tag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post2624362783423182337..comments2023-10-21T16:29:30.890+05:30Comments on माझा देश: चार्वाक नावाचा चमत्कारDr. Abhiram Dixithttp://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-42328459516395331562016-02-28T23:38:58.709+05:302016-02-28T23:38:58.709+05:30चार्वक सारखे विचार पण समाजा साठी ठिक नाही ....चार्वक सारखे विचार पण समाजा साठी ठिक नाही ....Anonymoushttps://www.blogger.com/profile/05807701696570187825noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-66474606620624384362015-12-29T03:23:29.129+05:302015-12-29T03:23:29.129+05:30http://mr.upakram.org/node/1993http://mr.upakram.org/node/1993Dr. Abhiram Dixithttps://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-53550175395797574572015-12-29T03:23:12.703+05:302015-12-29T03:23:12.703+05:30'चार्वाक' या शब्दाचा अर्थ गोड बोलणारा.(चार...'चार्वाक' या शब्दाचा अर्थ गोड बोलणारा.(चारु वाक् यस्य सः|) हे दर्शन म्हणजे 'लोकायत.' बृहस्पतिने रचले आणि चार्वाक इत्यादी शिष्यांद्वारे सगळीकडे पसरविले. यती "कृष्णमिश्र" यांनी लिहिलेल्या प्रबोधचंद्रोदय या नाटकात अगदी सोप्या पद्धतीने या दर्शनाचे विवेचन केले आहे. अन्य अनेक ग्रंथांचा उल्लेख विद्वान् मित्रांनी केला आहेच.<br />त्यांच्या मतानुसार प्रत्य़क्ष हे एकमेव ज्ञानाचे प्रमाण आहे. पंचज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव घेता येतो तेवढेच खरे.. म्हणून आकाश हे महाभूत ते मानत नाहीत. महाभूते चारच-पृथ्वी, आप,तेज आणि वायू. आत्मा मानत नाहीत त्यामुळे अर्थात पुनर्जन्म सिद्धांत मानत नाहीत.श्राद्ध, पक्ष इत्यादी पितरांसाठी करावयाचे विधी त्यांना पटत नाहीत. किंबहुना श्राद्धानिमित्त ब्राह्मण भोजन घालणे म्हणजे खालच्या मजल्यावरच्या व्यक्तीला जेवायला देऊन वरच्या मजल्यावरच्या माणसाला तृप्त करण्यासारखे आहे असे उद्गार त्या दर्शनाचे मत स्पष्ट करताना कोठेतरी वाचल्याचे स्मरते.<br /><br />आत्मा मानणे म्हणजे जे दिसते (शरीर) ते नाही(विनाशी मानणे) आणि जे दिसत नाही(आत्मा) तो आहे(अविनाशी मानणे) असे त्यांचे मानतात. त्यामुळे परलोकही मानत नाहीत. कर्मविपाकसिद्धांतावरही विश्वास नाही, म्हणून ह्या जन्मी जे करायचे ते करून घ्यावे, पुढचा जन्म वगैरे नसतो हे त्यांचे मत आहे.<br /><br />ऋग्वेदाच्या दुसर्या मंडलात इंद्रसूक्ते प्रामुख्यानी आहेत. त्यातील ( २.१२) या सूक्तात 'अदेवयु:' या नावाने उल्लेखिलेले 'इंद्राला न मानणारे' काही लोक असावे असा उल्लेख सायणाचार्यांच्या भाष्यात येतो. हा गट पुढे नास्तिक लोकांचा निर्माण झाला असावा,कदाचित ही चार्वाकदर्शनाची सुरुवात असेल असा अंदाज ऋग्वेदाच्या अनेक अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.Dr. Abhiram Dixithttps://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-8351263246902479232015-12-29T03:22:42.210+05:302015-12-29T03:22:42.210+05:30लोकायत किंवा चार्वाक दर्शन
