३१ ऑग, २०१५

इसापनीती # कथा पहिली - वटवाघुळ #

इसापनीती # कथा पहिली - वटवाघुळ #
वाघ , सिंह , गाय , डुक्कर याना प्राणि म्हणतात . कावळे , गरुड , पोपट , चिमणी याना पक्षी म्हणतात . प्राणि आणि पक्षी यात कायम भांडणे असतात . त्यांची जमीन एक नाही. हवा एक नाही. पाणि एक नाही. अन्न एक नाही. भक्ष्य एक नाही. लक्ष एक नाही. तरीही ते कायम भांडतात . प्राणि विरुद्ध पक्षी हा सनातन व नित्यनूतन व सार्वकालीन व निष्कारण असा झगडा आहे .
प्राणि विरुद्ध पक्षी या महान संघर्षात वटवाघुळाने कोणाची बाजू घ्यावी ? कधी प्राण्याच्या विरुद्ध तर कधी पक्ष्यांच्या विरुद्ध वटवाघुळ प्रतिध्वनी काढत बसते . कोणत्याच गटात जात नाही .
वटवाघुळे म्हणजे पंख असलेले सस्तन प्राणि . किंवा स्तन उगवलेले पक्षी . किंवा पंख फुटलेले प्राणि . किंवा चोच नसलेले पक्षी . किंवा जमिनीवर न रहाणारे प्राणि . किवा घरटे न बांधणारे पक्षी .
या - पण - किंवा - किंतु - परंतु - मध्ये वटवाघुळ अडकते . त्याला उगीचच वाटते आपण फार फार विचारी आणि तटस्थ आणि साक्षेपि आणि सम्यक आहोत .
" खरेतर ते गंडलेले असते "
त्याला आप्तजन नाहीत .
त्याला मानसन्मान नाही .
त्याला प्राण्यात जागा नाही .
.पक्षात स्थान नाही .
तात्पर्य : वट्वाघुळास निद्रानाश जडतो . ते रात्री बेरात्री जागे राहते . अस्वस्थपणे .
शुभरात्री !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *