मुझे मेरा हक चाहिये. और वो भी अभी. इसी वक्त. "

विनोदनी एका दमात ग्लास संपवला. त्याच्या आशा पल्लवित, चित्तवृत्ती उल्हासित झाल्या होत्या. अधिरपणे त्याने विचारल. "मग काय ठरलं नियतीच्या लग्नाचं ?"

" काय होणार ? लटकतोय अजून प्रश्न. पण राजकारण वेगळं आणी रक्तसंबंध वेगळे. हे त्यालाही कळतं. आणी मलाही.......पुढच्या बैठकीत गाडी सरकेल पुढे... ठरवून टाकू लग्न. "

विनोदच डोक गरगरू लागलं होतं. डोळे मिटले की की समोर वर्तूळं दिसायची. त्यात नाचती नियती तरळायची. तीन पेगनंतर भीडही थोडी चेपली त्याची. ग्लासच्या तळात बघत तो म्हणाला " .....सर नाझरीनशी लग्न नाय करायच मला. लग्न म्हणजे काय खेळय ? माझा खेळ नका मांडू.... माझ्या पुर्‍या आयुश्याचा प्रश्न आहे हा."

शिंदेनी ग्लास संपवला. नशा चढू लागली होती. नशा दारूची. ..नशा राजकारणाची... नशा सत्ताकारणाची... नशा इतिहासाची...नशा भूतकाळाची... नशा स्वतःचीच. छातीवर हात आपटत ते म्हणाले " हा मी. मी मल्हारराव केशवराव शिंदे. कोण आहे माहित आहे ? गरीब शेतकर्‍याचा पोरगा. आजचा आमदार. ४० कोटींचा मालक. बेळगावातल्या हिंदूंचा त्राता. आणी तुझा भाग्यविधाता. का आहे? कारण स्वतःच्या खाजगी जीवनाच तेरावं घालूनच राजकारणात उतरलो मी. तुझ्या आयुश्याचा प्रश्न नाही हा...... हा हिंदूच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. हा देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे. तान्हाजी, बाजी, मुरारबाजीने स्वतः खाजागी आयुश्य फाट्यावर मारल म्हणून तू बडवा राहिलास. नाहीतर सय्यदांचा भडवा बनून नमाज पढतास."

डाव्या हाताने सोफ्याचा आधार घेत शिंदे पुढे कलले. ग्लास टेबलावर आदळत म्हणाले " भर पेग"

पेग चौथा

शिंदेनी पुन्हा ग्लास उचलला त्यातले बर्फाचे खडे स्कॉच मधे गोल - गोल फिरवले. " हे चक्र तोडलं पाहीजे. आता बस्स झालं. अब हिंदू मार नही खायेगा. तुम्ही पन्नास माराल तर आम्ही पाच हजार मारू. तुम्ही एक पोरगी बाटवाल तर आम्ही शंभर पोरीना शुद्ध करू. दुसरी भाषा समजत नाय भाड्याना. हे युद्ध आहे. त्यासाठी रणचंडी बळी मागते आहे. तुझ्या वैयक्तीक खाजगी जीवनाचा बळी. कवीता आहे ना ती ... जिवा,तान्हाजी, बाजी, मुरारबाजीवरची.... सेतुनिर्माण.... देहाचा पूल


स्वर्णीम पृश्ठ गतकालके
पढतेही कंपित हृदय, प्रस्फूर्त बाहुद्वय |

जो नस नस मे थी दौडी
बि़जली हमारी रगोंमे
हतवीर्य आज वह विद्युत
जीवन हुवा श्वानवत, या फूटी अपनी किस्मत|
किस्मत पे न रोते थे
खुद भविष्य अपना लिखते थे,
हस्तरेखाओंकी दिशा, मुट्ठी से बदलते थे |

मुठीत दारुचा ग्लास उंचावत विनोद उभा राहिला. कविता म्हणू लागला

खान उठाये बिडा ,  बिजापुरी दरबार में 
इस सिवा चूहे को , मै पकडुगा शान से
कसम खाकर जिहाद की निकला जानोशान से 
मुर्तिया भंजने गोवध करने , मुजाहिद निकले शौक से 

जासूद मौजूद सिवा का , बिजापुरी दरबार में 
पहुचा राजगड  किला , करे शिवा को मुजरा 
वृत्त सुनकर सिवा , हो गया उठ खडा 
खडे हो गए भाले , शत्रु रक्त के प्यासे 

जय भवानी नि गर्जना आसमान में लहराई 
हर हर महादेव  कहते    फ़ौज अवनिपर दौड़ी 

देखा तो बड़ी खायी ; अंगारो से भरी हुइ 
अद्भुत संकट आसमानी ; कैसे कुचले सुल्तानी 

आता विनोदच्या उघड्या डोळ्याना वर्तुळं वर्तुळं दिसू लागली होती. तिरमिरत तो बोलू लागला " सर म्ह्टलं तर कविता काल्पनीक आहे. म्हटलं तर जिवा,तान्हाजी, बाजी, मुरारबाजीवरची... रूपक कविता..म्हटलं तर भूतकाळ... " भूतकाळ अनिश्चित असतो" ....... " इतिहास हा अंदाज असतो " ...... मी गडकरी शिवबाचा....खानाची ती हिरवी छावणी. त्या भोवती खणलेला खंदक. खंदकात निखारे. पेटते निखारे. पल्याड जावून माजलेले बोकड चिरायचेत. त्यांच्या रक्तासाठी भाले तहानलेत. पण पेटत्या निखार्‍यावरून आत कस जायच ? विझवायला जवळ ओढे न्हवते. स्वराज्या भोवती अशाच अडचणींचे निखारे होते. पण मावळे लेचेपेचे न्हवते. " एका हाताने सोफ्याचा आधार घेउन विनोद उभा होता. थोर विचारवंताचा - वक्त्याचा आव आणत त्याने उजवा हात उंचावला होता.

ग्लास खाली ठेवत शिंदे उठले. पुढची कविता म्हणू लागले

" कल्पना स्पर्शली चित्ता
जो तोच पटाइत चित्ता
ठाकूनी पुढे सगळ्यांच्या

जाहला शिवजी वदता -
जाणार काय माघारा ?
सरकार काय हे पुसता ?
ऐका तर माझे आता -

जी तयार हुकुमाकरता

खंदकावरी जरी कोण
आपुले देह टाकून
मज देइल पूल करून ? "

"अंगारो की शयन
बनेगी कुसुमसज्जा
वीरो अपने तन से
सेतुनिर्माण है करना"

विनोदनं आपला वर नेलेला हात झोकात खाली आणला. चुटकी वाजवून त्वेषानं तो म्हणाला -

" निघताच शब्द बाहेर
जन निजले त्यावर चार
त्यांचिया शरिरावरूनी
छावणीत सगळे घुसले

गळे शत्रूचे चिरले

रक्त ते भाले प्याले"

इतक्यात उगवला अरुण
तो गुलाल उधळी वरून

अरुणोदय बस तभी हुआ
केसरिया रंग छाया
स्वाधीनता का भगवा
आस्मान मे लहराया "

रणचंडी व्यक्तीस्वातंत्र्याचा बळी घेत होती....नशा चढत होती. दारूची.... युद्धाची. ....अनिश्चित भूतकाळाची. काल्पनीक इतिहासाची.... ताम्रसुरा प्यालेला नभातला दैत्य माजला... राजकारणाचा राक्षस जास्वंद चुरगाळत होता. सत्ताकारणाचा सैतान नसानसात भिनत होता. मोगरा पिचत होता.

धडपडत विनोद टेबलाजवळ आला शिंदेकडे पहात म्हणाला " माजी आमदारसाहेब .... भावी खासदाराचा पेग भरा "

पेग पाचवा



"विनोदपंत जरा चढलिय तुम्हाला." शिंदेच्या या उद्गारांवर विनोद म्हणाला - " मी कुठला पंत ? मी तर जंत सर... भरा पेग. पण सर खासदार होणारच आपण. कितिपण पैसे खर्च करू. माझा एक काँटॅक्ट आहे मुंबईत. लय भारी टॉप सिक्रेट. तुम्हाला सांगेन नंतर त्याविषयी ... "

पाचव्या पेग ला दोघांनी पुन्हा चिअर्स केलं. थरथरत्या हातांनी ....विनोदने पुन्हा एका दमात ग्लास संपवला आणी तळहाताने ओठ पुसले. कडक स्कॉच जठर जाळत धमन्यांत शिरली...... मेंदूत पसरली. भास. शौर्याचे भ्रम. ....नियतीचे विभ्रम. वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं.

 शिंदे सर बर्फाचे खडे स्कॉच मधे गोल गोल घोळवत होते. विनोदच्या अर्धोन्मलित डोळ्या समोर दिसत होती - वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. स्कॉच चा महाप्रचंड ग्लास. कट्यावर बसावं तसं आपण ग्लासच्या कडेवर बसलोय. बर्फाचे मोठमोठे क्युब दोन्ही हातानी उचलून ग्लासात फेकतोय. त्यामुळे स्कॉच मधे ऊठतायत तरंग - तवंग - वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं. विनोद नी बर्फाचे धोंडे जोरजोरात ग्लासात फेकायला आरंभ केला. आरंभ है प्रचंड, बोले मस्तकों के झुंड । आज जंग की घडी की तुम पुकार दो ॥ धाडड बर्फाचा मोठाला धोंडा नियतीच्या डोक्यात आदळला. आयला .....तिनं तर आधीच त्या वर्तुळात फेर धरला होता. बर्फाच्या खड्याबरोबर नियतीपण ग्लासात वितळून गेली. तिनं विनोदची साथ सोडली.... तशी नियतीन विनोदाची साथ कधीच सोडून दिली होती ....वर्तुळं वर्तुळं वर्तुळं वर्तुळं.