लोकायत हे बौद्ध आणि जै...लोकायत किंवा चार्वाक दर्शन<br /><br />लोकायत हे बौद्ध आणि जैन दर्शनांसारखेच एक अवैदिक दर्शन आहे. इतर दर्शने वेदप्रामाण्य मानतात वा त्यांना वळसा घालतात पण शक्य तो सरळ टक्कर घेत नाहीत. लोकायताचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेव दर्शन आहे ज्यात वेद, परलोक व देव या तिघांनाही फेटाळून लावले आहे. चेतनावाद हा सर्व धर्मांचा व दर्शनांचा अविभाज्य भाग आहे.शरीर ह्या हाडा-मांसाच्या गोळ्यापेक्षा चेतन जीव हा निराळा आहे हा झाला चेतनावाद. सर्व धर्म चेतनावादावर अवलंबून आहेत व लोकायतने त्यावर तोफ डागली म्हणून सर्वांनीच चार्वाक मतावर कठोर हल्ले केले व त्यातही बुद्ध धर्म आघाडीवर राहिला. याचा एक परिणाम म्हणजे चार्वाक मताचा एकही अधिकृत ग्रंथ वा त्यावरील टीका आतापर्यंत मिळत नव्हत्या. बृहस्पतीसूत्र व जयराशीभट्टाचा तत्वोप्लवसिंह हे अलिकडे उपलब्ध झालेले ग्रंथ एवढेच अपवाद. मग हे दर्शन समजावून घ्यावयाचे तरी कसे?<br />तीही एक गंमतच आहे.विरोधक चार्वाकाचे मत म्हणून एक वाक्य देतात व त्यावर जोरदार टीका करतात. अशी मते एकत्र करावयाची व त्याला म्हणावयाचे लोकायत दर्शन. आता विरोधकांकडून फार सरळपणा (Fairness) अपेक्षित करण्यात अर्थ नाही. उदा. श्री सातारकर यांनी दिलेले व सर्व साधारणपणे सगळ्यांना माहित असलेले<br /><br />"यावज्जीवं सुखं जिवेत् ऋणं कृत्वा धृतं पिबेत्" हे वचन विद्यारण्य़स्वामींनी सोळाव्या शतकातील सर्वदर्शन संग्रहात भोगवादी लक्षण म्हणून दिले. पण मुळात ते नवव्या शतकातील न्यासमंजिरीत असे आहे<br />" यावज्जीवं सुखं जिवेत् नास्ति मृत्युरगोचर:" यात कोठेही भोगवाद नाही. विरोधकावर टीका करावयाची म्हणून विपर्यास केला आहे. असो. आता थोडक्यात दर्शनाचा इतिहास व मते बघू.<br />(१) काल... सुरवात जवळजवळ वेदकालापासूनच. महाभारतातील उल्लेख व पाली बुद्ध वाड:मयामधील टीकेवरून इ.स.पूर्व ५०० नक्कीच.या काळातच उपनिषदांनी वेदांवर टीकेला सुरवात केली होती.<br />(२) मान्यता .. बुद्ध्पूर्व काळामध्ये विद्वान ब्राह्मणांच्या व राजनीतीच्या अभ्यासाचा विषय होता. आश्रमांमध्ये व यज्ञ काळीही चर्चा चाले. समाजात कसे वागावे-दण्डनीतीचा अभ्यास- याचे शिक्षण हा मुख्य उद्देश.<br />(३) आचार्य ... देवगुरु बृहस्पती पासून सुरवात. चार्वाक हा नंतरचा. शक्य आहे कीं चार्वाक ही व्यक्ती नसून पंथ वा उपाधी होती. लोकायत व बृहस्पत्य ही दुसरी नावे.<br />(४) काही सुत्रे<br />पृथ्वी,आप,तेज,वायू ही चार तत्वे; यांच्या संयोगास शरीर,इंद्रिय अशा संज्ञा आहेत, त्यातून चैतन्याची निर्मिती होते.<br />चेतनायुक्त शरीर म्हणजेच पुरूष.<br />प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे.<br />अनुमान प्रमाण नाही ( परलोकाबाबतीत).<br />परलोक नाही.<br />अर्थ व काम हेच पुरूषार्थ आहेत.<br />दण्डनीति हीच एक विद्या आहे व यातच कृषि,गोरक्ष वाणिज्य समाविष्ट आहेत.<br />तीन वेद हा धुर्तांचा प्रलाप आहे.<br />उद्याच्या मोरापेक्षा हातचे कबुतर बरे.<br />(५) काही नित्कर्ष (निरनिराळी मते)<br />हे असूरांचे म्हणजे आर्यपूर्व रहिवास्यांचे (सिंधू संस्कृती?) दर्शन आहे.<br />याची सुरवात सांख्य व तंत्रापासून झाली.<br />हे लोकायत म्हणजे लोकांचे दर्शन असल्याने राजसत्तेने ते दडपून टाकले.<br />उत्पत्ती पूर्व मिमांसेपासून झाली.<br />अर्वाचिन अब्यासाचा मूलस्त्रोत म्हणजे श्री देविप्रसाद चटोपाध्याय यांचा इंग्रजी ग्रंथ Lokaayat. या<br />वरून मराठीत गाडगीळ, आठवले, कुरुंदकर, साळुंखे थिटे इत्यादींची पुस्तके. देविप्रसाद व हे बहुतेक सर्व वामपंथी विचारसरणीचे.<br />Dr. Abhiram Dixithttps://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-28516490102862645712015-12-29T03:21:52.970+05:302015-12-29T03:21:52.970+05:30माधवाचार्यांच्या चौदाव्या शतकातील "सर्वदर्शनस...माधवाचार्यांच्या चौदाव्या शतकातील "सर्वदर्शनसंग्रहा"मध्ये लोकायताविषयी पुढील उतारा आला आहे :<br /><br />तदेतत्सर्वं बहस्पतिनाप्युक्तम् -<br />तर हे सर्व बृहस्पतीनेही म्हटले आहे<br /><br />न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिकः ।<br />नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिकाः ॥१॥<br />स्वर्ग नाही, मोक्ष नाही, पारलौकिक असा आत्माही नाही,वर्ण, आश्रम आदींची कर्मकांडे फळ देणारी नाहीच नाही.<br /><br />अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम् ।<br />बुद्धिपौरुषहीनानां जीविका धातृर्मिता ॥२॥<br />अग्निहोत्र, तीन वेद, त्रिदंड (साधूंची क्रिया), शरिराला राख फासणे - बुद्धी आणि पौरुष नसलेल्यांच्या उपजीविकेसाठी विधात्याने (या सर्व गोष्टी) निमाण केल्या आहेत.<br /><br />पशुश्चेन्निहतः स्वर्गं ज्योतिष्टोमे गमिष्यति ।<br />स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते ॥३॥<br />ज्योतिष्टोम यज्ञात मारलेले जनावर जर स्वर्गात जाते, तर यजमान स्वतःच्या पित्यालाच का मारत नाही?<br /><br />मृतानामपि जन्तूनां श्राद्धं चेत्तृप्तिकारणम् ।<br />निर्वाणस्य प्रदीपस्य स्नेहः प्रज्ज्वलयेच्छिखाम् ॥४॥<br />मेलेल्या जिवांची तृप्ती जर श्राद्धाद्वारे होऊ शकत असेल, तर तुपाने विझलेल्या दिव्याची ज्योतही मोठी होईल.<br /><br />गच्छतामिह जन्तूनां व्यर्थं पाथेयकल्पनम् ।<br />गेहस्थकृतश्राद्धेन पथि तृप्तिरवारिता ॥५॥<br />येथे प्रवासाला जाणार्या जगणार्या लोकांसाठी शिदोरी बनवणे व्यर्थ म्हणावे - घरच्याघरी केलेल्या श्राद्धाने आयतीच रस्त्यात तृप्ती होईल.<br /><br />स्वर्गस्थिता यदा तृप्तिं गच्छेयुस्तत्र दानतः ।<br />प्रासादस्योपरिस्थानामत्र कस्मान्न दीयते ॥६॥<br />दानामुळे स्वर्गात असलेल्यांची तिथल्या तिथे तृप्ती होत असेल, तर इमारतीत वरच्या भागात राहाणार्यांसाठी अन्न येथे (खाली) अन्न का देत नाहीत?<br /><br />यावज्जीवेत्सुखं जीवेदृणं कृत्वा घृतं पिबेत् ।<br />भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ॥७॥<br />जोपर्यंत जगावे, सुखाने जगावे, कर्ज घेऊन तूप प्यावे. राख झालेल्या देहाचे पुन्हा येणे कुठचे?<br /><br />यदि गच्छेत्परं लोकं देहादेव विनिर्गतः ।<br />कस्माद्भूयो न चायाति बन्धुस्नेहसमाकुलः ॥८॥<br />देहच सोडून गेलेला जर परलोकात जात असेल, तर नातलगांच्या जिव्हाळ्यामुळे तो वारंवार परत का येत नाही?<br /><br />ततश्च जीवनोपायो ब्राह्मणैर्विहिस्त्विह ।<br />मृतानां प्रेतकार्याणि न त्वन्यद्विद्यते क्वचित् ॥९॥<br />तर उपजीविकेसाठी ब्राह्मणांनी उपाय सांगून दिले आहेत, नाहीतर येथे मेलेल्यांसाठी प्रेतकार्ये कदापी अस्तित्वात नसती.<br /><br />त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचराः ।<br />जर्भरीतुर्फरीत्यादि पण्डितानां वचः स्मृतम् ॥१०॥<br />वेदांचे कर्ते भंड, धूर्त, आणि निशाचर आहेत. जर्भरी, तुर्फरी, वगैरे (निरर्थक) बोल पंडितांकडून ऐकल्याचे आठवतच असेल.<br /><br />अश्वस्यात्र हि शिश्नं तु पत्नीग्राह्यं प्रकीर्तितम् ।<br />भण्डैस्तद्वत्परं चैव ग्राह्यजातं प्रकीर्तितम् ।<br />मांसानां खादनं तद्वन्निशाचरसमीरितम् ॥११॥<br />(अश्वमेध यज्ञात) पत्नीने घोड्याचे शिश्न घ्यावे हे माहीतच आहे. (आणखी) याहून वेगळ्या गोष्टी घ्याव्यात असे भंडांनी सांगितलेलेही प्रसिद्ध आहे. त्याच प्रमाणे मांस खाण्याचे विधीही निशाचरांनी निर्माण केलेले आहेत.<br /><br />- - -<br />स्रोत : "चार्वाकमंथन" परामर्श ग्रंथमाला, तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, २००१.Dr. Abhiram Dixithttps://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-77268070378165795622015-12-27T17:50:21.828+05:302015-12-27T17:50:21.828+05:30माझी अशी धारणा होती कि चार्वाक हा कोणी एकच इहवादी ...माझी अशी धारणा होती कि चार्वाक हा कोणी एकच इहवादी विचारवंत भारतात होऊन गेला. सदर चार्वाकाचे लेखन उपलब्ध नाही, केवळ त्याच्या चिचारांचे नंतरच्या काळात इतरांनी केलेले उल्लेख उपलब्ध आहेत असेही माझ्या वाचनात आले होते.<br />परंतु, आपल्या लिखाणावरुन असे दिसते कि, इहवादी विचार परंपरा शतकानुशतके चालु राहिली होती व त्या इहवादी, विञानवादी परंपरेतील सर्वांनाच चार्वाक म्हणता येईल.<br />RAJMACHI CAMPINGhttps://www.blogger.com/profile/10238950830799561267noreply@blogger.com