विनोदला गरगरू लागलं. तो उभा राहिला. पाय लटपटत होते. म्हणाला - " मी निघतो सर "

विनोदची पाउलं जिन्याच्या दिशेने पडली. विनोदची धडपडती पावल जिन्यावर वाजत होती. डोक्यात घण वाजत होते. दारूच्या नशेत मुंबईच्या काँटॅक्ट बद्दल बोलण्याची घोडचूक घडली होती. त्याच्या पावलांचा आवाज बंद होइस्तवर शिंदे ग्लासातले खडे घोळवत होते. आवाज बंद झाला. विनोद घराबाहेर पडलाय याची खात्री झाली.

विनोद बाहेर पडत असताना .. नियतीचे मुके डोळे .. त्याकडे हताश विषण्ण पणे......  आणि  साहजिक त्वेषाने बघत होते .. पण त्या डोळ्यात द्वेशापेक्षा करुणाच जास्त दिसली मला ... 


शिंदेनी मोबाईल उचलला. एक नंबर डायल केला. पहिल्याच रिंग ला तिकडच्या व्यक्तीने तो उचलला. - " पोती पोचली ? .... अच्छा, अच्छा. जपून ठेव. फार तर १० दिवस माल पोलिसांपासून लपवून ..... अच्छा, अच्छा. त्यानंतर त्याचा वापर. ..." शिंदेनी प्रसन्न चित्ताने हसत मोबाइल बंद केला. "सोन्या जेवण लाव" शिंदेनी हुकूम सोडला.

*********************************************************************************

दिल्ली - सेंट्रल कमांड ऑफिस 

रामशरण पांड्या साहेबाचे बूट चकाचक पॉलिश करत होता. काटेकोर व्यवस्थितपणाच दुसरं नाव म्हणजे मेजर शीलवर्धन कांबळे . पस्तीस वर्षाचा हा तरणाबांड ऑफिसर. अविवाहित. कारण त्याच पहिलं लग्न झालं होतं घड्याळाशी. दुसरं हातातल्या टॅबलेट पीसी शी. आणी तिसरं लग्न सतत जवळ असणार्‍या एस एल आर कॅमेर्‍याशी. चौथ्या बायकोला द्यायला त्यापाशी वेळ शिल्लक न्हवता.

अव्यवस्थितपणा खपवून घेतला जात नाही हे रामशरणला पक्कं ठावूक होतं.
सकाळी बरोब्बर ६ वाजून तीस मिनिटानी मेजर शिलवर्धन च्या टॅबलेट पीसी चा मॉर्नींग अलार्म भूणभुणत असे. पण त्याआधी एक सेकंद शिलवर्धनचे डोळे उघडलेले असत. तंतोतंत ६:३५ ला रामशरण बेड टी आणून देई. सकाळच्या सहा वाजून पंच्चावन्न मिनिटांनी; मेजर साहेब ब्रेकफास्टच्या टेबलावर हजर असत. तीन उकडलेली अंडी, कडक भाजलेले चार ब्रेड टोस्ट आणी १ मोठा मग भरून स्ट्राँग काळी कॉफी. गेली ३ वर्षे न्याहारीत किंवा वेळेत फरक पडलेला रामशरणने पाहिला न्हवता.

पाच मिनिटाच्या आत ब्रेड आणी अंडी संपलेली असत. त्यापुढचा मोजून अर्धा तास शीलवर्धनची बोटे टॅबलेट पीसी वर फिरत. विविध देशांच्या अनेक वर्तमानपत्रांच्या ई - पेपरचे झपाट्याने वाचन चालू असताना मे़जर ब्लॅक कॉफीचे घुटके घेत राहतो. त्यावेळी आवाज झालेला त्याला खपत नाही हे माहिती असल्याने रामशरण तो अर्धा तास बागेतल्या झाडाना पाणी घाली. साडे सात वाजता टॅबलेट पीसी पुन्हा भुणभुणायचा - त्यावेळी चकाचक पॉलिश केलेले बूट तयार ठेवणे हे रामशरण पांड्याच्या अंगळवणी पडले होते.

मेजर शीलवर्धन बूट चढवून खाड खाड पावले टाकत ऑफिसकडे चालू लागला. चालताना पहिल्यांदा टाच मग चवडा. बरोबर २३५० पावले चालून ; नेहमीप्रमाणे १२ मिनिटात तो ऑफिसला पोचला आणी सकाळी आठ वा़जण्याआधी काही मिनिटे त्याने कामाला सुरुवात केली. बरोबर एक वाजता तो खुर्चीवरून उठला. लंच साठी घरी जायला निघाला. ह्या प्रवासाला मात्र त्याला कधी २० मिनिटे लागत तर कधी एक तास.

वाटेतल्या झाडांचे, फुलांचे, कीटकांचे, दगडधोंड्यांचे फोटो काढत - काढत शीलवर्धन घरी जाई. वर्षानुवर्षे तोच रस्ता, तीच झाडं, तसलेच पक्षी. पण प्रत्येक फोटो मात्र निराळा. कधी छायाप्रकाशाचा खेळ तर कधी ऑब्सर्व्हर्ची जागा बदलेली. कधी ऋतु बदलेला. एकाच दगडाचे किती वेगवेगळे फोटो निघू शकतात हे पहायच असेल तर मेजरसाहेबांच्या घरच्या भिंती पहा ! एकच वस्तू वेगवेगळ्या द्रुष्टीकोनातून पहाणे हा शीलवर्धन चा छंद होता; आणी एकच घटना वेगवेगळ्या अंगाने समजून घेणे हा व्यवसाय ! ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी. अ‍ॅनालिसिस डिपार्टमेंट. इंटलिजन्स ब्यूरो.इंडियन आर्मी . 

हे सगळे फ़ोटो त्याने घरातल्या भीतिंवर फ्रेम करून लावले होते. रामशरण पांड्या ला सक्त ओर्डर होत्या सगळ्या फ़ोटो फ्रेम चकचकीत कायम ठेवणाच्या . त्या सगळ्या फ़ोटो फ्रेम पांड्या रोज साफ ठेवतो .  त्यातल्या एका फोटोचा अर्थ मात्र त्या भय्याला कळत नाही. शिलवर्धन  च्या वडिलांनी दिलेला तो आंबेडकरांचा  फोटो असतो. 

अ‍ॅनालिटिक बुद्धीमत्ता आणी सम्यक निरिक्षणक्षमता या त्याच्या गुणांमुळेच डायरे़क्टर श्रीवास्तवांनी त्याला आय बी त डेप्यूट केला होता. त्याआधी इंडो तिबेटियन रायफल फोर्स मधील त्याच्या कामाबद्दल त्याला, अतिविशिष्ट सेवा पदकानेही गौरवण्यात आले होते.

तो दिसायला काळासावळा, अंग़काठीने किरकोळ तर होताच. पण सैनिकी पेशात आवश्यक अशी .दमबाजी  किंवा      नेमबाजीही त्याला फारशी येत नसे. इंडो तिबेटियन रायफल फोर्स मधे त्याचं काम होतं पकडलेल्या दहशतवाद्याकडून माहिती वदवून घेणे. पण त्यान कधी कुणाला साधी कानफडित सुद्धा मारली नव्हती. दहशतवाद्याच्या मनसिकतेचा व्यवस्थित अभ्यास करून तो त्याला असे काही प्रश्न विचारी, की खच्चीकरण झालेला कैदी धडा - धडा बोलू लागे. मेजर शिलावर्धन कांबळे हा मानसशास्त्राचा अभ्यासक होता .

आज वाटेत एकही फोटो न काढता तो घरी पोचला. डोक्यात विचारांची चक्र फिरत होती. कारण  आजच त्याच्या हातात ट्रान्सफर लेटर पडलं होतं

ड्यु टी पोस्ट : बेळगाव
मराठा लाइट इंन्फेंट्री.

श्रीवास्तव साहेबांनी आपली बदली का केली असावी ? तीही बेळगावला ?

शिलावर्धन च्या हातातला टेब्लेट पीसी खणाणला - श्रीवास्तव साहेबाचा प्रयवेट आयडीवर मेल होता -  

Dear Shilvardhan ,

No more Questions . Two extremist organisations growing in Behelgum.   Report @ Maratha Lite infantry HQ. As False ID .  High command  don't  want communal politics till next election.   Interference , Trojan anything. Stop the nonsense .  Turn around time - 60 days . PDN.

**********************************************************************************************************

त्याच वेळी बेळगावच्या अल निरमा मशिदीत चांद्या पासून बांद्या पर्यंत आणि भटकळ पासून आशमगडपर्यंतचे मौलवी दाखल झाले होते . अहले हदीस  आणि जमाते इस्लामी मधल्या कड्व्यांचि बैठक बसलि होती . आवाज घुमला - नारा ए तकदीर - आलाहु अकबर ...

(क्रमश : )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *